|
Soultrip
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:43 am: |
| 
|
मला वाटतं अशा समुपदेशाची येथे गरज आहे! e.g. the query raised under BB 'Spending more time in office than home' तशा समस्या येथे विचाराव्यात. आणि स्त्री-वर्गापैकी कोणितरी पुढे येउन (or, free for all who can genuinely guide) समुपदेशकाची भुमिका निभावावी!
|
Maudee
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:59 am: |
| 
|
good move soul trip
|
Psg
| |
| Wednesday, June 21, 2006 - 12:09 pm: |
| 
|
सोल, समुपदेशनाची गरज आहे हे मुळात मान्य केल पाहिजे! त्या बीबी च्या उद्गातीला असे वाटते असे वाटत नाहिये! त्यामुळे समुपदेशकाची कळकळ आणि वेळ दोन्ही वाया!! जर खरेच इच्छुक असतील तर गोष्ट वेगळी!
|
Deemdu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 12:16 pm: |
| 
|
आणि मुळात जर काही समुपदेशन करायचे असेल तर ते त्या त्या bb वर चालतेच की त्या साठी वेगळा खास वहिनींचा विभाग कश्यासाठी
|
Chingutai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 12:29 pm: |
| 
|
सोल काय गोSSSSड नाव आहे बीबी चं! -चिन्गी
|
Bee
| |
| Friday, August 04, 2006 - 10:38 am: |
| 
|
मायबोलिवर माझी कुणी वहिनी वगैरे नाही आहे. मी 'व' ऐवजी 'ब' वाचतो तेंव्हा बहुतेक माझा प्रश्न इथे योग्य दिसेल. कुणीही इथे मत व्यक्त करू शकतो. स्त्रीपुरुष कुणीही. मला इथे माझ्या एका मित्राच्या वतीने विचारावयाचे आहे. तो जी स्थळं बघतो आहे त्यामध्ये मुलीचे वय दुर्दव्याने त्याच्यापेक्षा कमीत कमी पाच वर्ष तरी लहान येते आहे. त्यामुळे तो पुढचे पाऊल उचलत नाहीये. तर त्यानी काय करावे.. कसा निर्णय घ्यावा. एकदा वयाचा फ़रक पाच पेक्षा अधिक असेल तर पुढे काहीच घडत नाही. हा एक blocking point आहे. त्यात त्याचा database ऐकूनच कमी आहे. त्यामुळे एक एक स्थळ मागे पडत चालल आहे. मीही ह्याबाबतीत अनभिज्ञ आणि निरुत्तर आहे. हितचिंतकांनी योग्य ती वाट दाखवावी. इथे मायबोलिवर अशी एक तरी मुलगी किंवा मुलगा आहे का.. अगदी आजच्या पिढीचा ज्यांच्या life partner मध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक फ़रक आहे आणि त्यांची विचारसरणी जुळली आहे. हा प्रश्न खूप आचरट झाला असेल तर क्षमस्व. खूप भितभितच मी हे पोष्ट्स लिहितो आहे.
|
बी, मी "वहिनी" किन्वा "काका" "मामा" "आजोबा" या सदरातला नाही, तेव्हा तू मान्डलेल्या प्रश्णान्वर मी काही भाष्य करावे की नाही याबाबत सम्भ्रमात हे! पण... >>>>>अगदी आजच्या पिढीचा ज्यांच्या life partner मध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक फ़रक आहे आणि त्यांची विचारसरणी जुळली आहे. तुझी आजच्या पिढीची वयोमर्यादा काय हे ठावुक नाही! पण आमच्या वेळेस देखिल पाच पेक्षा जास्त अन्तर अमान्य केल जायच! तुझा मित्र काय वयाचा हे तसच कोणत्या समाजातील हे त्यावरुन ठरवाव लागेल की येणार्या कमी वयाच्या मुली कराव्यात की नाही! याकरीता नियम असा काही नाही, सर्वकाही परिस्थितीसापेक्ष घडवायच असत, घडत असत! माझ्या समोर काही उदाहरणे आत्ता हेत! माझा एक मित्र, शहाण्ण्वकुळी मराठा, वय ३२ पूर्ण! घरात सगळ्यात धाकटा, सुरुवातीस शिक्षण आणि नन्तर नोकरीत स्थिरस्थावर होइस्तोवर लग्नाच वय वाढलेल! त्यान्च्या समाजात पन्चवीसाच्या वरची मुलगी लग्नाशिवाय शिल्लक असण कठीण, ज्या असतात त्या याच्या पेक्षा जास्त शिकलेल्या वगैरे अनेक अडचणी! तर जेव्हा असे प्रश्ण उपस्थित होतात तेव्हा निर्णय घेणे खरच अवघड असते. तरीही शक्यतो पाचसहा वर्षान्पेक्षा जास्त अन्तर असु नये! याचा पुढील आयुष्यात त्रास होऊ शकतो! तसेच वयपरत्वे अल्लडपणा वर्सेस बनचुके व्यक्तिमत्व यान्च्यातील वैचारीक दरीचा प्रभाव सान्सारीक दैनन्दीन जीवनमानावर होतो! या सर्व जर तर च्या गोष्टी हेत, प्रत्येकाबाबत असेच होइल असेही नाही! पण उगाच परीक्षा का घ्या? तुझ्या मित्राबद्दलचा अन्य तपशील नीटसा कळत नसल्याने, तो कुठे, काय वयाचा, शिक्षण किती, आर्थिक तसेच निवासाची परिस्थिती काय, त्याचा स्वभाव कसा वगैरे अनेक बाबी विचारात घेवुनच यावर काही "सल्ला" देता येवु शकेल! तर आपण खर्याखुर्या "मायबोलीकर वहिनीची" सल्ल्या साठी वाट बघु! 
|
लिंबु मी सुद्धा शहाण्णव्कुळी मराठा आहे, पण २५ पर्यंत लग्न केल पाहिजे अस मी तरी कधी ऐकिवात नाही. ते असो. हे बघ बी वयात अंतर जास्त असु नये हे मान्य, पण शेवटी हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे. दोघ एक्मेकांना किती समजुन घेतत, त्यांच्या विचार धारा जुळतात का किव्हा ते दोघे एक्मेकांन किती आणि कसे समजु शकतात का, ह्या आणि अशा अनेक प्रश्नंची उत्तर हो असेल तेव्हा ते नात टिकायला कहिच हरकत नसवी. वयात अंतर ४-५ असेल तरी ठिक आहे अस निदन मला तरी वातत. जर दोघही एकमेकांन पसंत असतील, तर हो म्हनायला काहिच हरकत नाही. शेवटी आपल्या मनात एक कल्पन असते तिच्यशी थोड तरी साम्य आढळल्यास वेळ न घालवता पुर्ण विचारंती हो म्हणने.
|
Ajjuka
| |
| Friday, August 04, 2006 - 3:47 pm: |
| 
|
मनं जुळत असतील तर ५ काय नी १० काय.. काही फरक पडत नाही. आमच्यात साडेआठ वर्षांचं अंतर आहे. its been best so far!
|
Manaswii
| |
| Friday, August 04, 2006 - 6:28 pm: |
| 
|
विद्या,अगं लिंबुचे बरोबर आहे आणि तुझेहि. साधारण देशस्थ मराठा समाजात मुलगी कितीहि शिकलेली किंवा कितीहि (तथाकथीत)माॅर्डन असली तरि साधारण २५ पर्यंत लग्न करावे लागते, आणि तेच कोकणस्थांमधे नेहमीच मुलींची लग्ने ३० पर्यंत होतात. हे मला माहित आहे कारण मी माहेरची देशस्थ आणि सासर कोकणातले. त्यामुळे सध्या माझी बहिण २४ आहे तर घरि तिच्या लग्नाचे युद्धपातळिवर बघणे सुरु आहे आणि इकडे नात्यामधे अनेक नणंदा ३० पर्यंत आहेत पण त्याचे एवढे काहि टेंशन नाही. असो. आता बीच्या प्रश्नाबद्दल.५ पर्यत वयाचा फ़रक ठिक आहे. पण ५ च्या पुढे जरा विचार करावा लागतो,असे माझे मत. love marriage मधे वेगळि परिस्थिती असते,पण arrange मधे नको. आमच्या मधे साडेसात वर्षाचा फ़रक आहे. हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत.
|
काॅलेजमधे One of my friend got married with a guy 9 years senior . प्रेमविवाह. एका मित्राचे Arranged marriage झाले, ७ वर्ष लहान आहे बायको त्याच्यापेक्षा. He was a bit reluctant, She wanted that age difference दोनही जोडपी सुखाने नांदताहेत. मन जुळली तर बाकी काही फ़रक पडत नाही.
|
विद्या, अज्जुका, मनस्वी, एक मुलगी! खासच! मन जुळली तर काहीच प्रश्ण नसतो तरीही शारिरीक, शैक्षणीक व मानसिक भेद विचारात घ्यायलाच लागतात व त्याचा परिणाम मन जुळली तरी कुणाला तरी कसलीतरी तडजोड करण्यात होतो! कदाचित भविष्यात त्यामुळे घुसमट होण्याची शक्यता असते. अर्थात प्रेमविवाहात काहिही चालु शकेल, यशापयशाची खात्री पुन्हा जुळवुन घेण्यावरच असते! मात्र ठरवुन करायचे झाल्यास शक्यतो पाच वर्षांपेक्षा जास्त अंतर असु नये असे वाटते. आता बी कडुन थोडा अधिक तपशील येवुदे!
|
Naatyaa
| |
| Saturday, August 05, 2006 - 5:08 am: |
| 
|
लिंब्या, जरा व्रत पाळ!!!
|
>>>> लिंब्या, जरा व्रत पाळ!!! जरुर, एक दोन दिसात आठ हजार क्रॉस होवुदे! एकदा का आठहजारी मनसबदार झालो की थोडी विश्रान्ती घेइन म्हणतो!
|
Manuswini
| |
| Saturday, August 05, 2006 - 7:25 am: |
| 
|
हे आपले माझे विचार आजचा काळ आहे आणी लग्नाचे वय ज्जाती नुसार बदलते?? ए. ते न. कोकणस्थ लवकर करत नाही, देशस्थ करतात?? हे काही मला रुचत नाही. काळ बदललाय हे जेव्हा लिहिता तेव्हा हे ही तितकेच खरे आहे की आजकाल careeR मधे गुंतलेली बहुतेक लोक ३० च्या आसपास असतात. आता मला हे माहीत नाही की गावा ठिकाणी हे चालते का? पण माझ्यामते असे काही आजकाल जातीवर राहिले नाही. बी, तुझ्या प्रश्णाचे उत्तर हे खुप relative आहे. ते प्रत्येकाच्या wants n desires वर आहे आणी एकमेकन मुले-मुलि समजवुन घेतात तरी फार difference असु नये
|
शेवटी बी जास्त अंतर असु नये हेच खर. आणि हे ज्याच्या त्याच्या वर अवलंबुन असते
|
मनुस्वीनी, केवळ जातीवार नव्हे तर कोणत्या राज्यात, शहरात, गावात की खेड्यात रहाता,तसेच आर्थिक परिस्थिती, शिक्षण, रूप इत्यादीक सर्व बाबी लग्नाच्या वयावर परीणाम करतात! अगदी जातीतल्या जातीत देखिल अनेक कारणे अशी असतात जी लग्न लाम्बवतात किन्वा लौकर उरकायला लावतात! जातीनिहाय व प्रदेशानुरुप हे अलिखित नियम बदलताना आढळतात. कुणाला रुचू दे वा न रुचूदे! फॅक्ट इज फॅक्ट, त्या नाकारण्यात अर्थ नाही उलट त्या नेमक्या समजुन घेतल्या तर सुधारणेस व विचारान्च्या आदानप्रदानास अधिक वाव मिळेल! तो बी अजुन का लिहित नाही? कुठ गायब झाला एक पिल्लु सोडुन?
|
Shonoo
| |
| Sunday, August 06, 2006 - 10:30 pm: |
| 
|
बी हिन्दी सिनेमा मधे किंवा पुस्तकांमधे जेंव्हा कोणी ' माझ्या मित्राची' किंवा 'मैत्रिणीची' गोष्ट म्हणून सांगतात तेंव्हा तेंव्हा ती प्रश्नकर्त्याचीच असते. तसेच तर नाही ना दिवे घ्यायची सवय आहेच ना?
|
Arch
| |
| Monday, August 07, 2006 - 5:20 pm: |
| 
|
बी लाजला का,शोनूने गुपीत उघडल म्हणून?
|
Manuswini
| |
| Tuesday, August 08, 2006 - 6:02 am: |
| 
|
बी रागवु नकोस, पण मलाही तसेच वाटते शूनुसारखे ती "भीत भीत" posT दुसर्याबद्दल का टाकले? ...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|