Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सल

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » कथा कादंबरी » सल « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 21, 200720 07-21-07  9:57 am

Manuswini
Saturday, July 21, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अक्षशरशा रडायला आले एकदम, खुप गुंतागुंतीची नाती असतात.............



Dineshvs
Saturday, July 21, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती, तुझ्या कथा नेहमीच वास्तव वाटतात.

Shamli
Monday, July 23, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

abhishruti

shabdach naahit...............
he sagala maze baba sadhya anubhawatayet
amchyaahi ghari ek madhav aani tyachi baayako aahe

Disha013
Monday, July 23, 2007 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती,खुप छान,मनाला भिडणारं लिहिलयं.
या कथेच्या नायकासारखी जाणीव ठेवणारी भावंडं असायला हवीत.


Arati7
Tuesday, July 24, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच खुपच टची आहेग ही कथा.............. ...Keep it up Abhishruti....

Itgirl
Tuesday, July 24, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार Abhishruti , खूप छान वाटली तुमची कथा.
साध्या, सरळ भाषेतली कथा आणि निवडलेल्या विषयाची कुठेही पकड सुटू न देता तसच उगाचच वहावत न जाता केलेली मांडणी खूप भावली...जड शब्द नाही वापरले हे तर एकदम मस्तच झालं!! :-)


Sanghamitra
Wednesday, July 25, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती सुरेख गोष्ट. जसं व्हावं असं वाटतं आपल्याला, तसंच झालंय या गोष्टीत. सुंदर मांडणी. लिहीत रहा.

Shivam
Wednesday, July 25, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रुती, अभिनंदन! खुपच सुंदर लिहिलयंस. कथा संपताना डोळ्यांत कधी अश्रु तरळतात हे कळतच नाही. खुप र्‍हृदयस्पर्शी. simply great.

Gajanandesai
Wednesday, July 25, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रुती, कथा वाचली. खरेच इस्टेटीच्या वाटण्या हा अतिशय गुंतागुंतीचा प्रकार असतो. नुसते एकमेकांवर वचपे काढण्यासाठी अडून बसतात लोक. एखाद्याच्या भावनाप्रधान स्वभावाचा फायदा उठवतात. नेहमीप्रमाणेच छान मांडली आहेस. शेवटही स्पर्शून गेला.

Rupali_rahul
Wednesday, July 25, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रुती तुझी कथा वाचली. छान आहे कथा पण असा प्रसंग कधीच कोणावर येउ नये...


Mahe
Wednesday, July 25, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती,
खुपच छान आणि ह्रदयस्पर्शी कथा आहे!!! डोळे पाणावले
अभिनन्दन!! लिहीत रहा!

भाग्यश्री


Savyasachi
Wednesday, July 25, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख कथा... वाटण्या घेऊन, आपल्या आईवडिलांच्या पैशांवर आपला संसार चालवायला बघणे हा नालायकपणा आहे.
मनाला भिडणारी शैली आहे तुझ्या लिखाणाची. फ़क्त एक शंका, आई असताना कायद्यानुसार ६ वाटण्या झाल्या पाहिजेत अस मला वाटत.


Arch
Wednesday, July 25, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, अगदी बरोब्बर. पण वडिलोपार्जीतमध्ये बायकोला वाटा असतो का?

Manuswini
Wednesday, July 25, 2007 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर हे माझे प्रामाणिक मत आहे. देवाने हात नी डोके दीले असताना कमवा की स्वःताच्या हिमतीवर. Swear by God पण हीच हिम्मत माझ्या आईने दाखवलेली २० वर्षापुर्वी जेव्हा तिच्या वडीलांच्या गडगंज संपत्तीत तीला वाटा नको होता. असे इथे बोलु नये पण माझ्या मामीला हीच भीती होती की तीघी बहिणी वाटा मागतील. पण कोणीही बहिणी काही न बोलता 'आम्हाला काहीही नको' म्हणून सही करुन मोकळ्या झाल्या. एकुलता एक भावाला सोपवली. माझ्या मामीला इतके tension की आजोबा गेल्यावर सारखी धुसफुस होती की काय ते लवकर करा म्हणुन मामाच्या मागे.
मीही काहीही घ्यायचे नाही ठरवले आहे माझ्या पप्पांकडुन.


Chinnu
Wednesday, July 25, 2007 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती छान वाटलं वाचून.

Savyasachi
Wednesday, July 25, 2007 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय आर्च, मला पुर्वी वाटायचे की वडील गेल्यावर फ़क्त आईलाच सगळ मिळत ती असली तर. पण त्याउलट आहे. ती असली तरी पोरांना पण समान हिस्सा द्यावा लागतो. म्हणून ६ वाटे.
पण आई गेली, वडील आहेत, तर आईची पूर्ण संपत्ती फ़क्त वडिलांनाच मिळते.


Pancha
Wednesday, July 25, 2007 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीही काहीही घ्यायचे नाही ठरवले आहे
--ह्यापेक्शा घ्या आणि तुमच्या आवडीनुसार गरजवंताला द्या.


Bee
Thursday, July 26, 2007 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही इतका उदारपणा आवडत नाही. म्हणजे तुमचे इतर भाऊ बहिण आणि त्यांचे जीवनसाथीदार तुमच्या आईवडीलांच्या सम्पत्तीवर डोळा ठेवून आहेत. उगाच वाद होऊ नये म्हणून तुम्ही समंजसपणे गप्प आहात आणि म्हणत आहात की तुम्हाला ह्यातल काहीच नको आहे. म्हणजे खरी समज फ़क्त तुम्हालाच आहे. त्या पैशाचा विनियोग कसा करावा हे तुम्हाला जास्त चांगलं जमेल. मग पंचा जस म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही तुमची वाटणी घेऊन तो पैसा सत्कारणी लावा. शेवटी आईवडीलांची सम्पत्ती ही मुलांसाठी नसते तर मग कुणासाठी ती असावी. आणि खर तर तुमच्या नवर्‍यानी किंवा बायकोनी ह्या सम्पत्तीवर मुळीच हक्क गाजवता कामा नये. भावंड भांडलीत ती एक वेगळी गोष्ट आहे. पण तुमच्या साथीदारांना त्या मालमत्तेवर काडीचाही हक्क नाही. वर मनु म्हणते तिच्या मामीची धुसपुस चालू होती. मामीला काय बरेच झाले असेल जर मनुच्या आईने हिस्सा मागितला नाही त्यावेळी. फ़क्त वाद झाले नाहीत इतकेच काय. ह्याला विचार केला तर समंजसपणा म्हणता येईल आणि त्याचवेळेस भेकडपणाही म्हणता येईल. पण सम्पत्तीसाठी आपल्या समाजात खुनाखुनी देखील होते तेंव्हा सभ्य व्यक्ती घाबरून राहिलेलीच बरी असेही वाटते.

Manuswini
Thursday, July 26, 2007 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तो वाद किंवा खुनाखुनी वगैरे प्रकार न्हवता. फक्त इतकाच विचार होता की काय करायचे वाटा घेवुन, सर्व बहिणी व्यवस्थीत संसार करत होत्या, शिकलेल्या, स्वःताच्या पायावर उभ्या होत्या. नवरे छान आहेत मग कशाला........ बस.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators