बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा

Submitted by nimita on 22 February, 2018 - 19:55

आज ८मे २०१६.माझी ट्रीटमेंट संपून आज दहा वर्षे पूर्ण झाली.असं म्हणतात की 'काळ हे उत्तम औषध आहे'. जसाजसा काळ जातो, तसे तुम्ही तुमची दुःख, तुमच्या यातना सगळं हळूहळू विसरता. राहतात, मागे उरतात त्या फक्त आठवणी ! आज पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
गेल्या दहा वर्षांतला प्रत्येक दिवस मी आज पर्यंत कित्येक वेळा अनुभवला आहे. एखाद्या flashback सारखे ते सगळे प्रसंग, त्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोरुन सरकत जातात.