|
Mansmi18
| |
| Wednesday, August 01, 2007 - 7:40 pm: |
| 
|
छान कथा.. ही कथा वाचुन "रिन्कू पाटील" प्रकरणाची आठवण झाली.
|
Princess
| |
| Thursday, August 02, 2007 - 5:14 am: |
| 
|
मोनाक्षी, लाडकी, आॅना मीरा, मानस्मी१८ अभिप्रायाबद्दल आभारी आहे. आशु२९, कुणाल सारख्या हुषार आणि चांगल्या मुलाने हे करावे हाच कथेचा क्लायमॅक्स आहे. कुणाल किंवा अर्चित कोणीही रुचीचे बॉयफ्रेंड नाहीत. एकेकाळी कुणालची प्रिय मैत्रिण असणारी अभिरुची आता अर्चितचे मैत्रिण आहे, हेच त्याला नकोसे झालेय. आपले मित्र मैत्रिणी काळाबरोबर बदलत जातात, आपल्या आयुष्यात नवे लोक येतात. पण कुणालला मात्र रुची हीच एक मैत्रिण असते म्हणुन तिच्या पुढे जाण्यान तो अगदी एकटा पडतो.शिवाय अभिरुची कोणाचा चुकीचा सल्ला ऐकुन त्याला अपमानित करते हे तिचे चुकते. असो. अरे बापरे, बरेच मोठे स्पष्टीकरण झाले की. आणि हो हे सत्यकथा नाही पण पुर्णत: काल्पनिकही नाही. अनेक एकतर्फी असफल प्रेमकहण्या डोक्यात होत्या, ही कथा लिहिताना.
|
Daad
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:33 am: |
| 
|
पूनम छान झालीये कथा, पुढच्या लेखनाला माझ्या शुभेच्छा.
|
R_joshi
| |
| Thursday, August 02, 2007 - 9:51 am: |
| 
|
पुनम धन्यवाद आम्हि आपल्या द्यायला हवेत इतकि छान कथा लिहिण्यासाठि. तुझ्या कथांमध्ये विशेष आवडणारी गोष्ट म्हणजे त्यातील भावनिक गुंतागुंत. अगदि हळुवार पदधतिने तु ती हाताळतेस.
|
Zelam
| |
| Thursday, August 02, 2007 - 11:59 am: |
| 
|
पूनम छान लिहिलं आहेस. realistic .
|
Zakki
| |
| Thursday, August 02, 2007 - 1:27 pm: |
| 
|
माफ करा, खरे नि स्पष्ट लिहीतो, अगदीच राहवले नाही म्हणून. पण चेहेर्यावर Acid फेकले? फारच भयंकर प्रकार हा! तिनेच तर काही वर्षे त्याला मैत्रीचे प्रेम दिले होते. त्याचे तिने काहीच वाईट केले नव्हते. खरे तर इतक्या लहान वयात, नि विशेषत: वेगळ्या वातावरणात रहाताना, तिची मते बदलणारच, पण त्याबद्दल एव्हढी शिक्षा? फारच वाईट वाटले शेवट वाचून. कदाचित् हाच परिणाम वाचकांवर व्हावा अश्या उद्देशाने जर कथा लिहीली असेल, तर तो उद्देश साध्य झाला.
|
Kashi
| |
| Thursday, August 02, 2007 - 1:41 pm: |
| 
|
पूनम छान झालीये कथा !!! 
|
Dineshvs
| |
| Friday, August 03, 2007 - 9:06 am: |
| 
|
झक्कि, आजकाल तरुण मुले अशी वागतात. पेपरमधे खुप बातम्या येतात अश्या. अगदी सरबत म्हणुन, Acid प्यायला दिल्याच्या घटना आणि त्यानंतर अन्ननलिका जळुन गेल्याच्या उल्लेख, डॉ. रवि बपटानी, त्यांच्या पुस्तकात केलाय.
|
पूनम, छान कथा, पण माझ्या मते ती घटना घडून गेल्यावर त्या मुलीच्या आयुष्यावर झालेला परिणाम रंगवायला हवा होतास. कुणालने हे काम करताना त्याच्या मनातले चढ उतार ही घेतले असतेस तर... कारण असे काम करताना त्याच्या मनाची चल बिचलता घालमेल होत असणारच. पण तू विषय खूपच समझदारीने हाताळलास, संवेदनशील विषय आहे. मध्यंतरी ठाण्यामधे एकाने लग्नाला नकार देणार्य मुलीवर चाकूने बावीस वार भर रस्त्यात केले होते. (आणि बघणारे तमाशा बघत होते.) विकृत माणसं विकृत वागतात कारण एक तर आपण आधी दुर्लक्ष करतो किंवा घत्टना थांबवण्याचे धाडस दाखवत नाही. असल्या हिंसात्मक कृत्यासाठी खूप आधीपासून तयारी केलेली असते. पण कित्येकदा तिकडे कुणी बघतच नाही आणि त्यातून ही परिस्थिती उद्भवते. दोन वर्षापूर्वी, गेट वे वरती एका मुलाने दोन अनोळखी मुलीवर वार केला होता. त्यातली एक जण जागीच मेली. (मी घटना झाल्यानंतर बरोबर सातव्या मिनिटाला पोचले होते.) तो मुलगा पळून गेला असता तर कुणी त्याला पकडायची हिंमत दाखवली नसती. हा मुलगा विकृत आहे हे घरच्याना ठाऊक होतं. त्याने आधी आपल्या बापावर कोयत्याने वार केले होते. तरीही घरच्यानी त्याच्यावर हवे ते उपचार केले नाहीत. परिणामी एका मुलीला जीव गमवावा लागला. एकतर्फ़ी प्रेमाच्या घटनाना बर्याचदा चित्रपटाना दोषी ठरवलं जातं. मुळात असे किती चित्रपट आहेत ज्यामधे अशा विकृत घटना दाखवल्या आहेत?? उलट हे लोक व्हीलन ठरवून नंतर मेलेले दाखवले आहेत. अर्ध्याहून जास्त मधे तर "त्याग कुर्बानी, बलिदान" असल्या गोष्टी असतात. मग तरीही हे प्रकार का वाढत आहेत? नेमकी कुठली सामाजिक आणि मानसिक बाबी याच्याशी निग्गडीत आहेत?? खूप दिवसाचे प्रश्न आहेत. या कथे मुळे परत मनात आले.
|
Maudee
| |
| Friday, August 03, 2007 - 12:13 pm: |
| 
|
अगदी सरबत म्हणुन, Acid काय सांगताय काय दिनेशदा... बापरे मी अशी एकच घटना ऐकलेली पण ती एकतर्फ़ी प्रेमातून वगैरे नव्हती.... सोनाराच्या दुकानात पाणी म्हणुन एकाने चुकून H2SO4 पिले होते.... आणि तो मुलगा लहान होता वाटत बर्यापैकि.....
|
Pillu
| |
| Friday, August 03, 2007 - 12:48 pm: |
| 
|
पुनम खरेच छान लिहिले आहेस खरे तर मी या बीबी वर येत नाही माज़ा तो प्रान्त नाही म्हणजे मला कथा कादंबया खुप आवडतात पण हल्ली कामा मुळे वेळ मिळत नाही आणि घरी गेले की त्या ईडियट बॉक्स समोरुन हलवत नाही असो पण आता नक्की या साईट वर येत जाईन लिहित रहा माझ्या सारखे अनेक लोक त्या बॉक्स पासुन किमान मुक्ती मिळवतील.
|
Nilima_v
| |
| Friday, August 03, 2007 - 3:24 pm: |
| 
|
अत्यंत दु:खद घटना पण कथा खुपच आवडली. लहान वयात होणारे परिणाम खुप काळ टिकतात. लहान मुले ही पालकांची समीक्षक असतात, आपल्या पालकांचे गुण दोष पटकन जाणतात. पण irony अशी की मोठे झाल्यावर किंवा इतारांशी व्यवहार करताना, मी तर लहानपणी एवढी कडक वागणुक सहन केली मग इतारांना (अथवा आपल्या मुलांना) काय झाले थोडी कळ काढायला, किंवा आमचे सर्व ठीक झाले ना मग आपल्या मुलांशीही तसेच वागायला हरकत नाही म्हणून त्याच चुकांची पुनरार्वूत्ती करतात.
|
Princess
| |
| Friday, August 03, 2007 - 4:11 pm: |
| 
|
दाद, झक्की काका, प्रिती, झेलम, दिनेशदा, नंदिनी, माऊडी, पिल्लुदादा, आणि निलीमा सगळ्याना धन्यावाद माझी कथा वाचल्याबद्दल आणि अभिप्राय दिल्याबद्दल. झक्की काका, कथेचा उदेश तुम्ही लिहिलाय तोच होता. कथा वाचकापर्यंत पोहचण्यात सफल झाली म्हणजे. तुमच्या सारख्या मोठ्या आणि जाणत्या व्यक्तिने माझी कथावाचावी हेच माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. प्रिती धन्यवाद. धनुदादा तुमच्य रुपाने स्वामींनी आशिर्वाद दिला असे वाटले.
|
Zakki
| |
| Friday, August 03, 2007 - 5:37 pm: |
| 
|
मी मोठा म्हणजे फक्त वयाने. नि जाणता तर अजिबात नाही, literature मधले मला काऽहीऽहि कळत नाही.
|
Arch
| |
| Friday, August 03, 2007 - 6:09 pm: |
| 
|
literature मधले मला काऽहीऽहि कळत नाही>> म्हणजे झक्की तुम्ही कथेबद्दल दिलेल्या comment चा अर्थ कसा घ्यायचा? 
|
Disha013
| |
| Friday, August 03, 2007 - 7:15 pm: |
| 
|
चुटपुट लावणारी कथा. आजकाल अशा घटना जरा जास्तच घडतायत. घरातल्या वातावरणाचा बरावाईट परिणाम नकळत होत असतो मुलांवर. लहान मुलांना 'नाही' ची सवय लावणं किंवा त्यांना दुसरे options शोधण्याइतके त्यांना सक्षम बनवणं कित्ती अवघड नि जबाबदारीचे आहे.
|
Zakki
| |
| Friday, August 03, 2007 - 7:43 pm: |
| 
|
पण मनावर परिणाम तर झाला, ते तर कळते. तेव्हढेच म्हंटले मी.
|
Ajjuka
| |
| Saturday, August 04, 2007 - 7:43 am: |
| 
|
हं.. छान गं! एकुणातच ही प्रेम लादण्याची प्रवृत्ती फारच बोकाळलीये. प्रेमच काय मैत्री सुद्धा. आपल्याला एखाद्याबद्दल जे जसं वाटतं ते तसं त्यालाही आपल्याबद्दल वाटलं पाहिजे हे झालं विशफुल थिंकिंग पण ते तसं वाटलं नाही तर त्या व्यक्तीलाच दुखावण्यात काय मिळतं यांना काय माहित? ज्या व्यक्तीवर प्रेम असतं ती व्यक्ती सुखी होणं, आनंदी रहाणं महत्वाचं असायला हवं ना. ती व्यक्ती आनंदी रहाण्यासाठी प्रयत्न करणं हे प्रेम आहे. माझ्यावर प्रेम नाही करत तर मी तुझीच वाट लावतोते हे विकृत आहे.
|
Chetnaa
| |
| Saturday, August 04, 2007 - 12:36 pm: |
| 
|
प्रिन्सेस, छान आहे कथा... विशेष म्हणजे निवडलेला विषय.. लिहित रहा ग...
|
प्रिन्सेस, मला साहित्यातिल फार काहि कळत नाही, पण कथा वाचायला आवडली की ती चांगलि असा माझा सरळ नियम आहे. आणि हि कथाहि आवडली. फक्त एकच सुचना.... सुरवातिला जो roll call आहे.. तो alphabetical असायला हवा होता....
|
Princess
| |
| Friday, August 10, 2007 - 4:00 pm: |
| 
|
धन्यवाद आर्च, दिशा, अज्जुका, चेतना आणि राजा ऑफ नेट. राजा ऑफ नेट, तुमचे विशेष धन्यवाद. मी तुमची सुचना लक्षात ठेवेन.
|
Arch
| |
| Friday, August 10, 2007 - 4:27 pm: |
| 
|
राजा, कोणी झोपल नाही न बघायला teachers करतात अस.
|
Princess
| |
| Friday, August 10, 2007 - 4:55 pm: |
| 
|
हो ग आर्च, तसेही करतात खुप टीचर्स.
|
|
|