Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 26, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » हे करून पहा... » Archive through May 26, 2008 « Previous Next »

Rimzim
Wednesday, April 16, 2008 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदा कापताना शेजारी एक बाऊल भरुन पाणी ठेवल्यास डोळ्यातुन पाणी नाहि येत

अजुन एक उपाय एका अमेरिकन मैत्रिणीचे म्हणणे आहे की कांदा चिरताना तोंडात ( दाता मधे) काडेपेटि ची काडि धरायची.


Dakshina
Wednesday, April 16, 2008 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळी ब्रेकफ़ास्ट करताना मैत्रिणीला 'हे' कांदे पुराण सांगत होते,
तिने पण एक उपाय सुचवलाय, म्हणे नाक बांधून कांदा चिरा...
बघा हे ही करून....


Giriraj
Wednesday, April 16, 2008 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाक कसे बांधावे? सर्दी झाल्यास कांदा चिरताना किंवा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही का?


बी,ते 'पपई काप' म्हणण्यामागे अनुप्रास घडवण्याचा उद्देश्य असेल रे! हे माझे वेगळे मत बरंका..


Dakshina
Friday, April 18, 2008 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाक कसे बांधावे? सर्दी झाल्यास कांदा चिरताना किंवा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही का? >>>>>
हो ऽऽऽऽऽ येईल ना..... पण नाकातले आणी डोळ्यातले पाणि मिक्स होऊ नये म्हणून नाकाला रूमाल बांधायचा

Rajya
Thursday, May 22, 2008 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोमॅटो सुप करताना त्यात एक गाजर चिरुन घाला आणि बघा कशी बेष्ट चव येते ते :-)

Dineshvs
Friday, May 23, 2008 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, अभिनंदन. कशाबद्दल ते विचारू नकोस.

Lajo
Friday, May 23, 2008 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदे पुराण आवरते घेतले म्हणून ना दिनेशदा...

टोमॅटो सूप करताना साध्या बटर ऐवजी गार्लिक बटर मधे करा, चव आणखीनच बेष्ट लागते...


Dakshina
Friday, May 23, 2008 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक,स्वयंपाक शिकला म्हणून असेल

Dakshina
Friday, May 23, 2008 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

* दही जर खूप आंबट असेल तर त्यात ४ कप पाणी घाला. अर्ध्या तासाने, वरचं पाणी काढून टाका,
दह्याचा अंबटपणा कमी होईल.

* लोणी काढून झाल्यावर उरलेल्या ताकात अर्धी वाटी दूध घालून उकळा... झटपट पनीर तयार...

* पालेभाज्या स्टोअर करताना न्यूज पेपर मध्ये गुंडाळून फ़्रिज मध्ये ठेवल्यास जास्त टिकतील.


Dakshina
Friday, May 23, 2008 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसाळ्यात कपड्यांवर चिखलाचे डाग पडतात, असे कपडे बटाटे शिजवलेल्या पाण्यात भिजवून धूतल्यास, डाग जातील.

शिवाय लाईट जाण्याचे दिवस आलेत, मेणबत्या लागतीलंच घरात, तर मेणबत्या जास्ती दिवस टिकण्यासाठी स्टॅन्ड मध्ये फ़िक्स केल्यावर त्यात अर्धं पाणी भरा, वाहून आलेलं मेण काढायला ही सोप्पं जातं, आणि स्टॅन्ड पण नीट साफ़ करता येतं...




Dineshvs
Friday, May 23, 2008 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं दक्षिणा, अभिनंदन करायचे तेच कारण, आता मला एकटेपणा नाही जाणवणार ना इथे.

Yogesh_damle
Saturday, May 24, 2008 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोणच्यासाठी मिरच्या चिरतांना, किंवा बटाटावडा-आलू परांठा ह्यांचा लगदा कुस्करतांना मिरच्यांची जळजळ हातांना होते. अशावेळी हात गॅसच्या आचेवर शेकल्यास ती जळजळ खूपच कमी होते.

(मिरचीचं झोंबणारं तेल ह्या उष्णतेने उडून जातं. Capsicin oils असतात हे).


Dakshina
Monday, May 26, 2008 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर ढब्बू मिरची चिरल्यावरही हातांची जळजळ होते, असं केल्याने ती ही कमी होईल का?

Dineshvs
Monday, May 26, 2008 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि ढब्बू मिरच्या अश्या असतात, पण साधारण मोठ्या बघून घेतल्या, तर हाताची आग आग होत नाही.
जर सगळ्याच मिरच्या चिरल्यावर असे होत असेल, तर कदाचित हाताची त्वचा, खुप नाजूक असल्यामूळे होत असेल.

अश्यावेळी, हाताला प्लॅस्टिकचे किंवा रबराचे ग्लोव्ज घालून काम करणे योग्य. हे ग्लोव्ज, केमिष्टकडे मिळतात. धुवुन परतपरत वापरता येतात.


Dakshina
Monday, May 26, 2008 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, ही ग्लोव्हज वापरण्याची कल्पना खरंच खूप छान आहे, आधी कशी काय सुचली नाहि कोण जाणे..

Nandini2911
Monday, May 26, 2008 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढब्बू मिरचीने हाताची जळजळ??
ऐकावे ते नवलच...

योगेश, तुझेया सल्ल्याबद्दल धन्यवाद. बरं मिरचीचा हात असताना कॉंटॅक्ट लेन्स घाल्लून कुणी पाहिलय
दिवसभर सर्व विचारतील,,, काय झाल.लं, बरं वाटत नाही का? घरी सर्व ठीक आहेत ना!!!!!!!


Zakki
Monday, May 26, 2008 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढब्बू मिरचीने हाताची जळजळ??
मी मिरच्या चिरत नाही, पण कधी खाल्ली तर पोटात मात्र जाम जळजळते. त्यामुळे अनेक पदार्थ खाणे बंद केले आहे, जसे चायनीज पदार्थ.


Ajjuka
Monday, May 26, 2008 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढब्बू मिरचीच्या आतल्या बियांना हात न लावता चिरता आलं तर बघ. मिरचीची टोपी चिरली की की खालचा कप असतो त्यतल्य बिया छोट्या सुरीने हात न लावता काढून टाक आणि मग तो कप आतून पाण्याने विसळून काढ. हाताची आग होणार नाही.

Ajjuka
Monday, May 26, 2008 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उष्णता, पित्त वाढलेलं असेल तर मिरच्यांनी, सुरणाने हात जळजळणे/ खाजणे हे जास्त होते. गारवा देणार्‍या, पित्तशामक गोष्टींचा आहारात अंतर्भाव केल्यास फरक पडतो असा माझा अनुभव आहे.

Dineshvs
Tuesday, May 27, 2008 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हात वा भांडी धुण्यासाठी जर एखादा खास तीव्र स्वरुपाचा साबण वापरत असाल, तरिही हाताची आग होते.
ज्या ढब्बू मिरच्यांची टोके मोदकाप्रमाणे बाहेर आलेली असतात, ज्यांच्या सालीवर जास्तच सुरकुत्या असतात, ज्यांचा रंग थोडा पोपटी असतो, त्या जरा जास्तच तिखट असतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators