Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 30, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » वन्दे मातरम » Archive through August 30, 2006 « Previous Next »

Sherloc
Wednesday, August 23, 2006 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दुंव्यतिरिक्त इतरानी उच्चारण्यास, गाण्यास नकार द्यावा, त्यावरुन कुणी आंदोलन सुरु करावे असे या राष्ट्रगानात काय आहे?

कुणी अभ्यासक मार्गदर्शन करेल का? मला वाटतं चर्चेसाठी हा विषय ताजा आहे.


Samuvai
Wednesday, August 23, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sherloc ,
सगळ्यात महत्वाच कारण्:
ह्या गाण्यामुळे "राष्ट्र" ह्या संकल्पनेवर लोकांची निष्ठा वाढून उपासना पद्धतींमुळे होणारा भेदभाव संपेल. काही उपासनापद्धतीच्या पुरोहितांचे निहितस्वार्थ त्यामुळे धोक्यात येतिल.

मग हिंदू धर्माचार्य त्याला विरोध का नाही करत? तर हिंदूंसाठी पहिल्यापासूनच देव, देश आणि धर्म हे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे देशाला वंदन केल्याने देवाचे महत्व कमी होतं वा त्याचा अपमान होतो अशा वेडगळ कल्पना हिंदूंच्या मनातही येणार नाहीत.
थोडक्यात ह्या देशावर निष्ठा नसलेले आणि ह्या देशाची अजून शकले करण्याची स्वप्न बघणारे दलाल वंदे मातरम ला विरोध करत आहेत.


Laalbhai
Wednesday, August 23, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.hindu.com/2006/08/23/stories/2006082307231001.htm

वाचकांचा पत्रव्यवहार वाचून लक्षात घेण्यासारखी बाब की शाही इमामाचा उघड उघड विरोध करणारा सामान्यांचा आवाज, क्षीण का होईना, यायला लागलेला आहे. या धाडसाचे आणि maturity चे कौतुक केले पाहिजे.

Jaaaswand
Wednesday, August 23, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळा hopeless प्रकार आहे... मतांसाठी देशही विकायला काढतील ही मंडळी

Zakki
Wednesday, August 23, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काढतील (?!)

नव्हता कधी काढला? ते काम चालूच आहे. कधी कधी मतांसाठी लहान लहान गटांसाठीसुद्धा, मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, किंवा काहीहि असोत, निर्णय फिरवले जातातच!

आता मुस्लिमांजवळच अशी खूप मते आहेत असे तर मुळीच नाही. पण त्यांना विरोध करणारे एकत्र येऊन कुणाला निवडून देतील का? आता तर मुस्लिम बाँब उडवून गोंधाळ करतील ही भीति! आणि ते कसे थांबवणार? आपण बाँब टाकून असे मी मुळीच म्हणत नाहीये, पण भारतात जर एव्हढे शहाणे लोक आहेत तर ते का नाही मार्ग शोधून काढत?


Shaileshkm
Thursday, August 24, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A good article on history of 'Vande Maataram'
http://www.indianexpress.com/story/11232.html

Vijaykulkarni
Sunday, August 27, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेर्लोक,
वन्देमातरम गीताची पहीली दोनच कडवी प्रसिद्ध आहेत.
त्यानन्तर चे सम्पूर्ण गीत वाचले तर हिन्दु सोडून अन्य धर्मीय का विरोध करतात हे लक्शात येईल.
उद्या अमेरिकेने येशु ख्रिस्ताचे गुणवर्णन करणारे राश्ट्रगीत तयार केले तर हिन्दू ते स्वखुशीने म्हणतील?
ह्या गीतवरून मुम्बई महपालिकेत धुडगूस घल्णार्या एकाही शिवसेना नगरसेवकाला हे गीत पूर्ण माहीत नव्हते. पण ह्या गीताला विरोध करणर्या एक मुस्लीम नगरसेवकाने ह्य सम्पूर्ण गीतचा सन्दर्भ देत विरोध का याचे उत्तर दिलेले होते.
देशावर प्रेम करू, जरूर तर देशासाठी
मरू पण देशाची पूजा करणार नाही या भूमिकेत चूक काय?
रामजन्म्भूमीच्या नाटकाला पुर्वीसारखी गर्दी जमत नाही कान्ची शन्करचार्याचे प्रकरण सुध्ह फुसके निघाले, पाहुयात या गाजराची पुन्गी तरी वाजते क? म्हणून हवा तापवण्याच केवीलवाणा प्रयन्त सूरू आहे.
पण सोनीयाजीन्च्या कणखर आणी प्रगल्भ नेत्रुत्वाखाली देशाची घोडदौड सुरु आहे ती थाम्बणार नाही.

जय सोनीयामाता



Dinesh77
Monday, August 28, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे फ़क्त भारतातच होऊ शकते.
कल्पना करा जर हेच कुठल्या दुसर्‍या इस्लामिक राष्ट्रात झाले असते तर कोणत्याही हिंदु नेत्याला त्याचे विचार मांडु न देता त्याची कत्तल केली असती आणि त्याचे
live telecast केले असते.

देशाची पूजा का नाही करणार?
जर तुम्ही या भूमीला मातृभूमी म्हणत असाल तर मातेची पूजा करण्यात लाज वाटण्याचे काही कारण नाही.

आणि कुणी सांगितले की एकाही शिवसेना नगरसेवकाला पुर्ण गीत माहित नव्हते?


Vijaykulkarni
Monday, August 28, 2006 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे इस्लामीक राश्ट्रे आपले आदर्श मानायचे का?


Zakki
Monday, August 28, 2006 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण सोनीयाजीन्च्या कणखर आणी प्रगल्भ नेत्रुत्वाखाली देशाची घोडदौड सुरु आहे ती थाम्बणार नाही.

जय सोनीयामाता

घोडदौड कुठल्या दिशेला चालू आहे?

रामजन्म्भूमीच्या नाटकाला पुर्वीसारखी गर्दी जमत नाही कान्ची शन्करचार्याचे प्रकरण सुध्ह फुसके निघाले, पाहुयात या गाजराची पुन्गी तरी वाजते क? म्हणून हवा तापवण्याच केवीलवाणा प्रयन्त सूरू आहे.

यात थोडेफार तथ्य असावे. कदाचित् षंढ नि निष्क्रीय अश्या हिंदूंना जागे करण्याचे प्रयत्न असतील. पण त्याचा काऽहीहि उपयोग होणार नाही. गेल्या हजार वर्षात झाला नाही, आता तर पैशांशिवाय दुसरा कुठलाच विषय जनतेला लक्ष देण्याच्या लायकीचा वाटत नाही! भारतातच नाही, सगळ्या जगातच.

Vijaykulkarni
Monday, August 28, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पैशांशिवाय दुसरा कुठलाच विषय जनतेला लक्ष देण्याच्या लायकीचा वाटत नाही! भारतातच नाही, सगळ्या जगातच

यात चुकिचे काय आहे


Zakki
Tuesday, August 29, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चूक आहे असे कोण म्हणते? महत्वाच्या विषयाकडे लक्ष असल्याने इतर विषयांकडे लक्ष द्यायला जमत नाही. पूर्वी काय कारणे होती माहित नाही, पण सध्या हेच कारण असावे असे वाटते. मते मिळवणे, निवडून येणे, पैसे मिळवणे यांच्या मागे लागले की सध्या तरी मुसलमानांना उघड विरोध करून चालत नाही.

माझे तर म्हणणे आहे की ज्यांना म्हणायचे आहे 'वंदे मातरम्' त्यांनी अभिमानाने मोठ्या आवाजात न घाबरता म्हणावे, इतरांनी पण म्हणावे हा आग्रह कशाला? त्यांना नसेल म्हणायचे तर गेले उडत!

खरे म्हणजे प्रत्येक प्रश्नाचा विचार नुसता राजकीय सत्ता मिळण्याकडे कसा होईल, किंवा यातून पैसे कसे मिळतील या कारणांसाठीच होतो, सगळ्या जगात. तेंव्हा त्या दोन गोष्टींखेरीज इतर मतांना काही किंमत नाही. secularism , हिंदू जागृति हे केवळ तात्कालिक.


Dinesh77
Tuesday, August 29, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात कोणत्याही मुस्लिमाची या कारणावरुन कत्तल होणे कदापि शक्य नाही. त्यामुळे आपण असले मुर्ख आदर्श मानायचे काहीच कारण नाही.
हाच तर फ़रक आहे हिंदु आणि मुस्लिम यांच्या मधे.


Vijaykulkarni
Tuesday, August 29, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लीम देशात वन्दे मातरम न म्हणल्यास कत्तल केली जाते?
ऐकावे ते नवलच


Moodi
Tuesday, August 29, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्णी कृपया आपण आपले वाक्य नीट वाचावे व आधी दिनेश ७७ यांनी जे लिहीलेय ते पण नीट वाचावे.
धन्यवाद.
झक्की मी तुमच्याशी सहमत आहे.




Dinesh77
Tuesday, August 29, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi धन्यवाद.
मी देखिल झक्की यांच्याशी सहमत आहे.


Sherloc
Wednesday, August 30, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रानो!

हिन्दुंव्यतिरिक्त इतरानी उच्चारण्यास, गाण्यास नकार द्यावा, त्यावरुन कुणी आंदोलन सुरु करावे असे या राष्ट्रगानात काय आहे?

हा प्रश्न या बी बी वर मी उपस्थित केला होता. त्यामुळे या प्रश्नाची मी माझ्या बुद्धीने केलेली उकल अशी आहे

वन्दे मातरम म्हणजे आईला केलेले वन्दन असा साधा सरळ अर्थ आहे. परन्तु आई ही शेवटी एक स्त्री आहे. आणि विरोधाची मेख मला वाटतं इथेच आहे. कारण हिन्दुंव्यतिरिक्त इतर धर्मांमध्ये स्त्री ला देवाच्या जागी मनण्याची पद्धत नाही. कुराणाने तर स्त्रीला माणुस मानण्यासही नकार दिल्यासरखी उदाहरणे आहेत. ख्रिश्चनांमध्ये काही तुरळक अपवाद आहेत जे मदर मेरी वगैरे मानतात. पण ती जमात या विरोधाच्या फन्दात न पडल्याने त्यांचा मी फारसा विचार केला नाही. माझे विचार तुटक तुटक आहेत पण त्यांची दिशा योग्य आहे की नाही याबद्दल तुमची मते द्यावीत.


Limbutimbu
Wednesday, August 30, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेरलॉक, तुमच बरोबर हे! चालुद्या!
मला वेळ झाला की येतोच मी सम्पुर्ण वन्देमातरम घेवुन! :-)
बायदीवे, पुण्यात जे झाले नाही ते नागपुरात घडले!
चार पाच वर्षान्पुर्वीची गोष्त असेल! :-)
नागपुर महानगरपालीकेने माहाराष्ट्रातील महानगरपालीकान्च्या मधे सन्गित स्पर्धा आयोजित केली होती ज्यात पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यान्चा सहभाग अपेक्षित होता!
बलाढ्य सन्घ म्हणजे पुणे, मुम्बै, ठाणे, औरन्गाबाद इत्यादीक! पीम्परी चिन्चवडचा सन्घही सामिल झाला होता व त्यातिल सर्व विद्यार्थी आन्धळे होते! ही स्पर्धा खुप गाजली, व पिम्परी चिन्चवडच्या विद्यार्थ्यान्नी प्रथम क्रमान्क पटकावला!
हे येवढ्या तपशीलात सान्गायचे कारण की या स्पर्धेचा विषय होता "सम्पुर्ण वर्देमातरम च्या शेवटच्या कडव्याची चाल"
पालिका स्तरावरील विविध खाकी प्रकल्पान्मध्ये काम करणार्‍या कला शिक्षकान्साठी हा कस लावणाराच प्रकार होता, येवढेच नव्हे तर अन्य खाजगी सन्स्थान्च्या शाळान्च्या तुलनेत कमी सुविधा असुनही या सर्वच पालीकान्च्या विद्यार्थ्यान्नी व त्यान्च्या शिक्षकान्नी सम्पुर्ण वन्देमातरम गाताना जी विविधता दाखवली त्यास तोड नाही!
त्याचबरोबर, नागपुर महानगरपालीकेने हा विषय ठेवला याबद्दल तेही कौतुकास पात्र हेत! :-)
मला जमल्यास मी त्यातिल काही गाणि किमान बक्षिसपात्र तरी,मिळाले तर बघतो! :-)

इन्ग्रजान्च्या राज्यात वन्देमातरम हा शब्द उच्चारण्यास सुद्धा "अघोषित" बन्दी होती!
पं. विष्णुबुवा दिगम्बर पलुस्कर (नाव चूक असल्यास सुधारुन द्यावे) कॉन्ग्रेसच्या अधिवेशनात सुरवातिला सम्पुर्ण वन्देमातरम म्हणायला लागले तेव्हा तेथे हजर असलेल्या (आणि तोवर द्वीराष्ट्रवादाचा साक्षात्कार झालेल्या) कॉन्ग्रेसच्या सभासद मुसलमानान्नी त्यास विरोध केला व पं. पलुस्करान्ना सम्पुर्ण वन्देमातरम म्हणणे अशक्य केले! या सर्व प्रकारास, "राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या" नेत्यान्नी "काय प्रकारे अहिन्सावादी विरोध" केला ते कळण्यास अवघड हे पण तेथ पासुन कॉन्ग्रेसच्या कार्यक्रमात अर्धमुर्ध वन्देमातरम म्हणल जावु लागल! अर्थात मुस्लिम अनुनयाची ही बोटचेपी भुमीका तेव्हाही नवि नव्हती! आत्ताही नाही! षण्ढ लोकान्च्या हातात राजकारणाची सुत्रे गेली की काय घडू शकते त्याचे हे उदाहरण हे! पुढे जे जे घडत गेले तो इतिहास हे, पण स्वतन्त्र भारतातही शासकीय पातळीवर सम्पुर्ण वन्देमातरम म्हणु दिले जात नव्हते ते अगदी १९८० ते ८५ पर्यन्त! असे करायचा कोणी प्रयत्न केल्यास "आत" टाकले जायचे ज्याचे पुरावे उपलब्ध केलेले नसतात, मागु नयेत!
१९८४ मधे रामजन्मभुमीचा प्रश्ण पुढे काढल्यावर येथिल निद्रिस्त पण सूप्त ताकदीने परिपुर्ण अशा हिन्दु समाजास जाग येवुन जिथे तिथे सम्पुर्ण वन्देमातरम म्हणले जावु लागले!
१९८७ चे आळन्दी येथे भरलेले विश्व हिन्दू सम्मेलन एक मैलाचा दगड ठरले! पुढील इतिहास प्रत्येकास आपापल्या चष्म्यातून बघावयास उपलब्धे हे!
या पार्श्व भूमीवर नागपुर महानगरपालीकेने जी स्पर्धा घेतली तिचे कौतुक करणे अनिवार्य ठरते!
मला नेमके साल आठवत नाही, पण तेव्हा महाराष्ट्रात बहुतेक बीजेपीसेनेचे राज्य होते म्हणुन ते शक्य झाले असावे!
वन्दे मातरम म्हणण्यास विरोध हा निलाजरे पणाचा कळस हे व त्यात काय बिघडले असे विचारणे हे वाळुत तोन्ड खुपसुन बसल्याचे लक्षण हे! पण ज्या देशात भर सन्सदेत स्वतन्त्र भारताचे मान्यता प्राप्त राष्ट्रगीत "जन गण मन" न म्हणणारे व ते सुरु असताना ठोम्ब्यासारखे तसेच बसुन रहाणारे अस्तित्वात हेत तर बाकी लोकान्चे काय बोलावे?
वर कुठेतरी एक "जर तर" प्रष्ण आला हे की समजा उद्या अमेरिकेने येशुवरचे राष्ट्रगीत ठरविले तर काय कराल?
बुद्धिभेद करता करता जाता जाता एन आराय बाबत सुक्ष वीषपेरणी करायच्या उत्कृष्ट प्रयत्नाचा एक भाग म्हणुन या प्रष्णाची सम्भावना करावी लागेल!
इथे देशातील परिस्थितीवर चर्चा चालु असताना, एकदम अमेरीका अन येशुला मध्ध्यात आणुन देशी लोकान्ना एन आर आय लोक काय करतील याचे अन्दाज बान्धायला लावुन ते काय करतील याचे उत्तर मागणे हा मुर्ख पणाचा कळस हे! इथे भारत देशापुरते बोलले पाहीजे, व भारतातील राष्ट्रवादी लोक भारता बाहेर वन्देमातरमची सक्ती करायला जात नाहीयेत, नाही परदेशाचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकान्च्या निष्ठा तपासायला!
त्या त्या लोकान्च्या निष्ठा तपासण्याचे काम ती ती राष्ट्रे इमाने इतबारे करीतच असतात, व त्यात अगदी "कौमार्य चाचणी" पासुन सर्व काही येते! याचे भान (खर तर कसलेच) प्रश्ण कर्ट्यास नसावे असे वाटते! अन्यथा, देशातल्या परिस्थितीबद्दल बोलायचे व त्यावर युक्तीवाद करायचे सोडुन अमेरिकन किरिस्ताव आणि येशु काय करेल याची फिकीर करायची वेळ आली नस्ती! पण ज्यान्ना आपल्या बुडाखाली काय जळतय याचेच भान नस्ते ते लाम्बवर दुसर्‍याच्या बुडाखाली काय हे ते वाकुन वाकुन बघत अस्तात! एनीवे, तो विषय नाही हे!
सबब हा प्रश्णच सर्वथिव चुकीचा असल्याने त्यावर अधिक विचार करण्याचे कारण नाही!


Moodi
Wednesday, August 30, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या तुझे म्हणणे मान्य असले तरी एक सांगते की आपण सांगुनही हे काय किंवा कुठलेच लोक राष्ट्रगीत म्हणत नाहीत. शाळेत असतांना एक मुस्लीम विद्यार्थी जन गण मन हे राष्ट्रगीत सुद्धा म्हणत नव्हता हे आम्ही प्रत्यक्ष बघीतलय. आधी हे माझ्या मैत्रीणीच्या भावाने बघीतले कारण तो त्याच्या शेजारच्या रांगेत असायचा, नंतर ही गोष्ट त्या मुस्लीम विद्यार्थ्याच्या मित्रांनी पण मान्य केली. मागे मी दिवाळीत गेले होते तेव्हा तोच मुस्लीम मुलगा पाकी क्रिकेटपटू सईद अन्वरसारखा दाढी वाढवुन फिरत होता. असे कित्येक तुम्हाला सापडतील.( त्यात परकीय बांगलादेशी अन पाकी जास्त असतील, भटिंडातच २ पाकी लष्करी तळानजिक सापडले, हिंदू नावे वापरुन रहात होते)

कुणाला सांगुन काहीच होत नसते. नागपूरची गोष्ट सोड तिथे आधीपासुनच संघाचा प्रभाव आहे. त्यामुळे ते हे सगळे यशस्वी करुन दाखवु शकले. इथे पुण्या मुंबईत बघ असे काही शाळांनी करा म्हटले की लगेच राष्ट्रवादी, कॉंग्रेस, समाजवादी, डावे धावत येतील. बाडगे तर आधीच पहिल्या नंबरला असतील.

रहाता राहिला अमेरीकेचा अन येशूचा प्रश्न ती आमची मते नाहीत. ज्यांना सोनियाचे गुणगान करायचे ते त्यांनी खुश्शाल करावे. लोकशाही आहे ती अशीच वापरावी.


Limbutimbu
Wednesday, August 30, 2006 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> कुणाला सांगुन काहीच होत नसते.
मुडी, या लिम्ब्याला तू इतकाही दुधखुळा समजु नकोस की त्याला येवढेही कळत नाही की एकवेळ रेड्याच्या तोन्डुन वेद वदविणे कदाचित आजही शक्य होइल पण असल्या "त्या" नाठाळान्च्या तोन्डुन राष्ट्रगीत किन्वा वन्देमातरम वदविणे महा कर्म कठीण!
तेव्हा हेऽऽ मूडेऽऽ, तू याची निश्चित खात्री बाळग की हा लिम्ब्या दगडावर डोक आपटुन घेतल्याप्रमाणे इथे पोस्टत नाही! "त्या" लोकान्ना "बदलविण्यासाथी" "सुधरविण्यासाठी" तर नाहीच नाही!
माझ्या पोस्ट त्या "आपल्यातल्याच" "सुशिक्षित" लोकान्करीता अस्तात जे वरीलप्रमाणे बुद्धीभेदात भारावलेले असतात! त्यान्च भारावले पण थोडफार दूर व्हाव म्हणुन हा अल्पस्वल्प प्रयत्न अस्तो!
त्याशिवाय, ज्यान्च्यावर असल्या बुद्धिभेदाचे परिणाम होत नाहीत पण आपण या विचारान्ची माणसे सन्ख्येने अल्पसन्ख्य होत की काय अशा निराश अवस्थेत कुणी असतील तर त्यान्चे नैराश्य दूर करण्याकरता ठाऽम विचार माण्डणार्‍या माझ्या पोस्ट्स असतात!
बाकी काही विशेष नाही!
तुमचे चालुद्या!
:-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators