|
१) विजय, तुम्ही एवढे गुणगान केले सन्घाच्या लोकान्चे हेच जरा तुमच्या लालभाईन्ना सान्गा "व्याव्हारिक सत्य". हेच कौतुक समाजवादी कार्यकर्त्यान्ना पण लागू होते. हे मान्य करण्याचा उदारपणा दाखवाल? ४)हिन्दु सन्घटन कोणाच्या विरोधात नाही, एखाद्या विशिष्ट समुदायाला हाकलुन लावणे किन्वा द्वेष करणे ह्या क्षुल्लक कारणासाठी मुळीच नाही ते आधी पण स्पष्ट केले आहे. हिन्दु सन्घटन केवळ हिन्दुचे दोष नष्ट करुन त्यान्ना एकत्रित करण्यासाठी आहे. तसे असते तर हिन्दुमधील अन्ध श्रद्धा विरुद्ध काम करणार्या अन्निस वर भोन्दु महराजान्च्या खान्द्यावर बन्दूक ठेवून हल्ला केला नसता. किन्वा सतिप्रथेचे आजही समर्थन करणार्याला मार्गदर्शक केले नसते. ५)सन्स्क्रुत सगळ्या भाषेची जननी, एखाद्या तामिळ माणसाने ऐकले तर तुमच्या डोक्यावर कढत साम्बार ओतेल तो. त्या स्वामी रामदेव बाबानी आपल्या मालाची जाहीरात करण्यासाठी वापरून घेतले तुम्हाला आणी रॉयल्टी पण दिलि नाही.
|
Santu
| |
| Monday, November 13, 2006 - 6:34 am: |
| 
|
म्हणजे यांच्या कोलांट्या उड्या बघा)))) आता कोलांट्या कोण मारतय हे जगाला दिसतेच आहे अहो तुमचा करात इथे केन्द्रात बोंब ठोकतोय कि multinational ला हाकला. आणी तिकडे राज्यात बुध्ददेव(बघा कमुनिस्टा च्या नावात पण देव)सगळ्या भाडवलदाराना पायघड्या घालतोय. अत्र्यांच वाक्य ठाउक आहे ना जो बदलत नाहि तो दगड. वैयक्तिक कारणा साठि मुंडे याना वर आणले)))) मग आणु द्या ना. आता याला काय म्हणावे जर वर आणले तर वैयक्तिक कारणा साठि म्हणनार नाहि आणल तर उच्च वर्णीय मागासांवर अन्याय करतो म्हणणार(तळागाळातील हा तुमचा शब्द).मग माणसाने करावे तरी काय? नामांतरास विरोध )))) मग कमुनिस्टानी तरी कॅलकटा चे कोलकाता का केले.कुठल्यातरी गावाचे स्टालिनग्राड का केले. तामिळ माणुस सांम्बार ओतेल))))) अहो तामिळ च काय सर्व asiatik and indo-yuropian या सन्स्क्रुत पासुनच उगम पावल्यात. आता राज्किय कारनासाठि हे सगळ नाकारायच चाललय. हे पहा तामिल मधिल संस्क्रुत शब्द ishatam,kaashtam,nashtam,pushpam,vedaranyam रामदेव बाबा ला शिव्या देण्या पेक्षा कपालभाती करा म्हणजे डोके शांत होईल
|
Gs1
| |
| Monday, November 13, 2006 - 10:12 am: |
| 
|
सगळी नाही पण गेल्या दोन पानांवरची पोस्ट वाचली. केदार, संतु व चायला आपण फार सुरेख, मुद्देसूद आणि तर्कसंगत विवेचन केले आहे. पण आपल्या प्रतिपादनामुळे, ज्याप्रमाणे मलीनवस्त्रशुचीकरणात कार्यरत अशा व्यक्तीचे जे प्रिय असे वस्तूवाहक की जे मृत्तिकावहनासाठीही घटनिर्मात्यांकडुन वापरले जाते, अशा विशिष्ट चतुष्पादासमोर जर कोणी फार प्राचीन काळी प्रत्यक्ष रणांगणावर, ऐन धुमश्चक्रीत जीवनाचे सार प्रकट करणारे जे तत्वज्ञान प्रसवले गेले ते ज्या महान ग्रंथात प्रकटले त्याचे मौखिक पुन : प्रकटीकरण केले असता जी परिस्थिती उद्भवेल की जेणेकरून प्रस्तुत कृती आणि दिनापुर्वीच्या घटिकांतील परिस्थिती सुसह्य होती असे वाटावे तसे काहीसे येथे झाले आहे असे मला वाटते. आपल्यालाही असाच अनुभव आला असावा असे वाटते. 
|
उष्ट्राणाम ही विवाहेषु, गर्दभम मन्त्र पाठयेत. परस्परम प्रशन्सन्ती अहोरुपमहोध्वनी.
|
Zakki
| |
| Monday, November 13, 2006 - 3:19 pm: |
| 
|
पण असे ठरले होते ना की कुठल्याहि एका पक्षाचे (कॉंग्रेस, संघ, कम्युनिस्ट इ.) वर्चस्व न ठेवता, एक नविनच पक्ष, DWW काढायचा? या पक्षातले नेते सर्वांकडून चांगले गुण घेऊन, सत्तेच्या नादी न लागता केवळ हिंसा थांबवणे हेच काम करेल? ते कसे करायचे याची चर्चा करा ना, कृपया!
|
Chyayla
| |
| Monday, November 13, 2006 - 4:43 pm: |
| 
|
विजय स्वस्तुती आणी आणी तुमच्या मित्रान्ची स्तुती छान केलीत तुम्ही, तुम्हाला चपखल लागु होते आणी कौतुक म्हणजे अगदी योग्य शब्दात मान्डलीत. घ्या तुम्ही म्हणत होते ना समाजवाद्याच कौतुक करा... केल... Gs1 ना पण लगेच खरे ठरवले आपण. आयला, साम्बार यम...मला गरम साम्बर प्राषन करायला खुप आवडतो, मला वाटल नव्हते तामिळ ईतके खुश होतील. मुळ विषयावर कधी लिहिणार तुम्ही?
|
Chyayla
| |
| Monday, November 13, 2006 - 6:44 pm: |
| 
|
१) काही समाजावादीन्चे वैयक्तिक आचरण खरच चान्गले आहे, कम्युनिस्टान्कडुन एक चान्गली गोष्ट सगळ्यान्नी शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे एखादा पक्षाचा प्रमुख निवडणुक, आणी ईतर लाभाच्या पदा पासुन दुर रहातो आणी पक्षाचे कार्य प्रामाणिक्पणे व सचोटीने करतो. त्यान्ना मान, प्रतिश्ठा, पैसा याचा स्वार्थ नाही. साधी रहाणी असते. पण या मुळे पार्टीचे कार्य खरच चान्गले होते. मागे हरकिशन सुरजित यान्चे घोटाळे चव्हाट्यावर आले होते पण मिडियानी पुर्ण खबरदारी घेतली जास्त चर्चेत येउ नये म्हणुन, असल्या अजुन काही भानगडी असतील तर माहिती नाही. पण हे सन्गठन, समाजात वर्ग सन्घर्ष निर्माण करुन सतत समाजाला तोडण्याचे कार्य करत असते, क्रान्ती प्रतीक्रान्ती यात त्याअन्ची स्वता:ची फ़जिती झाली परिणाम त्यान्च तत्वज्ञान व्याव्हारिक पातळीवर साफ़ अपयशी ठरले हे प्रत्येक वेळी सिद्ध झाले आहे, तसे कम्युनिस्ट दहशतवादाच्या BB वर मुद्देसुद, आणी व्यवस्थीत चर्चा झालेली आहेच. लालभाईन्नी सान्गितल्याप्रमाणे (मानसशास्त्रात, पराकोतीचे न्युनगंड असणारी लोकं जास्त ओफ़्फ़ेन्सिवे असतात) त्यामुळे हे लोक उलटे दुसर्यान्नाच साम्प्रादायिक म्हणुन कायम हिणवत असतात. खन्त हीच वाटते, की अश्या प्रामाणिक व्यक्तिन्चा उपयोग राष्ट्रकारणासाठी झाला तर चान्गले, दहशतवाद सम्पवायला मदतच होइल. पण दुर्दैवाने ते स्वता: दहशतवाद्याना समर्थन, देशहीत, देशाला गौरवास्पद प्रत्येक गोष्टीला विरोध कारण स्पष्ट आहे ईथे राष्ट्रवाद वाढला, जनता जाग्रुत झाली की कम्युनिस्टान्चा भारतातही एक पराभव होईल ही भिती त्यामुळे ते यावेळेस सगळी खबरदारी घ्यायचा प्रयत्न करीत आहे. बन्गाल यान्चे Experimental State पण राजकिय पक्ष कशाप्राकारे दहशत निर्माण करुन कश्या निवडणुका जिन्काव्या व राज्य करु शकतो त्याचे उदाहरण. (ईतके वर्शे राज्य करु शकलात हे अजुन एक कौतुक) कोलकात्यामधे गेलो असताना हे सगळ प्रत्यक्ष पाहिलेले, व माझ्या काही बन्गाली कम्युनिस्ट मित्रान्कडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे. त्यानी सोप्या शब्दात सान्गितले "यन्हा पर सभी गरीब का बात करता है, और सरकारी बाबु को कोई नही गिनता, उसके लिये कभिभी बन्द, धरना चालु करता है कोई भरोसा नही, ट्राम और जो सरकारी बसे है उनका भाडा भी नही बढा सकता आज भी भाडा अभीभी १ या २ रु. रहता है, अगर थोडा भी बढ गया तो अख्खा ट्राम ही बन्द, लोग ऐसी बातोसे बहुत खुश और, पार्टीकोही व्होट देते है, कोई भी कार्यकरता हो उसको पार्टी का लेटर आसानीसे मिलता है और उसका कोई भी काम हो जाता है, यन्हा का सरकारभी पार्टी ही चलाता है." वरच्या उदा. मधे ट्राम तोट्यात चालतात, सगळा कर्मचार्यान्चा पगार, मेन्टेनन्स वैगेरेचा भार सरकारी तिजोरीवर, शिवाय त्याचे आधुनिकिकरण व चान्गली सेवा देण्यास असमर्थता आलीच. बस तेव्हाच कळुन चुकले त्यान्चे निवडणुका जिन्कण्याचे रहस्य, सगळ्या सरकारी योजनान्चा लाभ पार्टी कार्यकर्ता असेल तरच मिळतो मग झक मारुन लोक पार्टीला सामिल होउन काम करतात. शिवाय बान्गलादेशी घुसखोरान्ना अगदी रेशन कार्ड मिळवुन व्होट ब्यान्क सुरक्शीत करुन ठेवलेली आहे. या सगळ्या कारणामुळे आर्थिक, औद्योगिक प्रगती च्या नावाने बोम्ब मग रोजगार, नौकर्या निर्माण करणे दुरच. एकप्रकारे गरीबाना गरीब, व अज्ञानीला अज्ञानीच ठेवल्या जाते नाहीतर कोण व्होट देणार हो यान्ना. तसेच दलितान्ना दलित, व अल्पसन्ख्यकना अल्पसन्ख्यकच ठेवतील त्यान्चात राष्ट्रीय एकत्वाची भावना निर्माण न होण्याची पुर्ण काळजी घेतल्या जाते. तसे कम्युनिस्ट व जिहादीनमधे हे साम्य आहे, काही लोक वैयक्तिक पातळीवर अतिशय चान्गले असतात वागण्यात एक अदब असते कुणीही प्रभावित होईल, पण सामुहिक पातळीवर राष्ट्रविघातक, असहिष्णु, एकान्गी व हेकट आणी ईथेच सगळ बिघडत. पण यात त्यान्चा वैयक्तिक दोष नाही कारण त्यान्ची तत्वे, ध्येयच तशी असतात त्यामुळे ते त्याला प्रामाणिक आहेत. हिन्दु सन्घटनान्च्या तत्वामधे ईथेच फ़रक दिसुन येतो, हिन्दुत्वाची चर्चा सुद्धा झाली आहेच त्यामुळे कसे ते परत सान्गण्याची गरज नाही. २) अनिसचा उद्देश, उपद्व्याप प्रामाणिक असते तर त्याला पुर्ण समर्थन, भोन्दुगिरीच्या विरुद्ध जनजागरण करण्याला समर्थन पण त्यान्चा हिन्दुत्वविरोधी भुमिका पाहिली की स्पष्ट दिसुन येते की ते एका पक्षाला, ठरावीक विचारसरणीला पुर्णपणे विकल्या गेले आहेत आणी ईथेच त्यान्चा लबाडपणा उघडकिस आला. ३) आयला तुमचा जातीयवादाचा आरोप फ़सल्यामुळे आता सतिप्रथा आठवली का? ह्या आरोपामधे तसाही काही दम नाही, सतिप्रथेला कोणी हिन्दु सन्घटना समर्थन करत नाही, हिन्दु सन्घटनान्च्या प्रयत्नामुळे जेन्व्हा तो पण समाज जाग्रुत होईल तेन्व्हा ते पुर्णपणे बन्द होईल. तुमचा फ़ार मोठा गोन्धळ झालेला दिसतो आहे, हिन्दु, हिन्दुत्व व हिन्दु सन्घटनामधे. त्यामुळे हिन्दु समाजातील दोष तुम्ही हिन्दु सन्घटनान्ना चिकटवण्याचा प्रयत्न करत आहात जो उलट असले दोष काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, तरी... तुमच्यासाठी... हिन्दुत्व्- एक आदर्श ज्यामधे मानवकल्याण, समाजातील कुरिती जसे जातियवाद, सतिप्रथा किन्वा अजुन काही खुस्पट जे तुम्ही पुढे काढाल व ईतर दोष विरहीत असा व्यापक राष्ट्रवादी विचार्सरणीचा, तुमच्या सार्ख्या खोडसाळ प्रचारामुळे आत्मग्लानीने ग्रसित, व स्वघातक असे विचार व अतीसहिष्णुतेचा त्याग करुन. राष्ट्राला परमवैभवावर नेणारा समाज निर्माण करणे. (अजुन बरेच काही ईथे थोडक्यात) हिन्दु- हा समाज आहे जो अजुन पुर्णपणे जाग्रुत झाला नाही (टार्गेट हेच आहे एखदा धर्म जसे इस्लाम, ख्रिश्चन वैगेरे नव्हे) यामधे मागे सान्गितल्याप्रमाणे दुसर्या मताचा आदर करणारे, सहिष्णु असे मुस्लिम व ईतर ज्याना तुम्ही अजुनही अल्प्सन्ख्यक, दलित, महार बनवुन राष्ट्रिय प्रवाहापासुन तोडले आहे ते सगळे आलेत. हिन्दु सन्घटनान्नी हे शब्द कधीच काढले, समाज नव्हे. आपल्या देशापुरता म्हणाल तर जे हिन्दुस्थानानात रहातात ते सगळे हिन्दु, व याशिवाय वैश्विक पातळीवर हिन्दुत्वाचा जीवनमार्ग अवलम्बणारे सारे सज्जन.(अर्थात एखादा थाम्बलेला अपरिवर्तनिय मतप्रवाह असलेला धर्म नव्हे) हिन्दु सन्घटना- वरचा आदर्ष समाज निर्माण करण्यासाठी असलेले साधन आहे. BTW तुमची वरच्या बाबतित असलेली अन्धश्रद्धा गेली कि नाहे ते कळवा किन्वा अजुन काहे असेल तर सान्गा, मागे म्हटल्याप्रमाणे सगळे विष काढुन टाकु. आणी हे करण्याचे पवित्र कार्य तुम्ही आमच्याकडुन घेताहात त्याबद्दल आपला आभारी आहे. आशा करतो यामुळे तुमच्यासारखे पण राष्ट्रीय विचारधारेबद्दल असलेले गैरसमज काढतील व दहशतवाद सम्पवायला मदत होईल. एकन्दरीत मी विषयला धरुन बोललो आहे.
|
"ही उर्दूप्रचूर नावे ही महायुद्धात झालेल्या जखमांचे व्रण आहेत, ती मिटवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अभिमानाने मिरवली पाहिज्ते." माझ्या हे वाचनात आले नाही, त्यामुळे नक्की काय ते सांगु शकत नाही. पण नाव बदलायला काय हरकत आहे. (रादर नावच नाही तर जे मुख्य देव स्थान आहेत ते पण बदलायला हवेत असे माझे वयक्तीक मत आहे). संघ सत्तेला हपापलेला आहे. गोंधळलेला आहे. गोंधळलेला मी मान्य करतो. कारण कधीकधी मी स्वत्: चकीत होतो पण all in all ही एक चांगली संघटणा आहे. गांधी वधा पासुन व नंतर आणिबाणी पासुन उगीचच ह्या संघटनेला ब्राम्हणी माणले गेल पण तसे काही नाही. मी अगदी अलिकडे म्हणजे गेल्या ५ वर्षांपासुन active काम करणे कमी केले आहे कारण US मधे असल्यामुळे. तरुण लोकांमध्ये काम केल्या मुळे अनेक नविन योजना निर्मान होत आहेत. त्यामुळे संघ फार बदल्ला हे मान्य होत नाही. संघ सत्ते साठी हपापलेला आहे. मला नाही वाटत तसे काही आहे. (शिवाय बाकी लोकांच्या मता प्रमाणे संघ ब्राम्हणी आहे नी आताची लोक्संख्या पाहात ब्राम्हण राज्यकर्ते होऊ शकत नाहीत मग स्वप्न का बघावेत. उलट तुम्ही जे म्हणात की संघ सत्ते साठी हपापलेला आही याचा अर्थ संघाला आता जनाधार आहे म्हणुन तो सत्ते वर येन्याची स्वप्न पाहात आहे असा वाटतो.) उलट तसे काही असते तर भाजपा असताना रज्जु भैया पंतप्रधाण वा राष्ट्रपती झाले असते. एकुन सध्या थोडा गोंधळ वाटत आहे पण तो कमी होईल अशी आशा करुयात.
|
Zakki
| |
| Monday, November 13, 2006 - 11:26 pm: |
| 
|
चला, आता एकमेकांची उणि दुणि काढली, परस्पर प्रशंसाहि झाली थोडीबहुत. थोडक्यात पक्ष राजकारणात पडला, सत्तेमागे लागला की तो बिघडतो! म्हणून तर असा एक पक्ष काढा की जो सत्ता मिळवण्या ऐवजी दहशतवाद कसा कमी करता येईल ते बघेल. सत्ता आपोआप चालून येईल!
|
२) अनिसचा उद्देश, उपद्व्याप प्रामाणिक असते तर त्याला पुर्ण समर्थन, भोन्दुगिरीच्या विरुद्ध जनजागरण करण्याला समर्थन पण त्यान्चा हिन्दुत्वविरोधी भुमिका पाहिली की .. जरा स्पष्ट कराल ३) आयला तुमचा जातीयवादाचा आरोप फ़सल्यामुळे आता सतिप्रथा आठवली का? ह्या आरोपामधे तसाही काही दम नाही, सतिप्रथेला कोणी हिन्दु सन्घटना समर्थन करत नाही. विहिम्प हिन्दु नाही? दक्शीण महाराष्ट्रात आणी कर्नाटकात देवदासी नावाची एक राक्शसी प्रथा होती. अशिक्शीत लोक नवस फेडण्यासाठी एका पोटच्या मुलिला देवदासी बनवून देवाशी लग्न लावीत. नन्तर त्या बिचारीचा प्रवास मुम्बाईचा कुन्टणखाना आणी नन्तर गावात परत येऊन भीक मागणे. सुमारे पन्धरा वर्शान्पुर्वी अन्निस ने या प्रथेविरुद्ध जाग्रुती आणी अन्दोलन सुरु केले ( नेहेमीप्रमाणे त्यान्च्यावर धर्म विरोधाचे आरोप ही झाले) पण पाच सहा वर्शे चिकाटीने आणी दोन्ही राज्याच्या पोलिसान्च्या मदतीने ही प्रथा बन्द पडली आणी हिन्दू धर्मावरचा एक डाग गेला. त्याच वेळी हिन्दुत्ववादी मात्र अयोध्येत जावून मशीद पाडायच्या तयारीत मग्न होते.
|
Laalbhai
| |
| Tuesday, November 14, 2006 - 2:58 am: |
| 
|
उलट तसे काही असते तर भाजपा असताना रज्जु भैया पंतप्रधाण वा राष्ट्रपती झाले असते. >>> हा दावा काही पटत नाही केदार. संघाला kingmaker व्हायचे आहे. king नाही. "संघ" सत्तेसाठी हपापलेला आहे म्हणताना संघाचे पदाधिकारी राज्यकर्ते होऊ इच्छितात, असा अर्थ नाही तर त्यांच्या परिवारातला राजकिय पक्ष सत्तेवर असला पाहिजे ही त्यांची धडपड आहे. ह्यात काहीच वाईट नाही. समाजकारण आणि राजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. किंवा सत्तेसाठी चांगले वाईट राजकारण करणे हा त्याचा एक भागच झाला आहे. आक्षेप अहंगंडाला आहे. आक्षेप समाजात विद्वेशाची बीजे पेरत केलेल्या राजकारणाला आहे. रोजच्या रोज होणारी तत्वांची मोडतोड दिसत असूनही संघाने स्वतःचा "तत्ववादी" असा गौरव स्वतःच करून घेणे हे हस्यास्पद आहे. कालच माननीय (!) सरसंघचालकांई जाहीर मुक्ताफळे केली की मुस्लिम, ख्रिश्चन आणि त्यांना आश्रय देणारे हे देशद्रोही आहेत! संपूर्ण मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजालाच राष्ट्रद्रोही ठरवण्याचे काम केलेले आहे. (ते वाचून सुदर्शन महाराजच मायबोलीवर येऊन लिहितात की काय असा मला प्रश्न पडला. ) तुमच्या प्रचाराची, विचाराची आणि आचाराची दिशा, हे उद्गार दाखवतात. म्हणून सध्याचा संघच मला सर्वस्वी घातक वाटतो.
|
Santu
| |
| Tuesday, November 14, 2006 - 8:13 am: |
| 
|
अनिस चा उद्देश प्रामाणिक नाहि)))) अनिस हि नुसती हिन्दु लोकांच्या मागे लागलिय.त्यांनी कधी बक्रि इद ला मारल्या जाणारया प्राण्यासाठी आंदोलन केले नाहि.किंवा मुसल्मानाच्या दोन बायका करण्या ला विरोध केला नाही.यांचा हेतु फ़क्त हिन्दु समाजाचा तेजोभंग करण्याचा आहे. रोजच्या रोज तत्वाची मोड्तोड दिसत असुन सन्घाने तत्ववादि.....)))) सन्घाने काय तड्जोड केली? बदलणे हा तर निसर्ग नियम आहे.बदलत नाहि तो फ़क्त दगड.ज्या कमुनिस्ट तत्वड्नान लोकशाहि मानत नाहि ते कम्युनिस्ट भारतात निवडुका लढवतातच नाहि का? शेवटि काय साध्य आहे ते महत्वाचे. मार्ग काय अडचणी नुसार बदलला तर हरकत नाहि. मुस्लिम ख़्रिस्चन देशद्रोहि))))))कश्मिर मधे मुसलमान स्वतंत्र होण्याची इच्छा बाळगतात.मिज़ोराम,मणिपुर,नागालॅड इथे ख़्रिस्चन लोक स्वतंत्र प्रदेश मागतायत त्या साठि अतिरेकि कारवाया करतात. मग ते देशद्रोही नव्हेत काय. बहुतेक मुसलमानाना व ख़्रिस्त्यांना हा देश आपला वाटत नाहि. हि गोष्ट कोणच नाकारु शकत नाहि. शेवटी खरे बोलण्याचे धाडस हे फ़क्त सन्घ दाखवु शकतो जे कुठलाहि राजकीय पक्ष दाखवु शकत नाहि कारण त्यांना फ़क्त मते पाहिजे असतात
|
Zakki
| |
| Tuesday, November 14, 2006 - 1:07 pm: |
| 
|
संतू, मुसलमानांना कोणताच 'देश' आपला वगैरे वाटत नाही. जिथे जातील तिथे त्यांना फक्त मुसलमान धर्म पसरवायचा एव्हढेच वाटते. नि काश्मिरी मुसलमानच काय, नेहेरूंसारखेच नाही तर खरे हिंदू असलेले लोक यांनाहि स्वतंत्र काश्मीरच पाहिजे होता, म्हणूनच ते काश्मीर प्रकरण उद्भवले हे मी मागेच एक दोनदा लिहीले आहे. तर आता पक्ष, धर्म यांच्या चर्चेसाठी दुसरे बीबी उघडा नि इथल्या चर्चेचा समारोप करा. धन्यवाद
|
Chyayla
| |
| Tuesday, November 14, 2006 - 8:30 pm: |
| 
|
झक्कि, सन्तु, तुमचे म्हणने बरोबर आहे, पण आपल्याच काही लोकान्ना ही अक्कल कधी येइल, ईतिहासात रममाण होण्यापेक्षा त्यापासुन कधि शिकतील कोण जाणे. पण ही अजुन एक गोष्ट शिकण्यासारखी आहे कम्युनिस्टानकडुन, मिडिया कसा म्यानेज करावा, तुमच्या वरची २ उदा: पुरेसे आहे. ग्लोबेल्स चे तन्त्रज्ञान वापरुन विरोधकान्बाबत गैरसमज पसरवणे यान्ना छान जमते. अगदी शब्दान्चा स्वता:च्या मनाप्रमाणे अर्थ लावुन खोटा प्रचार करण्यात अगदी माहीर की समोरच्याला वाटाव की काय भयन्कर आहे. १०० वेळा खोटे बोलले किन्वा गैरसमज पसरवले की झाले. पण एक लक्षात घेत नाहीत की याने तात्पुरता फ़ायदा होतो, पण दिर्घ काळात ते कुचकामी ठरतात. याच्या आधी, स्वातन्त्र्य सन्ग्रामाला विरोध, चिन च्या आक्रमणाच्या वेळेस केलेली भलावण, ईन्ग्रजान्शी हातमिळवणी, गान्धिन्चा, सुभाष बाबु, विवेकानन्द या सगळ्यान्च्या बाबतित असाच खोडसाळ प्रचार केल्या होता या राष्ट्रद्रोह्यानी.... आणी जेन्व्हा चुक लक्षात आली तर ती ईतक्या वर्षानी आता कबुल केली... नशिब ते तरी सुचल. पण मला हे म्हणायचे आहे वर्तमानकाळात कधी जगाल? चुका करत रहाणे आणी नन्तर वेळ गेल्यावर कबुल करणे याला काय अर्थ आहे? आता तरी सावध व्हा आणी दहशतवाद ओळखुन, त्याचा मुकाबला करण्यास सहाय करा. परत नाही तर गाढवासमोर... अशी म्हणण्याची परत पाळी यायची.
|
Shravan
| |
| Tuesday, November 14, 2006 - 11:03 pm: |
| 
|
अनिस ला मध्ये आणले म्हणून बोलतोय... अनिस हिंदूंच्या विरोधात आहे, मुस्लीमांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते ही विधाने मला आक्षेपार्ह वाटतात. उलट हिंदू समाजातील अनिष्ट प्रथांना ते विरोध करुन त्यातील वाईट गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिस चे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर देव या संकल्पनेला कधिही विरोध केला नाहीये. याबातची त्यांची भुमिका त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केली आहे.. (त्यांची जेवढी भाषणे, मुलाखती वाचल्या ऐकल्या आहेत त्यावरुन हे माझे मत बनले आहे). त्यांनी बर्याच मुस्लीम भोंदू बाबा, मौलवींच्या विरोधात काम केले आहे. हिंदू व मुस्लीम संख्येचे प्रमाण बघता सहाजीकच दोन्ही समाजातील प्रकरणेही त्या त्या संखेच्या प्रमाणात आहेत इतकेच. म्हणजे मुस्लीमांची कमी व हिंदूची जास्त असे... बाकी, झक्की तुमची प्रामाणीक पणे चर्चा करण्याची तळमळ वेळोवेळी दिसते आहे. पण इथे विषय मात्र पुन्हा पुन्हा भरकटतो आहे. तुम्हाला अभिप्रेत असलेल्या संघटनेच्या साधारण स्वरुपाविषयी मी मागे लिहिले आहे. त्याच पोस्ट दोनदा दोनदा टाकल्या आहेत. त्या वाचून त्यापुढे वा त्यातील तृटींविषयी पुढे चर्चा चालू ठेवता येईल.
|
श्रवन, झक्की अगदी बरोबर नेहमीच चर्चा अचानक हिंदु व तत्स्म विषयांवर वळते. कधी कधी येथील काही पोस्ट पाहाता केवळ विरोधा साठी विरोध दिसुन येतो. मग भलेही मुद्दा व्यवस्तिथ का असेना. त्यामुळे चर्चा होत असेल तर विषयाला अनुसरुन व्हावी. मुस्लीम दहशतादी जसे आहेत तसे बजरंग दल नाही का? असा प्रश्न निर्मान होतो. विष्याला अनुसरुन असेल तर ok पण आता अनिस पण ईकडे येत नी ब्राम्हणवाद पण. त्यामुळे मुळ विषय बाजुलाच राहात आहे. मुद्दा असाच असावा. १. तातडीचे उपाय. २. दुरगामी उपाय.
|
Rahul_1982
| |
| Wednesday, November 15, 2006 - 9:14 am: |
| 
|
अगदी बरोब्बर बोललात केदार
|
Santu
| |
| Wednesday, November 15, 2006 - 12:04 pm: |
| 
|
कुठल्या मुस्लिम बाबा बद्द्ल दाभोलकराने असे केले आहे?
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 15, 2006 - 12:25 pm: |
| 
|
हिंदुच्यात वाइट बाबा लोक नसतातच का/...गरीब भोळ्या भाबड्या.. हिंदु लोकांना च या भोंदु लोकांपासुन वाचवताहेत ना.. अ. नि.स वाले.. काहीअतरी आपल.. वडाची साल पिंपळाला. लावता!!! मुद्द्याच बोला... केदार ने.. मुद्दा दिला.. बघा..
|
Santu
| |
| Wednesday, November 15, 2006 - 1:31 pm: |
| 
|
भोळे..................भाबडे.....................गरीब उर्फ़...................तळागाळातले...................फ़क्त हिन्दुच............. सापडतात का या..................................दाभोळकराला....................मुसल्मान काय........................................................................................................ चावतात का त्यांना...................................................................................... ............................................ ......................................... ......................................... हुश्श दमलो बाबा इतक लिहुन
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|