भारतामध्ये काही राजकारणी का सतत भारतविरोधी किंवा राष्ट्रविरोधी विषयांवर चर्चा करतात? हे प्रश्न चॅनेल्सवरही “ब्रेकिंग न्यूज” म्हणून दाखवले जातात. काही प्रश्न तर गेल्या पंधरा वर्षांपासून पुन्हा पुन्हा विचारले जातात:
1. ईव्हीएम मशीन कशा प्रकारे नियंत्रित केल्या जातात? (निवडणूक हरलात तर)
2. बोगस मते कशी टाकली गेली?
3. पहलगाम हल्लेखोर खरे मुस्लीम होते का?
4. जिंकणाऱ्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले.
ही यादी मूर्खपणाची आणि अंतहीन आहे. देशातील कोणत्याही नेत्याने हैदराबादजवळ खासगी स्पेस सेंटर सुरू करण्याबद्दल बोलले नाही. दरवर्षी हजारो विमान इंजिनांसाठी MRO (मेंटेनन्स रिपेअर्स ओव्हरहॉल) सुविधा सुरू करण्यावर चर्चा नाही. ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या ऑर्डरवर का बोलत नाहीत? किंवा आक्रमक वस्त्रोद्योग धोरणावर?
मला वाटते हे नेते स्वतःच गोंधळलेले आहेत किंवा देशविरोधी शक्तींनी त्यांना नियंत्रित केले आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही, ते सामान्य लोकांच्या भावना काय आहेत हे समजुन घेऊ शकत नाहीत.
नेते सामान्य जनतेच्या अपेक्षांपासून किती दूर असतात याचा एक प्रसंग मला आठवतो. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा युरोपमध्ये पराभव होत होता. रोमेलने तुब्रुक जिंकला होता आणि सुझ कालव्यावर कब्जा करण्याच्या मार्गावर होता. अमेरिका अजून युद्धात उतरली नव्हती आणि अमेरिकन पुरवठा जर्मन U-बोटी नष्ट करत होत्या. लंडनवर सतत बॉम्बहल्ले होत होते आणि विध्वंस पसरला होता. इंग्लंडची वायुसेना जवळजवळ संपली होती. संसदेत प्रतिनिधी चर्चिलवर शरणागतीचा दबाव टाकत होते. ते राजाकडे गेले आणि शरणागतीबद्दल बोलले.
राजाने चर्चिलला विचारले: “तुम्हाला संसदेनं निवडलं आहे की सामान्य जनतेनं? मला संसद काय विचारते ते सांगू नका. मला लोक काय विचारतात ते सांगा.” चर्चिल परत गेले आणि त्यांच्या एजंटांनी संकटग्रस्त लोकांमध्ये सर्वेक्षण केले. सर्वांचा एकमताने उत्तर होते: “आम्ही शरण जाणार नाही. आम्ही मरू, उपाशी राहू, पण शरणागती स्वीकारणार नाही.”
दुसऱ्या दिवशी संसदेला चर्चिलकडून शरणागतीचे भाषण अपेक्षित होते, पण त्याऐवजी त्यांनी इतिहासात नोंद होईल असे गगनभेदी भाषण केले:
“इंग्लंड कधीही शरण जाणार नाही. आम्ही लढू. आम्ही जमिनीवरून लढू, आम्ही आकाशातून लढू, आम्ही समुद्रामधून लढू, आम्ही समुद्राखालील ठिकाणाहून लढू. जर देश सोडावा लागला तरी आम्ही परत परदेशातून लढू. पण इंग्लंड कधीही शरण जाणार नाही.”
ही दुसऱ्या महायुद्धातील धैर्य वाढवणारी भूमिका होती.
मूर्खासारखे प्रश्न विचारण्याऐवजी आणि त्यांना ब्रेकिंग न्यूज बनवण्याऐवजी आपल्या तथाकथित नेत्यांनी यापासून शिकायला हवे.
बोलबच्चन
Submitted by अविनाश जोशी on 29 November, 2025 - 05:56
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे भाषण पंतप्रधानांचे आहे -
हे भाषण पंतप्रधानांचे आहे - सर्वांना बरोबर घेउन शत्रूशी लढण्याबद्दल. ते इथे कसे लागू होईल? मोदी २०१४ नंतर सुरूवातीला करायचे तसे सर्वांना बरोबर घेउन प्रगती करणे वगैरे भाषणात बोलतात का माहीत नाही. मी त्यांची अलिकडची भाषणे ऐकलेली नाहीत. पण हे उदाहरण चुकले आहे.
बाकी तपशिलातील चुका तर वेगळ्याच. या सगळ्याचा संदर्भ कोणता आहे? चर्चिलचे हे भाषण इंग्लंडवरच्या प्रत्यक्ष हल्ल्याच्या बर्याच आधीचे आहे. तेव्हा फ्रान्सवर हल्ला झाला होता. तसेच इंग्लंडच्या संसदेत शरणागतीची मागणी होत होती असे कधी वाचले नाही. तोपर्यंत इंग्लंड हीच जगातली सर्वात मोठी महासत्ता होती. त्यामुळे ते लढत राहिले यात काही आश्चर्य नाही. चर्चिलने स्वतः कधी शरणागतीचा विचार केला असेल आणि असा प्रस्ताव सिरीयसली राजाकडे नेला असेल असे वाटत नाही.
बाकी लोकांनी निवडून दिलेल्या सदस्यांकडे दुर्लक्ष करून पुन्हा लोकांकडून मत घ्यावे असे पंतप्रधानाला राजाने सांगितले याला काही ऐतिहासिक आधार आहे का? यात लोकशाही, रिपब्लिक वगैरे लॉजिक रानोमाळ हरवले आहे. असे खरेच झाले असेल तर ते विनोदी आहे.
म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे,
म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे, देशात खरे बोलणे, भाजपविरुद्ध बोलणे नी चुना आयोगविरुद्ध बोलणे भारतविरोधी आहे! ख्या ख्या ख्या! फार विनोदी बुवा तुम्ही!
मला वाटले मोदींवरचा लेख आहे.
मला वाटले मोदींवरचा लेख आहे.
चर्चिल वसाहतवादी होते,
चर्चिल वसाहतवादी होते, भांडवलशाहीचे पाईक होते इ. त्यांच्या विरोधातील अनेक गोष्टी खऱ्याही असू शकतात पण ते हिटलरपासून जगाला वाचणारे एक महत्त्वाचे झुंजार , जिद्दी नेते होते हे सर्वमान्य आहेच आहे. हिटलर विरुद्ध अमेरिकेला लढाईत उतरवणं अत्यावश्यक आहे हे उमजून , त्यानीं अमेरिकेत जावून त्यावेळी सर्वत्र फिरून भाषणं केली. ( " English Speaking People Unite " ह्या शीर्षकाखाली ही भाषणं प्रसिद्धही झाली होती ).चर्चिल शरणागतीचा प्रस्ताव घेवून राजाकडे जातील हे ठोस पुराव्याशिवाय म्हणूनच अशक्य वाटते.
शिवाय, ह्या सर्वाचा भारतातील सद्यपरिस्थितीशी जोडलेला संदर्भही अनाकलनीय वाटतो, हे तर आहेच.
हा लेख कुणावरही नाही. माझे
हा लेख कुणावरही नाही. माझे म्हणणे एवढेच आहे कि पुढाऱ्यांनी स्वतःचे मत जनतेवर न लादता जनतेचे मत विचारात घावे.
गेल्या काही आठवड्यातील मुक्ताफळे वाचा
१. निवडणूक आयोगाच्या SIR मुळे आत्महत्या होत आहेत.
२. वक्फ बोर्ड कायद्यानुसार आम्ही सर्व भारत आमचा म्हणून घोषित करू
३. सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही.
जाऊदेत असे अनेक दाखले देतायेतील. हे सर्व दाखले BJP पेक्षा राष्ट्र विरोधी आहेत.
आज आपल्याच देशात आपल्याला चोरून राहावे लागते. Al-Falah बेकायदेशीर विश्व विद्यालय परदेशातून कोट्यवधी रुपये जमवत आहेत. वक्फ विरोधी कायदयात सामान्य मुस्लिम जनतेनी आनंद व्यक्त केला मोदींच्या फोटोना हार घातले पण खायला चटावलेले मुल्ला मौलवी वाट्टेल ते बरळत होते आणि हा वारसा पार नेहरूंपासून चालत आलेला आहे.
नेहरूंना बाबरी मस्जित सरकारी खर्चाने उभारायची होती. त्याला वल्लभभाई पटेलांनी तीव्र विरोध केला. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार हा सरकारी खर्चाने होत नाही असे त्यावेळी नेहरूंनी पटेलांनी सांगितले. एवढंच नव्हे तर सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा पटेलांच्या मृत्यूनंतर झाली. त्यावेळेस राजेंद्रप्रसादानी जाऊ नये असे बरेच प्रयत्न नेहरूंनी केले होते. पण तरीही राजेंद्रप्रसादांनीच सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली.
सैन्याला १९४७ रोजी आवरले नसते तर POK/काश्मीर असे प्रश्नच शिल्लक राहिले नसते.
हा प्रश्न नेहरूंनी UNO मध्ये नेऊन नसते वाद निर्माण केले.
त्यांची चौथी पिढी आज राष्ट्राचा अपमान करून भलतेच उद्गार काढत आहे. वरील सर्व आपण डायरी ऑफ मीराबेन या पुस्तकात वाचू शकता .
इंग्लंड व चर्चिलचे उदाहरण
इंग्लंड व चर्चिलचे उदाहरण दिले म्हणून माझी पोस्ट होती. बाकी, नेहरूंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशाला काय काय दिले यावर खूप कांहीं कृतज्ञतापूर्वक लिहिता येईल पण उगीच त्या वादात न पडणेच बरे असं आता वाटतं.
हा लेख कुणावरही नाही.
हा लेख कुणावरही नाही.
>>>
अच्छा तुम्ही स्वतःवरच लिहिलाय होय हा लेख
हा लेख कुणावरही नाही.
हा लेख कुणावरही नाही.
>>>>>
किंवा भारतातल्या प्रत्येक नीच, नालायक, नाकर्ता, हरामखोर, सत्तालोलूप, स्वार्थी, ढोंगी राजकीय नेत्याबद्दल आहे जे प्रत्येक पक्षात ढिगाने आहेत. मुळात यांचा एक असा पक्षच नाही. त्यामुळे हल्ली कोणालाही कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाची बाजू हिरीरीने मांडताना पाहिले की इरिटेट होते. कारण जनतेने सरसकट सगळ्या पक्षांना शिव्या घालाव्यात अश्या लायकीचे आहेत हे. मी तर आता मतदान करणे सुद्धा सोडून दिले आहे. या नालायकांमधून कमी नालायक निवडण्यात काही इंटरेस्ट उरला नाही.
बाकी बोलबच्चन शीर्षक वाचून मला मात्र अभिषेक बच्चन आठवला. तो बालबच्चन सुद्धा आहे आणि त्याचा बोलबच्चन नावाचा चित्रपट सुद्धा आहे.
>>>>>>>> एखाद्या राजकीय
>>>>>>>> एखाद्या राजकीय पक्षाची बाजू हिरीरीने मांडताना पाहिले की इरिटेट होते.
इरेल पडुन अगदी खुनशीपणे, हिंस्त्रपणे, ...... इरिटेटिंगच आहे.
लेखकांचा अभ्यास दांडगा आहे,
लेखकांचा अभ्यास दांडगा आहे, हे वाचकांसाठी.
जोशी , लवकर बरे व्हा.
जोशी , लवकर बरे व्हा.
मानव - तो संदर्भ यांच्या
मानव - तो संदर्भ यांच्या दुसर्या धाग्यावर जास्त लागू आहे
तुम्हाला तिकडे द्यायचा होता का?करेक्टेड. इथे वरती पोस्ट आहे हे आता लक्षात आले. मला वाटले तो वेगळा धागा होता.