Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 05, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through July 05, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Tuesday, July 03, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

But Acharya Dharmendra, a priest, rejected any such link.

"There is no tradition of sati in Hindu religion, but there are examples of sacrifices where women died along with their husbands," he said

This is from your own link Kulkarni. You are giving wrong artical as proof.
मग जो माणुस असे सांगतो की ही हिंदु धर्माची प्रथा नाही. तो तिचा प्रचार करतो असे कसे म्हनता येईल. तो तिथे होता हे चुक पण तो प्रचार करतो म्हनजे जरा जास्तच.
त्यातच लिहीले आहे की ही प्रथा ७०० वर्षा पुर्वी सुरु झाली, (बिबीसी लिहीते म्हण्जे खरेच पाहीजे नाही का? मी आधी लिहीले की गेल्या १००० वर्षापुर्वीची ही प्रथा आहे. आता तुम्हीच गणित करा. गेल्या ७ ते ८०० वर्षात पुर्ण उत्तर भारतावर कोण राज्यकर्ते होते व त्यांनी काय जुलुम केले ते. मग अशा प्रथा त्या कालातील स्तिथी मुळे लादल्या, निर्मान झाल्या हे मान्य करा की राव.

(बर मी अजुनही हिंदुनी ७ ते ८ दशक मुसलमांनावर काय अत्याचार केले याची वाट पाहात आहे).

हिंदु मुस्लीम टॉपीकमध्ये आता चर्चा करन्यासार्खे काही राहीले नाही तरी पण दरवेळी काही तरी ठुसकी सोडायची अन मग परत लोक त्यावर चर्चा करत राहातात.

परत एकदा लिहीतो सध्याच्या माहीतीवर जे लोक हिंदु धर्माला नाव ठेवतात त्यांचासाठी.

गेल्या ८०० ते १००० वर्षात सतत च्या परकिय आक्रमनांमुळे अनेक वाईट प्रथा आपल्या धर्मात चालु झाल्या त्या मुळ धर्मात नाहीत व आता त्या परत कालबाह्य होत आहेत कारण आता कोणी आपल्यावर आक्रमन करत नाहीय, आपण स्वत त्या घटना सोडुन देत आहोत. त्याला थोडा वेळ लागेलच.

टिका करन्याआधी निदान धर्म समजावुन घ्या मग अनेक गोष्टी आपोआपच स्प्ष्ट होतील.


Mahaguru
Tuesday, July 03, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इ-सकाळ मधली बातमी "मुख्यमंत्री विलासराव यांचा शिकागोमध्ये सत्कार": कशाकरिता हा सत्कार? असा काय यांनी (यात सगळे राजकारणी लोक आले) दिव्य काम केले आहे?

Maasture
Tuesday, July 03, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक करण्याचा प्रयत्न वाचला. पण श्रद्धा म्हटली की ती अंधच असते ना ?
I think the word अंधश्रद्धा is an oxymoron in that respect.


Satishmadhekar
Tuesday, July 03, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी,

लिंक्स दिल्याबद्दल धन्यवाद. वर केदार जोशींनी आपल्याच लेखाचा संदर्भ देऊन आचार्य धर्मेंद्र महाराजांनी सतीला पाठिंबा दिलेला नाही हे स्पष्ट केले आहे.

आणि सतीस्थळावरच्या धार्मिक समारंभाचं म्हणाल तर त्याने सती जाण्याला पाठिंबा आहे असं काही आपण म्हणू शकत नाही. तसं असतं तर तिथे जाऊन प्रार्थना करणार्‍यांच्या घरच्या बायका सती गेल्या असत्या आणि राजस्थानात आपल्याला दरवर्षी किमान १५-२० सती प्रकरणे ऐकायला मिळाली असती.

भारतात देवमूर्ती नसलेल्या अनेक ठिकाणी धार्मिक समारंभ केले जातात. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीला दरवर्षी पुरोहित बोलावून अनेक नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला जातो. अनेक दिवंगत पुढार्‍यांच्या जयंती / पुण्यतिथीला हारतुरे वाहिले जातात. प्रतापगडावरच्या अफजलखानाच्या कबरीला आणि संभाजीनगरमधल्या औरंगजेबाच्या कबरीला रोज हारतुरे चढवून ऊद जाळला जातो. सती मंदीरातल्या धार्मिक समारंभाला इतकाच अर्थ आहे.

आचार्य धर्मेंद्र यांनी सती प्रथेला पाठिंबा दिलेला नाही हे स्पष्ट झालेले आहे. भारतातून ही प्रथा केव्हाच लोप पावलेली आहे. क्वचित १५-२० वर्षातून एखादा असा प्रकार घडत असल्यास (शेवटचे सती प्रकरण १९८७ मध्ये झालेले होते) तो अपवाद समजला पाहिजे.

सतीला हिंदू संघटना पाठिंबा देतात हा खोटा प्रचार बंद झाला पाहिजे. जर त्यांचा खरोखरच पाठिंबा असता तर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या बायका सती गेल्या असत्या.


Marhatmoli
Tuesday, July 03, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी congress ला Support आणि म्हणुन BJP ला विरोध करत नाहि. पण वरचि बातमि वाचुन मला एक basic प्रश्ण पडला कि जर मुळात सतिप्रथा हि इस्लामि आक्रमणाचा परिपाक आहे तर आजच्या काळात हि प्रथा अप्रस्तुत असुन रुपकुंवर च सति जण हे बेकायदेशिरच नाहि तर धर्मच्या हि विरुध्ध (मुळ धर्मात तस काहि सांगितल नसल्यामुळे) आहे. त्यामुळे मंदिर वगैरे बांधण्याचा प्रश्नच उद्भवत नाहि अस आचार्य धर्मेन्द्र किंवा विजयाराजे का सांगत नाहित?

Svsameer
Tuesday, July 03, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरू
इथे लोकाना हिंदु आणि मुस्लिम हे सोडुन बाकि काहि लिहायचं नाही आहे. तेव्ह तुझ्या बातमीत थोड बदल करुन "विलासरावांचा शिकागोत मुस्लिमांकडुन सत्कार" असा कर म्हणजे बघ सगळे कसे लिहायला लागतील ते.


Vijaykulkarni
Tuesday, July 03, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या ७ ते ८०० वर्षात पुर्ण उत्तर भारतावर कोण राज्यकर्ते होते व त्यांनी काय जुलुम केले ते. मग अशा प्रथा त्या कालातील स्तिथी मुळे लादल्या, निर्मान झाल्या हे मान्य करा की राव

चला, हिन्दु धर्मातल्या सर्व वाईट गोष्टीना मुस्लीम जबाबदार आहेत असा एक ठराव पारीत करूयात का?


There is no tradition of sati in Hindu religion, but there are examples of sacrifices where women died along with their husbands,"

do you really support this?
if there was no tradition why did raaja raam mohan roy fight?




Kedarjoshi
Tuesday, July 03, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, हिन्दु धर्मातल्या सर्व वाईट गोष्टीना मुस्लीम जबाबदार आहेत असा एक ठराव पारीत करूयात का?>>>>>
हा हा हा. सायबा मी सति, बायकांना पुर्षांसारखे स्थान न देने, स्त्री शिक्षन वैगरे ला नक्कीच आक्रमन जबाबदार आहे असे म्हणतोय. तुम्ही तो ठराव पारित केला काय नी नाही काय त्यामुळे ईतिहास बदलत नाही.

There is no tradition of sati in Hindu religion, but there are examples of sacrifices where women died along with their husbands,"
>>>.

Per our text books there is no tradiion but in those later years some unethical things started like that of Sati.
And our text books are far far older then just 1000 years. That what I am trying to say here.

त्याच राजस्थानात जोहार करने ही पण एक प्रथा होती. ती आपल्याला माहीती असेल्च का का जोहार करायचा?
पण नंतरच्या काळात अकबर व ईतर राजांशी स्नेह जोडाय साठी स्पर्धा लागली पण ती प्रथा बंद झाली.

आणि जोहार मध्ये एकापेक्षा अनेक बायका आगीत उडी घ्यायच्या. ते पण एक प्रकारचे सती जाने नाही का?

if there was no tradition why did raaja raam mohan roy fight?>>>>.

Again that tradition started only some few hundred years ago, during muslim invesion and continued until now.

काय व्हायच की मुस्लीम लोक आक्रमन करायचे. त्यात बरेचदा पराभव व्ह्यायचा. मग सैनीकांचा बायकांना बंदी बनविने पळविने यात चढाओढ लागायची. काही जन जोहार करायचे काहींना बळजबरी जाळुन टाकले जायचे. नंतर नंतर मात्र मेला नवरा की जाळ बायको ही घान प्रथा सुरु झाली. ती प्रथा मात्र गेल्या १००० वर्षांची आहे हेच केव्हा पासुन मी सांगतोय. ते सम्हाउ आपण मान्य करत नाही आहात.

सतिप्र्थेचा ईतीहास आपण वाचुन काढाव ही नम्र विनंती. मी सतिप्रथेचे समर्थन करत नाहीय पण ती का सुरु झाली हे सांगन्याचा प्रयत्न करत आहे. ती बंद व्ह्याय्ला पण उशीर झाला. अशा अन्के प्रथा काढुन टाकायला पाहीजेत.




Uday123
Tuesday, July 03, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील अनेक पोस्ट वाचुन, सती प्रथे विषयक, केदार यांच्या मताशी मी सहमत आहे. रोग आणि ईलाज पैकी काय भयंकर आहे हे सांगणे कटीण जाते.



Kedarjoshi
Tuesday, July 03, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद उदय

महागुरू
इथे लोकाना हिंदु आणि मुस्लिम हे सोडुन बाकि काहि लिहायचं नाही आहे. तेव्ह तुझ्या बातमीत थोड बदल करुन "विलासरावांचा शिकागोत मुस्लिमांकडुन सत्कार" असा कर म्हणजे बघ सगळे कसे लिहायला लागतील ते>>>>>
समिर तुझ बरोबर आहे ईथे वाजवी पेक्षा जास्त मुस्लीम हिंदु चर्चा होत आहे. अन प्रत्येक चर्चा तिकडेच नेन्या चा लोकांचा कल आहे.

पण तु देखील पोस्ट मध्ये मुसल्मानांकडुन सत्कार हे वाक्य न टाकन्याचा मोह का टाळला नाहीस.

लॉजीकल रितीने मांडलेला मुद्दा लोक मान्यच करत नाहीत. (वर सति प्रथेचे प्रत्येक पोस्ट) नी बरेचदा च्यायला ही प्र्त्येक पोस्ट ला हिंदुत्वा कडे नेतो वा कुलकर्णी काहीतरी वाक्य टाकतात त्यामुले हिंदु मुस्लीम चर्चा चालुच राहाते.

वर ते मुंबई चे पोस्ट टाक्ल्यावर मला वाटल लोक बदलतील पण नाही परत तेच.


Asami
Tuesday, July 03, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लॉजीकल रितीने >> इथे मला तरी एकच logic दिसते रे.
1 != 2 and 1 != 3 implies 2 = 3


Deshi
Tuesday, July 03, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.cnn.com/2007/WORLD/europe/07/03/uk.doctors/index.html
.. .. ..

Chyayla
Tuesday, July 03, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार जर मी प्रत्येक गोष्ट हिन्दुत्वाकडे नेतो असे जरी मानले आणी तुम्ही कोणीही (वैयक्तिक नका घेउ) ते नेत नाही तरी मग तुमचही कोणतच लॉजिक का मानल्या जात नाही ईथे ईतर सगळ्यानीच सम्जावायचा प्रयत्न केला पण तरी बीनबुडाचे आरोप येतच आहेत ना?

त्यातल्या त्यात अगदीच बीनबुडाचे आरोप, चिखल उडवण्याचा प्रयत्न सुनिल यान्नी केलाच आणी आता परत उत्तर द्यायची वेळ आली तर त्यान्चा कुठे मागमुसही नाही. आणी परत काही दीवसानी तेच प्रकार खात्रीने सुरु करतीलच.

असो माझे सगळे पोस्ट प्रतिक्रियात्मक आहेत Pseudo secularist Fanaticism च्या द्वारे जो अपप्रचार केल्या जातो त्याला उत्तर मिळणारच ना मग त्यात उत्तर देण्यार्यावर दोश नसावा ना. आणी अर्थातच ढोन्गी धर्मनिरपेक्षता, एकतर्फ़ी पोस्टला उत्तर देताना हिन्दुत्वाचा मुद्दा येतोच. मला तरी हिन्दु, हिन्दुत्व (धार्मिक उन्माद नव्हे) देश या शब्दान्ची लाज वाटत नाही नेहमी अभिमानच वाटेल. शिवाय ही उत्तर द्यायची जबाबदारी माझीच आहे असेही मी मानत नाही पण माझ्या कडुन एक तुमच्यासारखाच सामान्य वाचक, लेखक व मायबोलीकर म्हणुन प्रयत्न करतो एवढेच.. कदाचित हा प्रयत्न जास्त झाला असेल असे वाटते माझ्या पोस्टवर अजुन नियन्त्रण ठेवायचा प्रयत्न करेल.

मी तरी एक बाजु प्रामाणिकपणे मान्डतोय केवळ बीनबुडाचे आरोप तरी करत नाहीये हे कृपया लक्शात घ्यावे. पण जे बाजु, मुद्दे न मान्डता केवळ वाद (चर्चा नाही) घालताहेत त्यान्च्याशी चर्चा अशी वळणे घेणारच असे नाही का वाटत.

जिथे कुणी Fanatic विचार मान्डत आहे असे वाटले तिथेही टोकले आहे "सगळे मुस्लिम हे शत्रु", "बाटला", "सुंता" असे शब्द वापरण्यारानाही समजावले व त्यान्नीही विनन्तीचा मान राखुन असे शब्द त्यापुढे काढले नाहीत यासाठी त्या सगळ्या मित्रान्चे आभार मानतो.

असामीनीही एक चर्चा सुरु केली Global warming त्यात हिन्दु सन्घटनाही दुरान्वयाने का होइना जोडुन दील्याच, Svsameer चे नेहमीच एकतर्फ़ी व अतिशय Biased पोस्टही वाचण्यात आली आहेत अगदी तुम्हीच म्हटल्याप्रमाणे त्यानाही हिन्दु-मुस्लिम असा शब्द घालायचा मोह आवरला नाही, पण त्यानीही विजय प्रमाणे कधीच बाजु मान्डली नाही. असो मला कोणाचे दोष काढायचे नाहीत वरील सगळे सन्दर्भ उदाहरण म्हणुन दीले आहेत. सगळ्यात महत्वाचे लालभाईना ज्यान्च्यापासुन याची सुरुवात झाली त्याना विसरुन कसे चालेल.

असो तुमचे सती विषयक विचार मलाही मान्य आणी केवळ तुमचेच विचार मी वेगळ्या शब्दात मागच्या पोस्ट मधे मान्डले आहेत. अगदी ईतिहासावर आधारीत आहेत कोणत्याही पार्टी बेसवर नाही.

असो माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफ़ी मागतो आणी त्यात मला लाज नाही कारण सगळेच आपलेच आहेत भलेही विचारात फ़रक असो पण V&C वर प्रामाणिक चर्चा चालु रहावी हा माझा आग्रह सगळ्यानाच राहील... मी माझ्या कडुन स्पष्टीकरण दीले. त्यात कुणाबद्दलही कशाचाही वैयक्तिक राग वैगेरे माझ्या मनात नाही.

चु. भु. दे. घे.









Asami
Tuesday, July 03, 2007 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पण तु देखील पोस्ट मध्ये मुसल्मानांकडुन सत्कार हे वाक्य न टाकन्याचा मोह का टाळला नाहीस. >>मला कोणीतरी svsameer चा मुद्दा मुसलमान शब्द न वापरता लिहून दाखवा रे please :-)

Vijaykulkarni
Tuesday, July 03, 2007 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"विलासरावांचा शिकागोत यवनान्कडून सत्कार"

:-) :-) :-)


Deshi
Tuesday, July 03, 2007 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी

अहो यवन म्हनजे मुसलमान नव्हेत. (शब्दाची व्युत्पत्ती न वाद घालता पाहाने.)

Vijaykulkarni
Wednesday, July 04, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sanjay dutt
why should Police hold umbrella for Sanjay dutt?


Ajjuka
Wednesday, July 04, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीप्रथेबद्दल....
मूळ हिंदू धर्मग्रंथात, मनुस्मृतीतही ह्या गोष्टी नाहीत. साधारण १०-११ व्या शतकाच्या सुमारास याज्ञवल्क्यस्मृतीचा(मनुस्मृती वरील टिका आहे. टिका याचा अर्थ निंदा असा नसून indology मधे टिका चा अर्थ संशोधनपर लिखाण असा होतो.) प्रभाव वाढला होता. त्यामधे स्त्रीयांच्या स्वातंत्र्यावर जाचक बंधने, कर्तव्यात्-पातिव्रत्याच्या संकल्पनेत अवास्तव आणि अमानुष गोष्टींचे महत्व वाढले. याला त्याच सुमारास सुरू झालेली मुस्लिम आक्रमणेही जबाबदार आहेत. या आक्रमणांच्यामुळे सुरक्षितता ह्या मुद्याखाली स्त्रिया अजून बंधनात गेल्या.
हे माझे मत बित नसून
डॉ. शारदा देशमुख यांच्या 'शिवकालीन व पेशवेकालीन स्त्रीजीवन' या पुस्तकात वाचलेले आहे. भारतीय इतिहास आणि त्यातील स्त्रियांचे स्थान या संदर्भातील अभ्यासाच्याबाबतीत डॉ. देशमुख या एक महत्वाच्या विदुषी मानल्या जातात. अधिक माहितीसाठी हे पुस्तक वाचा. पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ग्रंथालयात आहे. तिथले सभासदत्व मिळणे हेही अगदी सोप्पे आहे.


Satishmadhekar
Thursday, July 05, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> why should Police hold umbrella for Sanjay dutt?

भारतात व्यक्तीपूजेचे स्तोम फार पूर्वीपासून आहे. म्हणूनच गांधी घराणे, माधवराव शिंद्यांचे घराणे, करूणानिधी, जयललिता, अमिताभ बच्चन, रजनीकांत, एम. जी. रामचंद्रन, शरद पवार इ. लोकांना देवस्वरूप प्राप्त झालेले आहे.

त्याचप्रमाणे अधिकार्‍यांची, वरिष्ठांची, जुन्या राजेराजवाड्यांची हांजीहांजी करणे ही भारतीयांची जुनी खोड आहे. संस्थाने १९४७ मध्ये बरखास्त झाली. संस्थानिक, राजेमहाराजे वगैरेंचे अधिकार केव्हाच संपले. परंतु अजूनही कोल्हापूर आणि सातार्‍याच्या शिवाजी महाराजांच्या वारसांचा उल्लेख राजे, महाराज, छत्रपती असा केला जातो. वर्तमानपत्रे सुद्धा यात मागे नाहीत. संजय दत्त लोकप्रिय कलाकार. हे भांडवल सुद्धा दैवीस्वरूप प्राप्त व्हायला पुरेसे आहे. त्यातून त्याचे वडील पुढारी होते तर बहीण कॉंग्रेसची म्हणजेच सत्ताधारी पक्षाची खासदार. अशा थोर माणसाची सेवा करण्याचे पुण्य पोलिसमामा कसा सोडेल?


Sanghamitra
Thursday, July 05, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> why should Police hold umbrella for Sanjay dutt?
हा काय प्रश्न झाला? तो अर्धा मुस्लिम नाही का? म्हणून.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators