Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मातृप्रेम

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » मातृप्रेम « Previous Next »

Manogat
Monday, May 28, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावेळेस शुद्धलेखनाची बरीच काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे तरी चुका असतील तर समजुन घ्याल हीच अपेक्षा...

Manogat
Monday, May 28, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेणाने सारवलेल ते आंगण, आंगणाच्या कडेला छोटासा बगीचा. बगीचात चमेली, मोगरा अश्या सुवासिक फ़ुलांची झाडे, अणि आंगणात लावलेली तुळस. एका सुग्रण ग्रुहिनीचे घर असावे हे त्या घरा कडे बघुनच वाटत होते.

तुळशी जवळ लावलेल्या दिव्याच्या प्रकाश अंगणात सरवत्र पसरला होता. चिमुकली राधा सागर गोट्या खेळत होती..पण तीच सगळ लक्ष दारावर होत, माई अणी भाउ (आई अणि बाबांना ती लहानपणा पासन असेच म्हणायची) आता येतील आणि पिशवित खुप सारा खाउ आणतील. राघव रधा पेक्ष थोरला होता. ओसरीतल्या कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत बसला होता. खर तर त्याच पण पुर्ण लक्ष दारावरच होत, तो ही माई अणि भाउं ची वाट बघत होता. त्याला काळजी वाटत होती की अजुन ते कसे आले नही यची.

सकाळि सगळ आटोपुन माई अणी भाउ गेले होते माई च्या माहेरी. माई च्या आई ची तब्यत बरेच दिवसां पसन बरी न्हवती म्हुणुन तीला भेटायला. तशी माई ची ती सावत्र आई होती, तिने पहीले पासनच माईला कधी जीव लावलाच न्हवता पण दमोदर (माई चा सावत्र भाउ) पत्र येताच माई अणि भाउ तिला भेटायला गेले होते. माई लाहान पणा पासनच समजुतदार होती, वडलांचा खुप जीव होता तिच्यावर, पण ते ही लवकर गेलेत. घरचि परिस्थिती चांगली न्हवती माईला खुप भोगावे लागले होते माहेरी, पण सासर तितकच छान मीळाले होते तिला. तिच्या गोड स्वभावाने तिने सगळ्यांचे मन जींकले होते. भाउ थोरले होते घरात आई बाबा आणि छोटा रम असे मोजकेच लोक घरात होते. घरात भरपुर जमीन होती अणि पैस्या आडक्याला कमी न्हवती.

जस जस अंधारु लागल राघवची काळजी अजुन वाढु लागली राधा कधी पासन त्याला विचारुन विचारुन थकली होती. माई ने सकाळि केलेला अमटी भात दोघाने पण खाल्ला आणि राधाला झोपवुन तो पुन्हा ओसरीत येउन बसला माई आणि भाउंची वाट बघत. बाजुच्या जोशी काकु आल्या तितक्यात आणी राघव ला विचारु लागल्या "काय रे नाही आली का माई अजुन, तु काळजी नको करुस येइल हो इत्क्यात, आणि तुम्ही दोघे जेवलात कि नाहि". जोशी काकु असे बरेच काही राघव शी बोलत बसल्या होत्या.पण बरीच रात्र होउ लागलि होति माई आणि भाउ घरी परतले न्हवते, जोशी काकु पण थोड्या वेळाने घरी गेल्या.


Manogat
Monday, May 28, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माई आणि भाउ इकडे फ़सले होते, भाउंचे पैसे चोरीला गेल होत. परत माहेरी जाउन पैसे मागण्याची पण सोय न्हवती. ते दोघे ही एका झाडा खाली उभे होते, कोणताच गाडीवान त्यांची मदत करायला तय्यार न्हवता. खुप उशीर होत होता, माईच काळीज मुलांन साठि धडधडु लगल. दोघे घरात एकटी आहेत ह्या चींतेनी ती रदवेली झाली होती. भाउ घरी कसे परतावे ह्या चिंतेत फेर्या मारत होते माईचे पदराने अश्रु पुसणे त्यांच्या पासन लपले न्हवते पण तीला कसे समजवावे हे ही त्यांना कळत न्हवते.

जसा अंधार वढु लागला अणि एकही गाडिवान तय्यार होत नाही हे बघता माई नी भाउ ला आपण पैदल निघु अशे म्हंटले. भाउ माई ला म्हणाले इत्क्या दुर कसे जाणार आपण आणि रात्र खुप होत आली आहे. माई म्हणाली ते कही कळत नही मला पण माझी मुले तिथे घरी मझी वाट बघत असतिल आता जर आपण नीघालो नहीत तर ती दोघे कुठे जातील अणि मझी चिमुकली तर रडुन रडुन बेहाल होइल, आपण निघुयात. भाउ तीला पुन्हा सम्जावु लागले पण माई त्यांना म्हणाली तुम्हाला नाही कळणार आई च ह्रिदय, ति हिरकणी रात्री एवढा मोठा बुरुज उतरु शकते आपल्या तन्ह्या सठी तर मी का नाही जाउ शकत. माई च्या त्या वाक्यातला गंभिर पणा भाउं ला जाणवला आणि त्यांच्या जवळ तीला देण्यासाठी प्रतिउत्तर पण न्हवते. मायेच हे स्वरुप पाहुन ते ही चकीत झाले होते कधी त्यांच्या समोर न बोलणारी माई आज आपल्या मुलांसाठी इतकी भावुक झालेली होती.


Manogat
Monday, May 28, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही न बोलता ते दोघे ही तसेच पैदल निघालेत अंधारात भाउंचा हात धरुन माई पुढे चालत होती. थोड्या वीशरांती साठि म्हणुन ते दोघे ही एका मंदिराच्य पायरीवर बसलेत. गणपतीचे मंदीर होते, माईनी देवापुढे हात जोडले अणी "माझ्या चिमुरड्यांची काळजी घे" अशी मनात प्रर्थना केली. भाउ तीचे ते स्वरुप न्ह्यहाळत तीच्या कडे नुसते बघत उभे होते.

दोघेही देवाला नमस्कार करुन बसले होते..तर तितक्यात एक माणुस त्यांच्या जवळ आला अणि माई ला म्हणाला "का हो माउशी का रडतायसा", परका की ओळखीचा याच भान न ठेवता माई ने त्याला सारी हकीकत सांगीतली. तो म्हणाला "येवढच होय चला माझी गाडी त्याच दिशेनी चालली आहे मी सोडतो तुम्हाला" , माई आणि भाउ काही न विचार करता लगेच निघाले. पाहता पाहता मध्य रात्रीला ला ते घरी पोहोचले. राघव बसलेला होता, माई ला पाहताच तो तीला बिलगला आणि रडु लागला गाडी चा आवाज ऐकुन राधा पण उठली होती माई अणी भाउंना पहुन ती पण बिलगली.

माईने दोघांना ही मीठीत घेतले अणी तीच्या दोळ्यातुन आनंद अश्रु वाहु लागले. त्या गडीवानाच भान माई अणि भाउना पण राहील न्हवत ज्याने त्यांना घरी सोडल होत..भान येतच माई ने वळुन बघीतल तर तो गडिवान ही न्हवता आणि गाडी ही न्हवती.

तीने भाउंना त्यला पहायला सांगितले, भाउ बरेच दुरवर जाउन आले पण त्यांना कोणीच दिसले नाही. माई भाउंना म्हणालि कोन असेल हो तो आणी थांबला पण नाही. सग्ळे घटनाक्रम दोळ्यपुढुन घालता माई भाउंना म्हणाली त्या गावाच्या इतक्या दुर आपल्याला मंदीर तरी कस भेटल.जवळपास कुठे ही वस्ति पण न्हवती, आणि तो गाडीवन. तिच्या लक्श्यात आले अणि ति धावत देवा पुढे गेली आणि देवला नमस्कार केला. त्या आई च्या माये ला पाहुन खुद्द देवच तिच्या मदतीला आला होता…


Paresh_joshi
Monday, May 28, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय मनोगत. गोष्ट चांगली आहे. पण शुध्दलेखनातील चूका अजुनही आहेत.

Nandini2911
Monday, May 28, 2007 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोगत, शुद्धलेखनाकडे अजूनही खूप दुर्लक्ष आहे. व्यवस्थित विरामचिन्हाचा उपयोग करा. कथेबाबत बाकीचे मार्गदर्शन करतील. पण मला वैयक्तिक रीत्या खूपच बालिश हाताळणी वाटली. तुम्ही वातावरणनिर्मिती बरे केलीत पण मूळ पायाकडे दुर्लक्ष केलं.

तुम्ही narration चांगले करत आहेत. पण कथाबीज अजून जरा फ़ुलवा.

हे तुम्हाला मी सांगणं चुकीचं आहे कारण मी अजून घोडचुका करतच आहे तरीही जे वाटलं ते मी सांगितलं. आवडले नसल्यास तसे सांगा.
राग मानू नये ही विनंती.


Manogat
Tuesday, May 29, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी,
Thanks for the suggestion, definately I will take care of all the mentioned things.... , I have tried while writing these stories, yes if they are not up to the mark then I'll try to do it...and your suggestions will help me a lot :-)


Manjud
Tuesday, May 29, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुद्धलेखन सुधारल्यास गोष्ट वाचनीय होईल. विरामचिन्हांबरोबर परीच्छेदांकडेही लक्ष देणे आवश्यक.

हे माझे मत आहे. कृपया राग मानु नये.


Sanghamitra
Tuesday, May 29, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोगत शुद्धलेखनाची काळजी घेतलीत म्हणजे काय केलेत? तुम्हाला preview mode दिसतो का? (काही लोकांना वेगळ्या OS मुळे असे प्रॉब्लेम्स येतात.) शिवाय इथे मायबोलीवरच रंगीबेरंगीमधे एक dev software आहे जे वापरून left pane मधे ईंग्लिश(इथे लिहीतो तसेच) लिहिलेत की right pane मधे मराठी दिसते. थोडी प्रॅक्टीस ही करता येईल त्यावर. बघा जमल्यास.
गोष्ट चांगली आहे. पण जरा बाळबोध झालीय आणि छोटी पण. थोडा विस्तार होऊ शकला असता कथेचा.


Dhoomshaan
Wednesday, May 30, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोष्ट छानच लिहीलीस.........पण शुद्धलेखनात मार खाल्लास




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators