Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 29, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 29, 2007 « Previous Next »

Sunilt
Thursday, June 28, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचा हिन्दु, हिन्दुत्व, हिन्दुत्ववाद, हिन्दु धर्म व हिन्दु सन्स्कृती याचा बराच गोन्धळ उडालेला दीसतोय. आम्ही ज्याबद्दल बोलतोय त्या हिन्दु सन्स्कृती मधे सगळेच आले बौद्ध, सनातन वैदीक, जैन, शिख, देशप्रेमी, सहिष्णु, धर्मनिरपेक्ष मुस्लिम, ख्रिश्चनही (म्हणुनच बौद्ध व हिन्दु शत्रु नसल्याचे लिहिले कारण ते एकाच भुमीतुन एकाच सन्स्कृतीतुन निर्माण झालेले आहेत)... साहेब थोडे सन्कुचित धर्मान्धातुन बाहेर पडा आणी बोला स्वता: डोळे झाकुन ठेवलेत तरी बाकीच्यान्चे उघडे आहेत याचही भान ठेवा.

देशभक्तीचे स्वयंघोषीत ठेकेदार च्यायलासाहेब, मुस्लिमांना तेवढी "धर्मनिरपेक्ष" असण्याची अट, मग हिंदूना का नाही?

संकुचित कोण हे तुम्हीच दाखवून देत आहात.


Satishmadhekar
Thursday, June 28, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> देशभक्तीचे स्वयंघोषीत ठेकेदार च्यायलासाहेब, मुस्लिमांना तेवढी "धर्मनिरपेक्ष" असण्याची अट, मग हिंदूना का नाही?

हे पूर्णपणे उलटं आहे. "धर्मनिरपेक्ष" असणे हे फक्त हिंदूंना सक्तीचे आहे, इतर कोणत्याही धर्माला नाही. म्हणून तर मुस्लीमांचे कायदे त्यांच्या धर्मग्रंथावर आधारीत तरे हिंदूंचे कायदे तथाकथित "धर्मनिरपेक्ष" घटनेवर आधारीत.

Sunilt
Thursday, June 28, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणून तर मुस्लीमांचे कायदे त्यांच्या धर्मग्रंथावर आधारीत तरे हिंदूंचे कायदे तथाकथित "धर्मनिरपेक्ष" घटनेवर आधारीत.

ह्याला म्हणतात वेड घेऊन पेडगावला जाणे !!

आता या देशातील १००% फ़ौजदारी कायदे आणि ९९% दिवाणी कायदे (लग्न्-घटस्फोट वगळता) सर्व नागरीकांना सारखे आहेत हे सर्वांना समजते. पण जाणून्-बुजून दिशाभूलच करणार्‍यांना कोण आवरणार?


Vijaykulkarni
Thursday, June 28, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनील,
जावूद्या हो,
मुस्लिमाना चार चार लग्ने करता येतात याचा काहीना फारच मत्सर वाटतो :-)


Gobu
Thursday, June 28, 2007 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयभाऊ,

च्यायला
,
मात्रुभुमीची, समाजाची उस्फ़ुर्तपणे सेवा करणे म्हणजे ठेकेदारी कशी काय बुवा?
मी एक हिन्दु आहे, उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न कित्येक वर्षापासुन मनात ठेवुन आहे, केवळ पैशाच्या अभावी आखातात नोकरी करत आहे.........
मग, कराल मला मदत?
जाऊ द्या हो, मोठ्या मोठ्या बाता सोडा!
मातृभुमीची सेवा, समाजाची सेवा नाही केली तरी चालेल, निदान भारतात सर्व धर्म सुखासमाधानाने रहातील यासाठी काही तरी करा!
सुनिल, अनुमोदन!


Shendenaxatra
Friday, June 29, 2007 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायद्याची टक्केवारी (१००% फौजदारि ९९% दिवाणी इत्यादी) दिशाभूल करणारी आहे. खुनाचे, दरोड्याचे
कायदे बघण्याची वेळ सामान्य माणसावर कितीवेळा येते?
आणि लग्न किती सामान्य लोक करतात? लग्न झालेल्या मुस्लिम स्त्रीला कधीही तोंडी घटस्फोट मिळू शकतो आणि कायदा तिला कुठलेही संरक्षण
देत नाही हे एका पुरोगामी देशात भूषणावह आहे का?

मुसलमान पुरुषांना तोंडी तलाक देता येतो, चार लग्ने करता
येतात हे न्याय्य अहे का? ज्याप्रमाणे हिंदू धर्मातील जातिभेदामुळे काही जातीच्या
लोकांना समाजात दुय्यम स्थान दिले गेले तसेच ह्या कालबाह्य पद्धतीमुळे (तोंडी तलाक, बहुपत्निप्रथा) मुस्लिम स्त्रियांवर अन्याय होत आहे असे वाटत नाही का?

ह्याविरुद्ध निषेध करणार्‍यांची मत्सरग्रस्त म्हणून हेटाळणी करणे म्हणजे मूळ मुद्द्याला बगल देणे आहे. हिंदूंच्या जातिभेदाला नाके मुरडणार्‍या ख्रिश्चनाची वा मुस्लिमाची ह्याला जातीभेद करता येत नाहीत म्हणून जळतोय बघा कसा अशी हेटाळणी कराल का?

मुसलमान आपणहून ह्या कायद्यात बदल करा अशी मागणी करतील असे मानणारे मूर्खांच्या नंदनवनात रहात आहेत. मुस्लिम समाजाचे
नेते कट्टर धार्मिक आहेत. त्यांना असा बदल घडावा असे आजिबात वाटत नाही हे वेळोवेळी होत असलेल्या विरोधावरून दिसतेच आहे. हे नेते पुरुष असल्याने असल्या अन्याय्य प्रथांचा त्यांना फार त्रास होत नाही हाही एक मुद्दा आहे.


Sunilt
Friday, June 29, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१००% मान्य शेंडेनक्षत्र. तोंडी तलाक इ जुनाट प्रथांमुळे मुस्लिम स्त्रियांची परिस्थिती भयाण आहे हे खरेच. आणि ती सुधारणे हेदेखील जरूरीचे आहे.

परंतु, आमचा अक्षेप आहे तो, ह्याचे कारण पुढे करून मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरणार्‍यांवर.


Satishmadhekar
Friday, June 29, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> ह्याला म्हणतात वेड घेऊन पेडगावला जाणे !!

आता या देशातील १००% फ़ौजदारी कायदे आणि ९९% दिवाणी कायदे (लग्न्-घटस्फोट वगळता) सर्व नागरीकांना सारखे आहेत हे सर्वांना समजते. पण जाणून्-बुजून दिशाभूलच करणार्‍यांना कोण आवरणार?


- मुस्लिमांना कायद्याने चार लग्ने करायची (पहिल्या बायका जिवंत असताना आणि त्यांच्याबरोबर घटस्फोट झालेला नसताना सुद्धा) परवानगी आहे. इतर कोणत्याही धर्माला अशी अन्यायकारक सवलत देण्यात आलेली नाही.

- मुस्लीम पुरूषांना केवळ तीन वेळा "तलाक" असे म्हणून घटस्फोट द्यायची परवानगी आहे. इतर कोणत्याही धर्माला अशी अन्यायकारक सवलत देण्यात आलेली नाही.


- मुस्लीम पुरुषांना घटस्फोटानंतर बायकोला पोटगी देणे बंधनकारक नाही. इतर कोणत्याही धर्माला अशी अन्यायकारक सवलत देण्यात आलेली नाही.


- मुस्लीम धर्मात दत्तक घेणे किंवा देणे मान्य नाही. इतर कोणत्याही धर्माला अशी अन्यायकारक सवलत देण्यात आलेली नाही.


ही केवळ नमुन्यादाखल दिलेली धर्माच्या आधारावर भेदभाव करणारी काही उदाहरणे. अनेक छुपे कायदे आपल्याला माहीत सुद्धा नसतील. आणि मुख्य म्हणजे या सवलती कोणत्याही कायद्याच्या पुस्तकावर आधारीत नसून त्यांच्या १४०० वर्षांपूर्वीच्या पुस्तकावर आधारीत आहेत. ही पहा अजून उदाहरणे.

- भारतीय घटनेनुसार सर्व मुस्लीम मौलवींना भारत सरकारकडून दर महिन्याला पेन्शन मिळते. इतर कोणत्याही धर्माच्या धर्मगुरुंना अधिकृत सरकारी मदत मिळत नाही.

- तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा काही राज्यांनी कायदे करून हिंदूंची मोठी मंदिरे सरकारी नियंत्रणाखाली आणलेली आहेत. केरळ देखील असा कायदा करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात देखील शिर्डी, पंढरपूर इ. मंदिरे सरकार स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु कोणत्याही इतर धर्मीयांच्या धर्मस्थळाला सरकारने हात लावलेला नाही.

- केवळ मुस्लीमांना वाचविण्यासाठी "टाडा" आणि "पोटा" हे कायदे रद्द करण्यात आले.

- मुस्लीमांना मक्केला जाण्यासाठी सरकारी मदत देण्यासाठी कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार अत्यंत अल्प किमतीत मुसलमान भारतातून मक्केला जाऊ शकतात.

या नमुन्यादाखल दिलेल्या उदाहरणावरून हे सिद्ध होते की आपली धटना "निधर्मी" नाही. घटनेने अहिंदूंना झुकते माप दिलेले आहे.

९९ किंवा १०० टक्क्यांचं सोडा. "निधर्मी" आणि "लोकशाही" व्यवस्थेत एका विशिष्ट धर्माला सवलत देण्यासाठी एक सुद्धा अन्यायी कायदा करणे चुकीचे आहे. इथे तर अनेक अन्यायी कायद्यांची मुस्लीमांना खिरापत दिलेली आहे. आणि म्हणे भारताची घटना "निधर्मी" आणि "सर्व नागरिकांना समान समजणारी!"


>>> सुनील, जावूद्या हो, मुस्लिमाना चार चार लग्ने करता येतात याचा काहीना फारच मत्सर वाटतो

या अत्यंत मूर्खपणाच्या विधानावर काहीही प्रतिक्रिया देणे शक्य नाही. या विधानातून "मॅच्युरिटी" चा अभाव दृगोच्चर होतो. अनिसचे पितळ उघडे पडून अनिसचा छुपा अजेन्डा उघडा पडल्यामुळे विजयरावांची बोलतीच बंद झालेली आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढळून नैराश्यातून ते असे बरळत आहेत. सर्व ढोंग्यांची शेवटी अशीच अवस्था होते.



Sunilt
Friday, June 29, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Satishmadhekar ,

शेंडेनक्षत्र यांना दिलेले उत्तर तुम्हालादेखील लागू पडते.



Chinya1985
Friday, June 29, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्डेन आणि सतिशराव यांना पुर्ण अनुमोदन. मुद्दे अगदी बरोबर आहेत.
सुनिल अरे तुमचा आदर्श अनिस यासाठी काही का करत नाही??मुस्लिमांविरुध्द द्वेश पसरवण्याची काहिच गरज नाही. त्यांची कृत्येच द्वेश आपोआप पसरवतात. आणि मुस्लिमविरुध्द द्वेश हिंदुत्ववाद्यांमुळे पसरतो हे तर साफ़ चुकिचे. आजकाल पुर्ण जगभरात मुस्लिमविरोधी wave येत आहे. ह्यालापण हिंदुत्ववादिच जबाबदार का??


Kedarjoshi
Friday, June 29, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एक हिन्दु आहे, उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न कित्येक वर्षापासुन मनात ठेवुन आहे, केवळ पैशाच्या अभावी आखातात नोकरी करत आहे.........
मग, कराल मला मदत?>>>>>>


गोबु with all due respect आणि मी च्यायला चीच पुर्ण बाजु घेतोय असे नाही पण ह्याचा मातृभुमीच्या सेवेशी काय संबंध? हा तर वैयक्तीक प्रश्न आहे.
वैयक्तीक उन्नती करायला मदत केली की मातृभुमीची सेवा केली असा तुमजा समज तर नाही ना.

आणि तु SAP मध्ये नोकरी करत असशिल तर मला CV पाठव. मी मदत करेल.

Sunilt
Friday, June 29, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या,

जगभर मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरतोय हेच साफ़ चुकीचे आहे. जगभर द्वेष पसरतोय तो दहशतवादाविरुद्ध. पण सर्वसामान्य मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरविण्याचे काम (इमाने-इतबारे) हिंदुत्ववादी गेली ७-८ दशके करीत आहेत.

आणि हो, इस्लाम हा सद्ध्या जगातील सर्वात वेगाने वाढणरा धर्म आहे.


Vijaykulkarni
Friday, June 29, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केवळ मुस्लीमांना वाचविण्यासाठी "टाडा" आणि "पोटा" हे कायदे रद्द करण्यात आले.
बापरे, फारच विनोदी बुवा तुम्ही :-) :-) :-)
चार विवाह, तलाक आणी पोटगी यावरून मुस्लिमान्चा इतका मत्सर योग्य नव्हे.
चार विवाहाबरोबरच चार वाढदिवस, चार अनिवर्सर्‍या लक्शात ठेवणे, चार सासू सासरे येतात. :-)

कुम्भमेळ्यासठी सरकार शेकडो कोटीन्ची बान्धकामे करते.


Kedarjoshi
Friday, June 29, 2007 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगभर द्वेष पसरतोय तो दहशतवादाविरुद्ध. >>>>

कोणता धर्म पसरवित आहे? की दहशतवादाला धर्म नसतो असे पोकळ उत्तर तुम्ही देनार आहात. प्लीज मला दहशत वाद का वाढीला लागतोय हे सांगाल का? व त्यात कुठले ईतर धर्माय सामील आहेत. ते सर्व धर्म मिळुन एकत्र दहशतवाद धडवुन आनतात की ते एका पर्टीक्युलर धर्माचेच लोक आहेत.

पण सर्वसामान्य मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरविण्याचे काम (इमाने-इतबारे) हिंदुत्ववादी गेली ७-८ दशके करीत आहेत.

सुनील तुम्हाला उदाहरण देता येईल काय? मला जरा बेसलेस वाक्य वाटत आहे हे.

आणि हो, इस्लाम हा सद्ध्या जगातील सर्वात वेगाने वाढणरा धर्म आहे

अल्ला के बंदे सारे नसबंदी क्युं करे हे ब्रिद वाक्य असल्यावर तोच धर्म वाढनार नाही का?
अन धर्म वाढ हे मोजमाप होऊ शकत का?


आणि सुनील प्लिज या प्रश्नांची प्रामानिक उत्तरे द्या. (उदा सहीत) म्हणजे आमच्या सारख्या तळ्यात वा मळ्यात करनार्य लोकांना काही समधान कारक उत्तर मिळेल.
मी काही अति हिंदुत्ववादी नाही वा हिन्दु धर्माचा रक्षक नाही पण जे सध्या दिसत आहे व जो ईतिहास वाचला आहे त्यात मला हिंदु धर्मायांची काही ज्यातती दिसली नाही पण तुम्ही म्हनताय (वा तुमचा समज आहे) तर का म्हणताय हे जानुन घेन्याची इच्छा आहे.
कुलकर्णी देखील उत्तर देऊ शकतात.

मला वाटत च्यायला तु निदान यांची उत्तर ऐकुन घेऊ शकतोस. निदान दुसरी बाजु (असेल तर) ती सुनील टी वा कुलकर्णी मांडतील तरी. कारण यांना फक्त विरोध करतानाच बघीतल्य बाजु मांडताना नाही.




Deshi
Friday, June 29, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुम्भमेळ्यासठी सरकार शेकडो कोटीन्ची बान्धकामे करते>>>

कुंभ मेळा देशात होतो मदीनेत नाही.उद्या म्हणाल सरकार भारतीयांना खाउ पण घालते. मग काय बांग्लादेशीयांना खाउ घाल्नार काय?

Chyayla
Friday, June 29, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद केदार, मी यान्ची सगळी बाजु, तर्कट ऐकुन घेण्यास पुर्ण उत्सुक आहे म्हणुनच मी अजुन उत्तर का नाही दीले याच कारण सुज्ञास लक्शात आले असेलच... कारण पुढे बाजु मान्डायची, उत्तर द्यायची वेळ आली तर मागच्या अनुभवानुसार परत पळ काढायचे...

Sunilt
Friday, June 29, 2007 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,

मुस्लिमांविरुद्ध द्वेष कुठे आणि कसा पसरवला जातोय ते पाहण्यासाठी लांबवर जाण्याची गरज नाही. इथे मायबोलीवरच तुम्हाला अनेक उदाहरणे सापडतील. शिवाय, सिंघल, तोगडिया, मोदी ई ची मुक्ताफळेदेखील तुम्ही ऐकली / वाचली असतीलच. या सर्वांच्या विचारसरणीचे मूळ कोठे आहे हे मी मुद्दामून सांगण्याची काही गरज नाही.

बुश / ब्लेअर यांनी "दहशतवादाविरुद्ध" लढ्यण्याची घोषणा केली. जरी (अमेरीकेवर हला करणारे दहशतवादी मुस्लीम होते) तरी त्या लढाईला त्यांनी ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम असे स्वरूप येऊ दिले नाही.

आणि भारतात आमचे हिंदुत्ववादी काय करीत आहेत?


Nanya
Friday, June 29, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुश / ब्लेअर यांनी "दहशतवादाविरुद्ध" लढ्यण्याची घोषणा केली. जरी (अमेरीकेवर हला करणारे दहशतवादी मुस्लीम होते) तरी त्या लढाईला त्यांनी ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम असे स्वरूप येऊ दिले नाही.

हे फ़ारच बालिश विधान झाले.. कारण तसे जाहीर केले नाही त्यमागे political reasons आहेत. (चला, BB च्या विशयाला धरुन एक statement केले, आता कहीही लिहु शकतो. :-))
आजची बातमी: लंडन मध्ये एक bomb सापडला.
FOX news ने सान्गितले की " No organization has taken the responsibility yet" आणी त्यानन्तरचे वाक्य "today's subject of discussion is "what contemporary muslims are doing to stop radical islam" . म्हणजे हे कृत्य islamic group चे आहे हे assume केले गेले आहे.
आता हे चुकिचे असेल की काही proof नसताना मुस्लिमाना आरोपि केले.. पण असे का होते याचे उत्तर द्याल का सुनिलराव?


Chinya1985
Friday, June 29, 2007 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल अरे दहशदवाद जगभरात पसरत आहे. हा कोण पसरवत आहे???मुस्लिमच ना???यात हिंदुत्ववाद्यांचा काय दोष???हिंदुत्ववाद्यांना एव्हढे महत्व कोणामुळे मिळते???तथाकथित सेक्युलर लोकांमुळेच. हे लोक हिंदुविरोध करतात. कुठलिही गोष्ट हिंदु असली की विरोध करतात. अशांमुळेच हिंदुत्ववाद्यांना महत्व मिळते. जर भारतातिल तथाकथित सेक्युलर लोक खर्‍या अर्थाने सेक्युलर असते तर त्यांनी हिंदुंच्या गोष्टींना विरोध करायचा आणि मुस्लिमांचा उदोउदो करायचा हे प्रकार केलेच नसते. आत्ता काही दिवसांपुर्वी राजस्थानात गुर्जर समाजाने आंदोलन, दंगली केल्या, आपली राष्ट्रिय मिडीया सरळ म्हणत होती ह्या समाजाला हे करायचा अधिकार कोणी दिला वगैरे पण हेच काम मुस्लिमांनी केले तर हे नेते, मिडियावाले मुग गिळुन बसतात हे का??नव्हे हे मुस्लिमांनी केलेल्या दंगली वगैरे कशा बरोबर तेच पटवायचा प्रयत्न करतात.
तुम्ही लोक अस दाखवता की भारतात जे काही दंगे, बॉम्बस्फ़ोट होतात ह्याला हिंदुत्ववादी कारणीभुत आहेत. बर हे खर असत तर ही समस्या फ़क्त भारतातच असती पण आजकाल इस्लामी दहशदवाद पुर्ण जगभर पसरू पाहत आहे. तु लिहिलय की युध्दाला ख्रिश्चन विरुध्द मुस्लिम रुप दिल गेल नाही. अरे पण सर्वांनाच माहित आहे की ख्रिश्चन असल्यामुळेच अमेरिकेवर हल्ला झाला. शिवाय अमेरिकन धरुन जगातिल इतर लोकांबरोबर तु चर्चा केली तर समजुन येइल की ख्रिश्चन लोक मुस्लिमविरोधी बनत आहेत. पैगंबर कार्टुन प्रकरणानंतर बीबीसी वर पाश्चिमात्य विचारवंत(नाव आठवत नाही) म्हणत होते की हे र्‍याली करणारे स्टुपिड इडिअट्स आहेत. लंडनमधे 'त्या कार्टुनिस्ट्सना मारुन टाका' वगैरे फ़लक घेउन लोक रस्त्यावर गेले होते. अशा गोष्टींमुळे मुस्लिमांचे नाव खराब होते आणि ते स्वत्: ते करुन घेतात. यामधे दुसर्‍यांचा(हिंदुत्ववाद्यांचा )काहिहि दोश नाही. अबु हामझा ची लंडनमधे दिलेली भाषणे ऐकली का??इतकी दहशदवादी भाषणे तो देत होता तेंव्हा त्याच्यासमोरचे शेकडो साधे मुस्लिम त्याचा विरोध का करत नव्हते??मुस्लिमांचे म्हणने असते की इतर धर्मिय लोकांनी नेहमिच माघार घ्यावी सर्वांनी इस्लामला respect द्यावा मात्र ते इतर धर्मांना respect देणार नाहित. इतर देशांमधे त्यांच्या धर्माचे पालन करु द्यावे, धर्मास्थळे बांधली जावित, धर्मप्रसारक येउ द्यावेत मात्र त्यांच्या देशांमधे इतर धर्मांना त्या सुविधा ते देत नाहित.
भारतामधे सर्वात जास्त हिंसाचार काश्मिरमधे होतो तो कोण करवतो??मुस्लिमच करवतात. काश्मिरमधे कुठे आहेत हिंदुत्ववादी???शिवाय मुस्लिमविरोधी हिंसाचाराला बघुन पेटुन उठणारे तुमच्यासारखे लोक तेंव्हा कुठे जातात जेंव्हा काश्मिरी पंडितांची खुलेआम कत्तल होत असते??जेंव्हा काश्मिरमधे म्हटले जाते, पोस्टर लावली जातात की 'हिंदुओं कल सुबह तक काश्मिर छोडके जाओ ओर जाओगे तो अपनी बिबी और बेटिओंको यहिं रखके जाओं'?कुठे असता तुम्ही लोक तेंव्हा???जेंव्हा मुंबई मधे पोस्टर लागतात waiting for gajhanii तेंव्हा तुम्ही आणि शांतताप्रिय मुस्लिम विरोध का करत नाहित???ह्या देशातिल काही कोंग्रेस आणि कम्युनिस्ट लोक मुघल राज्य फ़ार चांगले आणि मराठा साम्राज्य स्वार्थी लोकांनी भरलेले असे म्हणतात. ह्या मातीतुन जन्म घेतलेले ह्या मातितितिल लोकांचे हीत पहाणारे शिवाजी महाराज का चुकिचे??त्यांचा आदर राखणारे हिंदुत्ववादी का चुकिचे??काहिकाहि तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांना तर waiting for gajhanii पण चुकिचे वाटत नाही. ह्या देशावर आक्रमण करुन इथल्या लोकांवर अतोनात अत्याचार करणारा त्यांना चांगलाच वाटतो. साहजिक आहे हिंदुत्ववादी ह्याला विरोध करणारच. आणि केल्यास काय चुकले?


Vijaykulkarni
Friday, June 29, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुंभ मेळा देशात होतो मदीनेत नाही.
उद्या म्हणाल सरकार भारतीयांना खाउ पण घालते.

पण हज ला जाणारे भारतीयच असतात ना
ते एअर इन्डिया ने जातात ना?
उद्या पुण्यात येशु जयन्ती चा कार्यक्रमाला सरकारी मदत द्यायला तुमची हरकत नसावी. पुणे तर भारतात आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators