Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 16, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through July 16, 2006 « Previous Next »

Moodi
Thursday, July 13, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांचा गेले ५० वर्षापासुन सगळ्यातच हात आहे की( चीन युद्ध सोडले तर), पण इतक्या वेळा सिद्ध होऊनही काही होत नाही.

Limbutimbu
Friday, July 14, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wakdya
Thursday, July 13, 2006 - 7:54 am:
>>>>>>> माफ करा, पण मला कोणी या स्फोटांमागच्या हेतुंबद्दल काही सांगु शकेल का? जसे की त्यांना नेमका काय परिणाम होणे अपेक्षित असावे?
वाकड्याभाऊ, मला जस जमल तस उत्तर द्यायचा प्रयत्न करतो हे! :-)
अशा प्रकारे बॉम्बस्फोट घडवुन आणण्यामागे पुढील वेगवेगळे हेतू असु शकतात!
१. जनतेच्या मनात दहशत पसरवणे!
यामुळे जनतेच्या मनात केवळ मृत्युची भितीच रहाते असे नाही तर चालु व्यवस्थेबद्दल असमाधान निर्माण होवुन एकन्दरीत वैचारीक गोन्धळ निर्माण होतो व एकन्दरीतच प्रशासकीय व्यवस्थेवर ताण पडुन तिचा बोजवारा उडतो. त्यान्ना तसेच अपेक्षित असते.
२. अशा प्रकारान्नी जनतेला उचकवुन त्यान्ना दन्गल किन्वा तत्सम विध्वन्सक कृत्ये करण्यास चिथावणी देणे. या मागे फार मोठे गणित आहे, कारण अशा प्रकारे दन्गलीत मुस्लिमान्चेही नुकसान होणार असते पण ते त्यान्च्या दृष्टीने "मुजाहिदीन" अर्थात कम असल असल्याने आणि मोठे उद्दिष्ट साध्य करताना काही थोडे फार गमवावे लागले, तेही दुसर्‍या देशातले तर त्यान्ना ते चालण्यासारखे असते. त्यामुळेच दन्गलीन्मुळे होऊ शकणारे मुस्लिमान्चे सम्भाव्य नुकसान गृहित धरुनही ते बॉम्बस्फोट वगैरे घडवुन आणतात. जर दन्गली पेटल्या तर जागतीक पातळीवर चोराच्या उलट्या बोम्बा मारण्यास त्यान्ना आयतीच सन्धि मिळते. प्रशासनावर व सन्रक्षण यन्त्रणेवर अतिरिक्त ताण येवुन ती खिळखिळी होत जाते हा साईड प्रॉडक्टही त्यान्च्या दृष्टीने महत्वाचा असतो!
अशा घटना सातत्यपुर्ण केल्या गेल्यास त्यान्ना त्यान्च्या यन्त्रणा तपासुन बघता येतात आणि माझ्या दृष्टीने त्या दिवशीचे बॉम्बस्फोट ही केवळ एक पुर्वतयारीचा भाग असावी!
ट्वीन टोवरवरचे हल्ले काय की जगात व देशात कुठेही केलेले असले हल्ले काय, अशा हल्ल्यान्नी तत्काळ ते ते राष्ट्र कोसळुन पडत नसते, मात्र असे हल्ले नेहेमी होत राहीले तर नागरिकान्ची मनःस्थिती भयाण व हरलेली अशी होऊ लागते! माझ्या घरामाग लाम्बट निघाल होत, पाच सहा वेळेस मी सोडुन सगळ्यान्ना दिसल, मला फक्त कात दिसली मीटरभर लाम्बीची, पण मग काय झाल? लाम्बट वावरत हे म्हणल्यावर घराबाहेर अन्गणात पाऊल टाकताना प्रत्येक वेळेस मनात भितीची भावना दाटुन येवु लागली, सन्ध्याकाळी उघड्या दारे खिडक्यातुन लाम्बट घरात शिरल तर काय घ्या?? अशा अनेक शन्काकुशन्कान्नी सगळेच धास्तावलेले राहू लागले! हे उदाहरण येवढ्या करता देतो हे की ही भिती अशीच कायम राहीली आणि तिच्यात कमी होण्या ऐवजी वाढच होत गेली तर एखाद्या मोठ्या समुहाच्या दृष्टीने ती अत्यन्त घातक बाब असते! अशा भितीत वाढ व्हावी असा प्रयत्न दहशतवाद्यान्चा असतो! अशा भिती खाली वावरणारा समुह तत्कालीक प्रतिक्रिया हिन्सक बनुन देतो मात्र त्याने त्याच्या भावना तशाच दाबुन ठेवल्या तर कालान्तराने असा समुह किन्वा समाज स्वत्व विसरुन जावु शकतो किन्वा षण्ढ मानसिकतेत जावु शकतो, आणि अशावेळेस जर युद्ध किन्वा तत्सम सन्कटे आली तर धैर्य हीन समुह त्यास प्रतिकार करु शकत नाही येवढेच नव्हे तर प्रतिकार करणार्‍या यन्त्रणान्ची असा समुह एक अडचण होवुन बसते. लॉन्ग टर्म मधे हे सर्व होणे त्यान्ना अपेक्षित असते याचे कारण, काश्मिर मधुन पन्डित हाकलणे तुलनेने सोपे होते, खलिस्तानवाद्यान्ना हाताशी धरुन अप्रत्यक्षरित्या घात करणे अजुनच सोपे होते, मात्र सुदूर महाराष्ट्रात मुम्बै सारख्या ठिकाणी काही करणे तितकेसे सोपे नाही व आत्ता महाराष्ट्रात जे होते आहे त्याच्या मूळ रचनेची पाळेमुळे वीस पन्चवीस वर्षान्पासुन रोवली गेली असणार हे निश्चित! इराकने जसा कुवेतवर कब्जा केला किन्वा हिटलरची झेक, पोलन्ड वरचा कब्जा अशासारखी कृत्ये डायरेक्ट करणे पाकिस्तान किन्वा अन्य इस्लामिक देशान्ना सहज शक्य नाही पण पॅन इस्लाम चे त्यान्चे स्वप्न नजरेआड करुन जर आपण विचार करु लागलो तर तो आपलाच आपण केलेला घोर अपराध ठरेल.
वर लिहिल्याप्रमाणे येथिल व्यवस्था खिळखिळ्या करीत, नागरिकान्चे मनोधैर्य खच्ची करीत, त्यान्चा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडवुन लावित शेवटचा झटका योग्य वेळेस देणे असा काही एक आराखडा त्यान्चा असु शकतो. त्यान्च्या या आराखड्यास अधिकच खतपाणी घालण्याचे काम सद्ध्याचे सरकार सातत्याने करीत आले आहे! त्याची असन्ख्य उदाहरणे आहेत. साधा पोलिसान्चा पगार वाढवायचा तर यान्ना वर्ष वर्ष विचार करावा लागतो आणि वर्षानुवर्षे प्रश्ण चिघळत ठेवुन त्याचेही राजकारण केले जाते! येथे सत्ता राबवताना इन्ग्रजान्चे धोरण हे नेहेमीच पोलिस व सैन्य यान्ना डोइजड न होवु देण्याचे होते, त्यान्च्या दृष्टीने तो विषय बरोबर असला तरी स्वतन्त्र भारतात पोलिस व तत्सम तपास व कायद्याच्या अम्मलबजावणी करणार्‍या यन्त्रणेची येवढी कृर थट्टा केली गेली त्याची फळे देशात सर्वदूर बघायला मिळतात, अर्थात आपण काय करतो हा विषय नसल्याने त्यावर अधिक भाष्य करीत नाही. पण या चुका जर टाळल्या नाहीत तर अतिरेक्यान्चे अधिकच फावणार आहे, शिवाय पैसे खावुन कोणतेही नियमबाह्य काम देखिल करुन देण्याची वृत्ती अन्तर्गत सुरक्षेस बाधा आणणारी ठरणार आहे आणि हे सर्व बदलविण्यास आत्यान्तीक टोकाची इच्छाशक्ती असलेले राजकारणी ज्या दिवशी सत्ते येतिल तो दिन सुदीन.
तु विचारलेला प्रश्ण येवढा व्यापक हे की असे एखाददुसर्‍या पोस्ट मधे त्याच्या उत्तराचे सम्यक स्वरुप दाखविता येत नाही.

>>>>>>
जर त्यांची यंत्रणा येवढी मजबुत व कार्यक्षम आहे तर ते अन्य कोण कोणते मार्ग काय कारणाने चोखाळू शकतील?
वाकड्या, मला तुझ्याकडुन हा प्रश्ण अपेक्षित नव्हता, पण विचारल हेस तर सान्गतोच. मी आधीच्या पोस्ट मधेच लिहिले आहे की शत्रुन्ना शहाणे करु नका, ते शहाणे होतील किन्वा त्यान्ना नवनविन कल्पना मिळतील असे काही होउ देवु नका! तुझ्या या प्रश्णाचे उत्तर यामुळेच देता येत नाही कारण कदाचित त्यान्ना सुचले नसतील असे मार्गही चर्चेत येवु शकतात! आणि मी त्यावर एक शब्दही लिहिणार नाही, तुही विचारु नयेस :-)}
>>>>> मी असे विचारतो आहे की त्यांचे नेमके साध्य काय असावे?
पॅन इस्लाम हे त्यान्चे सातत्याचे साध्य हे! तूझा प्रश्ण केवळ बॉम्ब स्फोटान्पुरता मर्यादीत असेल तर त्याचे उत्तर वर आलेच आहे, पण एकुणात प्रत्येक दहशतवादी कृत्यान्च्या एकत्रित परीणामात त्यान्ना काय साध्य करायचे तर ते "पॅन इस्लामिक राष्ट्र" हेच होय, आणि ते करताना भले भारतातील मुस्लिम भरडले गेले तरी त्यान्ना ते चालणार हे! चालत हे! किम्बहुना नविन राष्ट्राच्या जन्मा वेळेस येथिल गरीब लाचार अशिक्षित अडाणी मुस्लिम जनता त्यान्च्या अडचणीचीच ठरणार असल्याने परस्परम समर्पयामी असे झाले तर त्यान्ना ते हवेच आहे!
दन्गली हे या प्रश्णान्चे उत्तर नाही मात्र सरकार जर हातावर हात ठेवुन मतान्च्या राजकारणाकरता कसलीच ऍक्शन घेण्याचे टाळत असेल तर जनतेलाच या प्रश्णाची मिळतील ती उत्तरे शोधावी लागतील, जनता शोधेल! परिणामस्वरुप अर्थातच भयानक असेल, ते टाळणे राज्यकर्त्यान्च्या हाती हे पण सद्ध्याच्या राज्यकर्त्यान्कडुन कसलीच अपेक्षा बाळगता येत नाही हेही तितकेच दुर्दैवी सत्य हे!
लक्षात ठेवा, मोदी पॅतर्न (?) आपोआप एखादा विशिष्ठ पक्ष सत्तेत आला म्हणुन निर्माण होत नसतो किन्वा एखादी गोद्ध्रा सारखी घटना त्याला कारणीभूत नसते, त्यामागे आधीच्या कित्येक वर्षे नव्हेत तर दशकात घडलेल्या आणि खोल वर रुजलेल्या घटना कारणीभूत असतात! राज्यकर्त्यान्चा दीर्घकाल चाललेली निष्क्रियता कारणीभुत असते! गुजरात हे त्याचे एक ढळढळीत उदाहरण हे!
इन एनी केस, अतिरेक्यान मार्फत केलेल्या असल्या हल्ल्यान्मुळे काश्मिरातले पन्डीत बेघर होवु शकले असतील पण बाकी देशातली सर्वच्या सर्व जनतेचा नाश ते करु शकत नाहीत हे ही तितकेच खरे आणि अजुनतरी महाराष्ट्रातील जनतेचे नितिधैर्य शाबुत हे इतके की वेळेला अतिरेक्यान्चा प्रतिकार देखिल ते करु शकतील! मात्र पुन्हा तशी यन्त्रणा उभारण्याचे मनोधैर्य आणि इच्छशक्ती जर सरकारातच नसेल, गिल सारखे अधिकारी उपलब्ध नसतील, असलेल्या अधिकार्‍यान्वर भलतीच कामे सोपवली असतील तर सद्ध्या तरी तेही कठिणच दिसते आहे, पण वाट बघु! प्रश्ण येवढाच हे की खलिस्तान चळवळी वेळेस पन्जाब मधे परिस्थिती जेवढी चिघळली गेली तशी येथे निर्माण होइस्तोवर आम्हा वाट बघायला लागणार का?
आणि तरिही, येवढा काही हा महाराष्ट्र दुर्दैवी नाही आणि त्याची परम्पराही हातात बान्गड्या बसण्याची नाही!
ही पोस्ट मला सलग लिहिता आली नाही हे सबब तुटक तुटक वाटेल


Limbutimbu
Friday, July 14, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> अरे लिंबुटिंबू, तुम्ही एकमेकांशीही मेलम्धून बोलता? गंमतच आहे.
हे ईमेल, interenet प्रकरण नवीन होते ना, तेंव्हा एकाने सगळ्या ईमेल services वर एमेल IDs open केले. पण त्याला कुणीच मेल पाठवेना. वैतागून शेवटी तो या email ID वरून त्या email ID वर स्वतःच स्वतःला मेल पाठवी. आणि त्याच मेलचा reply सुद्धा देई. का कुणास ठाऊक त्याची आठवण झाली.

कणेकर, त्यापेक्षा तुम्हाला मी गेले वर्षभर मायबोलीवर उघडपणे लिहित असलेली "स्वगत" आठवली असती तर ते अधिक परीणामकारक ठरले असते! नाही का? :-)
वर वाकड्याला उत्तर दिल हे, जमल्यास तुम्ही पण वाचा!


Mahaguru
Friday, July 14, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

check out this link below which gives salaries of US White House Staffers:

http://nationaljournal.com/about/njweekly/stories/2006/0711nj1.htm

Did you know "Gift Analysts, Correspondence Analysts" make $30,000? A Senior Trip planner makes $37,000. Deputy Director for Mail Analysis makes a little more than a lowly Correspondence Analyst at $41,400. Speechwriters make $42,300, however, director of presidential writers makes $51,700.

However, the most outrageous is that Supervisor of data entry makes $82,509 and Director of Lessons Learned (yes - there is such a position) makes $106,641!!!!


Wakdya
Friday, July 14, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Limbutimbu धन्यवाद
तुमच्या पोस्ट वरुन नेमके काय चालले आहे याचा थोडा थोडा अंदाज येतो आहे
उत्तर न देण्याचा तुमचा मुद्दा मान्य
कृपया तुम्ही येवढ्या मोठ्या पोस्ट ऐवजी दोन तीन लहान पोस्ट टाकाल का?


Iasanil
Friday, July 14, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are koni mail karal kaay mala maitri karayal aavdel?
iasanil@yahoomail.com

Moodi
Friday, July 14, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या तू लिहीलेस छान पण वाकड्या म्हणतात त्याप्रमाणे विभागुन पोस्ट टाकत जा ना. ही पोस्ट मोठी आहे( मला वाचायचा कंटाळा आलेला नाही, पण एवढी मोठी नको टाकुस)

बीबी बंद पडला?( दचकलेला चेहेरा)


Limbutimbu
Friday, July 14, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग मूडी, वाकड्या म्हणतो तस तुकड्या तुकड्यात टाकीन, :-) (ड्या ड्याच काय मस्त यमक जुळत हे ना? D
अग उठत बसत एकिकडे लिहित गेलो नि शेवटी वैतागुन पोस्ट केली, प्रीव्ह्यू देखिल बघायला जमला नाही! :-(
वाकड्या, पॉइण्ट नोटेड :-)
नशिब तुला तरी थोड थोड तरी समजल..... मला वाटल की घरन्गळुन गेल की काय!
DDD

Zakki
Friday, July 14, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A Senior Trip planner makes $37,000. Deputy Director for Mail Analysis makes a little more than a lowly Correspondence Analyst at $41,400. Speechwriters make $42,300, however, director of presidential writers makes $51,700.

However, the most outrageous is that Supervisor of data entry makes $82,509 and Director of Lessons Learned (yes - there is such a position) makes $106,641!!!!

अहो महागुरु, हे पगार काहीच नाहीत हो!! खाजगी क्षेत्रात याहूनहि जास्त पगार असतात! हे पगार खाजगी क्षेत्राच्या मानाने ब्रेऽच कमी आहेत.
साधारण पणे, पगार, काम, लायकी यांची गणिते इथे वेगळी आहेत. शिवाय हुद्दा हा प्रकार सुद्धा फारसा महत्वाचा नाही. त्यातून हे सगळे ' suits ', म्हणजे कचेरित बसून लिखा पढीचे काम करणारे लोक. जे plumbing, electrical, auto mechanic , वगैरे असतात त्यांना कमीत कमी वेतनाच्या कितीऽतरी पटीने अधिक पैसे मिळतात.

तेंव्हा जाऊ दे झाले. त्यामुळेच तर ९ ट्रिलियन डॉलर्स चे कर्ज सरकारच्या डोक्यावर आहे!


Santu
Friday, July 14, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु
अरे मोदि पॅटर्न च पाहिजे. लबाडाशी महा लबाडिने
वागले पाहिजे. एक सैनिकाचे अपहरण केले म्हणुन इस्रायल ने
कशी त्यांची वाट लावली. हा छोटा देश जर इतका
स्वाभिमान दाखवत असेल तर आपल्याला का हे जमत नाहि.
मुसल्माना शी तुम्हि कसे हि वागा शेवटि हे आपलि तांगडि वर करणारच.
खरे तर ज्या गावातुन हि रसद लश्कर व सिमि ला पोचते त्यावर.उपाय म्हणजे त्यांचे मतदान अधिकार काधुन घेतले पाहिजे.

आता ही बघ ताजि बातमी बाई सारखा बुरखा घालुन सहार विमानतळावर आलेल्या
एका मुसल्मान पायलट ला पोलिसांनि अटक केली.म्हणजे प्रत्येक बुर्खाधारिची तपासणी केली तरी हे परत बोंब ठोकणार


Kedarjoshi
Friday, July 14, 2006 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिबुंभो,

उत्तर भन्नाट आहे. मला नवाकाळ मधला अग्रलेख वाचत आहे असे वाटले.


Lalu
Friday, July 14, 2006 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<--->माफ करा, पण मला कोणी या स्फोटांमागच्या हेतुंबद्दल काही सांगु शकेल का? जसे की त्यांना नेमका काय परिणाम होणे अपेक्षित असावे? जर त्यांची यंत्रणा येवढी मजबुत व कार्यक्षम आहे तर ते अन्य कोण कोणते मार्ग काय कारणाने चोखाळू शकतील?
मी असे विचारतो आहे की त्यांचे नेमके साध्य काय असावे?
गुन्हेगारांचा गुन्ह्यामागचा उद्देश किंवा हेतू कळल्या खेरीज तपास व उपाय योजना पुढे गति घेवु शकत नाहीत याकारणे ही विचारणा करतो आहे, कृपया जाणकारांनी मत प्रदर्शित करावे ही विनंती

वाकड्या, हा प्रश्न तुला किंवा कोणालाही का पडावा? जगभर असले प्रकार करणार्‍यांचा सगळ्यांचा उद्देश साधारण सारखाच असतो. आणि ज्या गोष्टीचे समर्थन करता येऊ शकेल अशाच गोष्टीचा उद्देश, हेतू जाणून घेण्यात अर्थ आहे. असल्या कृत्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकणार नाही हे सगळ्यानाच माहित आहे. चोराने चोरी का केली असावी विचरण्यापेक्षा त्याला शिक्षा होणे आणि तो ती करण्यात यशस्वी झालाच कसा हे शोधणे महत्वाचे. त्यामुळे तुझा 'अन्य कोणकोणते मार्ग चोखाळू शकतील' हा प्रश्न बरोबर आहे. 'काय कारणाने' याला महत्व नाही. जगात अशा प्रवृत्तीचे लोक कायमच असणार आहेत. "कारणे शोधा, ती दूर करा म्हणजे हे थांबेल" असे काही अस्तित्वात नाही. निदान या बाबतीत तरी. गुन्हेगारांना शोधणे, जबर शिक्षा करणे नवीन प्रकार होऊ नयेत म्हणून लक्ष ठेवणे हाच उपाय.

Ninavi
Friday, July 14, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबूभाऊ, तुमची Friday, July 14, 2006 - 12:19 am: ची पोस्ट सही आहे. पटलीच एकदम.

( बघ, इतकी पटली की लिंब्या किंवा अरेतुरे म्हणवेना मला.)


Moodi
Friday, July 14, 2006 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेही लोक आहेत समाजात.

http://www.loksatta.com/daily/20060715/mp05.htm

अन आता तरी अशा भेकड, संधीसाधु नाच्यांना मत देऊ नका.

http://www.loksatta.com/daily/20060715/mum07.htm

Limbutimbu
Saturday, July 15, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तू, केदार, निनावी धन्यवाद! :-)
केदार, नाही रे भो, कुठे अग्रलेखान्चे (स्वयम्घोषित) बादशाह खाडिलकर, अन कुठे आम्ही "तट्ट फुगलेल्या पोटावर हात फिरवित" बाता करणारे!


Wakdya
Saturday, July 15, 2006 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalu मला त्यांचे अंतिम ध्येय काय असावे व या बॉंबस्फोटातुन ते कसे काय साध्य होणार, जर होणार नसेल तर नेमका उद्देश काय या विषयी जाणुन घ्यायचे होते. एलटी यांच्या उत्तरात बरेचसे मुद्दे आले आहेत. तुमची शंका रास्त आहे पण मला त्यांचे उद्देश समर्थनीय आहेत की नाहीत हे तपासायला जाणुन घ्यायचे नाहीत तर ते उद्देश नेमके पणे समजले तर प्रतिकाराची सर्वस्तरिय व्युहरचना करणार्‍यास करणे सोपे जाते म्हणुन विचारले, किमान माझ्या विचारात अधिक स्पष्टता असावी म्हणुन अभ्यासाच्या दृष्टीने मी ते प्रश्न विचारले

Santu
Saturday, July 15, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि
अग मूडिताई
एवढी वैचारिक प्रगल्भता
असती तर हा नाच्या निवडुन आला
असता का?
मुख्य म्हणजे लोक शहाणे असते तर
हा प्रश्न च आला नसता


Moodi
Saturday, July 15, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिनेमात दहा गुंडांना लोळवणारा, मैय्याका दुलारा, उसके हाथोंकी रोटी अन गाजर का हलुआ खाने वाला हमेशा समाजका और देशका तारणहार होता है रे संतु.
डान्सबारच्या बंदीनंतर बारबालांची बाजू घेणारा हा गोंद्या मुंबईत पूर अन आता असे घडल्यावरही लोकांची विचारपुस करायला येऊ नये यातच सर्व काही आले. हे बघ ही बातमी.

http://www.hindustantimes.com/news/181_1743834,000900010009.htm?headline=Largest~Indian~state~now~hub~for~Pak~spies

जर नाही दिसले तर आजचा हिंदुस्तान टाईम्स बघ.


Mahaguru
Sunday, July 16, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या वृत्तपत्रांमधे आले आहे की अनेक राजकीय नेत्यांनी पोलिस आयुक्त आणि इतर पोलिस अधिकारी यांच्या बदलीची मागणी केली आहे. कारण काय तर एक आठवडा झाला तरी तपासांमधे प्रगती दिसुन आली नाही.
मला पोलिस अधिकारी यांची बाजु मांडायची नाही पण ...
ह्या हिशोबाने सर्व राजकारणी यांनी राजीनामा द्यायला हवा ..देशाला स्वातंत्र्य मिळुन इतकी वर्षे झाली तरी गरीबी , महागाई, बेकारी हे प्रश्नांबाबत काहीच प्रगती नाही.

Moodi
Sunday, July 16, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलीसांवर दडपण आधी राजकारण्यांचेच असते, तेच त्यांच्या अधिकारात, कर्तव्यात ढवळाढवळ करतात, आधी त्यांचीच सखोल चौकशी करायला हवी हा सकाळमधील लेख त्यावरच आहे.

http://www.esakal.com/esakal/07162006/NT00AFC47E.htm

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators