|
Jaaaswand
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:41 am: |
| 
|
Mods पोस्टचा विषय योग्य नसेल तर उडवून टाका.. लिंबुभाऊ मला तुमच्या बरोबर वाद घालायचा नाहीये..... फ़क्त तुमच्या वरील पोस्ट मधली विधाने पटली नाहीत. वाक्ये वीषाने बरबटलेली आहेत का नाही हे ठरवणारे तुम्ही कोण तसेच एका अनभिज्ञ ( माझ्यासारखाच ) user-id ने इथे देशप्रेमाच्या गप्पा मारायला किती धीटपणा लागतो हे मी सांगायची गरज नव्हे
|
जास्वन्द, तुम्ही उद्धृत केलेल्या त्या वाक्याचा सन्दर्भ घेवुन मी जे काही भाष्य केल हे त्यात व्यक्तिश तुम्ही किन्वा अजुन कोणी एकटे नजरे समोर नाहीत! तिथे मी अनेकवचन वापरल हे! तुम्हाला वाईट वाटणे किन्वा राग येणे स्वाभाविक हे पण माझा तुम्हाला दुखविण्याचा हेतु नाही! तसेच मी वादही घालु इच्छित नाही! उलट तुम्ही त्या तशा वाक्याचे उदाहरण दिलेत यावद्दल तुमचे आभारच मानतो! कोणत्याही गोष्टीचा विषारीपणा, ती गोष्ट ज्या ठिकाणि तसा परिणाम करते त्या सापेक्ष असतो! मला भासलेले वीष कुणाला कदाचित अमृतासमानही भासु शकते! त्यामुळे कशाला वीष, कोणी ठरवायचे हा मुद्दाच निकालात निघतो! आजचा कोट "वीषही सापेक्ष असते, द्वैतवादी असते!" आणि हो, मी धीट नाही हे! म्हणुन तर आयडीच्या बुरख्या खाली वावरतो हे! पण त्याचबरोबर, असा बुरखा घालुन वावरावे लागते याचाच अर्थ ते कसले "विचार स्वातन्त्र्य" वगैरे गोष्टी भारतातही अजुन स्वप्नवत हेत हे सान्गायला कोणा जाणकाराची गरज नाही, नाही का? आणि तरीही, जास्वन्द, माझ्या पोस्ट्स मधे आत्यन्तीक त्रागा झाकुन ठेवण्याच्या नादात कधि कधि ठासुन उपरोध भरला जातो, मी तो वैयक्तीक असा कधीच वापरीत नाही, मला नेहेमी समुहच अपेक्षित असतो, तेव्हा वरील पोस्ट मुळे तुम्ही दुखावले गेले असल्यास मी तुमची माफी मागतो, मात्र मला ते वाक्य डिलीट करायला सान्गु नका, कारण आधीच्या पोस्ट मधे बुद्धिभेदाचा हा "कुणी सान्गु पाहिले तर त्याचा बुद्धिभेद करायला अनेक बाबी सरसावुन असतातच " उल्लेख केला हे त्याकरता ही असली वाक्ये अनेक बाबीन्पैकी एक म्हणुन फिट बसतात! आणि विषयाच्या ओघात नेमकी तुमची पोस्ट नन्तर वाचली आणि ते वाक्य उदाहरणादाखल मनात आले म्हणुन मी तसे सान्गण्याचा प्रयत्न केला!
|
Pinaz
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:11 am: |
| 
|
>>>> मुर्खासारखे वा इरिटेटिंग बडबडून पुढच्या हत्याकांडाचे अप्रत्यक्ष समर्थक तरी बनू नका. अरे GS वेड बिड लागलेय का तुम्हाला? कोण असल्या गोष्टींचे समर्थन करणारे? सगळे मिळून निशेध नोंदवत असताना तुम्ही उगाच भांडणे उकरून काढू नका बाई.. कधी आणि कुठे तावातावानी भांडायचे हे कधी कळणार बाई लोकांना?? तुम्हाला न पटेल असे कुणी बोलले तर इतका का राग येतो तुम्हाला? मी मागेही हेच पाहिले होते. पण आता तुम्ही वेळ काळाचे भानही ठेवले नाहीत, म्हणून बोलावेसे वाटले. sorry
|
पिनाझ, मी तुमच्याशी सहमत नाही! वेळकाळाचेच भान बाळगायचे तर राजकीय पक्षान्ना सरकारच्या केलेल्या रास्त सकारण निषेधाद्वारे जनतेचे प्रबोधन करण्याचा जो अधिकार हे त्यालाच मुर्ख व इरिटेटिन्ग ठरविणे हे किमान मला तरी पचायला जड गेल, म्हणुन पक्षिय अभिनिवेश न ठेवता मी माझ्याकडुन उत्तर दिले! जीएस ला काय वाटले त्याप्रमाणे त्याने उत्तर दिले, यात तावातावात भाण्डने होताहेत असे मला तरी वाटत नाही! चु. भु. दे. घे. बट माय ऑब्झर्वेशन... बर्याचदा जीएस अन माझे विचार एकत्र जुळलेले किन्वा किमान समान्तर असतात.... असे का बर? की "ग्रेट पीपल, मे बी एनी व्हेअर, थिन्क्स इक्वली" हे विधान आम्हाला लागु पडते?
|
Ajjuka
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:24 am: |
| 
|
पिनाझ बाई, सगळ्यावेळेला सगळंच गोड गोड असत नाही हो..
|
Pinaz
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:32 am: |
| 
|
हे पहा, मला वादात पडायचे नाही. झाले त्याचे दुःख सगळ्यांनाच आहे. कुणीतरी कुणावर तरी राग काढत आपला निशेध व्यक्त करतच आहे ना? काहींनी नारायण राणेवर काढला काहींनी बाकींच्यांवर काढला.. मला इतकेच म्हणायचे आहे की आपल्या आपल्यात भांडणे नको करायला आपण.. किमान या वेळेस.. त्याने काय होणारे? इतर वेळेस आपण कायम भांडतच असतो.. म्हणून मी बोलले.. चुकले असेल तर sorry म्हटलेच आहे. पण मलाच देशाची काळजी खुप आहे, आणि इतरांना नाहीये, हा आविर्भाव मला तर काही पटत नाही. तुम्ही काही म्हणा. मी परत यावर बोलणार नाही. लिंब्या... fools also think alike, do u know? ~D
|
Tanya
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:36 am: |
| 
|
टुलिपने दिलेली वरिल लिन्क वाचली. काहिच नाही तर भारतातील हिन्दु जनता अजुनही मुसलमान स्त्रियांवर अत्याचार करते, त्यांना वेगळी वागणुक देतात, जिवंत जाळतात......,अजुनही हे so called पाकिस्तानी न घडलेल्य्या गोष्टी किती काळ उगाळत बसणार आहेत. काहीच नाही तर शिवसेनेनेच bomb blast केलेत... आणि blah blah..... आणि हीच त्यांच्या डोक्यातील किड भारतातल्या लोकांना फितवतेय. आताच आमच्या इथल्या news channel वर सांगितल, की खार की सांताक्रुझ ला बॉम्बस्पोट करणार्यांपैकी काहींची माहिती उघडकीस आली आहे की ते इस्लाम धर्मिय असुन मालाडला भेटुया असे काहिसे म्हणाले. (मालाडला देखिल मालवणी एरिया हा त्यांचाच.) हव्यात कशाला मतांसाठी ह्यांच्या पाया पडायला, त्यांची दाढी कुरवाळायला. हव तर रहा नाहितर जा तुम्हाला दिलेल्या मुलुखात. ह्यांच्यामुळे देवळात जायला भिती, तिथे security check मधुन बाहेर पडा, आणि मग देवाच दर्शन घ्या. मशिदीत जाताना असले सोपस्कार कुठे असतात? ह्यांच्यासाठी वंदे मातरम् म्हणायच नाही,देवळात आरती सावकाश करायची, गणपतीची मिरवणुक मशिदीवरुन न्यायची नाही आणि असे अनेक नियम आपण आपल्यावर स्वतःहुन लावुन घेतल्यावर ते आपल्यालाच पाळायला हवेत. नाही पाळलेत तर आपण जहाल, मुस्लिमद्वेष्टे. चालायचच, जोपर्यंत आपल्या राजकारण्यांचा वरदहस्त त्यांच्यावर आहे तोपर्यंत अश्या काय यापेक्षा भयंकर गोष्टी नुसत्या डोळ्यांनी काही न करता नुसत्या बघायच्या.
|
>>>>> लिंब्या... >>>>> fools also think alike, do u know? ~D Yep Pinaz, पण मग ते "फुल्स" देखिल "ग्रेट फुल्स" असायला हवेत 
|
Jaaaswand
| |
| Wednesday, July 12, 2006 - 11:06 am: |
| 
|
लिंबुभाऊ... तुम्ही केलेल्या " संदर्भासहीत स्पष्टिकरणाबद्दल " धन्यवाद आता माझ्याकडून थोडेसे... तुम्ही ज्याला विषारीपणा म्हणालात..ते कुणाला अमृतासमान भासू शकेल.... कुणाला माहितीय का ( मला फ़क्त क्रोसीन ची कडू गोळी वाटली... घाम फ़ोडणारी ) म्हणून बोललो... ते काहितरी.. चटका मांडीला तूप शेंडीला वगैरे म्हणतात तसे वाटले म्हणून अज्जुका.. तू म्हणालीस.. भ्रष्टाचारामुळे आतंकवाद्यांचे फ़ावते... बरोबर आहे... पण बहुतांशी भ्रष्टाचारच जबाबदार आहे असे नाही... अन्यथा ह्या हलकट लोकांच्या " फ़िदायीन " संघटना स्थापन झाल्या नसत्या.... लिंबु भाऊ.. अजून एक मुद्दा तुम्हांला स्पष्ट करतो... ह्या बाबतीत मी अजिबात मुस्लीमांची पाठराखण करत नाहीये... संघी संस्कार तुम्हांला सांगायला नकोच तुम्ही आत्मपरिक्षणा बद्दल म्हणालात म्हणून सांगतोय.... आपल्याच घरातले ( देशातले ) लोक घरभेदी पणा करतायेत.. ह्याचा काही अंशी आपला त्यांच्याबरोबर असलेला वैरभाव / डोळेझाक पणा / दुटप्पीपणा तर जबाबदार नाही ना.... अज्जुका.. तू म्हणत असलेल्या.. आपण बदलण्याच्या प्रक्रियेत हा मुद्दा येऊ शकेल ना
|
Parinita
| |
| Wednesday, July 12, 2006 - 11:26 am: |
| 
|
तुमी लोक एकमेकांषी इथे भांडुन हा प्रॉब्लेम कसा सोल्व होनार मला कळत नाही कोनताहि धर्म हिंसा शिकवत नाही. सर्व धर्म देवाचेच आहेत असे सर्व धर्मात सांगितले आहे. मग का भांडताय तुम्ही सर्कहे हिम्दु मुसलमान हिम्दु मुसलमान असे. terarisTanA धर्म नसतो हेच तुमल कळत नाही का.सगलिकदे हीच भांडने चालू. वाईट वाटल बघून.
|
जास्वन्द, मुस्लिम द्वेषाचे जसे चित्र रन्गविले गेले किन्वा कॉन्ग्रेसकडुन रन्गविले जाते तसेच ते आहे असेही नाही, उलट सर्वसामान्या हिन्दुत्ववाद्यान्चेच अनेक जवळचे मित्र मुस्लिम असतात, आहेत. माझा निषेध किन्वा सरकारकडुन ऍक्शनची अपेक्षा ही गल्ली गल्लितुन मोहल्ल्यातुन लपुन रहाणार्या अतिरेक्यान्विरुद्ध व त्यान्ना आधार देणार्यान्विरुध हे! सरकारला जर दन्गली घडायला नको असतील, दन्गलीत सुक्याबरोबर ओले तसे अपराध्यान्बरोबर निरपराधही भरडले जातात तसे व्हायला नको असेल तर मुळात दन्गली करण्याइतपत मानसिकतेला समाज येण्या आधीच सरकार स्वतः का कोणतीच कृती करीत नाही? कळीचा मुद्दा इथ हे! सरकारला निरपेक्ष धर्मनिरपेक्षता राबवायची हे ना? इथे सरकार म्हणजे कॉन्ग्रेस! तर तथाकथित हिन्दुत्ववादी पक्षान्ना सन्धि मिळु नये म्हणुन तरी किमान सरकार काही रास्त कारवाई करेल असे वाटले होते पण तिथेही नन्नाचा पाढा, या अर्थी कॉन्ग्रेसला कसलेही धोरण (पॉलिसी) नाही, स्वतःचे हीत साधण्याचीही नाही तर देशाचे हीत काय साधणार? माझ्या मते दोन जागान्वरुन सत्तेत आलेल्या बीजेपीला वर उचलण्यास कॉन्ग्रेसची ही "नसलेली पॉलिसीच" कारणीभुत ठरली, राममन्दीर नव्हे! अजुनही कॉन्ग्रेसने नागरिकान्च्या रास्त प्रश्णान्वर काम करुन दाखवावे, ते सर्वदूर सत्तेत येतिल! पण देश पातळीवर "गान्धी" या आडनावाच्या आधारासाठी "सोनिया" चे नेतृत्व स्विकारणारी कॉन्ग्रेस कसल्या भरीव देशहीताच्या पॉलिसी राबवेल असे वाटत नाही! आणि सर्व ठिकाणचा कॉन्ग्रेसचा बोटचेपे पणा या देशाला नको तिथ नेइल हे सान्गायला ज्योतिषाची गरज नाही!
|
Parinita
| |
| Wednesday, July 12, 2006 - 11:55 am: |
| 
|
इथे राजकारन आनु नका. सारख कॉंग्रेस कॉंग्रेस तर मग तुम्हि काय केल ? तुमी देशभक्त लोक बॉर्डरवर का नाही जात लढायला.
|
Jaaaswand
| |
| Wednesday, July 12, 2006 - 11:57 am: |
| 
|
लिंबुभाऊ.. एकदम मनातलं बोललात.. मी आधीच म्हटले आहे... Vote Banks साठी... कुठल्याही गोष्टिचे राजकारण होते.. आणि सगळी मेख इथे आहे.. POTA काढून टाकायची काही एक गरज नव्हती.. पण ते झाले... आणि " गांधी " ह्या आडनावामुळे... देशाला किती तोटा झाला.. हे गेले ५९ वर्षे आपण बघतोच आहोत.. असो तो मुद्दा इथे नको काल CNN वर आपले HM पाटील साहेबांचे statement पाहत होतो.. माणूस इतक्या वाईट प्रसंगी इतका मख्ख कसा असू शकतो... कुठल्यातरी PA ने दिलेले statement वर्गात धडा वाचायची शिक्षा केलेल्या मुलासारखे वाचत होते... मला अगदी किव वाटली त्यांची पण.. आणि माझी पण तो बुश कूटनीतीमधे माठ असेल अगदी.. पण त्याला.. त्याच्या यंत्रणेला emergency मधे inspire करण्याची ताकद आहे... ह्या पाटलांसारख्या नेत्यांकडे देशाच्या कायदा-सुव्यवस्था ह्यांची सुत्रे म्हणजे काय म्हणावे आता..................
|
तू शिवराज पाटीलान्बद्दल बोलतो हेस ना? मी पण बघितले काल टीव्हीवर! माणुस चान्गला हे पण प्रचण्ड दबावा खाली वाटला! आता दबाव काय बोलाव काय नको याचा की मॅडमची परवानगी शिवाय कस बोलू याचा ते माहीत नाही! बुश बद्दलचा तुझा मुद्दा पटला! अरे जनतेसमोर जाताना जनतेला किमान भावनीक बळ येइल, आधार वाटेल, इतके देखिल प्रेझेन्टेशन असु नये? याचाच अर्थ सन्कटकाळी कुणी काय वागावे काय बोलावे कुणी काय काय करावे याचीही पॉलिसी नाही! उलट घटनास्थळी लौकरात लौकर पोचुन टीव्हीवरच्या फुकटच्या प्रसिद्धीची सन्धी कशी मिळेल ते बघण्यात मग्न! आणि त्याचच कौतुक जास्त! सुरक्षा यन्त्रणेवर आधीच इतका ताण असताना या व्हीव्हीआयपी त्याउलट ते बीजेपी वाले बघा, घटना घडली की यान्ची थिन्क टॅन्क कामाला लागली! दिल्लितला पुढारी असो की कुठे दूर गुजरातेत भाषण देणारे अडवाणी असोत, बोलण्याचे सुत्र समान होते! हा फरक जाणवण्यासारखा होता! पण बार्किन्ग स्व्काड साम्भाळाण्यायेवढीच "पॉलिसी" असल्याने असल्यावर काय होणार?
|
Avinashi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 2:02 pm: |
| 
|
सोनिया" चे नेतृत्व स्विकारणारी कॉन्ग्रेस कसल्या भरीव देशहीताच्या पॉलिसी राबवेल असे वाटत नाही! आणि सर्व >>>> bjp कदे तर काहिच नाही ना धोरन ना देश्प्रेम.. फ़क्त.. हानमारि उद्या लिम्ब्या तु त्या रहुल महाजन ला पन मत देशिल, अरे एकाच देशत दोन राहुल वढताहेत दोघन्च्या संस्कारात जमिन अस्मानाचा फ़रक आहे.पण तुम्हा झापडबंद लोकांना कळत नाहि.
|
Avinashi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 2:05 pm: |
| 
|
naarayan raanelaa shivyaa denaare tyaa saapaalaa aadhi koni paalale hote, aataa to pinjaryaatun palala tar laagale bombaa maaraayalaa...aani to udhav thaakare kaay bolato.. kaay tyaache to.nd.. are shivyaa dyaayachyaat naa virodhii paxaalaa aamhii pan deu shakato, pan vishay to navataa maajhyaa raajaa.
|
कोनताहि धर्म हिंसा शिकवत नाही. सर्व धर्म देवाचेच आहेत असे सर्व धर्मात सांगितले आहे. मग का भांडताय तुम्ही सर्कहे हिम्दु मुसलमान हिम्दु मुसलमान असे>>>>>>>>परिनीता, अग अस फक्त पुस्तकात लिहीलेले असते, तस नसत तर दंगली, युध्द का झाले असते. धर्माच्या नावावर युध्द होनारच. फक्त आपल्या हिदुंधर्मात सांगीतले जाते की सर्व धर्म समभाव की काय ते. अस्तीत्वात तसे नाही. नाहीतर भारतावर त्यांनी ७०० वर्षे राज्य केले नसते. बाटाबाटी झाली नसती. एवढेच नाहेई तर सध्या जी खिश्नन बाटाबाटी चालीये, ती पण झाली नसती. तुम्ही ज्या धर्मात जन्मलात तो ती तुमची porperty . जसे word doc ला right clck केल्यावर कोनी ते doc तयार केले आहे ते दिसते तशी. तु स्वप्नलोकात राहु नकोस नाहीतर पसतावायची पाळी येईल. आता थोडे कालच्या स्फोटांविषयी. KUDOS to all the buyers who bought stocks yesterday. everybody was feeling that Markets will crash again and that will be a worst effect on economy, but wise buyers did went in for BUY and told the terriosts that this tactis will not work now in India. May be this was their way to show Patriotism. Market went up buy 315 points. Well done. माझे लगेच economy वरचे पोस्ट बधुन मला व्यवहारी समजु नका. पण अशा स्फोटांनंतर लगेच economy पण कोसळते हा अनुभव आहे. जास्वदं आज तरी असे वाटत आहे ( एका दिवसा नंतर) की दंगली लगेच होनार नाहीत. होऊ नयेत. पण तातडीने उपाय करायची गरज आहे. आता हे उपाय कोन करनार? लिबु, जिस, मुडी अ ईतर म्हनतात तसे लगेच सरकार ने छापे, झडत्या घेतल्या पाहीजेत. अज्जुका म्हनते तसे (की आपण दोष देन्या पेक्षा स्वत्: काय करनार?) जर तुम्ही देशात राहात असाल तर मोहल्ला कमीटी नाव नोदंनी करुन आपल्या गल्लीत कशी शांतता राहील हे पहाने. रात्री च्या वेळी काही वेळ गस्त घालने. ई. करु शकाल. १९९३ च्या आसपास मी स्वत्: असे केले आहे. माझे मुळ गाव नांदेड आहे. तिथे त्या काळी व आजही काही अंशी मिनी पाक नांदते. शिवसेने आधी दंगली व्ह्यायच्या व हिंदु मारले जायचे १९९३ नंतर यात बदल झाला आज अशी स्तिथी आहे की दंगली कमी झाल्यात, भाईचारा आहे. हे का? तर शांतता ठेवायची असेल तर शांतता ठेवायचे सामर्थ पाहीजे. (बघा अमेरिका का ईतर देंशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करते)
|
Asami
| |
| Wednesday, July 12, 2006 - 3:16 pm: |
| 
|
GS1, I urge you to read my post again. With due respect to your opinions, study and whatsoever, I, neither commented upon in previous post , nor intend to address any points you have raised, except, "timing of the contents" of the official BJP statement, and not contents (as that is my sole point). For that matter, I would have posted it with same verbatim had it been for any other party. IMHO, public forum वरून बोलताना कधी आणी काय बोलायचे ह्याचे तारतम्य, विवेक प्रत्येक राजकिय पक्षाने बाळगायला हवा. विशेषतः ते पक्षाचे अधिक्रुत वक्तव्य असेल तर तसे करणे अधिकच जरूरीचे आहे. कारणमीमांसा काहीही ( आणि कितीही बरोबर किंवा चूकीची ) असली तरी कालची वेळ ते बोलून दाखवायची नव्हती, जरुरी होती ती सहानुभूतीची, आधार देण्याची, पाठीवर हात ठेवण्याची. हे बाकी सगळे नंतर येउ शकत होते. मला तरी तसे काही त्या statement मधे दिसले नाही. सर्वसामान्य तारतम्य, विवेक सगळ्याच पक्षांनी गुंडाळून ठेवले आहे. आता हाच सर्वमान्य प्रघात होउ लागला आहे, दुसरे काय ? लिंब्या मी काय लिहिले आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न केला असतास तर alas .. पण तुला अमेरीकेच्या आर्थिक धोरणापसून ते बुद्रुक मुक्कामवाडीतील अमीनाचे दहावे बाळंतपण ह्या सर्व गोष्टींपर्यंत आपले मत तात्काळ नोंदवाअयचे असते my comment was related to timings of contents in the statement and not solely to the contents
|
Saranga
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:19 pm: |
| 
|
आता तरी सरकार मदरशान्वर कडक लक्श ठेवणार आहे का?
|
Ajjuka
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:49 pm: |
| 
|
>>तुम्ही आत्मपरिक्षणा बद्दल म्हणालात म्हणून सांगतोय.... आपल्याच घरातले ( देशातले ) लोक घरभेदी पणा करतायेत.. ह्याचा काही अंशी आपला त्यांच्याबरोबर असलेला वैरभाव / डोळेझाक पणा / दुटप्पीपणा तर जबाबदार नाही ना.... << jaaswandaa.. may I say you are elaborating my views further? मला काहि उदाहरणे सुचली तुला अजून काही सुचतायत.. अश्या अनेक गोष्टी आपण करू शकतो.. होय येते हेही येते या प्रक्रियेमधे पण ते कसे execute करायचे हा वेगळा मुद्दा होईल... kedaar, good point about the economy..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|