Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 11, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through August 11, 2006 « Previous Next »

Samuvai
Tuesday, August 08, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi, kedar ,
म्हणजे थोडक्यात काय तर "सगळ तुम्ही करा. आम्ही फक्त जमतील तिथे तंगड्या घालणार" :-))


Zakki
Tuesday, August 08, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग आम्ही अमेरिकेतील भारतीय तेच तर करतो आहोत! (काही सन्माननीय अपवाद वगळून)!


Laalbhai
Wednesday, August 09, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी..

तुमच्या आणखी एका मुद्द्यावर कालपासून लिहायचे होते पण राहून गेले. मुद्दा हा की मोठ्या नेत्यांचा अपमान! जसे की सावरकर, बोस वगैरे..

तर असे आहे की, हा अपमान सगळ्याच नेत्यांचा होत असतो. मणिशंकरने सावरकरांचा केला, शलिनीताई आंबेडकरांचा करते आहे. वास्तविक दोघांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा विचार केला तर ते दोन्ही मोठ्या व्यक्तींचा पासंगालाही पुरणार नाही. त्यातल्या त्यात मणीशंकरने इराण तेलवाहीनीसाठी फारच चांगले काम केले होते. शलिनीताईचे कर्तृत्व तेवढेही नाही. तरीसुद्धा तारतम्य, भान म्हणून नसते. यातून कोणताही मोठा नेता वाचलेला नाही. अब्राहम लिंकनचा एका अमेरिकनाकडूनच खून झाला. गांधींना उगाच आपले राष्ट्रपिता करून glorify केलेय म्हणून पण त्यांची होणारी छुपी विटंबना टळते का?

वैचरिक विरोधाला "शतृत्वचे" स्वरुप दिले जाते, हे खरे यामागचे कारण आहे. आता मायबोलीवरच पहा ना. सगळे सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित. V&C वर वाद घालणारे जास्तीत जास्त २५ लोकं... तरीही "शतृत्व" निर्माण होते. जर सुशिक्षितांच्या टोळक्यात असे होते, तर समाजात तर निरक्षरांची गणतीच नाही. त्यांना भडकावयला असे उपाय केले जाणारच. (ह्या घटना योग्य आहे, असे नाही. तर सद्यपरिस्थितीत अपरिहार्य आहेत.)

त्यामुळे महापुरुषांची विटंबना, हा मुद्दा irrespective of राजकीय पक्ष आणि विचारसरणी आहे, असे वाटते.


Robeenhood
Wednesday, August 09, 2006 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शत्रुत्व shatrutva असे लिहावे मेरे'लाल'

Laalbhai
Thursday, August 10, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभारी आहे. "लाल"ला "मेरे" म्हणालात तर इथे किमान २ readymade "शत्रु" आहेत, माहिती आहे ना? :-)

Kedarjoshi
Thursday, August 10, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PLANE TERROR PLOT DISRUPTED

http://www.cnn.com/2006/US/08/10/us.security/index.html

Moodi
Thursday, August 10, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार बातम्यांमध्ये तेच दाखवतायत हो सकाळपासुन. मती गुंग झालीय.


Zakki
Thursday, August 10, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला त्या बातम्यात परत परत सांगत असलेली एक बातमी लक्षवेधी वाटली. पूर्वी लंडनमधे पकडलेले नि आत्तापण पकडलेले हे नुकतेच पाकीस्तानात जाऊन आले होते, शिवाय पैशाचा पुरवठाहि पाकीस्तानमधून झाला. तेंव्हा तिथेच त्यांना Terrorist training दिले जात असावे असा संशय आता FBI ला येतो.!

Musharraf is our friend in fight against terror! Let's give him money, F16!

त्यांचेच F16 घेऊन त्यांच्याच लोकांवर हल्ला केला तरी हे जागे होणार नाहीत. उगीच कशाला भारतीय नेत्यांना दोष देता! त्यांनी अनेक वर्षांपूर्वी ओळखले की सरकारकडून कुठलेहि काम धड होत नाही, म्हणून सरकारने कधीहि मधे मधे करू नये, होत असेल ते होत राहू द्यावे. आपली policy कधीहि बदलू नये!

Kedarjoshi
Thursday, August 10, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुमच्या वरिल तिन्ही पैराग्राफना १०० टक्के अनुमोदन.

Moodi
Thursday, August 10, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की अहो FBI ने( बहुतेक) पाकीस्तानात जिथे अतीरेकी ट्रेनिंग सेंटर आहे ना तिथले फोटो घेऊन ते सिद्ध पण केले, चांगली कडक भाषा पण वापरली. तरी या पाकीस्तान्यांचे पडलो तरी नाक वर अशी भूमिका. काय करणार कप्पाळ.

मागे मी एकदा इथे टॅक्सीतुन घरी येत होते(ब्रिटनमध्ये टॅक्सी व्यवसाय पाकींच्या हातात आहे) तेव्हा तो ड्रायव्हर मला म्हणाला की मी नाही जाणार आता पाकीस्तानात. आमच्या देशात इतके प्रांतिक आणि वांशिक वाद सुरु आहेत की कोणत्याही क्षणी भयानक संघर्ष सुरु होऊन, दंगली पेटुन त्याचे तुकडे पडु शकतील. मी जास्त बोलले नाही कारण एकटीच होते. आता उद्या एअरपोर्टवर जायचे तरी ड्रायव्हर पाकीच असतील.

पण असे व्हावेच तेव्हा पाकीस्तान जगाच्या नकाशावरुन पुसला जाईल.( दुसर्‍याचे वाईट चिंतु नये म्हणतात पण ह्या लोकांनी जो उच्छाद मांडुन सगळ्या जगाला पिसाळुन सोडलय तेव्हा अशीच भावना मनात येणार)


Zakki
Friday, August 11, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थात् अपेक्षेप्रमाणे त्या मुर्दाडांनी सांगितले की पाकीस्तानने आम्हाला हे लोक पकडून देण्यात मदत केली! मूर्ख, निर्लज्ज लोक!

मूडी, तुमच्या शेवटच्या परिच्छेदाला अनुमोदन. पाकीस्तान, इराण इ. देश जगाच्या नकाशावरून पुसले जावेत असे वाटणे म्हणजे 'सर्वेऽपि सुखिन: सन्तु' असे वाटण्याचा एक भाग आहे. तसे झाले तर भारतातील परिस्थिती नक्की सुधारेल, लोक सुधारतील, नि चांगले होतील!


Samuvai
Friday, August 11, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्ण अनुमोदन moodi .
झक्की,
'सर्वेऽपि सुखिन: सन्तु' साठी नसल तरी "सर्वे सज्जना: सुखिन्: सन्तु" साठी तरी हे व्हायला हव.


Lalitas
Friday, August 11, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचा आणि विचार करा.. कोण मुर्ख व कोण शहाणे
http://www.loksatta.com/lokprabha/20060818/sabha.htm

Samuvai
Friday, August 11, 2006 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalitas ,
लेख सुरेख आहे.


Gs1
Friday, August 11, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, छान लेख आहे. अरुण साधूने लिहिला आहे हे विशेष.

Moodi
Friday, August 11, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई मगाशी मी व्यक्त केलेले विचार पाहुन तुम्हाला वेगळे काही तर वाटले नाही ना? सगळे म्हणाले लेख छान आहे अन मी एकदम विरुद्ध पोस्ट लिहीली. काय करणार असे बघुन अन वाचुन आपल्याच असहाय्यतेची जाणिव होते, चीड येते. काय कमी आहे आपल्या देशात बुद्धीवंतांची? सर्व थरात आहेत ते. पण असेच लोक राजकारणापासून दूर पळतात अन देशाचे नुकसान होते ते वेगळेच.

प्रमोद महाजन सारखे नेते हवे होते हो आज.


Lalitas
Friday, August 11, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग नाही मूडी! तू तुझे विचार मांडलेस, लेख छान आहे यांत प्रश्णच नाही.... मी राजकारणाबद्दल फारसं लिहित नाही, फक्त वाचत राहाते. हा लेख इथे टाकला तर विचाराला दिशा मिळेल असं वाटलं.
बुद्धीवंतांची आपल्याकडे अजिबात कमी नाहीये.... पण राजकारणाच्या चिखलांत रुजण्यासाठी एक वेगळीच मानसिक तयारी लागते, त्याचा अभाव आहे.


Moodi
Friday, August 11, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना खूप दिवसानी असा परखड अन मर्मावर बोट ठेवणारा लेख वाचायला मिळाला.

Avdhut
Friday, August 11, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालील बातमी जरुर वाचा. US goverment मुर्ख आहे की काय
http://www.msnbc.msn.com/id/14292854/ Section - Uneasy alliance with Pakistan
जगातली सर्वात हुशार govt is of Parkistan बघा, safe heaven to all terrorist and leaders. Protection to Osama and others from US attack. Special trainings for all terrorirst world wide. Finance of terror world wide. आणी still - most important US allie in war againest terrorism हा हा हा. फ़क्त त्यांना ५-६ महीन्यातुन एक terrorist पकडुन द्यावा लागतो. मला तर वाटत त्यांच्या जवळ US bribe terroris suside squad सुद्धा असवा.

Kedarjoshi
Friday, August 11, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवधुत तुला हा प्रश्नच का पडावा.
हे जगजाहीर आहे की तालीबान, ओसामा, यांना तयार कोणी केले. असे म्हणतात की आजोबाने झाड लावले तर त्याचे फळ नातवाला भेटतात. सुज्ञास सांगने न लगे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators