|
Bee
| |
| Tuesday, January 03, 2006 - 3:09 am: |
| 
|
Nirakar, mee ase pahile aahe kee ekadaa 10/15 warshacha kaL ulaToon gelaa kee tya pati-patniche sambandh adhik jiwhaLyache hotat. mag purwee tyannee je kalah kele asatat, khasta khallya asatat aaNi tumachya mhaNaNyapramaNe aapala KONDAMARA karun ghetala asato, ase joDape sukhaane naandaayala surawaat karataat. he mee sarwaadhik maajhya swatachya bahininbaddal pahile aahe. tyanchya lagnala aataa itake warsha zalit kee tyanchya life partner barobar tya adhik sukhat disatat. Maher waigare maage paDale ase waaTate. mag wichar kelyaawar ase kaLale kee saadhe room mates barobar aapale paTat nasate. jyasobat aapaN fakt paishyachya roopat kahitaree share karat asato, aapalya bhawana, man, sharir hya goshti nahi. tarihi aapale tya aparichit wyaktisobat kalah hotatatch. akher nishkarsha asa kaDhala kee kuThelehee naate nirman hote tenwha tyala barach awadhee, patience, endurance, taDajoD hya sarwanchee garaj asate. bagha paTate kaa.. MT, sagaLe post aawaDale.
|
Moodi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 12:53 pm: |
| 
|
मुलींसाठी लग्न न करण्याचे चांगले वाईट परीणाम. चांगले : १ : मनासारखा जोडीदार असेल तर भविष्याची सुरक्षीतता. २ : घरी जसे सगळे लाड पुरवले जातात, तसेच नवरा पण पुरवतो. ~dd . ३ : नवीन संबंध जोडले जाऊन अनेक नवीन नाती निर्माण होतात. ४ : पुढे मुले झाली की निदान काही जणीना तरी आयुष्याची पुर्तता झाली असे वाटते. ५ : सहजीवनातुन बर्या वाईट अनुभवातुन मुलगी किंवा मुलगा तावुन सुलाखुन निघतात. परीपक्वता येते. वाईट परीणाम : निदान माझ्या दृष्टीने तरी जास्त नाहीत. तरी जे मनात आहे ते देते. १ : माहेरी जसे वागले जाते अन आई वडिल, भाऊ बहीण याना गृहीत धरले जाते तसे सासरी होईलच असे नाही. २ : या नवीन संबंधात जे आपल्याला आवडणार नाही, पटणार नाही असे देखील ऐकुन घ्यावे लागते. तशी तयारी असेल तर लग्न जरूर करावे.
|
मुडी, तुला १०१% अनुमोदन, लग्ना ला बंधन मानु नये, नवरा बायको हे नाते जन्मभर सोबत करते, बहीण भावंड, आईवडील मित्र मैत्रीणी हे सगळे क्षणाचे सोबती प्रत्येक जीव स्वतंत्र असतो या न्यायाने मुले सुद्धा आईवडीलांपासुन लांबवर सेटल होतात(याला अनेक कारणे असतात) तुम्ही कमवता, फ़िरता, पण या सगळ्यांचा कधीना कधी तुम्हाला कंटाळा येतोच, तेव्हा विसवायला घर हवे असते, आणि मुलांची पण वाढ निकोपपणे अशा घरातच होते, जर आपण थोडी बंधने पाळली ना घरात तर पुढची पिढी सुढ्दा सुध्रुड नातेसंबध मानेल, अथवा सगलीकडे अराजक निर्माण होइल. जर एखादीची किंवा एखाद्याची नात्यात फ़सवणुक झाली तर त्याने अथवा तीने नवीन जीवन्साथी निवडावा! हा मुद्दा वेगळाय संपुर्ण,, पण म्हणुन लग्न करु नये असे नाही.
|
इथे लग्न न करण्याचे परिणामांवर चर्चा अपेक्षित आहे 
|
Moodi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 2:36 pm: |
| 
|
अरे! हे काय लिहीले मी चुकुन मग. बर आता लग्न न करण्याचे परीणाम बघा. मनाला लावुन घेऊ नका, पण मी वस्तुस्थिती बघितलीय म्हणुन बोलते. पुरूष असो की मग स्त्री त्याला किंवा तिला जन्मभर स्वतच्या उदरनिर्वाहाकरता नोकरी किंवा व्यवसाय करून भविष्यातल्या तरतुदीकरता कष्ट करावेच लागतील. पुरुषाला पर्याय नसतो त्यासाठी, पण जर लग्नानंतर मुलगी नोकरी करत नसेल तर तिला नवर्यावर अवलंबुन रहावे लागते किंवा रहाता येते. लहान मुले असतील तर मग ती काही काळ घरी राहून मग नोकरी किंवा व्यवसाय करु शकते. पुरुषाला ते शक्य नाही. नोकरीवरुन दमुन घरी आल्यावर आपल्याबरोबर कुणी बोलायला, चहा खाणे शेअर करायला नसते तेव्हा हा एकटेपणा नंतर जाणवतो. तेव्हा हे निदर्शनास येते की लग्न झालेली जोडपी स्वतच्या मुलांबरोबर वा जोडीदाराबरोबर हसत खेळत दिवसभराची सुख दुख शेअर करुन मनाचा ताण हलका करु शकतात. एकट्या आयुष्यात हा ताण मानसीक त्रास देऊ शकतो, मात्र ज्याच्या मनाची तयारी आहे अन ज्याला कायम एकटे रहाण्याची सवय आहे, त्या व्यक्तीला ही एक सवय बनुन जाते. त्यामुळे नशिबातच असेल तर गोष्ट वेगळी, पण मुद्दाम कुठल्या पुर्वग्रहातुन घाबरुन जाऊन असे निर्णय घेऊ नयेत.
|
Arjun0306
| |
| Wednesday, March 15, 2006 - 3:10 pm: |
| 
|
मला वाटते की जर नवरा बायकोचे प्रेम असेल, तर ते दोघे मिळून सर्व अडचणींवर मात करू शकतात. त्यांनी एकमेकांना धीर दिला पाहिजे. मी पाहिले की हटवादी पणा करणरे, रागीट असे लोक जर साथीदार मिळाले तर जीवन कठिण होते. राग, हट्ट मर्यादेत असावेत. अर्थात प्रेम असल्याशिवाय एकमेकांना या बाबतीत सांभाळून घेणे कठीणच! Note: This is my first long posting in Marathi, Is my devnagri good enough to read? I am still studying it.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|