Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 24, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Mumbai Local Train Serial Blasts » Archive through July 24, 2006 « Previous Next »

Zakki
Wednesday, July 19, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणि कायदे तज्ञ (रॉबिनहूड!) यावर लिहील का? मला असे सांगण्यात आले की सुप्रिम कोर्टाने सिमि ला अवैध ठरवल्याने आता सिमि legally does not exist! मग त्या खाली कुणाला अटक करणार तुम्ही?

Laalbhai
Wednesday, July 19, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SIMI चा भारतीय प्रजासत्तेच्या मुळ तत्वे secular, democratic, republic ह्या गोष्टी वर विशवास नाही आणि हे ते अभिमानाने बोलतात. मग ह्यान्ना देशद्रोही घोषीत करुन अटक का करु नए?


SIMI हलकट आणि देशद्रोही आहे, त्यांना विनाचौकशी गोळ्या घातल्या पाहिजेत यात वादच नाही.

पण भारतीय घटनेला नावे ठेवणे, तिचे मूळ स्वरूपच बदलण्याची भाषा करणे, हे आजकाल बर्‍याच संघटनांच्या राष्ट्रप्रेमाचे व्यवच्छेदक लक्षण झालेले आहे. तसे केले तरच तुम्ही राष्ट्रभक्त. देशाच्या घटनेवर विश्वास ठेवला तर तुम्ही राष्ट्रद्रोही... अशी काहींची समजूत आहे. असो.

कट्टरतावाद, मग तो कोणाचाही असो, शेवटी सर्वमान्य गोष्टी बळजबरीने बदलायला बघतो. ह्या कट्टरतावादाला सुशिक्षितांचा पाठिंबा मिळणे, ही त्या त्या राष्ट्रासाठी सर्वात घातक बाब!


Kedarjoshi
Wednesday, July 19, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई, काही मुद्दे अगदी बरोबर.

पण घटना जेव्हा लिहिली गेली तेव्हा बर्याच गोष्टी वेगळ्या होत्या, कालोघात त्या बदलाव्या लागतात.
उदाहरण मी माझ्या वरच्या पोस्ट मधे दिले आहे, काश्मीर चा स्पेशल दर्जा.

सर्वच देश त्यांचा घटनेत बरेचदा बदल करत असतात किंवा परिस्थीती मूळे तो करावा लागतो.
एखादी गोष्ट जर स्पष्ट नसेल तर ती परत स्पष्ट करुन घ्यायला काही हरकत नसावी.

उलट घटना बदल म्हनजे बाबासाहेंबांनी जे लिहिले ते नाकाराणे असा समज ज्या काही पार्ट्या किंवा राजकारणी करुन घेतात तो चुकीचा आहे. बाबासाहेब त्या समीतीचे अध्यक्ष होते त्यांचा सोबत वकीलांचा एक ताफा होता.


Laalbhai
Wednesday, July 19, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळाला अनुसरुन काही बदल अत्यावश्यक आहेतच! त्याबद्दल दुमत नाही. आत्तापर्यंत किमान पाउणशेवेळा घटनादुरुस्ती झालेली आहे. त्यात काहीच चूक नाही. घटना म्हणजे कुराण नव्हे...

प्रश्न दुरुस्तीचा नाहीये, तर घटनेचे "मूळ स्वरूपच" बदलण्याचा आहे. मी काय म्हणतो, ते लक्षात आलेच असेल.. :-) जास्त वाढवत नाही..


Robeenhood
Wednesday, July 19, 2006 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

death punishment म्हणजे गोळ्या घालणे नव्हे. ती hanging punishment या स्वरूपात दिली जाते.टाडा १९९५ लाच लॅप्स झाला आहे....
मी पूर्वीही कुठेतरी लिहिले आहे criminal law जेवढा कडक असतो तेवढे त्याचे पुराव्याचे निकष जास्त कडक होत जातात व beyond doubt सिद्ध न झाल्याने आरोपी सुटतात...

विनाचौकशी गोळ्या घालन्याची पद्धत भारताच्या उत्तरेकडील व north east कडील देशात आहे....
त्यात गुन्हेगारांपेक्षा राज्यकर्त्याना नको असलेल्या लोकानाच गोळ्या घालण्याची पद्धत जास्त आहे....
झक्कास mocca मध्ये आधि तो क्राईम आॅर्गनाईज्ड होता हे आधी सिद्ध करीत बसावे लागते. त्या सर्व लिन्क्स आणि नेटवर्क establish व्हावे लागते otherwise it becomes ordinary crime under explosive act or arms act


Zakki
Wednesday, July 19, 2006 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

secular, democratic, republic
ही तत्वे जरी बदलली नाहीत तरी एखाद्या संस्थेचा अतिरेकी पणाशी संबंध असेल तर, त्या संस्थांची कस्सून चौकशी करण्याचे हक्क सरकारला राखून ठेवता येतात. नेहेमीप्रमाणे ते सांगतील आम्ही गोरगरीबांसाठी पैसे गोळा करतो, नि आमच्या धर्माची माहिती लोकांना देतो असे ते म्हणतील तर त्यांच्या हिशेबांची तपसणि व्हायला हवी. शाळेत धर्माची माहिती किती नि द्वेष किती शिकवला जातो याची तपसणी करण्यासाठी सरकारी अधिकार्‍याची देखरेख हवी!

पण अतिरेकीपणा करायचा नि मग 'आम्ही अमुक एक धर्माचे आहोत म्हणून आम्हाला त्रास देतात' अश्या चोराच्या उलट्या XXXX मारायच्या नि स्वार्थी राजकारण्यांनी मतांसाठी त्यांना पाठिंबा द्यायचा हे सर्वसाधारण जनता कसे चालू देते?


Robeenhood
Wednesday, July 19, 2006 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की म्हणतात ते(कधी नव्हे )ते बरोबर आहे!सिमी वर बन्दी असल्याने ती तशी अस्तित्वात नाही. पण तीचेच सदस्य दुसर्या नावाखाली काम करू शकतात, करताहेत....

Saranga
Thursday, July 20, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://switch5.castup.net/frames/20041020_MemriTV_Popup/video_480x360.asp?ai=214&ar=1050wmv&ak=null

हा सन्वाद एका

Moodi
Thursday, July 20, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा असे संवाद ऐकतांना अन व्हिडीओ बघतांना काही वेळेस मशिन हॅंग होते. बीबीसीच्या साईटवर आम्ही असा अनुभव घेतलाय. त्यापेक्षा ते काय म्हणतायत त्याचे थोडक्यात वर्णन करा ना जमले तर.

Kedarjoshi
Thursday, July 20, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांरगा,
thanks for that link .
पण बहुतेक ती बाई ज्यु वाटत आहे.
मुडी एका अरबी टिव्ही नी आयोजीत केलेला हा कार्यक्र्म आहे,यात एक मुल्ला, आयोजक आणी एका स्त्री ने भाग घेतला आहे.
त्या स्त्रि ने सांगीतले की इस्लामिस्ट कशाचेही पालन करत नाहीत. मोहमदाने जी शिकवन सांगीतली त्याचा शब्दश्: अर्थे घेउन ते लोक मुस्लीम आणी नॉन मुस्लीम असा भेदभाव करत आहेत. लोकांना मारत आहेत. याला घर्म म्हनत नाहीत. हा दोन विचारसरणीतील फरक आहे. एकाची विचारसरनी २१ व्या शतकातील आहे तर दुसरी अश्म युगातील. त्यामुळे हे भांडन होत आहेत. स्त्री ला ते क:पदार्थ समजतात. ( बर्याच गोष्टी ऐकायसारख्या आहेत).
तो मुल्ला मग विचारतो कि तु कोनत्या धर्माची आहे. ती म्हन्ते मी कुठल्याही घर्माची नाही मी एक माणुस आहे व राहानार. तुझा धर्म तु तुझ्या जवळ ठेव लोकांना का तो फोर्स करत आहेस. वैगरे.


Saranga
Thursday, July 20, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती बाइ अरब अमेरीकन psychologist Wafa Sultan आहे. हा कार्यक्र्म २१ फ़ेब ला अल जझीरा वर प्रसारीत झाला होता. i'll post the major points of her argument after sometime

Zakki
Thursday, July 20, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुदैवाने मला हा संवाद पूर्णपणे ऐकता आला. आता तिने सांगीतलेले कोण मुस्लिम ऐकणार हा एक प्रश्नच आहे, कारण त्यांच्या दगडासारख्या टाळक्यात इ. स. ६०० सालचे विचार बसले आहेत, ते हटायलाच तयार नाहीत.

कुणा एकाने लिहिले होते (नि मी ते मागे इथे लिहिले होते) की जेंव्हा ख्रिस्चन धर्म स्थापन झाला तेंव्हा सुसंस्कृत असे ज्यूच फक्त आजूबाजूला होते नि त्यांनी फारसे अकांडतांडव नि विरोध केला नाही, दोन्ही धर्मात सारख्या अस्या गोष्टी आहेत, त्यामुळे ख्रिस्चन धर्मात असे म्हंटले नाही अ-ख्रिस्चनांना मारून टाका. फक्त त्यांना जिझस ख्राईस्ट चे महत्व सांगा नि ख्रिस्चन बनवण्याचा प्रयत्न करा. बुद्ध नि जैन धर्म तर सनातन, ब्राह्म (*)इ. तून तयार झाले, तिथे वैर असण्याचा संभवच नाही, कारण आपला धर्म फारच सुसंस्कृत होता, नि शिवाय बुद्ध नि जैन यांनी जे सांगितले ते आपल्या धर्मातूनच घेतलेले आहे. मंडनमिश्र नि शंकराचार्य यांनी १३ व्या शतकात 'वादविवाद' केला, मारामारी नाही!! बाकीचे जग त्यावेळी उघडे नागडे फिरत होते, नि शिकार करून रहात होते!! अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे ही!

पण इस्लाम जेंव्हा नि जिथे स्थापन झाला, तिथे महम्मदाने अत्यंत कठीण परिस्थितीतून, नि अत्यंत क्रूर लोकांच्या मधे हा धर्म काढला. तेंव्हा वाद विवाद करून म्हणणे पटवून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर आपला धर्म Defend करण्यासाठी त्याने हाती तरवार घ्या असे सांगीतले. त्याचा अर्थ पुढे स्वार्थी लोकांनी बदलला.

अलिकडच्या इतिहासात इतर धर्माच्या लोकांनी जसे बदल केले तसे बदल करण्याची नि पटवून घेण्याची मुसलमानात अक्कल नाही! म्हणून तर ते मागासलेले राहिले! नि आता काहीतरी मूर्खासारखे बरळतात, आमच्यावर अन्यायच झाला, नि जुलूमच होताहेत वगैरे!

वास्तविक एव्हढा तेलाचा साठा तिथे आहे. पाश्चिमात्य देशांच्या कंपन्यांनी येऊन refineries बांधून त्यांना अक्षरश: लुबाडले, कारण त्यांना स्वत:ला अक्कलहि नाही नि काम करण्याची इच्छाहि नाही! तेच जर त्यांनी ज्यू लोकांची अक्कल, भारताची अक्कल नि श्रम वापरून काम केले असते तर या 'infidel' पाश्चिमात्यांना येऊ देण्याची काही गरजच नव्हती! पण तद्दन मूर्ख लोक!!
असे आपले माझे विचार!!


(*) - 'हिंदू' हे नाव परकीयांनी दिले, ते आपल्या धर्माचे खरे नाव नाही, कारण आपला असा एकच 'धर्म' नाही. तत्वज्ञान आहे, त्याप्रमाणे स्वत:ची उन्नति कशी करावी ते गीतेत सांगीतले आहे, पण कुठलाहि एकच 'धर्म', चालिरीती सबंध भारतात सारख्या नाहीत. तर त्या ऐवजी, सनातन, भारतीय, ब्राह्म असे काहीतरी म्हणावे आपल्या तत्वज्ञानाला असे मला वाटते. एक महत्वाची सूचना: 'ब्राह्म' या शब्दाचा नि 'ब्राह्मण' जात यांचा संबंध केवळ सारखे दिसणारे शब्द असा आहे. ब्राह्म (ब्रह्मस्य इती) याचा अर्थ Aschig च्या पानावर पहा!

Rupali_county
Friday, July 21, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय दारून अवस्था केली त्या नरधामानि
त्याला स्वर्गात नव्हे तर नरकात ही जागा मिळणार नाही.




Moodi
Friday, July 21, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, सारंगा धन्यवाद. अशा चर्चा( धर्म, देव, वगैरे) जेव्हा बीबीसीच्या लोकल चॅनेलवर होतात, तेव्हा कायम शबाना आझमी भारतातर्फे( तिला भारताच्या सर्व धर्मांची अधिकृत प्रतीनिधी बनवलीय अन त्यामुळे ती कायम फिल्मी स्टाईलमध्ये बोधामृत देण्याचा आव आणत बोलते. पाहून वैताग येतो.) अन पाकीस्तानतर्फे इम्रान खान याला बोलवतात.

Laalbhai
Monday, July 24, 2006 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॉंबस्फोटाची दोन नवीन कारणे.

Samuvai
Monday, July 24, 2006 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा झक्की, सुरेख! एकदम पटले. "खंडण-मंडणा" ची परंपरा असणार्या ह्या देशामध्ये आठव्या शतकात काही अभद्र पावले उमटली आणि आपल्या दुर्दशेला सुरुवात झाली.
मला आठवतय की १९९३ च्या स्फ़ोटावेळी काही विद्वानान्नी इथे त्याचा संबंध रामजन्मभूमीशी जोडला होता. त्याच धर्मनिरपेक्श विद्वानान्पैकी इथे कोणी असेल तर मी विचारु इच्छीतो की मग आत्ताचे स्फ़ोट कशामुळे झाले?
विद्यापीठ रस्ता रुदीकरणात आमच्या पुण्यात म्हसोबाचे देऊळ कुठलाही गाजावाजा न होता बाजुला झाले. मग अहमादाबादेत छोट्याश्या दर्ग्याच निमित्त करुन नंगा नाच का घातला गेला?
भिवंडीत सरकारी जागेत पोलिस चॉकी उभारण्यात २ सरकारी कर्मचारी "on duty" का मारले गेले?
हे सगळ अगदी ताज आहे (हो, नाहीतर कोणीतरी "सेक्युलर" उठुन फ़िल्मी ईस्टाईल मध्ये म्हणायचा की "इतिहास के गडे मुर्दे क्यो उखाड रहे हो?").
संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय ह्यावर कधी साकल्याने विचार होणार आहे की नाही? की आपल "साप साप" म्हणून भुई धोपटत सगळा राग "communal RSS" वर काढायचा?


Samuvai
Monday, July 24, 2006 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या posts आत्तच वाचल्या.
limbutimbu , kedarjoshi , zakki , bhramar_vihar आणि सगळे शिलेदार लगे रहो.
केन्द्रीय ग्रुहमंत्र्यान्ची मुक्ताफ़ळे बघा म्हणे मदरशान्मधून समाजसेवेचे कार्य चालते
http://www.esakal.com/esakal/esakal/rightframe.html


Zakki
Monday, July 24, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या टी. व्ही. वर पण हिजबुला चे गोडवे गायला सुरुवात झाली आहे. हिजबुला ने आम्हाला किती मदत केली, आमचे इस्राइलच्या हल्ल्याने किति नुकसान झाले होते, पण त्यांनी मदत केल्यामुळे आम्ही जगू शकतो, अश्या लोकांच्या मुलाखति वगैरे. तरीपण ताबडतोब मुद्दाम सांगण्यात येते की, 'तरी पण त्यांचे अतिरेकी हल्ले आम्ही सहन करणार नाही'.

मला वरची लिंक नीट वाचता आली नाही, पण आपल्या मंत्र्यांनी असा खुलासा केला का? हा प्रश्न आहे.


Samuvai
Monday, July 24, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
सध्या समस्त सेक्युलर नेत्यान्नी "सगळे तसे नाहीत हो ..." असा गळा काढायला आणि रंगसफ़ेदीला सुरुवात केली आहे. हा त्याचाच एक भाग


Zakki
Monday, July 24, 2006 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, सेक्युलर असायला हरकत नाही, पण अतिरेकी? ते कशाला हवेत सेक्युलर किंवा कुठल्याही राज्यात? म्हणून सगळे नसतील तसे, पण त्यात जे आहेत, त्यांना आम्ही स्वीकारणार नाही असे स्पष्ट करावे!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators