|
सर्वाना नमस्कार... प्रथमच लिहित आहे इथे.माझ्या घरी एक problem झालाय. आशा आहे तुम्हा सर्वांचं मार्गदर्शन मिळेल. ७ वर्षापासुन माझ एक मुलावर प्रेम आहे. घरी ही गोष्ट माहित नव्हती. आता अचानक ३-४ दिवसापुर्वीच कळलीय. मुलगा चांगला आहे. शिक्षण १२वी आहे. Job आहे व्यवस्थित.माझ्यापेक्षा higher caste चा आहे. पण तरीही माझ्या घरुन permission देत नाहियत.घराण्यात मीच मोठी आहे. आणि माझे बाबा पण इथे नसतात. आईने एकटीने इथे राहुन आम्हाला शिकवलय.त्यामुळे आता घरुन emotional blackmailing होतय की तु अस काही करु नकोस.तुच जर अस केलस तर नंतर मागच्या बहीणी पण असच करतील. pls help me काय करु मी..मला दुसर्या कोणाबरोबरही नाही जमणार रहायला आणि आई बाबाना पण दुखवायच नाहिय. काय करु मी???
|
Anaghavn
| |
| Monday, January 14, 2008 - 9:11 am: |
| 
|
योगिता, तु जर ठाम असशिल की तू त्या मुलाशिवाय राहु शकत नाही, तर तू शांतपणाने घे सगळं. तुझ्या आई वडिलांच त्यांच्या द्रुष्टिने बरोबर आहे. तु ही बरोबर आहेस. अशा परिस्थितीत तू शांत रहावस. तुझ्या मतावरच रहावस, पण शांतपणे. आई बाबा रागाऊन बोलतिल, त्यांचा तो आधिकार आहे. पण जर तु शांतपणे आणि ठाम पणे ते ऐकुन घेतलस, या सगळ्याला सामोरी गेलीस, तर तेच तुझ वागणं त्याना atleast विचार करायला भाग पाडेल. तू हे करू शकतेस हे नक्कि, फक्त तुला त्यासाठि न थकता, न थांबता आणि सगळ्यात महत्वाच, निराश न होता, न हारता प्रयत्न करावे लागतिल. all the best आणि मनातला सगळा राग, निराशा share करायला आम्ही आहोतच. अनघा.
|
हो ग अनघा पण हे लोक main म्हणजे इतर relatives मला खुप बोलतायत.२-३ दिवस रडुन रडुन डोळे सुजलेत अक्षरक्ष:. काय करु ते ही कळत नाहिय अज्जिबात.
|
Monakshi
| |
| Monday, January 14, 2008 - 9:42 am: |
| 
|
हे बघ योगिता, नातेवाईक किंवा इतर लोकांच्या भानगडीत पडूच नकोस. हा सर्वस्वी तुझा, त्या मुलाचा आणि तुमच्या दोघांच्या parents चा प्रश्न आहे. लोकं काय दोन्ही बाजूंनी बोलतात. त्यामुळे तिकडे सरळ दुर्लक्ष कर. आणि त्यांच्यासाठी रडायची तर काहीच आवश्यकता नाहीये. तुझा जर पूर्ण विश्वास असेल त्या मुलावर आणि तुम्हा दोघांना पुढचं सगळं आयुष्य एकमेकांसोबत काढायचं असेल तर be patient आणि कोडगं बनायला शीक. कारण हे आता नेहेमीच होईल. सतत आई नाहीतर वडिलांकडून टोमणे ऐकावे लागतील. प्रत्येक वेळी तू रडत बसणार आहेस का???? आणि कुटअच्याही प्रकारची घाई करु नकोस, पळून जाऊन लग्न वगैरे तर विचार डोक्यातून काढून टाक. शेवटी आपल्या आईवडिलांना आपलं समाधानच हवं अस्तं आणि तू त्या मुलाबरोबरच समधानी रहाशील हे तू हळूहळू पण सतत त्यांच्या मनावर ठसव. आणि होता होईल तसं त्याला त्याचं graduation complete करायला सांग. म्हणजे निदान त्या front वर तरी तुला आईबाबांकडून objection येणार नाही.
|
नाही ग मोनाक्षी हे पळुन वगैरे जाण मलाच पटत नाही मुळीच. आज सकाळी पण office ला जाऊ नकोस वगैरे चालु होत.बघुया मी आज सकाळीच बाबाना call केलाय. त्यानी शांतपणे ऐकुन घेतलय सगळ आणि मला म्हणालेत पण मी आलो की भेटेन त्याला म्हणुन. पण इतके दिवस माझी आता काही खैर नाहिय.घरी गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टि आपोआप होतातच tonting वगैरे.
|
Monakshi
| |
| Monday, January 14, 2008 - 10:35 am: |
| 
|
तेच तर सांगतेय. especially आई वगैरे तर सतत करतीलच tonting . बाबा खूप चिडके नसतील तर ते शांतपणेच घेतील पण शेवटी आई त्यांचंही डोकं खाईलच. त्यामुळेच सांगतेय तू हे सगळं शांतपणे घे. उगाच तू त्रागा केलास तर त्याचा त्रास तुलाच होईल. तुझ्या बाहेर पडण्यावर बंधन येतील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मैत्रिणींना जर का ह्याच्यात involve केलंस तर त्यांचीही खूप मदत होईल तुला.
|
Manjud
| |
| Monday, January 14, 2008 - 10:37 am: |
| 
|
योगिता, नक्की कुठल्या कारणासाठी तुझ्या घरून ह्या लग्नाला विरोध आहे? म्हणजे तू लवमॅरेज करते आहेस म्हणून की अजून दुसरंच कुठलं कारण आहे त्याचा शोध घे. आईवडिलांचं म्हणणं काय आहे ते नीट समजून घे. त्यावर नीट विचार कर. कदाचित त्यांच बरोबरही असू शकेल. तुझी बाजू तुला बरोबर वाटत असेल तर ती तुझ्या आई वडिलाना शांतपणे पटवून दे. मोना म्हणत तसा पेशन्स ठेव. कुठलाही निर्णय आततायीपणे आणि भावनेच्या भरात घेऊ नकोस. आणि हो, नातेवाईक किंवा इतर लोक काय म्हणतात तिकडे अजिबात लक्ष देऊ नकोस.
|
Akshra
| |
| Monday, January 14, 2008 - 11:06 am: |
| 
|
योगिता,तुज़्ह्या आई वदिलना काय प्रोब्लेम आहे ते समजुन घे.
|
Akshra
| |
| Monday, January 14, 2008 - 11:08 am: |
| 
|
मला कोनि द कसा लिहयचा ते सन्गेल का?वदिल मधला द
|
मंजु खर तर मीच घरात मोठी आहे त्यामुळे मीच जर अस केल तर माझ्या मागच्या बहीणी पण असच करतील अस त्यांना वाटतय.पण no one is ready to asure me that मी अस नाही केल तर बहीणी नाही करणार...
|
वडिल vaDil अस लिहि...
|
Gobu
| |
| Monday, January 14, 2008 - 11:28 am: |
| 
|
योगिता , कुठलाही निर्णय आततायीपणे आणि भावनेच्या भरात घेऊ नकोस. वर मंजुने जे लिहीलेय त्याला माझे अनुमोदन! पुर्ण विचार करुन निर्णय घे...आणि, एकदा निर्णय घेतलास की त्यावर ठाम रहा.
|
Anaghavn
| |
| Monday, January 14, 2008 - 11:32 am: |
| 
|
अक्षरा, वडील्-- waDiil योगिता, तुला सगळे बोलणारच. पण त्यातल्या कोणाला अधिकार द्यायचा हे तू ठरवायचस. अधिकार म्हणजे--- आई वडीलांना अधिकार असतोच. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामुळे तुला रडु आले तर ठीक आहे. पण इतर नातेवाईक जे बोलतात त्यांच्या मुळे जर तु रडलीस तर तु स्वत:च त्यांना अधिकार देत आहेस बोलण्याचे. त्यांना उलट उत्तर द्यायची नाहिस.पण त्याच बरोबर रडायच नाही की तोंड पाडुन बसायच नाही. तुझा ठामपणा या सगळ्यातून दिसून येईल आणि हळुहळु ते बोलायच बंद होतिल. तु जितकं त्यांच्या कडे लक्ष देशिल, रडशील तस तसा त्यांना बोलायचा अजुन अजुन अधिकार, चान्स मिळेल. आता तुला निग्रही होण्याची ते ही लवकरात लवकर्--- गरज आहे--स्वत:साठीच. आहे ही अशी परिस्थिती आहे. ती लवकरात लवकर स्विकार. म्हणजे त्यात तू खोलवर रुतून बसणार नाहीस. डीयर, तुला स्वत:वर आणि त्या मुलावर, तुमच्या प्रेमावर विश्वास आहे ना? मग घाबरतेस कशाला? अगं हिच तर तुझ्या प्रेमाची, विश्वासाची परीक्षा आहे. परीक्षा अजुन काय वेगळी असते? तू यशस्वी होणारच आहेस्--तुला व्हायचं आहे. आणि हे सगळे संकट तुला तुझ्या स्वत:विषयी चा विश्वास वाढवण्यासाठी आहेत.व त्यातुन तू तावून सुलाखून निघशील तेव्हा खूप strong झालेली असशील. आणी तुझा आत्मविश्वास, आत्मसन्मान त्यावेळेस वाढलेला असेल. तेव्हा रडु नकोस, कामाला लाग. तुला स्वत:ला या सगळ्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे. ताठ मानेने. अनघा
|
Manjud
| |
| Monday, January 14, 2008 - 11:33 am: |
| 
|
अक्षरा, हे तुझ्या साठी योगिता, लवमॅरेज करण्याला त्यांचा विरोध असेल तर तुला पटवून देता आलं पाहिजे की ते का चुकीचं नाहीये.
|
Anaghavn
| |
| Monday, January 14, 2008 - 11:36 am: |
| 
|
मघाशी वाचलेलं एक छान वाक्य--- As soon as Fear approches near,attach and distroy it. अनघा
|
गोबु, अनघा बघते आज घरी काय situation आहे ते म्हणजे कळेल मला.शक्यतो मी शांत रहायच ठरवलय आता.. आणि माझ्या घरी काका आणि मावशीच पण love marriage आहे पण they both r not ready to listen me at all..
|
योगिता, तू आधी स्वत्:ला काय हवय ते ओळखून घे. तुझं त्या मुलावर प्रेम आहे म्हणजे नक्की काय आहे त्याचा शोध घे. या मुलाबरोबर तू तुझं अख्खं आयुष्य काढी शकशील का? हा प्रश्न स्वत्:लाच विचार आणि उत्तर बघ,. तुझी आणि त्याची compatibility काय आहे ते बघ. अर्धा प्रॉब्लेम तुझा तिथे सुटून जाईल. आता दोन शक्यता उरतात एक म्हणजे तुला त्या मुलाशी लग्न करायचंच आहे. दुसरी शक्यता आपण नंतर बघू. जर तुला त्या मुलाशी लग्न करायचं हे एकदा ठरलं की ते का? हे सर्व एका कागदावर लिहून काढ. ते सर्व मुद्दे नीट वाच. आणि मग आईशी बोल. शांतपणे. तुझ्या बहिणी तिथे असतील तर बरे होईल. स्पष्टपणे तुझ्या मनात जे काही आहे ते सांग. वटल्यास त्या मुलाला बोलवुन घेतलेस तरी चालेल. आईची मन:स्थिती विचरात घे. तुझे बाबा इथे नसल्यामुळे तुझी आणि तुझ्या बहिणीची जबाबदारी फ़क्त तिच्यावर आहे. त्यामूळे तिला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तू काहीही वावगं वागत नाही आहेस हे तिला पाटवून दे. बाकीच्या कुठल्याही नातेवाईकाची काळजी करायची गरज नाही. "वेळ अली तर कुणी येतं का?" हा प्रश्न आईला विचार. त्यचबरोअब्र बहिणीनाही सर्व व्यवस्स्थित समजावून सांग. हा प्रश्न तुझ्या आयुष्याचा असल्यामुळे त्या नक्कीच तुला समजून घेतील आणि मदत करतील. त्याचा सपोर्ट तुझ्याशी महत्वाचा आहे. वडीलाशी नीट बोलुन घे. इथे तु "मी हे असं करू का?" हे विचारत बसू नकोस. "मी लग्न करतेय." हे सांगून टाक. त्या मुलाला रजिस्टर मॅरेजसाठी अप्लाय करायला सांग. (हे रजिस्ट्रेशन एक महिना आधी करावं लागतं. मित्र मैत्रीणीना कल्प्ना देऊन ठेव. स्वत्:च्या राहण्याची सोय दोघानी मिळून करा. जरी त्याच्या घरून विरोध नसला तरीही. आणि एक लक्षात घे, तू जेव्हा हे पाऊल उचलतेयस तेव्हा तुझे पाठी जान्याचे सर्व मार्ग जाळून टाकत आहेस. हे सर्व लक्षात ठेव. त्याचबरोबर त्या घरच्या संस्कृतीचा तू एक हिस्सा होशील हेही लक्षात घे. तीपण मानसिक तयारी ठेव. सर्वात शेवटी आपल्याला काय हवं आणि आपल्याला काय करायचं, या दोन्ही बाबी समजावुन घे. प्रेमविवाह करणं खूप सोपं आहे. त्या लग्नानंतर सर्वाना खुश करणं कठीण आहे. अर्थात यासाठी तुला सर्वात जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. तु त्या मुलाच्या घरच्या विषयी काहीच लिहिलेलं नाहीस. त्यामुळे मी त्यावर काहीच बोलत नाहिये. तरी तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. हे आठवणीत ठेव. महत्वाचा मुद्दा म्हणजे अजून तु लहान आहेस. इत्क्या लवकर लग्नाची घाई करू नकोस. तुझ्या रेलेशनशिपला देव्हलप व्हायला थोडा वेळ दे. let it get matured तवर तुम्ही दोघंही करीअरवर लक्ष केंद्रित करू शकता. committeD असणं म्ह्णजे लग्न ताबडतोब करायला हवे असे नाही. यामुळे घरचा विरोश पण जरा कमी होईल आणि तुम्हाला स्वत्:ला सावरायला बराच वेळ मिळेल. मात्र या दरम्यान काहीही वावगं वागून स्वत्:ची क्रेडीबिलिटी घालवू नकोस. आणि माझ्यातर्फ़े हा सर्वात महत्वाचा सल्ला.. आयुष्य फ़क्त एकाच माणसासाठी नसतं. त्यामुळे छोड दे सारी दुनिया किसी के लिये ये मुनासिब नही आदमीकेलिये.. हे विसरू नकोस.
|
ड लिहिण्यासाठी वापरा D.. जसे ण साठी वापरायचा N
|
Akshra
| |
| Monday, January 14, 2008 - 12:32 pm: |
| 
|
थन्क्स कसे लिहायचे ते सान्गितल्याबद्दल
|
Zakki
| |
| Monday, January 14, 2008 - 1:05 pm: |
| 
|
थन्क्स ऐवजी धन्यवाद लिहा. असे: dhanyawAd .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|