Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 05, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » काव्यधारा » कविता » Archive through September 05, 2006 « Previous Next »

Kiru
Friday, September 01, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"सुखामागोमाग दु:ख यायलाच हवं का रे ?"

"हं... स्वच्छ पौर्णिमेपाठोपाठ नाही का
अमावास्या असते?"

"पण पौर्णिमेचा चंद्र जेवढा सुखावतो
तितकाच अमावास्येचा अंधार जीवघेणा वाटतो.."


"थोडी चुकलीस...
पौर्णिमेचा चंद्र सुखद असतोच पण..
अमावास्येच्या रात्री.. सहस्र तार्‍यांनी खळखळून भरलेलं आकाश पाहिलयस कधी?
जीवघेण्या अंधाराचा आपोआप विसर पडतो.
...
मी ही खूप प्रयत्न करतो...
एक तारा होण्याचा..
कुणाच्यातरी अमावास्येच्या वेळेस
त्याला अंधाराचा विसर पाडण्यासाठी..."


Asmaani
Friday, September 01, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे किरु! सही!

Niru_kul
Saturday, September 02, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फक्त तुझ्याच साठी....

माझी भावना, फक्त तुझ्याच साठी....
माझी प्रेरणा, फक्त तुझ्याच साठी....
प्रतिक्षा, फक्त तुझीच....
माझी प्रतिभा,फक्त तुझ्याच साठी....
मी वेडा, फक्त तुझ्याच साठी....
मी शहाणा, फक्त तुझ्याच साठी....
मी रुसतो, फक्त तुझ्यावरच गं....
माझा हा बहाणा, फक्त तुझ्याच साठी....
माझं विश्व, फक्त तुझ्याच साठी....
माझं स्वत्व, फक्त तुझ्याच साठी....
माझं ह्रदय, कधीच तुझं झालंय....
माझं मनही आता, फक्त तुझ्याच साठी....
माझी निर्मळता, फक्त तुझ्याच साठी....
माझी रसिकता, फक्त तुझ्याच साठी....
माझं दैवत, तुच तर आहेस....
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, फक्त तुझ्याच साठी....
माझा श्वास, फक्त तुझ्याच साठी....
मी मरतो, फक्त तुझ्यावरच गं....
माझा हळवेपणा, फक्त तुझ्याच साठी....
माझे शब्द, फक्त तुझ्याच साठी....
माझा अर्थ, फक्त तुझ्याच साठी....
माझी कविता, फक्त तुझ्याच साठी....
नाही आवडली ?
फाडून टाकतो, फक्त तुझ्याच साठी....

Sameerdeo
Sunday, September 03, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पहिली भेट

मी
असा
कसा
जसा
तया
नको
तसा
असा

ते
असे
कसे
जसे
मला
हवे
तसे
नव्हे

तरिही
रोज
हासतो

मित्र
आम्ही
भासतो

आम्ही
असे
कसे?


Sameerdeo
Sunday, September 03, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sare kavimitra,
This is my first day with Maayboli, Give me your comments and join me to your group
Thank You
- SAMEER DEO

Shyamli
Monday, September 04, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देठ

चैत्रपालवी किंवा श्रावणसरी

नाहीच व्ह्यायचं मला

शिशिरात होते ना पानझड

पानझडीत गळणार पान

आणि त्या पानाबरोबर गळून पडणार देठ

तेवढंच व्ह्यायचय मला........

कारण

जाता तरी येईल कमीत कमी
त्याच पानाबरोबर

मला....................

श्यामली




Dhund_ravi
Monday, September 04, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय असते चैत्रपालवी
अन काय असते पानझड
भासांच्या हिन्दोळ्यावर नसते
वास्तवाशी सांगड

तुझ्या विरहात माझ्या श्रावणाला असतात
तुझ्या बहरत्या पानझडीचे वेध
श्रावणसरी पान होऊन गळुन पडतात
जेंव्हा तु असतेस पानासोबतचा देठ

धुंद रवी


Vaibhav_joshi
Monday, September 04, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा !!! सहीच चाललंय इथे ...

Vaibhav_joshi
Monday, September 04, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऊब ...
कित्येक रात्री तळमळत काढल्यानंतर
काल उठलो तिरीमिरीने ...
अन शोधून काढली
अडगळीत पडलेली लहानपणीची गोधडी .
अगदीच दुर्दशा झाली होती ,
धागे उसवले होते अन दिसत होते
सुरकुत्यांसारखे ...
आता हिचा काय उपयोग म्हणून
फेकून देणार
इतक्यात जाणवलं
गोधडी थंडीने कुडकुडत होती
अन माजघरात कुणी स्त्री रडत होती ...
आई असावी बहुतेक ...


Archanamandar
Monday, September 04, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर, फारच सुरेख. किती वेगळ्या शैलीत लिहिलं आहेस.

Manishalimaye
Monday, September 04, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

September 04, 2006 - 6:39 am:


" परत कधी चुकुन सुध्दा 'माणुस ' म्हणु नकोस,
अर्ज आहे समज
विनंती आहे म्हण
पण माणुस म्हणु नकोस."
असं म्हणताच मी---
तो चक्क हसला.
म्हणाला,
"घाबरलास?
का रे?"

मी म्हटलं,
"सगळ- सगळ होण सोप आहे इथे,
पण माणुस?
अ हं.
अरे माणुस म्हटला की अंगात माणुसकी हवीच!
ती कुठुन आणु?
ती concept च out-dated झाल्ये हल्ली
असलीच तर असते एखाद्याकडेच
ती सुध्दा 'लिमिटेड माणुसकी'.
नाही तर मग नाहीच
मग उपयोग काय माणुस असण्याचा?"

तो म्हणाला,
"अरे कोणी सांगितलं तुला हे?
जरा समोर बघ,
डोळे उघडे ठेऊन बघ.
आपल्या अंगावरच्या फाटक्या लक्तरात जखमींना लपेटणार्‍यांकडे काय होत दुसरं?
माणुसकीच ना?
पावसात अडकलेल्यांना बिस्किटं देणार्‍यांचा काय धर्म होता?
माणुसकी हाच ना?
खड्यात अडकलेल्या कोण कुठच्या प्रिंन्ससाठी प्रार्थना करणारे काय जपत होते
माणुसकीच ना?"

मी म्हटले,
"पण.. पण आरे...पण"

तो म्हणाला,
"पण पण काय करतोस?
जरा स्वत: वरती विश्वास ठेवुन बघ.
समोरच्यावरही विश्वास ठेवायला शिक.
बहरलेल्या बागेत थोडं तणं असणार
म्हणुन काही बागेच सौदर्य कमी होत नाही
साक्षात देवांनाही शाप आहेत
माणसाच काय सांगतोस!
स्वत: पासुन सुरवात कर्----
तू साद घालुन तर बघ,
दशदिशांतुन येईल प्रतिसाद.
अनुभुती घेऊन बघ."

मग पतर कधी चुकुन सुध्दा असं म्हणणार नाहीस,
कारण माणुस म्हणवुन घेण्यातच गौरव वाटेल तुला"

मनिषा

























Sameerdeo
Monday, September 04, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनविहंग झेपावत उत्तरेस उडताना
सागरापल्याड दिसे सुर्यबिंब बुडताना
का कशी कुठून तिथे कविता ती येते अन
तम जाळित आकाशी शुक्र दिसे चढ ताना


Devdattag
Tuesday, September 05, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ती पहा अहाहा
रक्तिम पश्चिमा झाली
का सांग धरा की
लज्जेत चूर ही न्हाली

नववधू उभी का
त्या दाराशी सजलेल्या
ती आतूर नजर अन
त्या अनामिका जुळलेल्या

पहा खेळ मनोहर
करी पदर अन अधरांचा
नाव घेई प्रियाचे
मग हलके गुणगुणतांना

ते पुन्हा बटांचे
त्या गालावर ओघळणे
तो पाय मुडपूनी
धरेस जरा उलगडणे

ती रम्य चारुता
पण मनी वाटते हुरहुर
रे कुणा शंकांचे
सांग उठले असेल काहूर

ये घरी लवकरी
मी थोपवू कसा आवेग
रे बरसून जातील
ह्या नयनांचे दो मेघ
-देवदत्त


Shyamli
Tuesday, September 05, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवि..... हम्म..... छान लिहीताय
ललीतपण छान आहे तुमचे

समीर, अरे हे झुळकेत टाकायचस ना...मस्तय


मनीषा...... छान

गुरुजी रडवलत तुम्ही, अचुक शब्द कसे सापडतात रे तुला?

देवा, येऊ दे अजुन, छान सुर पकडलायस


Sameerdeo
Tuesday, September 05, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा
किरु, निरु, शामली, धुंद रवी, वैभव, मनिषा, आणि देवदत्त
फारच छान
आता तुमच्यासाठी एकोळी
माझी खात्री तुझी मैत्री


Mrudgandha6
Tuesday, September 05, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!!!
सगळेच अप्रतिम
किरु,
काय सुंदर तू खरच तार्‍यासारखा झगमगशील..

समीर,
अप्रतिम!!!!

श्यामली,
नितांत सुंदर

वैभव,
नेहमीप्रमाणेच हुरहुर लावणारी

रवी..खरच सुरेख

देवदत्तजी,
अगदी मस्त..

मनीषा,
कविता दिसली नाही ग..फ़क्त चौकोन दिसले..पण छानच असेल..


Mrudgandha6
Tuesday, September 05, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरु,
तुझीही कविता दिसली नाही..


Manishalimaye
Tuesday, September 05, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंघा sty वर जा तिथे माझी ही कविता आहे

Devdattag
Tuesday, September 05, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलि देठ मस्त आहे गं..
मनिषा.. छान
रवी.. सुंदर आहे
वैभव.. .. ..
समीर चारोळी मस्त आहे.. खरंतर काल घरी जायला निघतांना तुमची चारोळी वाचली आणि जाता जाता ही वर लिहिलेली कविता सुचलि.. कशी ते माहित नाही..:-)


Lopamudraa
Tuesday, September 05, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा.. अलवार शेवट आवडला..!!!
समिर लिहिलि फ़ार सुन्दर आहे..!!!
धुन्द रवी.. आणि.. श्यामली best ....
मनिषा.. छाने..एकदम..
गुरुजी आजकाल.. हळवे झालेत फ़ार..!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators