|
Yogy
| |
| Wednesday, October 25, 2006 - 12:15 pm: |
| 
|
भाजप आणि मित्रान्चे गोध्रा, अयोध्या इ. उद्योग पाहता भाजप असा करु शकेल असे नक्कीच वाटते.
|
Sahilshah
| |
| Wednesday, October 25, 2006 - 2:21 pm: |
| 
|
संसदेवर हल्ला ह्यापेक्षा आजुन भयंकर काय असु शकते? ह्या हल्ल्यातील सहभागी असलेल्या सर्व लोकान कठोर शिक्षा (फाशीची) झाली पाहिजे जर ५०० पेक्षा जास्त आमदार हल्ल्यात बळी पडले असते तर देशात काय अरजकता माजली असती? किति लोकाचे बळी गेले असते. किति लोकाची आयुष्याची कमाई गेली असती? आणि हे सगळे कुणी निस्तरले असते? १९८४ मध्ये फक्त पंतप्रधानाची हत्या झाल्यावर किती बळी गेले? गेल्या ६० वर्षात राष्ट्रपतीना सही करणावाचुन काही करु दिले नाही, त्यामुळे त्याचा किवा लष्कराचा control हा लोकाना मान्य झाला नसता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, शिक्षा ही त्या माणसाना करायची नसुन परत हे दुष्क्रुत्य होउ नये म्हणुन द्याचे असते. भारतात जन्मठेप दिल्यस गुन्हेगार परत सुटु शकतो हे सगळ्याना माहित अहे (विमानाचे किवा मत्र्याचे अपहरण करुन किवा तुरुन्गात चंगले वागुन) फाशी दिल्यास पुन्हा हे दु:क्रुत्य करतना चार वेळा विचार केला जाईल.
|
Sashal
| |
| Wednesday, October 25, 2006 - 4:36 pm: |
| 
|
हल्ली सगळ्या गोष्टी 'घडवून' आणल्या असंच म्हंटलं जातं .. एकतर ह्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणं कठिण झालंय आणि 'The Trueman Show' या पिक्चरची आठवण होऊन आपण सर्वजण कोणाच्या तरी हातातलं बाहुलं असल्यासारखं वाटतं ..
|
कुलकर्नी सप्रेम नमस्ते. काय मस्त शोध लावला आहे तुम्ही. कशाचा आधारावर तुम्ही हल्ला भाजपाने घडवुन आणला असे म्हनताय याचा पुरावा द्याल काय? अफझल शेवटचा दुवा आहे असे म्हणु नका. एकतर पुर्ण पुरावा द्या नाहीतर तसे विधान चुकीचे आहे असे लिहा. भाजप आणि मित्रान्चे गोध्रा, अयोध्या इ. उद्योग पाहता भाजप असा करु शकेल असे नक्कीच वाटते. योगी अयोध्या वेगळे नी संसदेवर हल्ला करणे वेगळे. मान्य की तुम्हाला भाजपा आवडत नसेल पण एवढे टोकाचे मत. की आता देशी म्हणतात तसे विरोधकांचे मुद्दे सपंले म्हणुन नविन काहीतरी काढायचे.
|
Saurabh
| |
| Wednesday, October 25, 2006 - 4:59 pm: |
| 
|
९ / ११ ही घटना रिपब्लिकन पक्षाने घडवून आणली असा एक विचारप्रवाह अमेरिकेत आहे. त्याची आठवण झाली. कोणताही राजकीय पक्ष सध्या नैतिक मुल्ये जपत असल्याची वल्गना करु शकत नाही. त्यामुळे असले आरोप करणे सहज शक्य आहे. हा आरोप कधी आणि कोणी केला आहे हे कळू शकले तर बरे होइल. म्हणजे हल्ला झाल्या झाल्या केला गेलेला हा आरोप आहे की अफझलला फ़ाशी सुनावल्यावर केलेला? कारण असले असंख्य फ़ाटे फ़ोडुन गुन्हेगाराला शिक्षेपासुन दूर ठेवता येणेही अशक्य नाही. थोडक्यात अफझलवरील आरोप जर सिद्ध झाला असेल, तर अशा अतिरेक्यांना एक संदेश म्हणून त्याला त्याच्या 'अंजाम' पर्यंत पोचवणे हे महत्वाचे आहे आणि त्यामध्ये कोणताही अडथळा येउ न देणे हे आपले कर्तव्य.
|
Yogy
| |
| Wednesday, October 25, 2006 - 5:00 pm: |
| 
|
योगी अयोध्या वेगळे नी संसदेवर हल्ला करणे वेगळे. मान्य की तुम्हाला भाजपा आवडत नसेल पण एवढे टोकाचे मत. हे तुमचे मत झाले पण एका समाजाला लक्ष्य करुन देशात फूट पाडणे हाच ज्यांचा आवडता धंदा आहे त्यांना अयोध्या काय आणि संसद काय काही फरक पडत नाही. भाजपाने असे कदाचित केलेही नसेल पण त्यांचा इतिहास ध्यानात घेता ते लोक असे करणे अशक्य नाही असे मला म्हणायचे होते.
|
Yogy
| |
| Wednesday, October 25, 2006 - 5:02 pm: |
| 
|
थोडक्यात अफझलवरील आरोप जर सिद्ध झाला असेल, तर अशा अतिरेक्यांना एक संदेश म्हणून त्याला त्याच्या 'अंजाम' पर्यंत पोचवणे हे महत्वाचे आहे आणि त्यामध्ये कोणताही अडथळा येउ न देणे हे आपले कर्तव्य. सहमत
|
Shravan
| |
| Wednesday, October 25, 2006 - 5:21 pm: |
| 
|
हे तुमचे मत झाले पण एका समाजाला लक्ष्य करुन देशात फूट पाडणे हाच ज्यांचा आवडता धंदा आहे योगी, मला वाटते कॉग्रेस, समाजवादी पक्ष सुद्धा एका समाजाकडे जाणीवपुर्वक जास्त लक्ष देऊन समाजामध्ये दुही निर्माण करत आहे. हे माझे आपले वैयक्तीक मत आहे बरका. आणी हो.. मी दुसया कोणत्याही राजकीय पक्षा चा (म्हणजे BJP ई.) सुद्धा नाही बरका. बाकी हे विषयाला सोडून झाले.. तुमचे चालू द्या.
|
Giriraj
| |
| Thursday, October 26, 2006 - 6:05 am: |
| 
|
मी मागे म्हटले होते तेच पुन्हा म्हणतो... तेव्हा इतिहासाबद्दल म्हणालो होतो... कोणी काय केलं असेल किंवा काय बोललं असेल हे इथे बसून आणि त्या लोकांशी थोडाही संबंध नसलेल्यांनी बोलणं म्हणजे.. कधी क्रेकेटछ्या चेंडूला हातही न लावलेल्या माणसाने तेंडूलकरला शिकवण्याइतकेच महान आहे... धन्यवाद!
|
Santu
| |
| Thursday, October 26, 2006 - 8:01 am: |
| 
|
कुलकर्णी भाजप चे लोक संसदे वर हल्ल्याच्या पाठिमागे आहेत याचा पुरावा द्या की राव. नुसत्या ढगात गोळ्या सोडु नका. योगी समाजात फ़ूट पाडण्याचा धंदा तर काॅग्रेस्स चा त्यानी व त्यांच्या गांधीबाबा नी तर देशाची फ़ाळणी(धर्मावर आधारित) घडवून आणली.त्यावेळी तर भाजप नव्हता ना?
|
Dinesh77
| |
| Thursday, October 26, 2006 - 1:33 pm: |
| 
|
योगी, तुम्ही माझ्या प्रश्णाकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केलेले दिसते. जर ५५ कोटि पाकच्या हक्काचे होते, तर त्याकाळी जेवढे मुसलमान होते त्या हक्कासाठी गांधीबाबा का नाही लढला?
|
Zakki
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:11 pm: |
| 
|
अरे पण या सगळ्यात इस्लामी दहशतवादावर उतारा काय ते कळले नाही. माझ्या मते सगळेच भारतातले लोक जाम लाचखाऊ नि स्वार्थी आहेत. तिथल्या आजकालच्या लोकांचा पाश्चात्य, पौर्वात्य, सनातनि भारतीय तत्वज्ञान (सत्यमेव जयते, न्यायव्यवस्था, कायदे वगैरे) इ. शी काऽही संबंध नाही. रोज सकाळी उठल्यावर कुठे नि किती पैसे खावेत, कुणाला अडचणीत कसे आणावे, नि त्यातून आपला फायदा करून घ्यावा, एव्हढाच फक्त विचार असतो. साधे वहतुकीचे नियम पाळता येत नाहीत, कुठलाहि कायदा आरामात मोडतात, नि पैसे चारून प्रकरण मिटवून टाकतात! कुणाला पर्वा आहे, देश, आतंकवादी इ. भानगडींची! तेंव्हा हे असेच चालणार. आधीहि असेच चालले होते, म्हणूनच कुणिही यावे नि भारतावर राज्य करावे, नि काहीपण करावे!
|
Yogy
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:20 pm: |
| 
|
माझ्या मते सगळेच भारतातले लोक जाम लाचखाऊ नि स्वार्थी आहेत. तिथल्या आजकालच्या लोकांचा पाश्चात्य, पौर्वात्य, सनातनि भारतीय तत्वज्ञान (सत्यमेव जयते, न्यायव्यवस्था, कायदे वगैरे) इ. शी काऽही संबंध नाही. रोज सकाळी उठल्यावर कुठे नि किती पैसे खावेत, कुणाला अडचणीत कसे आणावे, नि त्यातून आपला फायदा करून घ्यावा, एव्हढाच फक्त विचार असतो. साधे वहतुकीचे नियम पाळता येत नाहीत, कुठलाहि कायदा आरामात मोडतात, नि पैसे चारून प्रकरण मिटवून टाकतात! तीव्र आक्षेप!!! कदाचित तुम्हाला माहित असलेले लोक असे असतील. तुमचा अशाच लोकांशी संबंध आला असेल. शितावरून भाताची परीक्षा करू नका... आम्ही भारतात राहतो याचा आम्हाला अभिमान आहे आणि देशाचे नियम पाळण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करतो...
|
१ अफ़ज़ल हा शरण आलेला अतिरेकी आहे. म्हणजे खर्या अतिरेक्यान्च्या द्रुष्टीने गद्दर. अशा माणसाला इतक्या मोठ्या कामगिरिवर पाठवतील ते? २ हल्ल्यानन्तर दुसर्याच दिवशी अडवाणीन्नी जहीर केले कि ते पकिस्तानी होते. कशावरून? तर त्यान्चा चेहरा पाकिस्तानी वाटतो. ३ दिल्ली पोलिसानी सम्पूर्ण प्रकरणाचा दोनच दिवसात तपास लावला. यावर कुणी विश्वास ठेवील काय? ४ या प्रकरणाच्या तपास अधिकारी म्हणून तुलनेने कनिश्ट आणी एन्कौन्टर फेम अधिकार्याला का नेमले? ५ हल्यात मेलेले ते चार अतिरेकी कोण? हे अजुनही महिती नाही पण त्य नन्तर सारे सैन्या सीमेवर नेवुन लावणाच्या तुघलकी कारभारात आपले करोडो रुपयान्चे नुकसान झाले आणी काही सैनिक मेले. ६ अफ़झल ला अटक केल्याबरोबर त्याला माध्यमान्समोरे पेश करून त्याच्या तोन्डातुन गुन्हा कबूल करून घेण्याचे कारण? अशी पत्रकार परिषद झालीच नाहे असे न्यायालयात धडधडीत खोटे सान्गूनही पोलिसान्वर काहीच कारवाई का नाही? ७ मला काश्मीरी पोलिसान्नी पाठवले आहे आणी माझ्या मोबाईलवर त्यान्चा नम्बर सापडेल असे सान्गुनही त्या दिशेनी तपास का नाही? ८ अफझल वर अन्याय झाला आहे आणी त्याच्या विरुद्धचा पुरावा विश्वासार्ह नाहे हे मान्य करून ही फाशी कायम करताना सर्वोच्च न्यालयाने दिलेली कारणमिमान्सा बालिश आहे.
|
Santu
| |
| Friday, October 27, 2006 - 6:22 am: |
| 
|
सर्वोच्च न्यायालय बालिश))))))) व्वा वा कुलकर्णी धन्य तुमची. "आपल्या" अफ़जल ला सोडत नाहित म्हणुन एवढ न्यायालयवर का राग काढता त्या पेक्षा पहिजे तसा निकाल देणारा न्यायाधिश(बनर्जी सारखा) नेमा म्हणाव सोनियाला भाजप बद्दल पुरावा कुठाय?
|
Chyayla
| |
| Friday, October 27, 2006 - 6:57 am: |
| 
|
ओढुन ताणुन छान प्रयत्न केला अफ़जल ला निर्दोष ठरवायला, यान्ना बनर्जी एवजी नेमायला पाहिजे होते तेथे तर धडधडीत खोटारडेपणा केला आहे लालु च्या ईशार्यावर. काही झाल तरी अफ़जल निर्दोषच आणी गोध्रा मधे लोकान्नाच स्वता:ला मारुन घ्यायची हौस आली होती दन्गे करायला. हा असला उफ़राटा प्रकार आणी केविलवाणी कसरत तुम्हालाच शोभते... चालु द्या. किती कळवळा बिचार्या एका जिहादीसाठी अक्षरशहा टाहो फ़ोडला कि हो आणी जे ६९ निरपराध गोध्रात मारल्या गेले त्यान्च्या साठी एक शब्द तरी निघाला होता का? आता काय... आपली दोड सोनियातक... मग पळा
|
Dinesh77
| |
| Friday, October 27, 2006 - 2:35 pm: |
| 
|
योगी, माझ्या प्रश्णाचे उत्तर कुठे आहे?
|
Yogy
| |
| Friday, October 27, 2006 - 3:02 pm: |
| 
|
योगी, तुम्ही माझ्या प्रश्णाकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केलेले दिसते. जर ५५ कोटि पाकच्या हक्काचे होते, तर त्याकाळी जेवढे मुसलमान होते त्या हक्कासाठी गांधीबाबा का नाही लढला? ५५ कोटी पाकच्या हक्काचे होते कारण ते देण्याचे भारताने मान्य केले होते. फाळणिच्या वेळी भारत हा धर्मनिरपेक्ष देश राहिल असे आपण जाहिर केले होते. त्यामुळे इथल्या मुसलमानांना जाण्यासाठी बळजबरी करू शकत नव्हतो. इथे गांधीजी नियमाप्रमाणेच वागले आहेत. नंतर आपण स्वीकार केलेल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे हेच अधोरेखित केले आहे. असो, गांधीजी फाळणीसाठी जबाबदार होते हा मोठाच विनोद म्हणावा लागेल. त्यांनी फाळणी होऊ नये म्हणून जिवापाड प्रयत्न केले. हा मुद्दा येथे बर्याच वेळा चर्चिला गेला आहे. प्रत्येक वेळी तेच तेच मुद्दे आणू नका. विषयांतराबद्दल क्षमस्व वरती विजय यांनी उपस्थित केलेले मुद्दे खरे असतील तर अफजलला घिसाडघाईने फाशी होऊ नये अशाच मताचा मी आहे. मात्र दुसर्यांची बाजू ऐकूनच घ्यायची नाही हा ज्यांचा छंद आहे त्यांना ते कदाचित पटणार नाही.
|
Zakki
| |
| Friday, October 27, 2006 - 3:31 pm: |
| 
|
तर सुप्रिम कोर्टाचा निर्णय अमान्य असेल, तर त्या विरुद्ध काय करतात? Constitution मधे त्याची काय सोय आहे का? सर्वसाधारणपणे लोकशाहीत कुणीच मनमानी करू शकत नाही. सगळेजण त्यांचे निर्णय सिद्ध करायला जबाबदार असतात. मुख्य म्हणजे न्यायाधीश हे समोर आलेल्या पुराव्याच्या आधारावर फक्त निर्णय देतात. तो पुरावा खरा की खोटा हे त्या आरोपीच्या वकीलाने तपासून पाह्यला पाहिजे. शिवाय आरोपीचा वकील incompetent असेल तर त्याला किंवा इतर वकीलांना (जे कायदा, पुरावा, न्याय, यांच्या शुद्धतेबद्दल शपथ घेऊन बसले आहेत) त्यावर आक्षेप घेतला की नाही? जर तो अतिरेकी होता, तर अतिरेक्यांजवळ प्रचंड पैसा आहे, त्यांनी त्यातून अफजलसाठी चांगला वकील नेमला का नाही? काय चालले आहे काय? कदाचित् 'सगळेच' लोक मी म्हंटले तसे नसतील, पण जे कुणि काम करण्यास जबाबदार आहेत ते मात्र मी सांगीतले तसेच दिसतात! ज्यांना काही अधिकार नाहीत असे लोक चांगले असूनहि काही करता येत नाही, म्हणून फक्त इथे येऊन वाद घालत बसतात! आता मला काही उद्योग नाही म्हणून मी आपला काहीतरी लिहायला इथे येतो. बाकीच्यांचे काय? नि अजूनहि इस्लामी दहशतवाद कसा कमी करावा? की फक्त एक अफजलचे प्रकरण संपले की मग आपण तिकडे वळणार आहोत?
|
अफझल साठी सरकारने पुरविलेल्या वकिलाने अफझल ला न विचारता एक असा निर्णय घेतल की त्यामुळे अफझल बुडाला.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|