गीतकार - राजशेखर

Submitted by सामो on 1 June, 2025 - 02:39

कितने दफे दिल ने कहा, दिल की सुनी कितने दफे!
वैसे तो तेरी ना में भी मैने ढूँढ ली अपनी खुशी,
तू जो गर हाँ कहे तो बात होगी और ही!
दिल ही रखने को कभी ऊपर ऊपर से सही,
कह देना हाँ... कहे देना हाँ... यूँ ही...

.
काय हळवी कल्पना आहे ही सुद्धा. की तुझा नकार पचवूनही मी जगात आनंद मिळवत राहीलो. आणि त्यात जर तू 'हो' म्हणालीस तर चार चांद लागतील माझ्या प्रेमाला. अगं इतकी देखील कठोर सत्यप्रियता दाखवु नकोस, कधी तरी खोटच बोल की माझं मन ठेवण्याकरता ...
.
आज, युनुस खान यांनी , गीतकार राजशेखर यांची घेतलेली मुलाखत मी विविध भारतीवरती ऐकली. तोवर मला राजशेखर नावाचे कोणी गीतकार आहेत याची गंधवार्ताही नव्हती. झोप यावी म्हणुन विविधभारती चॅनल लावला आणि एक मृदु, सौम्य आवाज कानावर पडला. स्त्रीचा की पुरुषाचा या संभ्रमात, आणि खरे सांगायचे तर that drew me in. त्यामुळे आकर्षित होउन, ऐकू लागले आणि मग वेळेचे भान राहीले नाही. याचे कारण आयुष्यातील प्रसंग, फिल्म इन्डस्ट्रीमधील गंमतीजंमती सांगताना, राजशेखर मधे मधे त्यांनी लिहीलेल्या गाण्यांच्या लडी च्या लडी म्हणुन दाखवत होते. इतकेच नव्हे तर ते स्वतः सिनेमातील त्या त्या पात्राचा अ‍ॅनॅलिसिस करुन कसे गाणे बसवित त्याचे उदाहरण देत होते.
आणि संगीत ऐकताना, दुर्लक्ष झालेले गाणे, शब्द मला त्यांच्या आवाजात ऐकायला मिळत होते. मग ते गाणे - 'पापा मेरी जान' - घ्या ना. यात वडील-मुलाचे नाते कसे उलगडून दाखवायचे आणि त्याच वेळी ट्युन च्या बंदिस्त भिंतीत शब्द कसे बांधायचे, याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्यच होता. गाण्याच्या ओळीही मस्त आहेत.
अंबर पे मेरे एक ही तारा
वो एक तारा हो तुम
ना कोई ख़ुदा मेरा तेरे सिवा
मेरा जग सारा हो तुम
मैंने तुम्हें जहाँ रखा
कोई नहीं है वहाँ

दुसरा एक अ‍ॅनॅलिसिस त्यांनी केलेले गाणे म्हणजे - 'पेहेले भी मै' यात नायक आहे विवाहित त्यामुळे तो प्रतारणा करु शकत नाही. त्याला प्रेक्षकांना नेहमी आपल्या म्हणजे त्याच्या बाजूने ठेवायचे आहे. मग 'जनम जनम का साथ- चांद सितारे' वगैरे सर्व बाद झाले. त्यातून एक जेनेरिक गाणे त्यांनी लिहीले ते म्हणजे. त्यातील - किती काळ लोटला, मी स्वतःलाच शोधतो आहे, तुला जर सापडलो तर तेवढे कळवायला विसरु नकोस- ही कल्पना मला जबरदस्त वाटली.
पहले भी मैं तुमसे मिला हूँ
पहली दफ़ा ही मिलके लगा

तूने छुआ ज़ख़्मों को मेरे
मरहम-मरहम दिल पे लगा

.
ग़लत क्या, सही क्या, मुझे ना पता है
तुम्हें 'गर पता हो, बता देना

मैं अरसे से ख़ुद से ज़रा लापता हूँ
तुम्हें 'गर मिलूँ तो पता देना
खो ना जाना मुझे देखते-देखते

.
खरे तर मुलाखतीचे, २ भाग झालेले मी ऐकले नव्हते आज मुलाखतीचा तीसरा व शेवटचा भाग ऐकला. पण गाणी त्यांचे शब्द एकदम आवडून गेले. एक लक्षात आले की आपल्याला गाण्यातील भावना, शब्दांची बांधणी खूप आवडते आहे. हे मला नवीन होते कारण मी खूप आवडल्याशिवाय, नवीन गाण्यांच्या वाटेस जात नाही. जुनीच देवानंद-मीना कुमारी वगैरे माझा प्रांत.
.
मग थोडा रिसर्च केला तर राजशेखर यांची अजुन २ गाणी सापडली - 'जोगी'
जो जग से कहा ना जाए, वो
मुझको बस तुझसे कहना जी

माझं बेहद आवडतं गाणं आहे हे. विशेषतः खालील ओळी -
इश्क़ का रंग सफ़ेद, पिया
ना छल, ना कपट, ना भेद, पिया
फिर आतिश हो या रेत, पिया
रेत, पिया
जिस जंग में तेरा हो रुतबा
उस जंग का मैं तो जुनैद, पिया

आणि मग एक अल्टिमेट सुंदर गाणे , राजशेखरनी लिहीलेले सापडले -
ए रंगरेज़ मेरे, ये कौन से पानी मे तूने कौन सा रंग घोला है,
के दिल बन गया सौदाई मेरा बसंती चोला है, मेरा बसंती चोला है,

अप्रतिम आहे हे गाणे थोडे सूफिझम थोडी मीराबाई असे काही काही आठवु लागते हे गाणे ऐकताना. कसे सुचले असतील हे शब्द की- अरे ईश्वरा(की प्रेयसी?) तू अफू-बिफू खाऊन बसलायस का काय की मलाच विचारतोस "कोणता रंग आहे हा". तुझाच धंदा ना रंगांचा आणि मला विचारतोस? ओहो! ईश्वरास, ही प्रेमळ दटावणी - मस्त मस्त.
रंगरेज़ तूने अफीन क्या है खा ली, जो मुझसे तू ये पूछे के कौन सा रंग?
रंगों का कारोबार है तेरा, ये तू ही तो जाने, कौन सा रंग.

सप्तरंग, प्रेमाची, भक्तीची उधळण आहे हे गाणे. बसंती चोला म्हणजेच भक्ती की हो. समर्पण.
नींदे रंग दे, करवट भी रंग, ख्वाबों पे पड़े सलवट भी रंग, ये तू ही है, हैरत रंग दे,
आ दिल में समा हसरत रंग दे, आजा और वसलत रंग दे, जो आ ना सके तो फुरक़त रंग दे
दर्दे हिजरा लिए दिल में दर्दे हिजरा लिए दिल में दर्दे मैं ज़िंदा रहूँ, मैं ज़िंदा रहूँ ज़ुर्रत रंग दे.

एक हवाहवासा, आणि रोमॅन्टिक दंगा आहे हे गाणे म्हणजे.
.
आणि मला परत एकदा साक्षात्कार झाला, मृदु आवाज, कविमन, या सगळ्याला पटकन ओळखणारा एक सिक्थ सेन्स आपल्यात आहे. इट डझन्ट फेल मी. आणि खूप मस्त एकाग्रतेने मुलाखत ऐकली गेली. खूप आवडली. पेरलेले त्यांच्या आवाजातील शब्द न शब्द, उपमा, ओळी, गाणी. हां त्यांनी मीनाक्षी सुंदरेश्वरन सिनेमातीलही गाण्याचा उल्लेख केलेला. हे गाणे मी ऐकलेले मला आठवत नव्हते पण ज्या रीतीने त्यांनी या ओळी म्हणुन दाखविल्या .... एकदम आवडले. अनुप्रास किती सुरेख साधलेला आहे.
.
मन केसर-केसर महके, रेशम-रेशम लागे रे
दिल चंपई-चंपई बाँधे, सिंदूरी से धागे रे
सुन ओ कनमनी शहनाई सी ये बाजे रे
साँवली-साँवली तेरी आँख में, से ख़ाब रे
खनक-खनक गई हँसी हँसी तेरी
कनक-कनक धरा हुई अभी अभी

त्याच सिनेमातील हे भांडणाचे गाणे - या ओळीही मनाला स्पर्शून जाणार्‍या.
जाना अगर है तो जा, मुझे कुछ नहीं कहना
ना यकीं हो रहा, संग हम दोनो का था
बस इतना ही क्या
क्या ही कहें, क्या ही लड़ें
जब प्यार ही ना रहा

ऐकताना नायकाची वेदना जाणवतेच की
छोटी-छोटी यादों में हम अटके रहें क्यूँ
पीछे जाती सड़कों पे भटके रहें क्यूँ
जो धागा-धागा उधड़ा है -क्या ही है बचा
जो रेशा रेशा पकड़ा है - कर दे ना रिहा

.
रत्ती रत्ती रेज़ा रेज़ा, जो है तेरा ले जाना
यादें बातें दिन और रातें, सब ले जा तू

कोणते भावमधुर मराठी गाणे आठवते सांगा. हेच शब्द मला राजशेखर यांच्या गाण्यात सापडले, तीच उत्कट वेदना. -
आणिले धागे तुझे तू मी ही माझे आणिले
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरुन जा
चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा

.
माझ्या मते एक दुर्लक्षित पण भरपूर पोटेन्शिअल असणारे हे गुणी गीतकार आहेत. यापुढे सजगतेने आणि सतर्कतेने त्यांचा गानप्रवास फॉलो करण्याचा मानस आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीही आज हीमुलाखत ऐकली. पहिले दोन भाग माझेही चुकले. कवी आवडला, कविता आवडल्या आणि आवाजही आवडला. अगदी मृदुभाषी.

वडिलांसोबत आयफा अवॉर्ड्सचा पुर्ण प्रसण्ग खरेच खुप हृद्य होता.

राभु, साधना, शर्मिला आणि माझेमन खूप धन्यवाद. शर्मिला तू नेहमी किती कौतुक करतेस Happy
.
साधना तू ऐकलीस ना ती मुलाखत. काय मस्त विश्लेषण करत होते ना. ते गाणं मला कळलं नाही पण ते सांगत होते बघ - नायकाकडे सोनं, धन, बंगला, गाडी सगलं आहे पण त्याचं मन रमत नाही. त्याला उबग आलाय या सगळ्याचा. त्याला , त्याच्या मुलाला, वारसा म्हण्बुन , लेगसी म्हणुन एक स्वतःचा हिस्सा द्यायचाय .... जबरदस्त विश्लेषण करुन , त्यांनी ते गाणे जमवले. आणि एक ओळ त्यातली आहे - शापही आणि वैभवही ..... ती ओळ मला कळली नाही. त्यात अपरिचित शब्द होते. ते गाणेही माहीत नाही.
.
त्यांची शब्दांवरती पकड दिसते मात्र. रंगरेझमधील 'कोणत्या मातीच्या घड्यात तू कोणता रंग मिसळलायस' ही संकल्पना काय ताकदीने मांडली आहे. नुसता एक अनोखा दंगा आहे ते गाणं. अर्थात संगीतकारानेही न्याय केलेला आहेच.
.
तू म्हणतेस तसे वडीलांचा प्रसंग खरच हृदय होता.

त्यांचेच हे गाणे -
कितने दफे दिल ने कहा, दिल की सुनी कितने दफे?
वैसे तो तेरी ना में भी मैने ढूँढ ली अपनी खुशी,
तू जो गर हाँ कहे तो बात होगी और ही!
दिल ही रखने को कभी ऊपर ऊपर से सही,
कह देना हाँ... कहे देना हाँ... यूँ ही...

काय हळवी कल्पना आहे ही सुद्धा. की तुझा नकार पचवूनही मी जगात आनंद मिळवत राहीलो. आणि त्यात जर तू 'हो' म्हणालीस तर चार चांद लागतील माझ्या प्रेमाला. अगं इतकी देखील कठोर सत्यप्रियता दाखवु नकोस, कधी तरी खोटच बोल की माझं मन ठेवण्याकरता Happy

ते तुंबाडचे शिर्षकगीत.

विभाचे लोक सुंदर मुलाखती घेतात. छान बोलते करतात लोकांना. माझ्याकडे विभा व श्रीपाद रेडिओ सुरु असते. विभा वर नवी गाणी लागली की श्रीपाद रेडिओ असे बदलत राहते.

नव्या गाण्यांमध्ये गीते उत्कृष्ट आहेत पण संगित इतके लाऊड असते की शब्द बुडुन जातात. मुद्दाम लक्ष देऊन ऐकले तर(च) कळते. एवढे कोण करेल?? त्यापेक्षा जुनी गाणी बरी. सगळेच ओळखीचे. मध्ये दुर्लक्ष झाले तरी पुढची ओळ माहितअसते Happy

>>>>विभाचे लोक सुंदर मुलाखती घेतात.
अगदी खरे आहे. विभा चा दर्जा टॉपच आहे. त्यांचे मधे मधे पेरलेले म्युझिक पिसेस अंगावर काटा (चांगल्या अर्थाने) म्हणजे रोमांच आणतात. तेच जुने दिवस आठवतात ग. माझे १६-१८ वर्षांमधले केअरफ्री दिवस आणि सोबत विभा.

>>>>तु ऐकलेस व लगेच धागा काढलास हे मस्त केलेस.
काहीही उत्कटतेने वाटले तर मग झोप उडते Happy
.
तुंबाडचे शीर्षकगीत नाही ऐकलेले मी. ऐकते. अच्छा त्या ओळी यातल्या होत्या Happy

खूप सुंदर लिहिलयं..

काही गीतांचे शब्द, संगीत अगदी आतपर्यंत पोचते पण त्यामागे असणारे मेहनती, गुणी कलाकार कधी-कधी माहित नसतात.. दुर्लक्षित राहतात.

तुझ्या लेखाने छान ओळख झाली.

विविध भारतीतील सर्व मुलाखती खूप रोचक, उद्बोधक आणि गतकाल विव्हल करणार्^या असतात. मुलाखतकार युनुस खान खूप व्यासंगी आणि प्रतिभाशाली आहे. मी देखील ही मुलाखत लाँग ड्राइव्ह वर असताना ऐकली. सामो यांनी त्याची आठवण जागी केली...... इतका प्रतिभासंपन्न संगीतकार.... उत्तरोत्तर प्रगती करो!

ममता सिंग, युनुस खान हे लोक खुप बोलते करतात. काल
सॅक्सोफोन प्लेअर राज सोधाची मुलाखत होती. पहिला भाग माझा चुकला. काल अंतिम भाग होता. हा माणुस बोलायला तयारच नव्हता. प्रत्येक प्रश्नाचे त्रोटक उत्तर देऊन गप्प बसत होता. युनुस खान उलट सुलट प्रश्न विचारुन त्याला बोलते करत होता. ही मुलाखतही छान होती.

इतका साधा माणुस की कोणकोणत्या चित्रपटांसाठी वाजवले ह्या प्रश्नावर म्हणाला, काय माहित नाही. बोलावले की जायचे आणि आपला पिस वाजवुन परतायचे. कुठला पिक्चर वगैरे बिचारत बसत नाही.! नम्तर कधी कानी पडले की ओळखता येते की अरे हे आपण वाजवले आहे.

https://youtu.be/JIQQu8qgvi4?feature=shared

अरे वा तुम्हीही ऐकली का रेव्यु?
साधना काल मी नाही ऐकली राज सोधाची मुलाखत. बरोबर बोललीस तू 'ममता सिंग सुद्धा मस्त आहेत'.
अगं अक्षरक्षः परवा सखी-सहेलीत 'ममता सिंग' यांची मुलाखत घेतली - मंदाकिनी म्हणुन कोणीतरी. त्या म्हणजे मंदाकिनी असतात आजकाल सखी सहेलीत.

सखी सहेलीत नेहमी दोघीच असतात ग. कधीकधी बुआ व तिची भाची असतात तर कोणी दुसर्या. आज सुन सहेली असे काहीतरी होते म्हणजे सहेल्यांनी फोन करुन गप्पा मारायच्या व आवडते गाणे लावायला सांगायचे. त्यात एक बाई म्हणे तिचा तिन वर्षांचा पोरगा मोबाईलशिवाय राहातच नाही. ममता सिन्गने सांगायचा प्रयत्न केला की कसा हा नाद सोडवायचा ते. बाई ऐकायला तयारच नाही. मग हिनेच गाणॅ कुठलं हवं ते सांग म्हणत तिचा नाद सोडला Happy एक बाई खुप छान बोलली पण नेमकी मी तेव्हा कामात होते. नंतर ममता कौतुक करत होती तेव्हा कळले.