Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 05, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through April 05, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Wednesday, April 04, 2007 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोर्सड
त्यात त्या बिचारिचा काय दोष? >>>>
काहीच नाही पण फोर्स करनार्याचा आहे असेच आम्ही तेव्हा पासुन लिहितोय ना. मग ते तरी मान्य करा.

बर गोबू हेच ऊतर नाही, असे वादग्रस्त मुद्दे निट मांडले ( म्हणजे त्यांचा कडे ऊतर नसले) की कुलकर्णी गायब होतात. हा ट्रेंड आहे. मग हळुच एक पिल्लु सोडतात. (पहीले मुसल्मान होते आत ख्रिच्शन).

कुलकर्णी वैयक्तीक घेऊ नका.


Chyayla
Wednesday, April 04, 2007 - 10:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद झकासराव, नक्की वाचेल ते लेख

बर गोबू हेच ऊतर नाही, असे वादग्रस्त मुद्दे निट मांडले ( म्हणजे त्यांचा कडे ऊतर नसले) की कुलकर्णी गायब होतात. हा ट्रेंड आहे. मग हळुच एक पिल्लु सोडतात. (पहीले मुसल्मान होते आत ख्रिच्शन)

एकदम बरोबर पिल्लु सोडुन द्यायच मग अन्गावर आले की कस सटकायच आणी परत दुसर घेउन हजर... पण काही म्हणा या व्यक्तिमुळे करमणुक होते... विचार करा असे उपद्व्याप कोणी केले, नसते तर सगळ्यान्च्या ज्ञानात ईतकी भर पडली असती का? मी तर आभारी आहे त्यान्चा पण वरच्या वाटचालीत एक टप्पा अजुन विसरलेत ते मुस्लिम होण्यापुर्वी सोनियाचे गुलाम ही होते आठवतय का... "जय सोनिया माता" ... दीवा घ्यायचा ह.

आणी गोबु त्यान्नी ईथे अनामिका ला वैयक्तिकच म्हटले होते की त्यान्च चुकल मग त्यावरच उत्तरही वैयक्तिक असणारच ना..

तर आता ही चर्चा या मुद्यावर आहे की बळजबरीनी, फ़ुस लावुन, अज्ञानाचा फ़ायदा घेउन, आमिश, लग्ने याद्वारे धर्मान्तर करणे योग्य आहे का? याचे उत्तर अर्थातच विजय साहेब मोठ्या खुबीनी टाळतीलच...
शिवाय जी कारणे सान्गितली की मन्दीर प्रवेश नव्हता, अन्याय होता त्या आधारावर तर ईतर कट्टर असहिष्णु धर्मापेक्षा हिन्दु लाख पटीनी चान्गले. हे सिद्ध झाले आहे.

एक मान्य की जातियवाद, आणी विषिष्ट समाज बान्धवाना खालची वागणुक देण्यात आली होती त्याचा राग असणे सहाजिकच आहे, मी त्या वर्गात नाही पण मला पण त्या प्रकाराची भयन्कर चीड आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या समाज तो कुठेही, कोणत्याही प्रकारचा असो असे प्रकार सम्पुर्ण जगात घडलेत आहेत फ़क्त स्वरुप वेगळे होते. पण यातही आपली हिन्दु सन्स्कृती सनातनी व परिवर्तनवादी असल्यामुळे सुधारणा होत आहे हे समाधान, व अभिमानाची गोष्ट आहे, जरी अजुन फ़ार मोठा पल्ला गाठायचा आहे.

तरी दुसर्या बाजुने टोकाचा विचार करुनही... धर्मान्तरण म्हणाल तर मग ख्रिश्चनच का महामानव बाबासाहेब आम्बेडकरान्नी ख्रिश्चन, इस्लाम नाकारुन बौद्ध धम्माची निवड का केली होती याचा विचार करा. काही म्हणा कुणाला माझे विचार पटो वा न पटो पण आम्बेडकरान्चे या समाजावर अनन्त उपकार आहेत व त्यान्नी अन्यायाचा प्रतिकार करुन उपेक्षीत समाजाला अतिशय योग्य दीशा दाखवली होती. अशा व्यक्तिला माझा अन्तकरणापासुन सलाम.

आज त्यान्चा दलीत चळवळीची दीशा आणी दशा पाहुन वाईट वाटत. कथीत दलीत पुढारी, रीपब्लिकनान्च्या सुडाच्या व पदाच्या लालसेने चालले राजकारण यामुळे ही चळवळ पुर्ण अपयशी ठरली व या अपयशाचे सगळ्यात धडधडीत उदाहरण म्हणजे बौद्ध समाजाचे होत असलेले ख्रिस्तीकरण.



Peshawa
Wednesday, April 04, 2007 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोर्सड
त्यात त्या बिचारिचा काय दोष? >>>>
बरोबर म्हणुनच जे force करतात त्यांना कयद्याचा बडगा दाखवला पहिजे! असेच तर सगळे म्ह्णत आहेत. पण मग काय्द्याचा बडगा म्हटले की सहिष्णुतेचे झेंडे नाचवायला तुम्ही असालच!

उद्या येसुबाबा हिन्डु धर्मात जन्माला आला तर तो कसे पट्वून देइल की तो Jesus आहे आणि ह्या जन्मात त्याचे नाव अनिरुद्ध आहे आणि हे India Christian मनतिल का? the second coming of that great soul means that he has to subscribe to the ideas of his followers and show he is Christian by adhering to those ideas? What happened to his son of god status? So which Christian sect he has to take birth in? :-) Will a Tribal born Jesus get accepted by a baptist from midwest as his lord and savior DREAM ON!

The whole harvesting and Christianity that is importaed to india has so much racial and colonial hangover that Jesus himself will renounce his second coming and who knows might become laalbhai insted! :-P



Vijaykulkarni
Wednesday, April 04, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण एक गोष्ट लक्षात घ्या समाज तो कुठेही, कोणत्याही प्रकारचा असो असे प्रकार सम्पुर्ण जगात घडलेत आहेत फ़क्त स्वरुप वेगळे होते.

चला इस ह्माम मे सभी नन्गे है


Vijaykulkarni
Thursday, April 05, 2007 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या लहानपणी पन्धरा ऑगस्ट ला
शाळेत मुलाना रन्गीबेरन्गी कागदात
गुन्डाळलेल्या गोळ्या वाटत.
माझ्याच गोळीचा रन्ग कसा चान्गला यावरून
भान्डणे होत.
आमचाच धर्म चान्गला असा वाद घालणरी मुले पाहीली की मला
त्याची आठवण होते.

:-)


Kedarjoshi
Thursday, April 05, 2007 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचाच धर्म चान्गला असा वाद घालणरी मुले पाहीली की मला
त्याची आठवण होते.



कुलकर्णी अगदी असेच उत्तर तुमच्या कडुन अपेक्षित होते. मला जाम हसायला आले. ( माझा गेस बरोबर लागला म्हणून).

ईथे आम्ही माझा धर्म चांगला असा वाद घालत आहोत असा फक्त तुम्ही समज करुन घेतला आहे. आम्ही नाही. फक्त तुमच्या आय मिन ख्रिशन बळजबरीपणाच्या विरुध्द मत मांडले तर त्या तुम्हाला असे का वाटले की हिंदु धर्मचा उदो उदो चालवला आहे. (तुम्ही हे नको ते रिड बिटबीन मस्त करता बॉ). परत एकदा जोरात
.

सायबा त्या का? अशा प्रश्नानां उत्तर पण द्या की.

गनुजी नाईक, यशंवतराव मोरे, सुर्वे यांना पण असच वाटायच. (आता हे कोण हे मी तुम्हाला रिसर्च करायला सोडुन देतो).

Peshawa
Thursday, April 05, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचाच धर्म चान्गला असा वाद घालणरी मुले पाहीली की मला >>
विजय खरच धन्य आहे. Christian harvesting च्या मागे काय आहे दाखवल तर हिंदु धर्म great अस logic? कस लावता हे खरच विलक्षण आहे. तुमची सोनियाभक्ती ह्या logic ची प्रेरणा असावी

गुंडाळलेली गोळि कुठल्या रंगाची ह्यावरुन भांडणं वेगळ आणि स्वत्:च्या कडच्या गोळ्य बळजबरीने दुसर्याच्या गळ्यात मुक्टिच औशध म्हणुन घलण वेगळ...


Nandini2911
Thursday, April 05, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे असलेले सगळे जण हिंदू आहेत. मुस्लिम किंवा ख्रिश्चन एकही नाही...
मग आमचाच धर्म चांगला असा वाद कसा होईल?
धर्म हा दोन द्रुष्टीनी महत्वाचा असतो. एक तर श्रद्धा आणि दुसरी म्हणजे सामाजिक जडणघडण. सांस्कुतिक मुद्द्यावर धर्म हा महत्वाचा दुवा आहे.
म्हणजेच धर्मातून संस्क्रुती घडते. पण सध्या मात्र धर्म हा संस्क्रुतीपेक्षा वरचढ ठरवायचे प्रयत्न चालू आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे दोघे त्यातील प्रमुख खेळाडू.. हिंदू धर्माकडून जो प्रयत्न चालू आहे तो फ़क्त याना प्रतिकार म्हणून.
त्यातही ख्रिश्चन धर्म हा सत्तेचा भुकेला आहे. फ़ार पूर्वीपासूनच या धर्माने इतर धर्मीयाची नामशेष करण्यावर भर दिला. सक्तीने धर्मांतर न करता आल्यास धोकेगिरीने ही केले आहे. (आठवा.. पाण्याच्या विहीरीत पाव टाकून "तुम्ही बाटले" असे बोंबलणारे पाद्री)



Anamikaa
Thursday, April 05, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी!
अश्या प्रकारे भुलविणार्‍या शब्दांचे खेळ करुन स्वतःच्या मनाची क्षणिक समजुत काढता येते पण वास्तव फ़ार चटका लावणार असते. आणि म्हणतात ना "ज्याच जळत त्यालाच कळत".तत्वज्ञान सांगणे फ़ार सोपे आहे. पण जिथे रक्ताच्या नात्याची किंमत ठेवलि नाहि तिथे राखिच्या धाग्याची कोण जाण ठेवणार?
पुन्हा ईतके करुन त्यांची मने देखिल मुर्दाड झाली आहेत. स्विकारलेल्या धर्माचे कौतुक आमच्या समोर आमच्याच घरात धार्मिक कार्य चालु असताना करण्याएव्हढी मजल मारणारी निर्लज्ज माणसे आहेत ती. अश्या बहिणीशी कुठल्याहि प्रकारचे संबंध एखादा स्वाभिमानी भाऊ ठेवु शकेल असे किमान मला तरी वाटत नाही. आणि मुळात जन्मदात्याला आपल्या हटधर्मापायी प्राण गमवावे लागलेत याची खंत ज्या मुलिला नाहि अश्या भावनाशुन्य व्यक्तीशी आपले नाते असले काय नसले काय काहि फ़रक पडत नाही.

आणि गोबु मी स्वतहुन कुठलेही वैयक्तिक शाब्दिक हल्ले चढवलेले नाहित पण कुणी माझ्या नावचा उल्लेख केल्यावर तरि किमान मी शांत राहू शकत नाही.

"च्या" नेहमी प्रमाणे तु योग्य मते मांडली आहेस.तुझ्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन.

"अनामिका"


Me_sakhi
Thursday, April 05, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका तुझे म्हणणे अगदि योग्य आहे. प्रेम हि एक उदात्त भावना आहे.इतकेच जर एकमेकांवर प्रेम होते तर तुझ्या नणंदेचा नवर्‍याने स्वतचा धर्म का नाही बदलला? आणि धर्म न बदलता देखिल दोघे सुखाचा संसार करु शकले असते पण कधि कधि वाटते आपल्या मुलिच कच खातात. आणि म्हणुनच ही परिस्थिति निर्माण होते.

Vijaykulkarni
Thursday, April 05, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हन्त हन्त
इथले वातावरण फारच तापलेले आहे.
त्यामुळे दोन महिने काहीही
न लिहिण्याची भीष्मप्रतिज्ञा लोकाग्रहस्तव करतो.
आणी हो, नकळत कुणाला दुखावले असेल तर क्षमस्व.


Saavat
Thursday, April 05, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>तर आता ही चर्चा या मुद्यावर आहे की बळजबरीनी, फ़ुस लावुन, अज्ञानाचा फ़ायदा घेउन, आमिश, लग्ने याद्वारे धर्मान्तर करणे योग्य आहे का?

नाही! नक्कीच नाही!!

परंतु जिथ दोन वेळच्या अन्नाची वानवा असते,तिथ अन्न हेच 'परब्रम्ह' होत. धर्माचा विचार, करायला पोट भरलेल असावे लागते. आतड जाळणार्‍या भूकेसमोर मी-मी म्हणनार्‍याचा फ़डशा पडतो, तिथ तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांची काय कथा! ( अपवाद सोडून देऊ, छत्रपती संभाजी विरळा असतो! आणि प्रश्न आहे तो आपल्या सारख्या सामान्यांच्या धर्माचा.)

आता वरिल प्रश्नाच स्वरूप थोड बदलू...

तर आता ही चर्चा या मुद्यावर आहे की बळजबरीनी, फ़ुस लावुन, अज्ञानाचा फ़ायदा घेउन, आमिश, लग्ने याद्वारे धर्मान्तर करायला लावणे योग्य आहे का?


ह्या प्रश्नाचा रोख आहे तो ज्यांच पोट भरुन, ते सुटलेले आहे, असे लोक,धर्माचा वरवर विचार का करतात, किंवा दुसर्‍याला फ़शी का पाडतात? मोठा गहन प्रश्न आहे. जर इतर धर्मीय ती चूक करतात, म्हणून आपणही तिच चूक परत करण योग्य आहे का?आपला मूळ धर्म काय सांगतोय? मला असे वाटते, मग ते तसे असेल, अशा विचारसरणी योग्य मार्ग न दाखवता, उलट पदभ्रष्ट करतात.

मी हिंदू आहे, तो माझा स्वधर्म आहे, मला माझ्या धर्माचा अभिमान आहे, हे नक्कीच! पण मला नेहमीच प्रश्न पडतो की मला माझ्या धर्माचा अभिमान का आहे? जर उद्या खरच पृथ्वीवर सगळेच हिंदू धर्मीय झाले, तर काय फ़रक पडेल किंवा माझ्या हिंदू धर्मात अस काय आहे की तो सगळ्या पेक्षा वरचढ आहे? असे छातीठोकपणे मला सांगता येईल! का माझा धर्म अजून एक timepass च साधन आहे, दूसर सगळ सरासर झूठ, बकवास आहे?



Zakki
Thursday, April 05, 2007 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो विजयकुलकर्णि, जरा स्पष्टपणे सांगा की इतर धर्मीयांनी हिंदूंना त्यांच्या धर्मात घेण्यासाठी काय वाट्टेल ते उपाय योजले तर त्याला तुमची मान्यता आहे का?

की तुमच्या मते, हे काही फार मोठे प्रकरण नाही, नुसता गाजावाजा केलाय् हिंदूंनी? बर्‍याच जणांचे मत तसे असते.

की हिंदूंनी म्हंटले की आमचा धर्म चांगला आहे तर तुम्हाला प्रचंड वेदना होतात, दु:ख होते, हसू येते?

जे काय असेल ते तसे लिहा. सावट यांनी पहा कसे स्पष्ट लिहीले आहे, की हिंदू धर्मच सर्वात श्रेष्ठ हा विवाद्य मुद्दा आहे. पण त्यांनी हे नाही स्पष्ट केले की, त्यांचे तरी हिंदूंना बाटवण्याबद्दल काय मत आहे, विशेषत: फसवा फसवी करून? नि बाकीचे लोक जेंव्हा त्यांचाच धर्म चांगला म्हणतात तेंव्हा त्यांना सांगायची त्यांची किंवा तुमची हिंमत आहे का, की हे सगळे लिमलेटच्या गोळीवरल्या कागदासारखे आहे? जाऊन बघा एकदा मुसलमानी लोकांच्या वेब साईटवर, नि लिहून बघा!


Saurabh
Thursday, April 05, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे दोन वेळच्या अन्नाची भ्रांत वगैरे मुद्दे अनेकदा येऊन गेलेले आहेत. ते योग्यदेखील आहेत. पण त्या भ्रांतेची सोय करण्यासाठी धर्मांतर करणार्यांना इथे कुणी दोष देत नाहीये, तर त्यांच्या त्या असहाय्यतेचा फ़ायदा करून घेणार्‍या लोकांना हरमखोर म्हटले तर, कुलकर्णी आणि सावट, तुम्हाला त्रास का व्हावा?

गुगल देखील बघा, फ़क्त ख्रिस्चिऍनीटीच्याच जाहिराती देतय..


Saavat
Thursday, April 05, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,सौरभ!

नमस्कार! कृपया पोष्ट नीट वाचावे ही विनंती.
हिंदू धर्मच सर्वात श्रेष्ठ हा विवाद्य मुद्दा आहे! नाही, नाही माझ्या करता तर अजिबात नाही.
विवाद्य वैगरे नाही हो, मला नक्कीच माहीत आहे की हिंदू धर्मच सर्वश्रेष्ठ आहे, absolutely no second thoughts ! झक्की, तुला विवाद्य का वाटतो,हा मुद्दा? जरा स्पष्ट सांगशील का?
सौरभ, कसला त्रास म्हणालात, परधर्मियांना हरामखोर म्हणण्याचा! नाही-नाही,त्यात कसला त्रास! चांगल काम आहे, चालु ठेवावे!

आणि हो, हिंदू धर्माच काय होणार? याची चिंता अजिबात करू नका. जे 'सत्य' आहे, ते 'चिरंतन' असते.


Savyasachi
Thursday, April 05, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला थोडा वेगळा प्रश्न आहे. विजय, तुमच लिखाण हे लिखाण आहे की नवकाव्य आहे? नाही, दर ४ ५ शब्दानंतर वेगळी ओळ आहे :-)

Kedarjoshi
Thursday, April 05, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन महिने काहीही
न लिहिण्याची भीष्मप्रतिज्ञा लोकाग्रहस्तव करतो>>>>
झाल कुलकर्णीनी प्रश्नांना बगल मारली व भिष्मप्रतिज्ञा केली. ( पण त्याला भिष्मप्रतिज्ञा कसे म्हणता येईल ती तर कुलकर्णींनी केली आहे).


पण मला नेहमीच प्रश्न पडतो की मला माझ्या धर्माचा अभिमान का आहे? >>>>

सावट तुम्हाला एकट्यालाच तो प्रश्न नाही पडला. पण तो पडला हे फार महत्वाचे आहे. या आधी गांधी, विवेकानंद सावरकर, रेव्ह रानड्यांना पण पडला पण रेव्ह रानडे सोडुन बाकीनी धर्मांतर केले नाही. त्यांनी जास्त अभ्यास केला व हिंदु धर्म काय आहे हे जानुन घ्यायचा प्रयत्न केला. फार अवधड आहे हे काम. कारण स्वत ला हिंदु धर्माचे रक्षक म्हणुन घेनारे हा प्रश्न पडु देनारे तिकडे जात नाहीत. उथळ पाण्यात डुबक्या मारतात. nevertheless तुम्हाला पडलाच आहे तर तुम्ही त्यावर अभ्यास करु शकाल. जर अमेरिकेत असाल तर सुरुवात अगदी सोप्या AM I Hindu सारख्या पुस्त्काने करु शकाल. नंतर बरिच पुस्तके आहेत ति पण वाचाल्यावर धर्म काय चिज आहे हे उलगडु शकेल.

Deshi
Thursday, April 05, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला थोडा वेगळा प्रश्न आहे. विजय, तुमच लिखाण हे लिखाण आहे की नवकाव्य आहे>>>
अहो सव्यसाची कुलकर्णी प्रशान्चे ऊतर देत नाहीत ते फक्त प्रश्न करतात. अन ऊत्तर मागीतले की प्रतिप्रश्न करतात.

Ajjuka
Thursday, April 05, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळं वाचलं आत्तापर्यंत... पण
>>इथले वातावरण फारच तापलेले आहे.
त्यामुळे दोन महिने काहीही
न लिहिण्याची भीष्मप्रतिज्ञा लोकाग्रहस्तव करतो.<<
हे वाचून मात्र हसून हसून मरायची वेळ आली. माणसाने पळपुटेपणा किती उघडपणे करायचा त्याला काही सुमार!!!
बाकी चालूद्या... माझा हिंदू धर्म असल्या गोष्टींनी ढासळून पडण्याइतका तकलादू नाही.
अनामिका, एक फुकटचा सल्ला... घरातल्या गोष्टी घरातच ठेवाव्यात नाहीतर असल्या मंडळींचं फावतं आणि त्रास आपल्यालाच होतो.

Saavat
Thursday, April 05, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
अरे व्वा! खूप बरे वाटले, तुमचे पोष्ट वाचून.

परमहंस रामकृष्ण- सारदा देवी- स्वामी विवेकानंद- परमहंस स्वामींचे मानसपुत्र, राखाल म्हणजेच ब्रम्हानंदस्वामी ही माझी दैवत आहेत,अधिक काय सांगू! मित्रा, आपण अभिमान त्याच गोष्टीचा धरायला पाहीजे, ज्याची आपल्याला पुर्ण कल्पना असते!नाहीतर अंधविश्वास आणि अंध-अभिमान यात फ़रक तो काय? दोन्हींही घातक, स्वत:करिताही, समाजाकरिताही,आणि हिंदूधर्माचा अविभाज्य भाग असलेल्या, हिंदूवैदिकधर्मतत्वज्ञाना नुसार, अंतिम ध्येय असणार्‍या, "मोक्षाकरिताही"!

मला 'च्यायला' काय म्हणतात ते पहायचे आहे!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators