|
Moodi
| |
| Friday, August 11, 2006 - 10:04 pm: |
| 
|
आज स्काय न्युजवर इथल्याच एका आपल्यासारख्या सामान्य नागरीक असलेल्या बाईने प्रश्न विचारला की ब्रिटनमध्ये किती तरी वर्षापासुन हिंदू अन शीख धर्माचे नागरीक सुद्धा रहात आहेत, त्यांना आमच्या पासुन किंवा इतर गोष्टींचा इथे कधी प्रॉब्लेम जाणवला नाही तर ह्याच( मुस्लीम) लोकांना कसला त्रास होतोय इथे? जर हे म्हणतात की इराक, लेबनॉनमध्ये मुस्लीम मरतायत, त्यांच्यावर अत्याचार होतायत म्हणून त्याचा बदला हे घेतायत तर मग त्यावेळी हे लोक कुठे गेले होते जेव्हा बोस्निया(युगोस्लाव्हिया), सुदान मध्ये कितीतरी यांचे लोक मारले गेले. मग त्यांच्या मदतीला का नाही गेले हे लोक. वरतुन इथल्या काही लोकांचा सूर असाच आहे की जोपर्यंत कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही यांना अतीरेकी मानणार नाही.( घ्या कायदा आत्ता बरा समजला) आता अमेरीकेने भारताला Indirectly सांगीतलय की अल कायदाचे पुढचे लक्ष्य भारतच आहे. पण प्रश्न हा आहे की सावधानी घेऊन सुद्धा गणपती, नवरात्र, दसरा दिवाळी या वेळी किती तुफान गर्दी असते. आता पोलीसांना ८ ऐवजी १२ तासांची ड्युटी लागलीय.( खरे तर काही राजकीय नेत्यांवरच ड्युटी लावली पाहीजे, कारण ते गुन्हेगारांना आश्रय देतात.) तिसर्या महायुद्धाची नांदी तर नव्हे?
|
Laalbhai
| |
| Saturday, August 12, 2006 - 8:04 am: |
| 
|
आजोबाने झाड लावले तर... >> वा छान.
|
Laalbhai
| |
| Monday, August 14, 2006 - 6:51 am: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20060813/lr05.htm स्वातंत्र्य दिन चिरायु होवो! सर्वांना शुभेच्छा..
|
Laalbhai
| |
| Monday, August 14, 2006 - 8:15 am: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20060814/mp02.htm hmmmm.... vichar karanyasarakhe aahe..
|
Moodi
| |
| Monday, August 14, 2006 - 6:36 pm: |
| 
|
ह्या विनोदाला नक्की काय म्हणणार? वरती ललिताताई यांनी दिलेल्या लिंकमधील लेख वाचुन हीच जाणिव होते की नुसते प्रचंड लोकसंख्येची बिरुदावली मिरवणारा आपला देश राजकीयदृष्ट्या किती अशक्त आहे. http://news.bbc.co.uk/1/hi/world/south_asia/4784215.stm
|
Avinashi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 9:15 am: |
| 
|
gud laabhai you are writing in black.thank you.many people are thinking logical and no ++++++ , i will join later busybusy busy
|
Chyayla
| |
| Friday, August 18, 2006 - 8:17 pm: |
| 
|
एक वेळ पाकिस्तानवर हल्ला करणे सोपे आहे कारण तुम्हाला शत्रु प्रत्यक्ष दिसतो, पण आपल्या देशात गद्दारान्चि काय कमी आहे. ह्या अन्तर्गत शत्रुन्शी कसे लढ्णार, राजनाथसीन्ग यान्चे विचार प्रत्य्क्शात न येनारे असो पण ते सत्य आहे आणी स्वदेशबद्दल चिन्ता प्रगट करणारे आहे. सध्या पाकिस्तान्वर हल्ला करायला परिस्थिती अनुकूल नसेलही ते लश्करि तज्ञानी सान्गितले पण हल्ला करुन अतिरेक्यान्चे तळ उध्वस्त करु नये असे कोणी म्हणणार नाही. ही एक बाजु त्याला विरोध दर्शवत नाही परन्तु ही लोकसत्ताची बातमी दाखवयचा हेतुबद्दल शन्का आहे. अर्थातच दहशतवाद्यान्चे छुपे समर्थक, डावे, अनेक राजकीय पक्श ज्यान्ना देशापेक्शा व्होट बन्केन्ची काळजी आहे त्याना मुळात असे काही होउ नये हे वाटणारच.
|
Laalbhai
| |
| Saturday, August 19, 2006 - 5:11 am: |
| 
|
च्यायला... तुमच्याशी संवाद करायचा म्हटले तर सुरवातच शिव्यांनी करावी लागते की हो.. त्यामुळे तुमच्याशी(ही) बोलणे टाळतो.
|
Shravan
| |
| Saturday, August 19, 2006 - 6:56 pm: |
| 
|
अजुन एक आनंदाची बातमी.. जनतेचे सेवक खासदारांचे पगार २५,०००/- रु ने वाढले. विधेयक एकमताने मंजूर. (अपवाद फक्त सन्माननीय डावे पक्ष. त्यांनी विरोध दर्शविला या वाढीला.) शिवाय इतर सुविधा सरकारतर्फे हात जोडून उभ्याच आहेत त्या वेगळ्या. गेल्या दहा वर्षातील ही १७ वी पगार वाढ. आनंद आहे.. तुम्ही अम्ही पेपर मेध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये नाराजी व्यक्त करणार, मायबोली वर खेद व्यक्त करनार.. बस बाकी त्यांचे सर्व व्यवस्थित चालू असणार व राहणार. एक सुखद बातमी मात्र दिलासा देउन गेली. सरकारतर्फे माहीती अधिकार कायद्यातील बदलच्या तरतूदींविषयकचे विधेयक मांडले जाणार नाही. अण्णांचा व केजरीवाला वगैरे मंडळींचा लढा यशस्वी झाला.
|
Chyayla
| |
| Saturday, August 19, 2006 - 11:20 pm: |
| 
|
मिर्च्या फ़ारच झोम्बल्या म्हनायच्या कि हो. जेन्व्हा तुमचा मुद्दा पराभूत होतो आणी त्याला उत्तर देउ शकत नाही तेन्व्हा तुमाला शिव्या द्यायची सवयच आहे, यात नविन असे ते काय. याचा विचार आधिच करायचा होता, दुसरान्च्ये दोश दाखवण्याच्या नादात स्वत किती बरबटलेले आहात तेच तुम्ही दाखवुन दिले.
|
Laalbhai
| |
| Sunday, August 20, 2006 - 9:47 am: |
| 
|
Shraavan.. Thanks for sharing the news.
|
Moodi
| |
| Sunday, August 20, 2006 - 1:21 pm: |
| 
|
डाव्या पक्षांचे या बाबतीत मग जाहीररीत्या अभिनंदन आहे. सामान्य माणसांसाठी झालेली पगार वाढ आपण समजू शकतो कारण तो आधीच महागाई अन कित्येक कारणांनी त्रस्त झालेला असतो तरी दुसर्यांना मदत करतो, या खासदारांचे काय? फुकटच्या गाड्या, बंगले आहेतच वापरायला( ते ही वर्षानुवर्षे खाली करत नाहीत.) आणि जनतेची किती कामे करतात हा पण संशोधनाचा विषय आहे. मागे संसदेवर हल्ला झाला तेव्हा सामान्य माणुस हेच म्हणाला की यातले दोन चार उडाले असते तरी बरे झाले असते, तेव्हाच जनतेला राजकारण्यांची किती चीड आहे हे उमगले( कळते पण वळत नाही अशी अजूनही स्थिती आहे, उदा. पुण्यातील खड्डे).
|
Chyayla
| |
| Sunday, August 20, 2006 - 9:25 pm: |
| 
|
आश्या प्रतिनीधीना निवडुन देणारी जनताच कि नाही, त्यामुळे ह्याला जबाबदार ही जनताच, त्याशिवाय का गून्ड लोक निवडुन येतात काय. आपल्या लोकशाही मधे "यथा प्रजा तथा राजा" असला प्रकार आहे. तथाकथित शिकलेले पान्ढरपेशे लोक तर मतदानाला जातच नाहि आणी तरिही सरकारला आणी राजकारणी लोकान्ना खुशाल शिव्या देत असतात ही बाब चिड आणणारी नाही का?
|
एक वाचण्याजोगा कॉलम: http://www.dawn.com/weekly/mazdak/mazdak.htm
|
Shravan
| |
| Monday, August 21, 2006 - 6:06 pm: |
| 
|
आनंदाची बातमी:- वंदे मातरम गीताला शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अर्जुनसिंगांनी राज्यसरकारांना आदेश काढले की प्रत्येक शैक्षणीक संस्थेमध्ये, शालांमध्ये वंदे मातरम म्हणले जावे. अभिनंदन त्यांचे. संतापजनक बातमी:- मुस्लिम खासदारांनी या निर्णयाला विरोध करुन याविरुद्ध बराच गदारोळ केला. कारण कुरान मध्ये त्यांच्या प्रेषीताशिवाय दुसर्या कुणालाही वंदन करायचे नाही असे सांगितले आहे. हे ९० १०० वर्षांनंतर त्यांना समजले. (म्हणजे तसा त्याचा अर्थ लावला गेला). नेहमीप्रमाणे कॉंग्रेसने बोटचेपी भुमिका घेतली आहे. समाजवादी पक्षाने कुणावर गीत म्हणण्याची जबरदस्ती करू नये म्हणले आहे. (ता.क. मध्यप्रदेशातील निवडणुका जवळ आल्या आहेत). बि.जे.पी. मात्र या सगळ्याला विरोध करत आहे. आपण कुठे राहातो अहोत मित्रांनो, नक्की भारतातच ना? आरे यांना कुणी आवरणार आहेच की नाही? आपण काय करायला हवे या परिस्थितीत?? काही तरी सुचवा.. काही तरी करा.. यांचे मताचे राजकारण जर असेच शांतपणे चालू दिले तर देश अराजकतेच्या उंबरठ्यावर येईल. खरंच जर सुशिक्षीत लोक मतदान करण्याएवजी मतदानाच्या दिवशी सुट्टी एंजॉय करत असतील तर त्यांनी आधी राजकारण्यांना शिव्या देने अजिबात बंद करावे आणि कोणत्याही असुविधेबद्दल तक्रार करणे बंद करावे.
|
Arch
| |
| Monday, August 21, 2006 - 6:39 pm: |
| 
|
कालच्या पेपरमध्ये वाचल. शिरडी संस्थानात २२ कोटी रुपये खर्चून सोन्याच सिंहासन करणार. बापरे!
|
Dinesh77
| |
| Monday, August 21, 2006 - 7:41 pm: |
| 
|
ज्या कोणी 'वन्दे मातरम' म्हणायला विरोध केला आहे त्या सर्वांविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरुन विनाचौकशी फ़ाशी देणे हा या परिस्थितीत सर्वात योग्य उपाय आहे.
|
मलाही त्या २२ कोटीच्या सिंहासनाचे आशच्र्य वाटले. ईतका पैसा फक्त सिहांसनासाठी आणी ते पण साईबाबांच्या ज्यांनी सन्याशा सारखे जिवन व्यतीत केले त्या सदपुरुषासाठी? साईबाबांना पण ते आवडनार नाही. दिनेश, वंदे मातरम न म्हणनार्यांना फाशी द्यावे, अरे तु भारतीयच आहेस ना? कारण हुगळी (कर्नाटक) व श्रिनगर सारख्या शहारात झेंडावदंन करायला पण बंदी होती एके काळी तेव्हा ही त्यांना फाशी दिले नाही तर हे तर फक्त वंदे मातरम गाण आहे त्यांचासाठी. त्यांना कोण फाशी देईल. लगेच काही लोक म्हणतील की तो काळ वेगळा होता तेव्हा वंदे मातरम म्हणले तर आज का म्हणावे? आणी Believe me अशाच लोकांच खर होईल. मृण्मयी, चांगला लेख आहे. पण त्यात थोडे असत्य पण आहे जसे की अशिक्षीत लोकांचे मुलच आंतकवादी होतात वैगरे. आजकालचे आतंकवादी अतिशिक्षीत आहे. अगदी हाय टेक. एकदम सायकल दुरुस्ती करनार्याचा मुलगा पायलट किंवा केमीकल वेपण स्पे. होईल असे पटत नाहीये. पण त्यांनी विश्लेषन मस्त केलेय. तु डॉन वर कशी काय गेलीस? मी पण बरेचदा वाचतो तो पेपर. खासकरुन काही अघटीत घडले की.
|
Chyayla
| |
| Monday, August 21, 2006 - 10:25 pm: |
| 
|
काय म्हणता फ़क्त वन्दे मातरमला विरोध छे छे आपल्या तथाकथित सेक्युलरवाद्यान्नी त्याना देशद्रोह करण्याचा पण अधिकार दिला आहे. कारण देशा पेक्षा जिहाद मोठा, आणी त्याना व्होट ब्यान्क पण, काय तुम्ही देशप्रेम, देशभक्ति घेउन बसला आहात. विरोध तर करुन बघा सगळी महान सेक्युलरवादी पिल्लावळ बेम्बीच्या देठापासुन ओरडायला लागतील बघा. Yes not only highly educated youngesters are turning to the Jihad but the fact is even a newly converted who brought up in christianity is also tepmted for terrorist activity is more disturbing this is the example of Germaine Lindsay accused bomber in London 7/7. don't you think something wrong with the islam. Lindsay was born in Jamaica. He moved to the UK when he was 5 months old and converted to Islam at age 15. A carpet-fitter, he had previously lived in Huddersfield in West Yorkshire before moving to Aylesbury in Buckinghamshire. His wife, Samantha Lewthwaite, a native of Aylesbury who had converted to Islam, lived with him and gave birth to their second child two months after his death. Germaine also persuaded his mother, Mary McLeod, the daughter of an Evangelical Christian, to convert to Islam. [2] He engaged in "work experience" with a local council, which he is said to have enjoyed, although the pay was poor. [3] Claims have been made that Lindsay was a violent drug dealer in Huddersfield prior to his conversion to Islam [4] Friends say that after his conversion he rejected his old friends and old habits and completely embraced terrorism. His mother recalls their shock at the 9/11 attacks and wondered how Muslims could have done something like that. His wife, Lewthwaite, now 22 (who has since unofficially taken the Muslim name Sherafiyah) denied Lindsay's involvement until authorities produced forensic evidence to confirm his identity. [5] She later went on record stating she abhorred the attacks and that her husband's mind had been poisoned by radicals (From Wikiepdia.org)
|
Samuvai
| |
| Tuesday, August 22, 2006 - 9:08 am: |
| 
|
समीर, shravan , दिनेश, केदार, उत्तम मुद्दे मांडलेत. shravan , फक्त एक सुधारणा. वंदे मातरम न म्हणण्यामागचे मुसलमानांचे तर्कशास्त्र आजचे नाहीये. स्वातंत्र्यपूर्व काळात काॅग्रेसच्या एका अधिवेशनात विष्णू दिगंबर पलुस्कर वंदे मातरम म्हणत असताना मुसलमान सदस्यांनी "त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीम" ला आक्षेप घेत गोंधळ घातला आणि आज जे आपण वंदे मातरम म्हणतो ते अर्धवट आहे (गांधीकृपा)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|