Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 18, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through October 18, 2006 « Previous Next »

Ganeshbehere
Wednesday, October 18, 2006 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकिय नेते (Congress/BJP) असो वा हिंदू/ मुस्लिम नेते,(मोठ मोठे भाषणं वा लेख लिहुन) त्यांचे काम फ़क्त लोंकाना कामाला लाऊन देणे,आणि दुरुन गंमत बघणे, त्यांच्या अंगाला साधी खरोच सुधा येत नाहि, पंरतू त्यांच्या हट्टासा पायी, निष्पाप लोकांचे बळी जातात..........

लोपाताई, तुमचे मण्हने बरोबर आहे, ते कधि बळाचा वापर करुन तर कधि धर्मा च्या नावा खाली हे सगळे खेळ करत असतात...........

Vijaykulkarni
Wednesday, October 18, 2006 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा :-)
१९८० च्या दशकात ठाकरे आणी शरद पवार एकाच बाटलीतुन बीयर प्यायचे आणी त्यान्चे गावोगावचे समर्थक एक मेकान्ची डोकी फोडायचे



Santu
Wednesday, October 18, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे जसे माओवादी मार्क्सवाद्याना बिहारात
बन्गालात झोड्पुन काढतायत


Santu
Wednesday, October 18, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज निर्माण झालेले प्रश्न अमेरिका व इस्रायल मुळे))))बरे तुम्ही मुसलमान दाढि वाढवता वा चार बायका करता या मागे अमेरिकेचा चा हात आहे असे म्हणाला नाहि.

दहशत्वादाचे मुळ शिक्षण आहे)))) डनिअल पर्ल चि गळा चिरुन हत्या करणारा उमर शेख हा ब्रिटिश economic school चा विद्यार्थी होता. तो आक्रोश करत असताना त्याची मान क्रुर पणे कापलि हि clip तुम्हाला नेटवर पहायला मिळेल.म्हणजे जेवढा सुशीक्षित तेवढा जिहादि घातक.

योगी अहो तुमच्या सारखे समन्जस मुसलमान फ़ार थोडे.


Yogy
Wednesday, October 18, 2006 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे जेवढा सुशीक्षित तेवढा जिहादि घातक >>>

मायबोली वरील काही पोस्ट वाचून दुर्दैवाने हे विधान हिंदुंनाही लागू पडते आहे असे वाटते..

ओसामा ला कोणी पुढे आणले... इस्रायलच्या निर्मितीचा इतिहास बघा...
इराक मध्ये अमेरिकेने काय चालवले आहे? दुसर्‍या देशाचा अध्यक्ष आपल्या इच्छेप्रमाणे वागत नाही म्हणून किती तडफड?

आता उ. कोरिया वर पण हल्ला करणार काय? अमेरिकेने बनवलेली अण्वस्त्रे स्व-संरक्षणासाठी मात्र इतरांनी बनवली तर ती आक्रमणासाठी हे ठरवण्याचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला?

मुसलमान वापरत असलेले मार्ग चुकीचेच आहेत आणि मी कोठेही त्याचे समर्थन केले नाही. पण रोगापेक्षा उपाय भयंकर स्वरुपाची चर्चा वाचून थोडेसे लिहावे वाटले इतकेच.

आज अमेरिकेत जगातील किती टक्के लोकसंख्या राहते? हे लोक जगातील किती टक्के साधनसंपत्तीचा वापर करतात?

मुक्त वगैरे अर्थव्यवस्थेमध्ये हे होणारच हे देखील मान्य आहे... पण अमेरिकेची एक जागतिक हवालदार असल्याप्रमाणे चाललेली वागणूक सर्वत्र अशांततेस कारणीभूत होत आहे...




Yogy
Wednesday, October 18, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी अहो तुमच्या सारखे समन्जस मुसलमान फ़ार थोडे. >>>

मी मुसलमान नाही. मात्र तुम्ही काही मुसलमानांना तरी समंजस मानता हे वाचून आनंद झाला.



Dinesh77
Wednesday, October 18, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी,
पुन्हा तुम्ही चुकीचा इतिहास सांगत आहात की जो काॅंग्रेसच्या राज्यात लिहिला गेला.
नथूराम गोडसेंनी गांधीचा खून केला नाही, "वध" केला.
खून हे पाप असते पण "वध" हे कर्तव्य.
आणि नथूराम गोडसे पळून नाही गेले, स्वताहून पोलिसांच्या स्वाधीन झाले.


Yogy
Wednesday, October 18, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh77
Wednesday, October 18, 2006 - 9:37 am:

हे पोस्ट BB च्या विषयाशी सुसंगत नाही मात्र आपण विषय उपस्थितच केला आहे म्हणून...
भारत सरकारने ठरवून दिलेले "वंदे मातरम" हे राष्ट्रीय गीत गाण्यास नकार देणे हा जर राष्ट्रद्रोह असेल (आपण ज्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मते तो राष्ट्रद्रोहच आहे...)
तर त्याच सरकारने "राष्ट्रपिता" म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तिचा वारंवार अपमान करणे आणि त्यांच्या खुनाचे- हत्येचे-"वधाचे" समर्थन करणे हा देखील राष्ट्रद्रोहच नाही का?




Kedarjoshi
Wednesday, October 18, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी तुमची वरील ८.३० ची पोस्ट.

तुम्ही मुसलमानांचा वागन्याला अमेरिकेला जबाबदार धरता आहात काही अंशी हे बरोबर आहे पण भारतात कथा वेगळी आहे असे नाही का वाटत तुम्हाला.
भारता समोरिल प्रश्न फार वेगळे आहेत असे मला तरी वाटते. काश्मीर मधील दहशतवाद वेगळा व मालेगाव, भिवंडीतिल दंगली वेगळ्या नी ९११ वेगळे आहे.


Dinesh77
Wednesday, October 18, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात माझा "राष्ट्रपिता" या शब्दालाच विरोध आहे.
जर आपण या "भूमिला" माता मानतो तर एखादी व्यक्ती "पिता" कशी काय होउ शकते?
हे ही काॅंग्रेसचेच राजकारण.


Dinesh77
Wednesday, October 18, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी,
तुम्ही म्हणता ती दोन्ही सरकारे वेगळी आहेत.


Yogy
Wednesday, October 18, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


केदार
मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की भारतातील मुसलमानांची आर्थिक आणि शैक्षणिक अवस्थाच भारतातील प्रश्नाला कारणीभूत आहे. empty mind is devil's workshop वगैरे काही तरी म्हणतात त्याप्रमाणे जर मुसलमानांना शैक्षणिक व नोकरी-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर असे प्रश्न चिघळण्यास वेळ मिळणार नाही.

dinesh77
मुळात माझा "राष्ट्रपिता" या शब्दालाच विरोध आहे.
जर आपण या "भूमिला" माता मानतो तर एखादी व्यक्ती "पिता" कशी काय होउ शकते?
हे ही काॅंग्रेसचेच राजकारण.


दुर्दैवाने किंवा सुदैवाने प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येकाची जीवनपद्धती, संस्कार वेगळे असतात. तुमची विचारसरणी-संस्कृती जर भूमीला माता मानण्याची शिकवण देत असेल तर तुम्ही तिचे पालन करण्यास स्वतंत्र आहात... पण जर "मूर्तीवाद" न मानणार्‍या मुसलमानांनी "मुर्तिरुप" भूमीला "वंदन" करण्यास नकार दिला तर इतका गहजब कशाला?

एकाच विचारसरणीच्या साच्यातील माणसे घडवणे भारताच्या परिस्थितीत फार अवघड आहे.

असो, हे देखील पहा.

http://www.esakal.com/esakal/10182006/83E73329AB.htm

Sunilt
Wednesday, October 18, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yogy यांचाशी सहमत. अमेरिकेने आपली दादागिरी जर थांबवली तर हा तथाकथित "इस्लामी" दहशतवाद बर्‍यापैकी संपुष्टात येईल.



Lopamudraa
Wednesday, October 18, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी तुम्ही चांगले स्पष्टीकरण देत आहात.ऽजुन खोलात सांगा
आता चांगली चर्चा सुरु झाली आहे..!!!, good. ..


Chyayla
Wednesday, October 18, 2006 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण म्हणतय मुसल्मान शिक्षणात मागे आहेत, ह्या बघा त्यान्च्या अभ्यासक्रम फ़ार... पुढे आहेत ते जगापेक्षा...

उगीच चहाटळपणा...


JEE - Jehadic Entrance Examination
IIT - Islamic Institute of Terrorism
IIM - Institute of Infiltration Management
CAT - Career in Alqaida & Taliban
IAS - Iraq after Saddam
M Tech - Masters in Terror Technology
GATE - General Aptitude in Terror and Extremism
TOEFL - Test of Extremist Foreign Languages
GRE - Graduate in Relocation Extremism
MBBS - Master of Bomb Blasting Strategies
MBA - Master of Bombing Administration

BTW माफ़ करा पण योगी तुमचा मुद्दा काही पटण्यासारखा नाही बुवा " आम्ही गवत खाउ पण जिहाद जरुर करु ", कुटुम्ब नियोजनाला विरोध, मदरसा मधेच शिक्षणाचा आग्रह, मुस्लिम विवाह कायदा वेगळा एकप्रकारे समान नागरी कायद्याला विरोध. ह्या सगळ्या मधे सामान्य मुसल्मान अडकला आहे शिवाय मतासाठी त्यान्ना भुल देणारी सेक्युलर पिल्लावळ ते पण तुमच्या सारखे हिन्दुच, ज्यान्नी त्यान्चा प्रगती करण्याचा, राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याचा मार्ग रोखुन धरला आहे खरे जबाबदार तुम्ही आहात.

शिक्षणाला विरोध नाही पण त्यामुळे ते जिहादी व्रुत्ती सोडतात, असे कधी घडले नाही, उलट त्याचा वापर परत अधीक जिहाद साठीच होत आहे, त्यासाठी तुम्हाला सर्वत्र पुरावे उपलब्ध आहेत.

तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर अजुनही दिले नाही, काश्मिरात त्यान्ना अडवणारे हिन्दु नाहीत मग तिकडे सुद्धा हे सगळ का व्हावे?



Sunilt
Wednesday, October 18, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या चर्चेकडे अंमळ उशीरानेच लक्ष गेले.

सामुवाइ यांनी ही चर्चा सुरू करताना root cause analysis करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु अगदी त्यांच्यासकट फ़ारसे कोणी हे केल्याचे दिसले नाही (मी अगदी सगळ्या नसल्या तरी बर्‍याच पोस्ट वाचल्या).

कोणीही दहशतवादावर का उतरतो ?

तर आपल्यावर (किंवा आपल्या समाजावर) झालेल्या अन्यायाची चीड आणि तो अन्याय ज्यांनी केला त्यांचा बदला घेण्याची प्रबळ उर्मी यामुळेच ती व्यक्ती दहशातवाद करू धजते.

आता हा तथाकथित अन्याय खरा किंवा खोटा असू शकतो. परंतु बरेचदा तो खर्‍या-खोट्याचे मिश्रण असते.

मध्यपुर्वेतील दहशतवाद हा पॅलेस्टीनींवर झालेल्या अन्यायाचा परिणाम आहे.

काश्मिरमधिल दहशतवाददेखिल, काश्मिर हा मुस्लिमबहुल प्रांत भारताने आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे झालेला आहे.

तेव्हा जोवर ह्या अन्यायाचे परिमार्जन होत नाही तोवर ह्या दहशतवादाला "ऊतारा" नाही !!




Kedarjoshi
Wednesday, October 18, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काश्मिरमधिल दहशतवाददेखिल, काश्मिर हा मुस्लिमबहुल प्रांत भारताने आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे झालेला आहे>>>>>>>>

ओह. तो लगेच देउन टाकायला पाहीजे नाही का?
अरेरे आधी नाही सांगायचे ईदींरा गांधीना त्या उगीच पंजाब मधे लक्ष्कर घेऊन गेल्या नी प्राण गमावुन बसल्या. लगेच पंजाब पण दिला असता त्यांनी बेगळा काढुन.

बर झाल तुम्ही सांगीतले ते आता उल्फा ला पण वेगळा आसाम मिळेल. झालच तर नागांना पण वेगळा प्रदेश.

मग भारत काहो म्हणुन घ्यायचे. नाहीतरी आधी वेग्ळा पाकीस्थान मागीतलाच होता तो दिलाच की.

काश्मीर प्रश्न न समजुन घेता त्यावर हा उतारा का? मग लगेच वेगळा बिहार व उत्तर प्रदेश ची पण तयारी होईल.( मुस्लीम जास्त आहेत)

सुनील तुम्हाला असे म्हनायचे आहे का बाकीच्या धर्मानी मुस्लीम घर्मावर अत्याचार केला ज्यामुळे सर्वत्र दहशत्वाद आहे. तुमच्या पोस्ट मधुन तर तेच सुचीत होते.
तुम्ही भारताने तो प्रांत देऊन टाकायला पाहीजे असे लिहिले म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाची जाण आहे असे समजायला हरकत नाही. बाय द वे. काश्मीर मध्ये केव्हा पासुन दंगली व्ह्यायला सुरु झाली व त्यात वाढ कधी झाली हे आपल्याला माहीत असेल अशी मी आशा करतो. निट लक्ष देऊन तो कालावधी पण तपासुन बघा मग लक्षात येईल की तो का आहे व कुनाचा हात आहे.
काही गोष्टी निटच तपासाव्या लागतात नाहीतर वैचारिक दिशाभुल होन्याची शक्यता असते.



Peshawa
Wednesday, October 18, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की भारतातील मुसलमानांची आर्थिक आणि शैक्षणिक अवस्थाच भारतातील प्रश्नाला कारणीभूत आहे....

हे विधान दिशाभुल करणारे आहे.
१. शैक्षणिक बाब्तीत सगळा भारतिय समाज साधारण सारख्याच पातळीवर असताना देखील हिंदु-मुस्लिम, पर्सि-मुस्लिम दंगली होत होत्या (मुम्बै मधे २०व्या शतकाच्य सुरवातिच्या कळात मुहम्मद प्रेशिताचे (BPUH) चित्र काढल्यावरून दंगल झाली होती*. आजच्या गुजरआतच्या इतकीच तिही दंगल भयाण होती). RSS, हिंदु महसभा ह्यांच्या उदयाला १९२०-५० च्या आस्पास झालेल्या दंगली मोठ्या प्रमाणावर जबाब्दार आहेत.
(मी केदारच्या मताशी सहम्त आहे दंगली, काश्मिर, दहशत्वाद ह्यांचे आयाम वेग्वेगळे आहेत)

२. वैचारिक आडमुठेपण शिक्शणाने जाते हे मान्य करणे अवगढ आहे. ईस्लामिक दहशतवादी, माओवादी, अनार्किस्ट, हिंदु मुलतत्ववादी, V&C करणारे माय्बोलिकर सुशिक्शित आहेत. अमेरिकेत क्रुष्ण वर्णियांवर अन्याय झाले तेंवा केवळ अशिक्शीत मागास लोक जबाब्दार नव्हते! तसेच भारतातिल दलितांसंदर्भात म्हणता येइल. धर्माला अफ़ु मानणारी कमुनिस्टांची सरकारे बघा.. (डावे आणि कमुनिस्ट हे वेग्वेगळे आहेत गल्लय नको)

३. आर्थिक संपन्न असेलाला समाज दहशत्वादी नसतो असे म्हणायचे असल्यास तुम्ही दिलेले ईस्राईलचे उदाहरण घ्या! अमेरिकेचे उदाहरण घ्या. तुमच्या आर्थिक संपन्न असलेला समाज दहशत्वादी नसतो हा मुद्दा एखाद्या लाल्भाइला सांगुन बघा, नर्मदा आंदोलन वाल्याना सांगुन बघा :-)

*:I hade the internet page with me some years back that had this piece of information. now I am unable to locate it so please cross check it before considering it remotely factual- thanks




Yogy
Wednesday, October 18, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


१. शैक्षणिक बाब्तीत सगळा भारतिय समाज साधारण सारख्याच पातळीवर असताना देखील हिंदु-मुस्लिम, पर्सि-मुस्लिम दंगली होत होत्या (मुम्बै मधे २०व्या शतकाच्य सुरवातिच्या कळात मुहम्मद प्रेशिताचे (BPUH) चित्र काढल्यावरून दंगल झाली होती*. आजच्या गुजरआतच्या इतकीच तिही दंगल भयाण होती). RSS, हिंदु महसभा ह्यांच्या उदयाला १९२०-५० च्या आस्पास झालेल्या दंगली मोठ्या प्रमाणावर जबाब्दार आहेत.
(मी केदारच्या मताशी सहम्त आहे दंगली, काश्मिर, दहशत्वाद ह्यांचे आयाम वेग्वेगळे आहेत)

शैक्षणिक बाबतीत भारतीय समाज एकाच पातळीवर होता हे मला मान्य नाही... आपण दिलेल्या कालावधीमध्ये हिंदू धर्मात आगरकर, राजा राममोहन रॉय वगैरे समाज सुधारक होउन गेले. हिंदू धर्म सुधारणेसाठि सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. मुसलमानांना सर सय्यद अहमद खान (अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक) वगळता सामाजिक्-शैक्षणिक क्षेत्रात नेत्रुत्व करू शकेल असा नेता मिळाला नाही.

दंगली आणि काश्मीर यांचे आयाम अर्थातच वेगवेगळे आहेत. बहुतेक दंगली या स्थानिक प्रश्नांवरून (उद. जमिनीचा वाद वगैरे) होतात... पुढे त्याला धार्मिक रंग देण्यात येतो.


२. वैचारिक आडमुठेपण शिक्शणाने जाते हे मान्य करणे अवगढ आहे. ईस्लामिक दहशतवादी, माओवादी, अनार्किस्ट, हिंदु मुलतत्ववादी, V&C करणारे माय्बोलिकर सुशिक्शित आहेत. अमेरिकेत क्रुष्ण वर्णियांवर अन्याय झाले तेंवा केवळ अशिक्शीत मागास लोक जबाब्दार नव्हते! तसेच भारतातिल दलितांसंदर्भात म्हणता येइल. धर्माला अफ़ु मानणारी कमुनिस्टांची सरकारे बघा.. (डावे आणि कमुनिस्ट हे वेग्वेगळे आहेत गल्लय नको)


वैचारीक आडमुठेपण शिक्षणाने जात नसले तरी मनाची कवाडे उघडण्यास ते उपयोगी असते. हिंदू समाजात शिक्षणाच्या झालेल्या प्रसारामुळेच मुलतत्त्ववाद्यांना तेवढे स्थान राहिलेले नाही.
पुन्हा येथे आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण देतो हे महत्त्वाचे आहे. जर कृष्णवर्णीय हे गुलाम आहेत अशीच शिकवण शाळेत तिली तर पुढचे वागणे त्याला अनुसरूनच असणार आहे.



३. आर्थिक संपन्न असेलाला समाज दहशत्वादी नसतो असे म्हणायचे असल्यास तुम्ही दिलेले ईस्राईलचे उदाहरण घ्या! अमेरिकेचे उदाहरण घ्या. तुमच्या आर्थिक संपन्न असलेला समाज दहशत्वादी नसतो हा मुद्दा एखाद्या लाल्भाइला सांगुन बघा, नर्मदा आंदोलन वाल्याना सांगुन बघा :-)

इस्रायल आणि अमेरिकेचा मुद्दा अगदी मान्य आहे.


Zakki
Wednesday, October 18, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कळत नाही, अमेरिकेच्या नि इस्राइलच्या धोरणाचा भारताशी काय संबंध? भारत नि इस्राईल किंवा भारत नि अमेरिका यांच्यामधील संबंधांपेक्षा भारत नि इराण, व २००३ पूर्वीपर्यंत भारत नि इराक यांचे संबन्ध जास्त दृढ होते अशी माझी समजूत आहे. (राजकीय पातळीवर, अधिकृतरीत्या)

आता सुद्धा वेनिझुएला, जे अमेरिकाविरोधी राष्ट्र आहे त्याचे नि भारताचे संबंध चांगले असल्याने बुश यांनी नुकतीच श्री. मनमोहन सिंग यांना विनंति केली आहे की (खरे तर दडपण आणले आहे) यूनो मधे चा(शा)वेझ च्या बाजूने मत देऊ नका.

मला वाटते अमेरिकेचा सांस्कृतिक(?) प्रभाव सर्व जगावरच पडत आहे. कुणि अजून धोतर नेसत नाहीत, किंवा साड्या नेसत नाहीत जगात, पण पॅंट नि टी शर्ट सगळेच घालतात! अमेरिकन मायकेल जॅक्सन [शी:!] नि इतर गायक (?) यांचे पंखे जगभर आहेत. लताचे पंखे भारतीय सोडले तर हाताच्या (फारतर पायाच्या सुद्धा) बोटावर मोजण्याइतकेच. तर त्यासाठी भारतात का अतिरेकीपणा करायचा?

माझ्या मते डॉक्टरी शिकणार्‍यांना जसे प्रथम मेल्या मुडद्याचे विच्छेदन करायला सांगतात, नि ते जमले की मग जिवंत माणसाचे हाल करू देतात, तसे आधी भारतात अतिरेकीपणा करून दाखवा (भारतीय काय, मेल्या मुडद्यासारखे, पकडला गेलात तरी तुम्हाला शिक्षा होणार नाही), मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट करायला पाश्चिमात्य देशात जा. असा तो अभ्यासक्रम आहे.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators