|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through May 10, 2006 | 20 | 05-10-06 9:43 pm |
  | Archive through July 23, 2006 | 20 | 07-23-06 9:15 pm |
  | Archive through August 01, 2006 | 20 | 08-01-06 1:40 pm |
  | Archive through August 04, 2006 | 20 | 08-04-06 2:58 pm |
  | Archive through August 06, 2006 | 20 | 08-06-06 6:07 pm |
  | Archive through August 07, 2006 | 20 | 08-08-06 3:38 am |
  | Archive through August 11, 2006 | 20 | 08-11-06 9:40 pm |
  | Archive through August 22, 2006 | 20 | 08-22-06 9:08 am |
  | Archive through August 24, 2006 | 20 | 08-24-06 10:55 pm |
  | Archive through November 09, 2006 | 20 | 11-09-06 5:22 pm |
  | Archive through December 12, 2006 | 20 | 12-12-06 9:27 pm |
  | Archive through December 22, 2006 | 20 | 12-22-06 12:25 pm |
  | Archive through February 03, 2007 | 20 | 02-03-07 2:08 pm |
  | Archive through February 10, 2007 | 20 | 02-11-07 3:00 am |
  | Archive through May 14, 2007 | 20 | 05-14-07 11:50 pm |
  | Archive through May 21, 2007 | 20 | 05-21-07 9:03 am |
  | Archive through May 29, 2007 | 20 | 05-29-07 4:28 pm |
  | Archive through May 31, 2007 | 20 | 05-31-07 6:28 am |
  | Archive through May 31, 2007 | 20 | 05-31-07 5:07 pm |
  | Archive through June 01, 2007 | 20 | 06-01-07 9:04 pm |
  | Archive through June 03, 2007 | 20 | 06-03-07 3:46 pm |
  | Archive through June 04, 2007 | 20 | 06-04-07 11:33 pm |
  | Archive through June 06, 2007 | 20 | 06-06-07 8:56 pm |
  | Archive through June 07, 2007 | 20 | 06-07-07 2:55 pm |
  | Archive through June 09, 2007 | 20 | 06-09-07 4:15 am |
  | Archive through June 09, 2007 | 20 | 06-09-07 7:03 pm |
  | Archive through June 11, 2007 | 20 | 06-11-07 3:02 pm |
  | Archive through June 12, 2007 | 20 | 06-13-07 1:33 am |
  | Archive through June 13, 2007 | 20 | 06-13-07 9:37 pm |
  | Archive through June 14, 2007 | 20 | 06-14-07 4:15 pm |
  | Archive through June 15, 2007 | 20 | 06-15-07 7:28 pm |
  | Archive through June 18, 2007 | 20 | 06-18-07 9:08 am |
  | Archive through June 20, 2007 | 20 | 06-20-07 7:46 am |
  | Archive through June 21, 2007 | 16 | 06-22-07 3:37 am |
  | Archive through June 23, 2007 | 9 | 06-23-07 8:43 pm |
  | Archive through June 25, 2007 | 20 | 06-25-07 9:52 pm |
  | Archive through June 27, 2007 | 20 | 06-27-07 5:17 am |
  | Archive through June 28, 2007 | 20 | 06-28-07 7:26 am |
  | Archive through June 29, 2007 | 20 | 06-29-07 11:13 pm |
  | Archive through July 01, 2007 | 20 | 07-01-07 8:28 am |
  | Archive through July 03, 2007 | 20 | 07-03-07 1:01 pm |
  | Archive through July 05, 2007 | 20 | 07-05-07 5:43 am |
  | Archive through July 06, 2007 | 20 | 07-06-07 5:41 pm |
  | Archive through July 09, 2007 | 20 | 07-09-07 7:03 am |
  | Archive through July 11, 2007 | 20 | 07-11-07 2:28 pm |
  | Archive through July 13, 2007 | 20 | 07-13-07 5:53 am |
  | Archive through July 13, 2007 | 20 | 07-13-07 1:37 pm |
  | Archive through July 16, 2007 | 20 | 07-16-07 7:24 am |
  | Archive through July 18, 2007 | 20 | 07-18-07 11:27 pm |
  | Archive through July 20, 2007 | 19 | 07-20-07 3:53 pm |
  | Archive through July 22, 2007 | 20 | 07-22-07 4:00 am |
  | Archive through July 24, 2007 | 12 | 07-24-07 8:51 pm |
  | Archive through July 30, 2007 | 20 | 07-30-07 12:24 pm |
  | Archive through July 31, 2007 | 10 | 07-31-07 5:55 pm |
  | Archive through August 21, 2007 | 20 | 08-21-07 9:14 am |
  | Archive through October 16, 2007 | 20 | 10-16-07 1:20 pm |
  | Archive through October 28, 2007 | 20 | 10-28-07 6:23 am |
  | Archive through November 01, 2007 | 20 | 11-02-07 12:17 am |
  | Archive through November 06, 2007 | 20 | 11-06-07 1:38 pm |
  | Archive through November 17, 2007 | 20 | 11-17-07 8:39 am |
  | Archive through December 04, 2007 | 20 | 12-04-07 3:52 pm |
  | Archive through December 28, 2007 | 20 | 12-28-07 1:49 pm |
  | Archive through February 22, 2008 | 20 | 02-22-08 5:11 pm |
  | Archive through March 30, 2008 | 20 | 03-30-08 4:36 pm |
  | Archive through April 22, 2008 | 20 | 04-22-08 6:05 pm |
  | Archive through May 05, 2008 | 20 | 05-05-08 11:50 pm |
  | Archive through May 08, 2008 | 20 | 05-08-08 2:43 pm |
Tonaga
| |
| Thursday, May 08, 2008 - 2:47 pm: |
| 
|
Mr. Vajpayee asked why the nation had stopped talking about socialism. "It is in the preamble of our Constitution and is a guiding goal for all parties. For the Bharatiya Janata Party, Gandhian socialism is what we want to achieve and make society free of
|
तुम्हाला म्हणजे तुमच्या वैचारिक गुरु असलेल्या केन्द्राला>>>>>> टोणगा त्याच केंद्रातुन मी ही तयार झालेलो आहे. मला नाही वाटत आम्हाला सरसग्ट गांधीचा विरोध करायला शिकविले. गांधीचा विरोध हा विषय नक्कीच तिथ अभ्यासक्रमाला नाही लोक आपापल्या कुवती नुसार गांधीचा विरोध वा पुरस्कार करतात. गांधी ग्रेट होतेच त्यात वाद नाही आणि म्हणुनच त्यांचा साध्या चुका पण घोड चुका होतात व त्याचा परिनाम सर्वांना भोगावा लागतो. जर साधी चुक महाग पडत असेल तर त्यांचे काही निर्नय विचीत्र होते म्हणुन आपल्याला एकाच वेळेस गांधीना माननारे पण त्याच वेळेस त्यांचा काही निर्नायासांठी विरोध करनारे लोक दिसुन येतात. ( मी त्यातलाच एक). यार तुम्ही ते विकीपिडीयाचा संदर्भ देऊ नका कारण तिथे अभ्यासु व्यक्ती लिहीतात असे नाही. हो पण तुम्ही म्हणता त्यात नक्कीच तथ्य आहे. गांधीनी दिलेले महत्वाचे सल्ले कॉग्रेंसी लोकांनी पाळले असता तर आजचा भारत खरच वेगळा दिसला असता. ते म्हणजे " स्वदेशी, खेड्याकडे चला व कॉग्रेसच वे विघटन " नुसता खेड्याकडे चला ह्या मंत्राचा देखील पुरस्कार केलाअ असता तर आज सर्व स्तरावर समान भारत दिसन्यास मदत झाली असती. ऊलट आज विषमता जास्त आहे. पण साहेबा अगदी तुमच्या कॉग्रेस ने सुध्द्दा गांधीना वापरुनच घेतले त्यांचा तत्वाचा पुरस्कार कुठे केला. ( वाजपेयी, सावरकर, व आम्हा सारखे लोक तर विरोधी पार्टीचेच मग तो विरोध भाजपाने केला तर त्यात काय नवल. आता हेच पाहाना आपले लोक नरशिंगरावानां व मनमोहन सिंगाना अर्थव्यवस्था खुली केल्याचे श्रेय देतात पण त्याच वेळी हे विसरतात की बंदीस्त (मिश्र) अर्थव्यवस्था हे पण कॉग्रेंसची (खास करुन नेहरुंची) भारताला देन आहे ज्यामुळे आपण ५० वर्षे काहीही प्रगती करु शकलो नाही. गांधीना नोटेवर विराजमान केले की त्यांचे काम संपले असे साक्षात कॉग्रेंस मानते नाहीतर गेल्या ६० वर्षात त्यांनी गांधीच्या म्हणन्याप्रमाने सुधारणा घडवुन आणल्या असत्या. अहो उघड शत्रु पेक्षा छुप्या शत्रु ने केलेली हाणि जास्त असते आणि कॉग्रेस पिलावळ ही छुपी शत्रु आहे. (पी ऐस आजकाल मला स्वताला भाजपाचा पण म्हणुन घ्यावे वाटत नाही. तेच नाटक भाजपापण काही अशीं करत असते.) ते जाऊदे. वर लिंब्यांचे पोस्ट पाहून मला चक्कर यायची बाकी राहीली. एकदंरीत लिंब्यांने व्ही ऐन्ड सी वर यायचे ठरविले हे बर केल. वेलकम ब्याक. अन लिंब्या आपल्याल बॉ ती गांधीची गुलाबी नोटच सर्वात जास्त आवडते. (तीच हजाराची) सुभद्रात जेवायला म्हणे आजकाल तेवढी नोट ठेवावी लागते.
|
Uday123
| |
| Thursday, May 08, 2008 - 8:06 pm: |
| 
|
गुलाबी नोटच --- म्हणजे विस रुपये कां? केदार योग्य शब्दात मांडले, तुमचे नाव good बुकात आहे म्हणुन अभिनंदन. खेड्याकडे चला हा बापुजींचा मंत्र थोडाफ़ार जरी अमलात आणला असता तरी आजच्या काही समस्यांची दाहकता (शहरांची बेसुमार होत असणारी वाढ) नक्कीच कमी झाली असती.
|
मग ती हजाराची गुलाबी की भगव्या. छ्या ईतके गांधी झालेत की नोटा ओळ्खता येत नाहीत आता. तुमचे नाव good बुकात आहे म्हणुन अभिनंदन >>>. उदय गुड बुक, ब्याड बुक व्यक्तीपरत्वे बदलते त्यामुळे ईतका लोड नको घेऊ. टोणग्याला हे म्हणायचे होते की विचार दोन्ही बाजुने करुन आपली भुमीका घ्यावी.
|
वेळी हे विसरतात की बंदीस्त (मिश्र) अर्थव्यवस्था हे पण कॉग्रेंसची (खास करुन नेहरुंची) भारताला देन आहे ज्यामुळे आपण ५० वर्षे काहीही प्रगती करु शकलो नाही. स्वातन्त्र्यानन्तर नेहरुनी विचारपुर्वक मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. सम्पूर्ण भान्डवलशाही किन्वा साम्यवाद यान्चा तो सुवर्णमध्य होता. आज झालेल्या प्रगतीचा पाया त्यामुळेच रचला गेला असे म्हणता येयील. एक साधे उदाहरण, माझ्या लहानपणी अत्यन्त गरीब घरातील मुले सुद्धा डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू शकत होती. खूप परिश्रम करून एकदा का सरकारी कोलेज मध्ये प्रवेश मिळवला कि बाकी सारे सुरळीत असे. आज ते तितकेसे सोपे नाही. अर्थात एकदा का मुसलमानान हाकलले की आपल्या देशातुन पुन्हा सोन्याचा धूर निघु लागेल असे साधे भोळे अर्थशास्त्र माननाण्याना हे पटणार नाही.
|
अर्थात एकदा का मुसलमानान हाकलले की आपल्या देशातुन पुन्हा सोन्याचा धूर निघु लागेल असे साधे भोळे अर्थशास्त्र माननाण्याना हे पटणार नाही. >>>> तुम्ही काढलेले निष्कर्ष माझे मत म्हणुन खपवु नका. मी कधीही असे म्हणले नाही की त्यांना काढले की सोन्याचा धुर निघेल. ऊलट आता पर्यंत तुम्ही जे बेसलेस विधाने करता ते मी व माढेकर नेहमी व्यवस्थित खोडुन काढतो व तुम्ही काही दिवसांसाठी निवृती घेता. आता तुमच्या मुद्दा. मेडीकल व ईंजीनिअरींगला सरकारा ग्रांट देते त्याचा कुठली अर्थव्यवस्था आहे याचा काहीही संबंध नसतो. अमेरिकेत भांडवली अर्थव्यवस्था असुनही पब्लीक स्कुल सिस्टीम आहे. सर्व प्राथमिक व बरेचसे माध्यमिक शिक्षन मोफत मिळते. मग तुमच्या तर्कानुसार अमेरिकेत साम्यवादी व्यवस्था आहे काय? आतापर्यंत भारत सरकार भरपुर ग्रांट देत होते आता ती काही प्रमानात कमी केली त्यामुळे फिस वाढली हिच वस्तुस्तिथी आहे यात मिश्र वा भांडवल याचा काहीही फरक नसतो. १९५२ च्या पंचवार्षीक योजने अंतर्गत अनेक सरकारी कारखाणे स्थापन केले गेले. या मागचा उद्देश कंपनीला फायद्यात आणन्यापेक्षा मोठ्या प्रमानावर रोजगार निर्मीतीच असल्यामुळे अनस्कील वर्कर भरले गेले पर्यायाने पुढच्या ७ ते ८ वर्षात ह्या कंपन्या पांढर्या हत्ती झाल्या व अनेक कंपन्या बंद केल्या गेल्या. रोजगार निर्मीती हा उद्देश चांगले व्यवस्थापण आणुन देखील साध्य झाले असते पण तसे मात्र झाले नाही कारण त्यासाठी योग्य ती कॉम्पीटीशन पैदा व्हावी लागते. ऊलट ती कॉम्पीटीशन्च मारली गेली व लायसन्स राज पैदा झाले. नंतर तुमच्या राजीवजींनी ते रद्द केले व त्याचे श्रेय घेतले. म्हणजे आपणच चुका करायचा आपण भरपाई करायची व त्याचे क्रेडीट घ्यायचे ही रणनिती. खुल्या दिलाने जर तुम्ही अर्थव्यवस्था काय असते हे समजु पाहात असाल तर मी आणखी अनेक उदा देऊ शकतो.
|
Arc
| |
| Friday, May 09, 2008 - 5:08 am: |
| 
|
माझ्या लहानपणी अत्यन्त गरीब घरातील मुले सुद्धा डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू शकत होती....कारण त्यान्ची कष्ट करण्याची तयारी असायची. अर्थव्यवस्थेचे ह्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. माझ्या ओळखीत असे कितीतरी doctor engeeneers, class one officers आहेत ज्यानी नादारीवर, part time job करुन शिक्शण घेतले आहे. कुठल्याही आदर्श समाजात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्शण हे सरकारने sponsor करायचे असते आणि उच्च शिक्शणाचा खर्च विद्यार्थ्याने स्वत्: करायचा असतो. जर परवडत नसेल तर कर्ज काढावे आणि कमवायला लागल्यावर ते फ़ेडावे.
|
नेहरुनी भोळसटपणा म्हणा वा मूर्खपणा म्हणा करून अनेक उद्योग सरकारद्वारा चालवायला घेतले आणि पैशाचा, मालमत्तेचा बट्ट्याबोळ केला. स्टील, अल्युमिनम, कोळसा, वीज एवढेच काय पंचतारांकित हॉटेलेही सरकारने चालवायला घेतली. ही स्थळे भ्रष्टाचाराची कुरणे बनली. नोकरांनी मलीदा खाल्ला, गिर्हाईकांच्या तोंडाला पाने पुसली आणि करदात्यांचे पैसे वाया घालवले. सरकारी टेलिफोन कंपन्या, इलेक्ट्रोनिक कंपन्या ह्यांची बजबजपुरी आठवत असेलच. कार, स्कूटर ह्याही कंपन्या खास मर्जीतल्या उद्योगपतींना चालवायला दिल्या त्यामुळे ह्या क्षेत्रातही अनेक वर्षे सेवेच्या नावाने आनंद होता. सरसकट सरकारीकरणाने ह्या गरीब देशाला अनेक पांढरे हत्ती पोसावे लागले. भाषावार प्रांत निर्मिती हे नेहरुच्या शेपुटघालेपणाचे फळ. त्यातून किती कटकटी झाल्या ते मोजणे कठिण. तमिळ्-कन्नड, कन्नड्-मराठी, मराठी-गुजराथी वगैरे वाद. दंगली, बंद इत्यादी. कश्मीरचे चिघळते प्रकरण, चीनकडून धूळ चारणे ह्याही नेहरूने आपल्या थोर नेतृत्वाने आपल्या मायभूमीला दिलेल्या बहुमोल भेटी.
|
>>> ह्या असहिष्णू पणामुळेच तर लोक तुमच्या दैवताना जवळ करीत नाहीत हे गेल्या ६० वर्षात तुम्हाला उमगलेले नाही. टोणगा, तुमच्या दैवतांना (आद्य गांधी आणि नेहरू) गेली ६० वर्षे सरकारने अखंड sponsor केले. भारतातल्या प्रत्येक गल्लीबोळाला, मैदानांना फक्त या दोघांचीच (आणि त्यांच्या वारसदारांचीच) नावे दिली. बिगरी पासून मॅट्रिकपर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तकातून फक्त या दोघांनीच रक्ताचा एकही थेंब न सांडता हसत हसत भारताला स्वतंत्र्य मिळवून दिले असा गोबेल्स सुद्धा लाजवणारा सरकारी प्रचार केला. भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य फक्त या दोघांमुळेच मिळाले किंवा भारताची प्रगती फक्त यांच्यामुळेच झाली असा अखंड प्रचार केला. सरकारी पातळीवरून कायम यांच्याच जयंत्या व पुण्यतिथ्या साजर्या केल्या. प्रत्येक गावागावातून फक्त यांचेच पुतळे उभारले. प्रत्येक नोटेवर फक्त आद्य गांधींचेच चित्र. भारतात या दोघांव्यतिरिक्त भूतकाळात व वर्तमानकाळात कोणी महान व्यक्ती झाली नाही व भविष्यात होणार नाही हेच लोकांच्या मनावर कायम बिंबविण्यात आले. तरीसुद्धा तुमच्या ह्या दोन दैवतांना बहुसंख्य भारतीय का जवळ करत नाहीत याचा तुम्ही विचार करा. याउलट हे दोघे सोडून इतर सर्वांना यांनी अनुल्लेखाने मारले. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राणार्पण केले किंवा ज्यांनी देशाकरता स्वेच्छेने सर्वस्वाची होळी करून अनेक वर्षे कठोर तुरुंगवास भोगला त्या सर्वांकडे गेली ६० वर्षे जाणूनबुजून संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. जर लोक या दैवतांना जवळ करत नसतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण लोकांना त्यांची अजिबात आठवण होऊ नये यासाठीच गेली ६० वर्षे नियोजनबद्ध प्रयत्न केलेले आहेत. परंतु गेली ६० वर्षे तुमच्या दैवतांना गोबेल्सप्रमाणे लोकांसमोर ठेवून सुद्धा बहुसंख्य लोक त्यांना जवळ करत नाहीत हे मात्र नक्कीच आश्चर्य करण्यासारखे आहे! जे थोडे लोक त्यांना दैवत मानत असतील त्याच्यामागे गेल्या ६० वर्षांचा गोबेल्सप्रमाणे केलल्या प्रचाराचा सिंहाचा वाटा आहे.
|
नेहरुन्नी आणलेली मिश्र अर्थव्यवस्था आदर्श होती असे कोणीही म्हणणार नाही. पण त्या वेळच्या नुकत्याच स्वतन्त्र झालेल्या देशाच्या द्रुष्टीने तो त्यातल्या त्यात चान्गला पर्याय होता. दीर्घ आजारातून उठलेल्या माणसाला आता तु रोज शम्भर जोर आणी पन्नास बैठका मार असे म्हणून कसे चालेल? तुमच्या राजीवजींनी ते रद्द केले व त्याचे श्रेय घेतले. म्हणजे आपणच चुका करायचा आपण भरपाई करायची व त्याचे क्रेडीट घ्यायचे ही रणनिती. घ्या, म्हणजे नेहरुन्नी समाजवाद आणला म्हणून ते बावळट आणी प पु राजीवजीनी तो सम्पवला म्हणून ते श्रेयासाठी उतावीळ
|
पण त्या वेळच्या नुकत्याच स्वतन्त्र झालेल्या देशाच्या द्रुष्टीने तो त्यातल्या त्यात चान्गला पर्याय होता >>>> परत चुक. त्याकाळी मिश्र अर्थव्यवस्था असनारा एकच देश होता बहुतेक पोलंड. केवळ एका देशाने स्विकारलेली अर्थव्यवस्था नुकत्याच स्वतंत्र्य झालेल्या देशाने स्विकारने म्हणजे आत्महत्याच होती. त्या वेळच्या अर्थतज्ञांनी यावर बरेच ताशेरे ओढले होते. कॉंग्रेस च्या मंत्रीमंडंळाने भाडंवली (मुख्यत्वे वल्लभभाई पटेल व मोरारजी देसाई.) अर्थव्यवस्था स्विकारावी म्हणुन नेहरुंना विनवनी केली पण केवळ नेहरु स्वत मनाने साम्यवादी होते म्हणुन त्यांनी देशाला पणाला लावले व कॉंग्रेस मंत्रीमंडळाचा निर्नय घुडकावला. संदर्भा साठी वल्लभभाई पंटेलाचे चरित्र व ईंडीया अफ्टर गांधी ही पुस्तक वाचा. म्हणजे तुम्हाला तुमच्या प.पु चे प पु किती चुक होते हे कळेल.
|
Uday123
| |
| Friday, May 09, 2008 - 11:56 pm: |
| 
|
वेणुगोपल पुन्हा एकदा AIIMS मधे परतले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे घालवणे अवैध ठरवले. http://www.ddinews.gov.in/National/National+-+Headlines/fgg.htm (अना)आरोग्य मंत्री, रामोदास, या एका व्यक्तिच्या 'अहंकारा' पोटी खास घटनेत दुरिस्ती केली, उद्देष केवळ "वेणुगोपाळ यांना घालवणे". हा तर सत्तेचा, संसदीय मार्गाने, सरळ-सरळ गैरवापर झाला आहे. कुणिच या मंत्र्याला थांबवु शकले नाही? दुरुस्ती कायदा एवढ्या लवकर (घाईत) कसा काय संमत झाला? घटना दुरुस्ती साठी दोन्ही सभागृहाची मंजुरी आणि मग राष्ट्रपतींची स्वाक्षरी लागते. एकंदरीत सर्व पोरखेळ आहे, आणि गरिब जनतेचा पैसा पणाला लागतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने एवढे फ़टकारल्यावर देखील निर्लज्जपणे "राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही".
|
>>> हा तर सत्तेचा, संसदीय मार्गाने, सरळ-सरळ गैरवापर झाला आहे. कुणिच या मंत्र्याला थांबवु शकले नाही? दुरुस्ती कायदा एवढ्या लवकर (घाईत) कसा काय संमत झाला? पंतप्रधानपद या सर्वोच्च पदावर एक निर्णयक्षमताहीन बुजगावणे बसविल्यावर दुसरे काय होणार? लालकृष्ण अडवाणींनी आपल्या आत्मचरित्रात मनमोहन सिंग यांचे अचूक मूल्यमापन केले आहे. त्यांनी या पदाचे अवमूल्यन केले आहे या आडवाणींच्या मतावर नक्कीच सर्वांचे एकमत होईल. http://www.rediff.com/news/2008/may/09flip.htm
|
Uday123
| |
| Saturday, May 10, 2008 - 10:51 pm: |
| 
|
अडवाणींनी आपल्या आत्मचरित्रात... --- "My Country, My Life" अजुन कुणिच कशी दखल घेतली नाही? मला सर्वात मोठे खटकले ते म्हणजे कंदाहार (IC-841, Dec 1999) प्रश्नी 'आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत परराष्ट्र मंत्री "अतिरेक्यां सोबत" जात आहेत हे माहीत नव्हते' हे त्यांचे भाष्य. हे भारताचे तत्कालीन कबिनेट दर्जाचे गृहमंत्री लिहीतात? हे भाष्य तत्कालीन कोळसा राज्यमंत्र्यांचे असते तर समजु शकतो. तुम्ही आत्म चरित्र काही दर्-रोज लिहीत नाही, आणी ही एक लोकांशी संवाद साधुन गैरसमज दुर करण्याची सुवर्ण संधी होती. खरं बोलण्याची, प्रामाणिकपणे काय झाले ते लिहायची धमक नसेल तर आत्मचरित्र लिहीण्याचा घाटच का घातला? कशाला लोकांची दिशाभुल? ह्या भाष्याने माझ्या मनात काही संभ्रम निर्माण झाले आहेत. (अ) ही घटना खरी असेल (तशी शक्यता खुपच कमी वाटते) तर त्याच वेळी म्हणजे जानेवारी २००० मधे एवढा मोठा निर्णय घेताना अंधारात ठेवले म्हणुन राजिनामा का नाही दिला? (ब) वाजपाई केंद्रिय मंडळ आणि अडवाणि यांमधे विश्वासाचा संपुर्ण अभाव होता कां? (c) अडवाणि धडधडीत खोटे बोलत आहेत आणि पुर्व-सहकार्यांचा घात करीत आहेत. अपयशचे खापर दुसर्याच्या माथी मारण्याचा हा प्रकार आहे. अमेरिकेच्या राजदुताचे चुकीचे नाव ही मोठी त्रुटी आहे... असायला नको होती पण पचवु शकतो. मला तरी अडवाणि स्वत:ची पंतप्रधान बनण्यासाठी लागणारी (उजळ) प्रतिमा तयार करत आहेत असे वाटते.
|
कंदाहार प्रकरणात १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी अतिरेकी सोडणे हा एकच पर्याय शिल्लक होता. कन्दाहार विमानतळावर उतरवलेल्या विमानाला तालिबान्यांनी रणगाड्यांचा वेढा देऊन अखंड पहारा ठेवलेला होता. त्यामुळे इस्राईल सारखी कोणतीही कारवाई करणे अशक्य होते. ते विमान नेपाळ मधून पळविण्यात आले होते. त्यामध्ये भारताने सुरक्षेत कुचराई केली असा काही भाग नव्हता. किंबहुना नेपाळ्यांच्या मूर्खपणामुळे चाच्यांना विमानात सहज प्रवेश मिळाला होता. चाच्यांनी एका प्रवाशाची आधीच हत्या केलेली होती. ७-८ दिवस विमानात स्वच्छता न केल्यामुळे आतमध्ये नरकपुरी झाली होती. अशा परिस्थितीत त्यांचा मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. १६० प्रवाशांचे बळी जाऊन देणे किंवा ३ अतिरेकी सोडणे, यातला दुसरा पर्यायच त्या परिस्थितीत योग्य होता. कॉंग्रेस व केतकरांसारखे कॉंग्रेसचे महामूर्ख स्वयंघोषित चमचे, भारताने इस्राईलसारखी कमांडो कारवाई करायला पाहिजे होती व ती न केल्यामुळे भाजप सरकारने अतिरेक्यांसमोर गुडघे टेकले असा गेली ८ वर्षे पूर्णपणे खोटा प्रचार करत आहेत. त्या खोट्या प्रचाराला उत्तर देऊन प्रामाणिकपणे जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्याऐवजी जसवंत सिंग, आडवाणी इ. मंडळी गेली ८ वर्षे या प्रश्नावर कोलांट्या उड्या का मारत आहेत हे अनाकलनीय आहे.
|
Tonaga
| |
| Sunday, May 11, 2008 - 4:15 pm: |
| 
|
जसवन्त आणि अडवाणी यांच्या कोलन्टऊड्या नाहीत, सतीशराव, तुमच्या आहेत वरच्या पोस्ट वाचल्या तर अडवाणींची स्तुती करावी की निंदा याबाबत तुमची अवस्था अगदी किंकर्तव्यमूढ अशी झाली आहे. आपण ज्यांचे समर्थन करतो त्यांच्या चुका फारच embarrassing असतात नाही?. आता काय भूमिका घ्यावी असा प्रश्न आला की तुम्ही सरळ सोनिया, नेहरू, गांधी(सर्व),गेला बाजार केतकर यांना शिव्या देत चला. भाजपच्ये मूल्यमापन करण्यापेक्षा ते सोपे आहे.(आणी इथले प्रेक्षक बहुमतात आहेत हा फायदा अलाहिदा....) खरे तर भाजपत अडवाणी हेच गृहस्थ बर्यापैकी डोके जागेवर असलेले आहेत.
|
Uday123
| |
| Sunday, May 11, 2008 - 4:57 pm: |
| 
|
आपण ज्यांचे समर्थन करतो त्यांच्या चुका फारच embarrassing असतात नाही?. --- अनुभवाचे बोल आहेत तुमचे, तुम्ही दु:ख समजु तरी शकता.
|
>>> आता काय भूमिका घ्यावी असा प्रश्न आला की तुम्ही सरळ सोनिया, नेहरू, गांधी(सर्व),गेला बाजार केतकर यांना शिव्या देत चला. भाजपच्ये मूल्यमापन करण्यापेक्षा ते सोपे आहे. माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. मी अनेक वेळा लिहिले आहे की कॉंग्रेस व विशेषतः नेहरू-गांधी कुटुंबियांच्या महाभयंकर घोडचुकांमुळे भारतातल्या आजच्या बहुतेक सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत. अडवाणि किंवा जसवंत सिंग यांनी एखाद्या प्रश्नावर चुकीचे प्रतिपादन केले म्हणून गांधी (सर्व असली व नकली गांधी) आणि नेहरू आडनावाच्या लोकांनी केलल्या महाभयंकर घोडचूकांवर पांघरूण पडत नाही. >>> आपण ज्यांचे समर्थन करतो त्यांच्या चुका फारच embarrassing असतात नाही?. तुमच्या दैवतांच्या घोडचुका तुम्हाला embarrassing वाटतात का?
|
Admin
| |
| Monday, May 12, 2008 - 4:49 am: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2008
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|