Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 11, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through September 11, 2006 « Previous Next »

Moodi
Friday, September 08, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाबांनो तुमची गांधीबद्दल वैयक्तीक मते काहीही असतील पण ती इथे अशी या तर्‍हेने व्यक्त करु नका प्लीज. नाहीतर मायबोलीच्या संस्थापकांवरच आरोप केला जाईल की गांधीहत्येचे समर्थन केले जातेय. सरकारी कामे नका रे मागे लावु यांच्या. जरा विचार करा.

तुम्हाला वाटेल काय मागे लागलीय सारखी, मत पण व्यक्त करु देत नाही. पण हे इंटरनेट आहे, आपले घर नाही.


Shyamli
Friday, September 08, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर मूडी.....

सांभाळुन लिहा जरा


Robeenhood
Friday, September 08, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साम्भाळून लिहायचे म्हणजे काय करायचे? त्यानी त्यांचे मन मारून लिहायचे का? त्यांच्या मनात काय आहे ते येऊ देत बाहेर... त्यांचे जसे programming झाले आहे तसे ते लिहिताहेत.. त्यांचा तरी काय इलाज. गोळ्या घालून विचार सम्पवण्याच्या संस्कृतीनुसारच ते प्रतिनिधित्व करताहेत. गोळीने कधीच विचार मेलेला नाही. लिहा बाबानो लिहा तुम्हाला हवे ते........

Chyayla
Friday, September 08, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो मन्डळी चाललात कुठे १९४७ कधिच गेले, जे झाले ते झाले आता त्याला वारन्वार उगाळुन काय होणार, हे असे झाले असते तर तसे झाले असते तर...वैगेरे वैगेरे... झक्किजी आणी मन्डळी सोडा आता ते नाहीतर आतापण तसेच होइल आणी पुढे असेच म्हणायची पाळी येइल भुतकाळापासुन बोध घ्या आणी उतारा काय यावर आपले मत मान्डा. गान्धीजीन्च्या बाबतित असे म्हणता येइल जेवढा मोठा नेता तेवढी मोठी चुक, काही कारण असो पण तेन्व्हा जनसमर्थन त्यान्च्याच बाजुने होते. गान्धीजी मुस्लिम अनुनयाच्या मागे धावले आणी ना हिन्दुन्चे रहिले ना मुसल्मानान्चे.

या आता २००६ सालामधे या आणी बोला, मुळ विषयावर. (चु. भु. दे. घे.)


Shyamli
Friday, September 08, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या आता २००६ सालामधे या आणी बोला, मुळ विषयावर>>>

अगदि बरोबर.. .. .. ..

Samuvai
Friday, September 08, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

robeenhood ,
अगदी योग्य बोललात.
santu, dinesh77 ,
मुस्लिम अनुनयाचा विचार गोळीने मेला नाही मरणार नाही. त्यासाठी योग्य काय हे समाजाला सांगावे लागेल. उदा. टिळकांनी ताबूतापुढे नाचणे बंद करा अस नाही सांगितल सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. आज लोक त्याच्यापुढे हिडिस गाणी लावून नाचतात. हे आधी बंद करुन उत्सव, सण, देवळे ही सज्जनशक्तीची उपासना केंद्रे झाली पाहिजेत. जेणेकरुन त्याचा धाक समाजकंटकांना वाटेल.


Dinesh77
Friday, September 08, 2006 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांचे जसे programming झाले आहे तसे ते लिहिताहेत????????????
Objection your honor
जर आमचे तसे programming झाले असते तर आम्हीही आत्तापर्यंत इस्लामी दहशतवाद्यासारखेच वागलो असतो. इथे पोस्ट टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा दुसरे काहितरी केले असते.
मलाही मान्य आहे की गोळीने विचार संपवता येत नाहीत, पण कधी कधी जशास तसे ही वागावे लागते. माझे कधीच असे म्हणणे नाही की हिंदु सोडुन कुठलाही धर्म नसावा. पण तो टिकवण्यासाठी जे जरुरी आहे ते करावे (कधी कधी गोळी घालणे सुद्धा)


Zakki
Friday, September 08, 2006 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, (दोन्ही अर्थांनी), अहो मी प्रथम सध्या काय करायचे तेच लिहीले होते! त्याचे काय? का तुम्ही आपले, मुद्द्याचे सोडून केवळ कुठला तरी moot मुद्दा घेऊन उगाच लोकांना नावे ठेवत बसणार?

दिनेश ७ यांना पाठिंबा. कारण आपल्या धर्मात असे कुठेहि म्हंटले नाही की कायम अहिंसा करा! ते आपले गांधीजींनी लावलेला अर्थ. उलट धर्म जर संकटात येतो असे वाटले तर बेधडक महायुद्ध करायला प्रत्यक्ष भगवंतानेच उपदेश केला आहे, तेंव्हा हो ज्जाय, भारतात एक महायुद्ध!!! वाटल्यास शंततामय मार्गाने करा, म्हणजे लो. टिळक यांनी जसा केला तसा. हिंदूंना एकत्र आणा.

पण हा मुख्य मुद्दा मान्य करून बाकीचा फापटपसारा विसरून जायला पाहिजे ना! नाहीतर आहेतच लोक पुन: 'अहो झक्की, हे असले काय लिहीले, तुम्ही सोनियाभक्त आहात', एव्हढेच लिहिणार!


Chyayla
Friday, September 08, 2006 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक स्तुत्य उपक्रम जो विहिप राबवते "घर वापसी" ,ज्याना बळजबरीने किन्वा लालुच, भोळेपणा यान्चा फ़ायदा घेउन धर्मान्तरित केले आहे, त्याना स्वधर्मात आणणे. निदान पुढे हा घटक दहशतवादी बनण्यापासुन वाचवण्यासाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रातच कित्येक जमाती अश्या आहेत त्यान्ची नावे मुस्लिम पण चाली रिती, सण सगळे हिन्दुन्चे त्याचे कधी आणी कसे धर्मान्तरण झाले आश्चर्यच वाटत. पण पुढे कट्टर्वाद्यान्च्या तावडीत सापडुन समाजासाठी आणी देशासाठी डोकेदुखी व्हायला वेळ लागणार नाही.

यासाठी पण समाज जाग्रुत होउन त्याना आपलेसे मानण्यास तयार असावे म्हणजे सुरुवात आपल्या घरातुनच, समुवै नी सुचवलेल्या उपायान्मधे हा पण एक भाग असावा असे मला वाटते हे काही सरकार करु शकणार नाही त्यामुळे समाजालाच जाती भेद व इतर समाज तोडणारे तत्व विसरुन एक सामाजिक बान्धिलकी म्हणुन पुढे यावे लागेल.


Santu
Saturday, September 09, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामुवाई
मुस्लिम अनुनय गोळी ने मरणार नाहि.-----अस कस म्हणता येइल
हिटलर ला शस्त्रानेच नमवला नाहि का?
शिवाजिने मुस्लिम आक्रमण तलवारिनेच परतवले ना?
अहिंसक चरख्याने या दोघांचे मत परिवर्तन झाले नसते.
उलट त्यानेच(औरंगजेबाने)च गांधिची सुन्ता केली असती


Chyayla
Saturday, September 09, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु सही रे बावा, आपल समर्थन आहे तुला, सगळे जग युद्धानेच व्यापले आहे, शस्त्र असेल तरच अस्तित्व आहे. आपल्या सगळ्या देवी देवता नुसता आशिर्वादासाठीच हात उचलत नाही तर इतर सगळ्या हातान्मधे शस्त्रच धारण केले आहेत आणी कायम दानवान्चे निर्दालन करण्यास सिद्ध असतात.

इतिहासापासुन एका गोष्टीचा नीट अभ्यास करुन बघा जेन्व्हा जेन्व्हा क्षात्र तेज आणी ब्रह्म तेज एकत्र आलेत या भुमीवरुन आपण परकिय आक्रमण परतवुन लावले आहेत. आणी आदर्श राज्य साम्राज्य निर्माण केलेत राजा श्रीरामचन्द्र व महान रूशी मुनी, भगवान श्रीक्रुष्ण व अर्जुन, सम्राट मौर्य व चाणक्य, शिवाजी व सन्त रामदास ईत्यादी ही ठळक उदाहरणे आहेत.

या वरुन एकच म्हणायचे आहे शस्त्रान्सोबत एक सदसदविवेकबुद्धी जाग्रुत ठेवणारी सात्विक शक्ती पण आवश्यक आहे. नाहीतर दहशतवाद्यान्मधे आणी आपल्यात काही फ़रक राहणार नाही.


Santu
Saturday, September 09, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली
२००६ मधे या------ २००६ काय आणी १००६ काय फ़रक आहे
तो फ़क्त शस्त्राचा.बाकी प्रव्रुत्तित काय फ़रक नाही.
त्यावेळी तलवारी होत्या आता bomb आहेत.दह्शतवादि तेव्हा हि होते व आत्ता हि आहेत.
४७ला हि चुक सुधरायचि चांगली सन्धी आली होति पण म्हातारबुवांनी घोळ केला----आणी आपण होवुन ही पिडा अंगावर घेतली


Zakki
Saturday, September 09, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु, अहो, च्यायला यांनी काय लिहिले आहे ते बघा नि १९४७ चा उल्लेख पुन: करू नका! त्यांना त्रास होतो! मग ते तुम्हाला सोनियाभक्त म्हणतील! अर्थात मला काही फरक पडत नाही, कारण मी सोनिया हे इथेच जास्त ऐकले, नि बर्‍याच लोकांच्या मते सोनियाभक्त असणे चांगले नाही असे वाटते!

अहो मन्डळी चाललात कुठे १९४७ कधिच गेले, जे झाले ते झाले आता त्याला वारन्वार उगाळुन काय होणार, हे असे झाले असते तर तसे झाले असते तर...वैगेरे वैगेरे... झक्किजी आणी मन्डळी सोडा आता ते नाहीतर आतापण तसेच होइल आणी पुढे असेच म्हणायची पाळी येइल भुतकाळापासुन बोध घ्या आणी उतारा काय यावर आपले मत मान्डा.


आता 'हे' हि त्यांचेच लिहीलेले आहे, पण ते चालते! फक्त लोकांनी लिहायचे नाही असे इथे आहे!
इतिहासापासुन एका गोष्टीचा नीट अभ्यास करुन बघा जेन्व्हा जेन्व्हा क्षात्र तेज आणी ब्रह्म तेज एकत्र आलेत या भुमीवरुन आपण परकिय आक्रमण परतवुन लावले आहेत. आणी आदर्श राज्य साम्राज्य निर्माण केलेत राजा श्रीरामचन्द्र व महान रूशी मुनी, भगवान श्रीक्रुष्ण व अर्जुन, सम्राट मौर्य व चाणक्य, शिवाजी व सन्त रामदास ईत्यादी ही ठळक उदाहरणे आहेत.

हटकेश्वर, हटकेश्वर!


Chyayla
Saturday, September 09, 2006 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा... झक्किजी तुम्ही पुन्हा चुकलात, माझे सन्दर्भ आजच्याच परिस्थितीला धरुन आहेत सन्तुजीनी शस्त्राचा मुद्दा काढला दहशत्वादावर उपाय म्हणुन मी त्यात इतिहासाचे दाखले दिलेत फ़क्त. मी असे कुठेच म्हटले नाही की शिवाजिन्नी तेन्व्हाच मुसल्मानाना सम्पवुन टाकायला पाहीजे वैगेरे... उदा. आधीच हाकलायचे होते त्यांना १९४७ मधे, तेंव्हा शेपूट घातली. सेक्युलर राष्ट्र म्हणे ....
भुतकाळापासुन बोध घ्या आणी उतारा काय यावर आपले मत मान्डा...माझ्या मुद्यामधली ही ओळ तुम्ही सोयीस्कर विसरलात

मी तुम्हाला सोनियाभक्त वैगेरे काही म्हटले नाही हो, कुणी तरी दुसर्याने म्हटले असेल, पण मला वाटत ते तुम्हि मनाला फ़ार लावुन घेतले दिसतय. माझा काय सम्बन्ध त्या सोनियाशी.

त्याच काय आहे कि सन्दर्भात थोडासा फ़रक असतो, ती एक पुसटशी रेखा असते पण त्यामुळे फ़रक मात्र मोठा पडतो, तेव्हढ समजल न कि असला गैरसमज होत नाही बघा.



Moodi
Sunday, September 10, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकच आणि अखेरचा जालीम,झणझणीत, जळजळीत, प्रखर उपाय तो म्हणजे पाकिस्तानची सगळ्या बाजूने कोंडी. सर्व जगाने बहीष्कार घालायला पाहीजे त्यांच्यावर. नाहीतरी दाऊदपासुन लादेनपर्यंत सर्वांचे आश्रयस्थान तेच आहे ना? मग तोडा त्याला जगापासुन.

Shravan
Sunday, September 10, 2006 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहशतवादाच्या उतार्‍याबाबत चर्चा चालू आहे आणि ज्या माणसाने आयुष्यभर अहिंसेचे व्रत संभाळले त्याच्याबद्दल लिहिले गेलेले वाचून जरा वाईट वाटले.

इस्लामी दहशतवाद हा केवळ भारताला भेडसवणारा प्रश्न नाहि तर त्याचा फटका अमेरिका, ब्रिटन, रशिया, इस्त्राइल व आणी इतर ठिकाणी ही बसत आहे. त्यामुळे भारतातील मुसलमान १९४७ ला हुसकावून देउन हा प्रश्न सुटला असता असे कसे म्हणता येइल? अल कायदाच्या अजेंड्यावर कश्मिर प्रश्न २००० सालापसुन आहे हे आता इतक्यात त्यांनी दाखविलेल्या टेप वरून लक्षात येते. म्हणजे भारतातील मुसलमान जरी हुसकावून काढले गेले असते तरी त्यांनी हा प्रश्न घेऊन भारतात कारवाया केल्याच असत्या हे निश्चित. त्यामुले भारतातील सध्याच्या दहशतवादी कारवायांबद्दल गांधींना दोषी ठरवने चूकीचे आहे.

गांधीच्या 'त्या' निर्णयाचे मी समर्थन करणार नाही. वर कुणीतरी म्हटल्याप्रमने नेता जेवढा मोठा तेवढी त्याची छोटी चुकही मोठी ठरते. राष्ट्रहितासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतात. त्यावेळी गांधींचा तो निर्णय जरी मानवतावादी द्रुष्टीकोन वगैरे किंवा त्यांच्या प्रव्रुत्तीला अनुसरून होता तरीही तो राष्ट्र हिताचा नव्हता असे वाटते.
एक गोष्ट मात्र मान्य करायला हवी.. गांधींमुळे तळागाळातील माणूस स्वातंत्रलढ्यात ओढला गेला. त्याअगोदर सामान्य ग्रामीण माणुस या चळवळीपसून खुप दुर होता. स्वातंत्र मिळण्यासाठी एकट्या गांधीची चळवळ कारणीभुत नक्कीच नाही, बर्याचश्या घटकांमुळे ते मिळाले आहे. मात्र स्वातंत्र्याचा खरा अर्थ जनसामन्या माणसापर्यंत पोहचला तो गांधींमुळे. त्यामुळे असे वाटते की खरेच गांधी जर वर काहींनी म्हटल्याप्रमाणे अफ्रिकेत मारले गेले असते तर भारतातील स्वतंत्र्याचा अर्थ सामान्या लोकांपर्यंत कसा व कोणत्या पद्धतीने पोहचला असता?..
(उद्या ११ सप्टेंबर अमेरिकेतील टॉवर्स दुर्घटनेला ५ वर्ष होत आहेत. त्यानिमित्ताने तेथील त्या जागेलगत गांधी हा चित्रपट दाखविला जाणार आहे).
असो, विषयांतर होत आहे थोडेसे पण अगदीच न रहावले तेव्हा लिहीले. (वरील सर्वांच्या मताचा आदर ठेवून).

मुसलमानांविरुध शस्त्राने युद्ध ही कल्पना अजिबाताही practical नाही. कुणाकुणाला मारणार? कुठे कुठे लढनार? कश्मीर मधील मुस्लीमांची बाजू घेणारे अल कायदासारख्या सांघटना व इतर इस्लामी राष्ट्रे शांत बसतील असे वातते काय? त्यापेक्षा zakki म्हणतात त्याप्रमाणे हिंदूंना एकत्र आनने ही शक्य कोटीतील आणी प्रभावी गोष्ट वाटते म्हणजे मुस्ल्मिमांचे अनावश्यक लाड करनार्‍या पक्षांना परभूत करणे वगैरे शक्य होइल.


Chyayla
Monday, September 11, 2006 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही गोष्टी आवश्यक आहे, हिन्दुन्चे सन्गठन (या मधे राष्ट्रप्रेमि मुस्लिम व ख़्रिश्चन सुद्धा आले) कारण हिन्दु या व्याख़्येमधे त्यान्चा पण समावेश होतो. हे झाले भारता पुरता, आणी दुसरीकडे जागतिक स्तरावर दह्शत्वाद विरोधात युद्धाला सक्रिय समर्थन, तुम्ही समजता त्याप्रमाणे सर्सकट हिन्सा करणे अभिप्रेत नाहीच. पण अतिरेक्याना सहानुभुती दाखवता कामा नये, पोटा सारखे कडक कायदे करुन त्यान्ना अटकाव करणे या बद्दल तर तुम्हाला आक्शेप नसावा तेन्व्हा या ठिकानी शस्त्रान्ची पण आवश्यकता आहे असे नाही का वाटत?

गान्धीबद्दल तुमच्या विचाराना आपले पण अनुमोदन. गान्धीनी जे केले तेन्व्हा त्याना मुसल्मानान्च्या जिहादी व्रुत्तिचा अन्दाज नव्हता आला एक भाबडी आशा होती, आणी जेन्व्हा आला तो पर्यन्त वेळ निघुन गेली होती. म्हणुन म्हणतो जे झाले ते झाले ते आता आपल्या हातात नाही, पण आजची तथाकथीत सेक्युलर पिल्लावळ तर सगळ समजुनही खुले आम पणे लान्गुल चालन करत आहे, त्याना आवरणे आवश्यक आहे.


Samuvai
Monday, September 11, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु,
मी हिंदूंकडुन होत असलेला मुस्लिम अनुनय गोळीने मरणार नाही अस विधान केलेले आहे. मुस्लिम दहशदवाद गोळीने मरणार नाही असे नव्हे.

त्याच कारण इतकच की गांधींना गोळी मारुन काय झाल? आपली "सहिष्णु" लोकं कळवळली. गोळीमागे गोळी मारणार्याचाही एक विचार होता, त्यालाही गांधींनी केलेल्या तळागाळातील लोकांमधल्या जागृतीविषयी आदर होता, तो गांधी ह्या व्यक्तिच्या नाही तर अनुनयाच्या आत्मघातकी विचारच्या विरुद्ध होता, हे कधी समजावून घेतले गेलेच नाही. "अनुनय" वाले विरोधकांविरुद्ध गांधींना कधीही न पटणारे सगळे मार्ग वापरुन राक्षसी बहुमताने सत्तेवर आले. त्यांनी दुसरी बाजू समाजापुढे कधी येवूच दिली नाही. आणि त्याचा परिपाक म्हणून आजची स्थिती ...

मी असा विचार मांडला होता की मुस्लिम अनुनयाचा विचार जर पराभूत करायचा असेल तर हिंदु जागृती हा एकच पर्याय आहे. कारण अनुनय करणारे आपलेच बांधव आहेत. त्यातील ९९% नोकरी मिळाली म्हणून, आदल्या दिवशी पैसे दिले म्हणून, वस्तुस्थितीच आकलन नाही म्हणून "अनुनय" वाल्यांना मते देतात, त्यांचे "हात" बळकट करतात. सगळ्यात मोठ आवाहन हे आहे की आपल्याच बांधवांना संघटित करण. मग ते वि. हि. प. चा घर वापसी, अ. भा. वि. प. चा भारत मेरा घर असे कार्यक्रम असतील वा अगदी आजूबाजूला होणारे छोटे कार्यक्रम. जे जे कार्यक्रम "समाज" म्हणुन केले जातात त्या प्रत्येक सण, उत्सव, सामजिक कार्यक्रम ह्यांमधून राष्ट्र, समाज ह्याविषयी विचार करण्यास समाजमन उद्युक्त करणे.



Samai
Monday, September 11, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या माणसाने आयुष्यभर अहिंसेचे व्रत संभाळले >>>>>>>>>>
स्वतःच्या मनाला मारणं ही सगळ्यात मोठी हिंसा आहे, जगाला अहिंसा शिकवणारा माणूस स्वतःअच्या मनाला मारायला शिकवतो ही विसंगती कोणीच लक्षात घेणार नाही काय?
( कृपा करुन मन मारणे ह्यावरुन कोणी इतर current मुद्दे उगाळायला सुरुवात करु नका जसे की मन मारायच नाही म्हणजे मनात आल तर बलात्कार करायचा का वगैरे :-( )

द्या हाकलुन ह्या मुसरड्यांना आणि ख्रिस्तींना हिंदुस्थाना बाहेर. हे राष्त्र हिंदुंचे आहे आणि इथे रहाण्याचा अधिकार ही फक्त त्यांचाच.




Lopamudraa
Monday, September 11, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली v&c वर.... keep it up.. !!!
श्रावण तुम्ही नविन दिसता म्हणुन या bb वर चांगल्या भाषेत लिहिता... आहात.. तुमच्या लक्षात येइल थोड्याच दिवसात!!!
लालभाइ तुमच्याकडे गांधीपेक्षा जास्त संयम आहे मानल तुम्हाला!!!,रोबिन्हूड programming...hmm..
samai बाई आल्याबरोबर किती सुंदर लिहायला लागली ग..!!!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators