Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नाती

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » नाती « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 19, 200725 05-19-07  10:34 am
Archive through May 21, 200720 05-21-07  4:52 pm

Arch
Monday, May 21, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान ग supermom . स्वातीशी सहमत.

मला वाटत अर्चना जोगळेकर सई परांजपे आणि अरुण जोगळेकरची मुलगी


Sashal
Monday, May 21, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, छान लिहिलीये गोष्ट ..

आर्च, सई परांजपे आणि अरुण जोगळेकरची मुलगी विनी परांजपे .. अर्चना जोगळेकर नाहि ..


Kedarjoshi
Tuesday, May 22, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ छान लिहीलय. ..

Saee
Tuesday, May 22, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीली आहेस गोष्ट. मला योगिनी जोगळेकर आणि ज्योत्स्ना देवधरांच्या कथा आठवल्या. शाळेत असताना वाचलेल्या.

Supermom
Tuesday, May 22, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या मित्रमैत्रिणींचे आभार.
अंगठीचे काय झाले, ती सापडली असेल किंवा नसेलही. पण ते या कथेत मला महत्वाचे वाटले नाही.
आयुष्यात कित्येकदा ऐकीव अथवा प्रत्यक्ष दिसलेल्या गोष्टी खर्‍याच असतात असे नाही. पण त्यावरून बरेचदा जीवघेणे गैरसमज होतात. अन मनू म्हणते तसे परस्परांशी न बोलताच संबंध तुटतात. नाती दुरावतात. खरेतर समोरासमोर बसून, बोलून, गैरसमज दूर करणे हा उत्तम उपाय. पण तसे न करता कुढत राहून,मनात झुरत राहून लोक परिस्थिती आणखीच स्फ़ोटक बनवतात.


Bhagya
Wednesday, May 23, 2007 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी खरे. सुंदर गोष्ट लिहिलयस sm . बरेचदा आपल्याला दुसर्‍याची खरी भावना, खरी परिस्थिती माहिती नसते आणि लोक न बोलताच दुरावतात.

Maasture
Thursday, May 24, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडासा भाबडेपणा जाणवला तरी कथा एकंदर चांगली जमली आहे. मनाला बरं वाटलं वाचून. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

दिनेशभौ, राग मानू नका. पण तुम्हाला इतरांच्या चांगल्या लिखाणाला प्रतिक्रिया देतांनही दर वेळेला मला किती माहिती अशी एक टिमकी वाजवायचा मोह होतो ते ठीक आहे, पण त्यासाठी ओढुनताणून कुठलीतरी असंबद्ध माहिती दिली तर त्यामुळे मूळ लेखनात रस असलेल्यांचा रसभंग होऊ शकतो. इथेही रांगांची माहीती, नट्यांची माहीती ईत्यादि अस्थानी वाटल.


Dineshvs
Thursday, May 24, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राध्यापक महाशय, मनापासुन माफी मागतो. शक्यतो अनोळखी लोकांच्या लिखाणावर मी प्रतिक्रिया देतच नाही.
या कथेशी साम्य असलेल्या एका कथेचा उल्लेख केला. त्यातल्या अभिनेत्रीचे नाव पण तेच होते हा योगायोग सांगितला आणि पारंपारिक ठुमरीत, हे नाते कसे रंगवले आहे तेच लिहिले.
यात काही असंबद्ध असले तर सुपरमॉमने लिहिले असतेच.
असो. माझी प्रतिक्रिया लेखन संपल्यावरच दिलेली होती. त्यामूळे रसभंग कसा काय होवु शकतो ?
आपण खरोखरच प्राध्यापक असाल, आणि खरोखरच असाल, असे गृहित धरलेय. ( एरवी अश्या बुरख्या आडच्या आयडीजच्या नादी मी लागत नाही. )
आणि अगा जे मूळातच नाही, त्याची टिमकी मला कशी वाजवता येईल ?


Mansmi18
Monday, June 04, 2007 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम,

अभिनन्दन. एक छान कथा लिहिल्याबद्दल.

माझ्या डोळ्यासमोर सुलोचना, जयश्री गडकर, चन्द्रकान्त गोखले इ असलेला कृष्णधवल काळातला चित्रपट उभा राहिला.

मला साहित्यिक मूल्यमापन वगैरे प्रकारात फ़ारशी गती नाही पण तुमची कथा एक चांगली कथा या सदरात मोडते असे वाटले.

तुमची दुसरी कथा पूर्ण व्हायची वाट पाहत आहे.:-)


Jayavi
Tuesday, June 05, 2007 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ.........खूप खूप आवडली गं.....नात्याची गुंफ़ण अतिशय सुरेख गुंफ़तेस तू :-)

Ladaki
Saturday, June 16, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ कथा खुपच छान आहे
प्रत्येक पात्राच स्वभाव आणि त्यांच्यात असलेले नाते अगदी सहज शब्दात रेखाटले आहे तुम्ही...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators