Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 25, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through October 25, 2006 « Previous Next »

Yogy
Friday, October 20, 2006 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कोणत्याही प्रश्ना मध्ये अस्मिता आली की तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो आणि सर्वसमावेशक उत्तर शोधणे अवघड होऊन बसते.
अफजलची घटना "त्यांना" कशी वाटते यापेक्षा ह्या घटनेचा ते फायदा कसे करुन घेणार नाहीत.. आणि ज्यायोगे दहशतवाद्यांची नवीन भरती वगैरे करताना त्यांना हा मुद्दा कसा वापरता येणार नाही हे पाहणे आवश्यक आहे.

फाशीची शिक्षा हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. या शिक्षेबद्दलचे माझे मत तुमच्यासरखेच आहे. मात्र ज्यांना ह्या शिक्षेलाच विरोध करायचा आहे त्यांची मते ऐकून घ्यायला मला नक्कीच आवडेल


Saurabh
Friday, October 20, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ायदा करुन घेउ इच्छीणारे नुसती "जन्मठेप झाली" ह्या गोष्टीचा फ़ायदा करून घेणार नाहीत ह्याची खात्री कोण देणार? किंबहुना कोणतीही "शिक्षा झाली" ह्याचाही ते फ़ायदा नव्या दहशतवाद्यांच्या नियुक्तिसाठी करुन घेउ शकतात.

थोडक्यात तुमच्या दुसर्या वाक्याच्या आशयाला धरून, "ते काय करतील" हा निकष नसून ह्या गुन्ह्याला "भारत काय शिक्षा देउ इच्छीतो" हा निकष आहे.



Yogy
Friday, October 20, 2006 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


फाशी या शिक्षेचे "अपील" दहशतवाद्यांसाठी अर्थातच जास्त आहे. त्याला "हुतात्मा" बनवले तर भारताला त्याचा जास्त तोटा होण्याची शक्यता आहे.
भारत काय शिक्षा देऊ इच्छीतो हे न्यायालयाने दाखवून दिलेलेच आहे. मात्र या शिक्षेमुळे चुकीचे संदेश जाणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.


हे वाक्य मी अफजलच्या बाजूने बोलत नाही हे स्वतंत्रपणे स्पष्ट करतो.




Peshawa
Friday, October 20, 2006 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्यायालय त्याच्या चौकटीत काम करते. त्याने जो दिला तो न्याय नाही असे म्हणणे म्हणजे सगळ्या न्याय्व्यवस्थेवरच प्रष्णचिंन्ह लावणे. असे करण्यात गैर काही नाही. पण मग उद्या कोणताही निकाल का ग्राह्य धरावा? सगळेच जण राश्ट्रपतीन्ना साकडे घालतील. अफ़्जल कसा निर्दोश आहे हे सिद्ध व्रुत्तपत्रातुन अत्ता करण्या इअवजि त्याला फ़ाशी नको म्हणणारी मंडळि योग्य वेळेस कोर्टात त्याच्या बाजुने का उभि राहीली नाहीत? हे वराती मागुन घोड ह्याला मानवतावाद असले ढींच्याक पोलके का नेसवतात? अता ह्यांन्न सगळ्या process मधले loop holes दिसतात जेंव्हा केस चालु होति देंव्हा काय फ़ेणि लाऊन पडले होते काय?

अफ़जलला एका सार्वभौम व लोकशाहीने मान्य केलेल्या process गुन्हेगार थरवले आहे. मान्य नसेल तर process बदला कोण नाही म्हणत नाही. पण राष्त्रपतींना अधिकार आहे तेंव्हा त्यांच्या कडुन माफ़ी मिळवणे योग्य पण मला वाटते अता निर्णय फ़िरवणे योग्य नाही.

हे म्हणजे Duckworth-Lewis मेथड ने match गमावल्यावर ती मेथड कशी वाइट आहे आणि कसा हरलेला संघावर कसा अन्याय झाला आहे आणि त्याला बाहेर काढणे कसे गैर आहे अमानवतावादी आहे वैगेरे म्हणण्यासारखे आहे.

मला ह्या मानवतावाद्यांच नवल वाटत आम्ही सांगतो तसे करा म्हणायला लंगोट्यांचे झेंदे करून जातील पण हेच सत्तेमधे बसुन योग्य निर्णय घेऊन दाखवा म्हटले की टाच लावून पळतील किंवा आपले ती पुर्व करायला असंख्य माणस मारतील :-)


Yogy
Friday, October 20, 2006 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लंगोट्यांचे झेंदे
प्रथमच ऐकले

Chyayla
Friday, October 20, 2006 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवा पुर्ण समर्थन.

मानवतावाद्यान्चा एक अलिखित नियम आहे, जेन्व्हा आतन्कवादी सामान्य जनतेची कत्तल करतात तेन्व्हा एक शब्द्पण निघत नाही, काश्मीर मधे हिन्दुन्ची कत्तल झाली, आपल्याच देशात निर्वासितान्च जीवन त्यान्चा नशीबी आला, कशाला येतिल बापडे मदतीला हीन्दुन्च्या रक्ताची काय किम्मत ते काय मानव आहेत का मानवाधिकार त्यन्च्या बाजुने असायला?... आणी जेन्व्हा अफ़जल सारख्याची पाळी येते तेन्व्हा अगदी बेम्बिच्या देठापासुन सारे एकजात ओरडतील. आपल्या कडे लग्नात एक ब्यान्ड पार्टी तयार ठेवण्याची पधत आहे लग्न लागले की "वाजवा रे वाजवा" म्हटल की झाले सुरु. हा असलाच प्रकार हे लोक करतात अशावेळेस त्यान्ना विचारावेसे वाटते "तेन्व्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म".


Vijaykulkarni
Saturday, October 21, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फाशी सारखी कठोर शिक्शा देताना
१ त्याच्यावरचा आरोप अगदी स्पष्टपणे सिद्ध झाला आहे का? अफ़ज़ल विरुद्धचा पुरावा अगदीच तकलादू आहे आणी काही पुरावा तर पोलिसान्नी खाडाखोड करून केला आहे हे तर सर्वोच्च न्यायालयाने सुध्हा मान्य केले आहे.
२ त्याला आपला बचाव करण्याची योग्या सन्धी मिळाली आहे का? वास्तविक पोलिसान्कडचा पुरावा भक्कम असता तर त्याला असे घाई गडबडीत दोषी ठरवण्याचे नाटक करावे लागले नसते.
३ खालच्या कोर्टात ज्या न्यायाधीशानी तिघानाही फाशी दिली त्यान्नी "महीला वकील काय करून पुढे येतात हे मला ठाउक आहे" असे उद्गार भर कोर्टात काढून मजा आणली होती. ज्या पोलिस अधिकार्याने केवळ चार दिवसात (!) या प्रकरणाचा तपास पूर्ण केला तो नन्तर ड्रग डीलर शी सम्बन्ध ठेवण्यावरून प्रकाशात आला होता.
४ एवढे सारे होउनही सन्सदेवर हल्ला करणारे कोण? याचे उत्तर आपल्याकडे नाहेई. ह्या कटाची महीती असणर्या एकमेव माणसाला मारून टाकण्याचा काही मन्डळीन्चा अग्रह का? की हा सारा बनाव काश्मिर पोलिसानी केला आहे या अफ़ज़लच्या आरोपात तथ्य आहे? परच टीवी वर पाहीले की राहुल महाजन राजकारणात पदर्पण करणार आणी अफ़ज़ल ला फाशी देण्याची मागणी करणार! आनन्द आहे


Kedarjoshi
Saturday, October 21, 2006 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतासारख्या "सुसंस्कृत" देशात फाशी वगैरे शिक्षा असणास काही लोकांचा विरोध आहे. त्यांचा विरोध "अफजलच्या फाशी" ला नसून "फाशी" या शिक्षेलाच आहे >>>>>

काय तरी वाद. अमेरिकेत सुध्दा देहदंड शिक्षा आहेच. ईंजेक्शन टोचुन आजही लोकांना मारले जाते व त्याचे प्रसारण १० मिनीटानंतर होते.
काय हरकत आहे फाशी द्यायला. माणवातवादी म्हणे आणी त्या नावाखाली ज्यांनी अमानविय कृत्ये केली त्यांनाच वाचावायचे. क्या बात है तु मार मै तुझे बचाता हुं.
BTW अनेक बाकी गोष्टींकडे हे लोक का लक्षात घेत नाहीत जसे गरिब लहान मुल वैगरे. त्यात कदाचित प्रसिद्दी नसते म्हणुन का?
पेशवा अगदी बरोबर.

anyway

तमसो मा जोर्तीगमय ह्या दिवाळीला आपल्या भारतात योग्य तो प्रकाश पडो.


Santu
Saturday, October 21, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाई गडबडित दोषी ठरवण्याचे नाटक))))))सुप्रिम कोर्टापेक्षा तुमच्या कडे "आतली" माहिति दिसतेय

Vijaykulkarni
Sunday, October 22, 2006 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तर आयुर्वेदिक औषधान्चे व्यापारी बाबा रामदेव यान्नी सुद्धा अफझल ला फाशी देण्याची मागणी केली आहे. फुकटात प्रसिद्धी मिळविण्याची ही नवी युक्ती राखी सावन्त ला सान्गायला हवी.


Santu
Sunday, October 22, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे या रामदेव बाबा च्या मागे
व्रुंदा करात(तिच ति कपाळावर रुपयाएवढ कुंकु लावणारी) अशाच सवंग प्रसिध्दि साठी लागली होति.पण तीच्या मित्रा नी पण(लालु,मुलायम) यानी पण तिला साथ दिली नाहि.कारण त्याना पण तिची स्वताचीच ++++ करायची सवय आवडली नाही.व बाई तोंड्घशी पडली.


Giriraj
Tuesday, October 24, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सापडला की नाही अजून उतारा?

Sunilt
Tuesday, October 24, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथम रोगाचे निदान तरी होऊ देत नीट. उतार्‍याचे नंतर बघू.

Vijaykulkarni
Tuesday, October 24, 2006 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उतारा सापडला हो!
आत फक्त कोम्बडी सुया, लिम्बू आणी काळी बाहुली हवी आहे


Yogy
Tuesday, October 24, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हा हा

अगदी योग्य उपाय सुचवलात... संपूर्ण स्वदेशी आणि संस्कृतीरक्षक उपाय आहे



Deshi
Tuesday, October 24, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे मला वाटल लालभाई सारखी वाद घालायची धमक तुम्हात असेल ते निदान मुद्दे तरि मांडत होते तुम्ही ...

लगे रहो. कदाचित आता येथे वाद घालन्यासारखे काही उरले नाही वाटत. कारण विरोधक एकतर सर्वपोस्ट ला हास्यास्पद तरी म्हणतात नाही तर वरील काही पोस्टस सारखे. उत्तर देतात.


Zakki
Tuesday, October 24, 2006 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुळकर्णी यांचे अफजलखानबद्दल लिहिलेले मुद्दे विचारात घेण्याजोगे आहेत. ते का विचारात घेतले नाहीत? असे कुणि वकिल का नाहीत की जे या मुद्द्यांवर भांडू इच्छित नाहीत? केवळ फाशी की नाही यापेक्षा तो दोषी की नाही हे आधी निर्निवादपणे ठरायला नको का?

Santu
Wednesday, October 25, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो जक्की
सुप्रिम कोर्टाने ठरवलय की एकदा दोशी
परत खालच्या कोर्टाने पण ठरवलय
मग आणखी किति दळण दळायच या अफ़जल्खाना साठि.


Vijaykulkarni
Wednesday, October 25, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्सदेवरील हल्ला हा भाजप सरकारने तहलका प्रकरणावरून लोकान्चे लक्ष विचलीत करण्यासाठी केलेला बनाव होता.
या कटाचा शेवटचा दुवा अफझल आहे.
आणी म्हणून अफझल ला ठार मारण्यासाठी भाजप परीवारातल्या सर्व सन्घटनानी आन्दोलन सुरु केले आहे.


Mahesh
Wednesday, October 25, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे हा तर भाजप आणी मित्र पक्षांवर सनसनाटी आरोप आहे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators