Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 13, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » १२ जून ..... पु. ल. स्मृतीदिन ..... » Archive through June 13, 2006 « Previous Next »

Arun
Monday, June 12, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिकविलेत तुम्ही आम्हा जीवनाचे सार
तुमच्याच निखळ विनोदाने
आज स्मृतीदिनी तुमच्या
हाती केवळ तुमचे लिखाण

व्यक्तीचित्र असो वा असो प्रवासवर्णन
नाटक असो वा भाषांतरे चार

रावसाहेब, अन्तू बर्वा अथवा धोंडोपंत
या व्यक्तीरेखांत मज दिसे मी पण

लंडन जपान असो वा अमेरिका
जणू आम्हीच केले दौरे तुमच्यासह

प्रवासवर्णनापरी प्रवासातील मी
हाच होता सारा लेखनप्रपंच

काकाजी असो वा असो ती फुलराणी
माय मराठी जणू भासे तुमच्या चरणांची दासी

आता केवळ तुमचे शब्द जपून ठेवणे
पु. ल. असते तर .... याच विषयावर बोलणे


Mrinmayee
Monday, June 12, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुण, छान लिहिलय. पु. ल. फॅन असूनही हा दिवस कसा विसरले


Dhani
Monday, June 12, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारच छान लिहिले आहे अरुण...

Abhi_
Monday, June 12, 2006 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुण मस्तच रे!! ..

Kmayuresh2002
Monday, June 12, 2006 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान रे अरुण... खरोखर पु. ल. आज असते तर.....

Smi_dod
Monday, June 12, 2006 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुण छान...पु.ल. म्हणजे आपली शाळा होती.. त्यांचा हात धरुनच मी या साहित्याच्या जगात फ़िरलेय.. त्यांनी आमचे वाचन,भाषाविश्व,अनुभवविश्व समृध्द केले.. निखळ विनोदाने खळखळुन हसायला शिकवले... घडवले नवनवीन प्रदेशांची, साहित्यिकांची ओळ्ख करुन दिली... परदेश फ़िरवुन आणले तसेच शान्तिनिकेतन ही फ़िरवुन आणले... चाळीत न रहाता चाळीचे जीवन ही अनुभवले..व्यक्ती मधल्या वल्लीचें दर्शन खुमासदार पणे घडवले.. खरच जे अनुभव त्यांच्या पुस्तकातुन मिळाले ते मिळणे नाही...

तासनतास ऐकट्याने हसत रहाणे.. समोरच्या माणासांमधे कोणी अन्तुबर्वा,सखाराम,बबडु, आहे का? हे शोधणे हा तर माझा आवडता छंद होता.

फ़क़्त एवढ्या बाबतीतच आमची पिढी मला नशिबवान वाटते कि आमच्या साठी पु.ल. होते.. आता आमच्या मुलांसाठी ती उणिव आहे.. पण त्यांचे चिरतरुण साहित्य बरोबर आहे हीच मोठी दौलत आहे...


Meenu
Tuesday, June 13, 2006 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच पु. लं ना जितकं miss करतो आपण सगळे तेवढ जगात दुसया कुणा लेखकाला miss केलं नसेल

Itsme
Tuesday, June 13, 2006 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arun, mastach ....

Giriraj
Tuesday, June 13, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा!

मस्तच रे अरुण! -- -- --


Jo_s
Tuesday, June 13, 2006 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरूण छानच लिहीलय

पु.ल. प्रेमींनो

मी काल कविता पानावर पुलं ची आठवण काढली होती.

आता वेगळ पान केल आहेच तर


पुल तुम्ही जाताना
साठवण इथेच ठेवून गेला
आणि तुमच्या आठवणीने
प्रत्येक डोळा पाणावला

पुल तुम्ही जाताना
थोडं तरी थांबायचं होतं
सार्‍या व्यक्ति वल्लींना
तुम्हाला एकदा भेटायच होतं

"बटाट्याची चाळ"
आता पोरकी झाली
"त्या फुलराणी"ला ही
तुम्हीच बोलकी केली

"तुझं होतं तुझं पाशीच"
हे आता जाणवतं
जेव्हा तस नावींन्य
क्वचीतच सापडतं

"पुर्वरंग"ची "अपूर्वाई"
नेहमीच राहील मनात
देशोदेशी फिरताना
स्वदेश नाही विसरलात

"वार्‍यावरची वरात"
पोहोचली घरा घरात
लहान थोर वेडे होती
हसण्याच्या भरात

तुम्ही फार बिन्धास्त होता
जेव्हा हादरवली दिल्ली
"पुल तुम्ही स्वत्:ला काय समजता"
जेव्हा उडवता "खिल्ली"

नाटक, संगीत, सिनेमा, लेखन
काही शिल्लक नाही ठेवलं
जे जे मिळवलं ते ते
तुम्ही नेहमीच वाटून टाकलं

राहवलं नाही म्हणून
प्रयत्ने काहीतरी लिहीलं
जेव्हा पत्राचा मजकूर लिहीणार्‍याने
पत्यातल्या नावाच्या धन्याला बोलावून नेलं

सुधीर




Smi_dod
Tuesday, June 13, 2006 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सुधीर.. मस्त.. डोळे पाणावले.. छान लिहिलय..

Puru
Tuesday, June 13, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दांना वाकवीत पण सवंगतेकडे जराही न झुकलेला विनोद करावा तो पुलंनीच! गुदगुल्या होतील पण बोचकारे निघणार नाहीत असं लिहावं पुलंनीच! समाजातील दंभांचं शाब्दिक व्यंगचित्र काढावं पुलंनीच! तानसेन नाही तर निदान कानसेन होऊन रसिकतेने कसं जगावं हे शिकवावं पुलंनीच! या हातानी दिलेलं दान त्या हातालाही समजु नये असं दातृत्व शिकावं पुलं कडूनच!!

Mrdmahesh
Tuesday, June 13, 2006 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरूण, सुधीर,
अतिशय सुंदर लिहिले आहे... त्यांच्या बद्दल लिहावे तेवढे थोडेच...
अशी चतुरस्त्र व्यक्ती (की वल्ली??) पुन्हा होणे नाही...


Devdattag
Tuesday, June 13, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरूण.. खरंच धन्यवाद रे..
तु उल्लेखलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखा आणि प्रत्येक जागा परत एकदा उभ्या राहिल्या.. अंतु बर्वा, नारायण, पेस्तनजी, बबडू, चितळे मास्तर, सखाराम गटणे, भैय्या नागपूरकर, काकाजी एक ना अनेक..
पूर्वरंग, अपूर्वाई मध्ये केलेली प्रवासवर्णन म्हणण्यापेक्षा प्रवासाचे रसाळ कथन..
त्यांची शास्त्रीय संगीतावरची हुकुमत.. त्यांचे रविवारची गोष्ट मधलं पेटीवादन क्या बात है..
त्यांचा गुळाचा गणपती मधला अभिनय.. तो भोळा भाबडा चेहरा..
अप्रतिम...:-(


Rajkumar
Tuesday, June 13, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुण,जो मस्तच! .. .. ..

Gs1
Tuesday, June 13, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा अरूण, अगदी समयोचित

Vinaydesai
Tuesday, June 13, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पु. ल. एक आठवण..
जसं तुमचं, तसं माझं ही ते दैवत.. ते असताना कधी दर्शन होण्याचा योग आला नाही, पण परवा पुस्तक प्रकाशित करताना त्यांच्या घरी जाऊन आलो..
'आता डोळ्यानी पाच टक्के ही दिसत नाही, नाहीतर वाचलं असतं तुमचं पुस्तक,' सुनिताबाई म्हणाल्या.
'आता आलेली पुस्तकं, कुठल्या कुठल्या वाचनालयाला देते मी'....
'पुस्तक देवळात पोहोचलं, आता तुम्ही काहीही करा', मी त्यांना म्हणालो..

पुढे त्यांच्याशी गप्पा मारायला काही वेळ म्हणाला..
'भाईचं पहिलं पुस्तक.. तेव्हा संगणक नव्हते... पुस्तक हाताने कंपोज करत. मग प्रकाशक ते घेऊन येई,' त्या सांगत होत्या.
'आपण चुका शोधून काढायच्या, मग परत पाठवायचं, असं चार पाच वेळा करावं लागायचं '.
'त्यांना सोपं जावं म्हणून मी कंपोझरच्या खुणा शिकले, आणि तश्या दुरुस्त्या करू लागले.'
'शेवटची चार पाच पानं राहिली, आणि मला जायचं होतं गावाला. मी भाईला पध्दत समजावून सांगितली आणि शेवटची चार पानं आली की तपास सांगून निघाले.'
'परत आले, तेव्हा भाईला विचारलं. तो म्हणाला प्रुफं तपासली आणि काम पूर्ण झालंय. मला जरा आश्चर्य वाटलं'
'पुस्तक आलं तर त्यात भरपूर चुका.. मी प्रकाशकाला बोलावून भांडले, तर तो म्हणाला 'बाई, तुमची सही आणि परवानगी असल्याशिवाय मी पुस्तक छपत नाही.. म्हणून मग प्रुफं बाहेर काढली.'
'त्या चार कागदांवर वाघ नावाच्या कंपोझरचं नांव होतं.. आणि पहिल्याच वाक्यात चार पाच चुका बघून भाईने, वाघ वर काट मारून तिथे डुक्कर असं लिहून पुस्तक परत पाठवलं होतं...


Shreeya
Tuesday, June 13, 2006 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या लाडक्या पु.लंचा स्मृतिदिन अन लक्षातच नाही.

पण म.टा.तील श्रद्धान्जली कायम आठवते,
"पु.ल., यापुढे महाराष्ट्र कधीच आपल्या आठवणींनी रडणार नाही. आपले लिखाण वाचुन हसेल,हसता हसता डोळ्यात पाणि येईल इतकेच!"
आजही ते आपल्यात आहेत हेच खरे!


Badbadi
Tuesday, June 13, 2006 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरूण, सुधीर, विनय... सुंदर... :-) अगदी कुठल्याही पिढीला हसवण्याची ताकद होती पु. लं. मध्ये..

Smi_dod
Tuesday, June 13, 2006 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय छान..पु.ल. च्या घरी जाउन आलात... मला वाटत हा किस्सा सुनिता बाईंच्या कुठल्या तरी पुस्त्कात पण त्यांनी सांगीतलाय... खरच पु.ल. ग्रेट होते




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators