|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 6:56 pm: |
| 
|
मॉड हे नंतर उडवले तरी चालेल. कारण ही साईट महत्वाची असली तरी दुसर्या बीबीवर आत्ता देणे योग्य वाटत नाही. मुंबई, पुणे आणि अन्य शहरात असलेले मायबोलीकर ही साईट बघा अन जमल्यास मेल करुन आपल्या मित्र नातेवाईकांना कळवा. रक्ताची खरच आता गरज आहेच आपल्या लोकांना. http://www.indianblooddonors.com/
|
आत्ताच बिबिसी वर विलासरावांचे बोलने ऐकले. त्यांनी सांगीतले की असे काही होईल असे त्यांना व केंद्राला माहीत होते पण इतक्या लवकर असे होईल असे त्यांना वाटले नाही. (???????????) राज्यात अलर्ट होता व पोलीस काम करत होते असे त्यांचे म्हनने आहे. BBC World Redio
|
Tulip
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:45 pm: |
| 
|
Pakistani reaction! That's sick!!!.. .. .. http://www.pakistanidefenceforum.com/index.php?showtopic=56950&pid=779227&st=0&
|
Yog
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:47 pm: |
| 
|
Asami, If you are talking "only" about the "timing" of that statement may be its bad timing BUT there is GREAT amount of Truth in it and I support it 200%! राहता राहिला मुम्बई अन सुरक्षेचा सवाल, तर इतकी वर्षे तिथे काढल्यावर अन गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवावरून हे निश्चीत आहे की things will be back to "Normal" in 2 days दुर्दैव की normal या शब्दाची व्याख्ख्याच भ्रष्ट राजकारणामुळे पूर्णपणे बदलून गेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही "मुहल्ल्यात" घुसून या देशविघातक शक्तीना ठेचायला(च) हवे पण त्यासाठी राजकीय इच्छाबळ अन लान्ड्यान्चे लान्गूलचालन न करण्याची हिम्मत हवी. म्हणूनच "त्या" विधानातील सत्त्त्य नजरेआड करता येत नाही. असो. hope , सर्वान्चे सगे सोयरे सुखरुप आहेत. ईश्वर मृतात्म्याना सद्गती देवो पण निदान यावेळी तरी त्यान्चे रक्त "फ़ुकट" जावू नये!!!! 
|
मुम्बाई च्या नशीबातले हे ब्लास्ट्स कधी सम्पनार आहेत देव जाने.... खरच फ़ार चीड आननारी गोश्ट आहे.... लोकान्च्या जिवाशी खेल आहे नुसता...
|
Asami
| |
| Tuesday, July 11, 2006 - 8:43 pm: |
| 
|
If you are talking "only" about the "timing" of that statement may be its bad timing BUT there is GREAT amount of Truth in it and I support it 200%! >> may be ????
|
Zakki
| |
| Wednesday, July 12, 2006 - 12:00 am: |
| 
|
ट्युलिप, तू दिलेली लिंक पूर्ण वाचली नाही, कारण वाचू शकलो नाही! आता हे पण वाचा. अर्थात्, मला वाटत नाही हा काही प्रॉब्लेम आहे. कारण त्या आधी सगळे मुसलमान होतील!!
|
Ajjuka
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:04 am: |
| 
|
लिंक वाचली.. च्यायला.. पाकिस्तान्यांची जातच हरामाची.. शिवसेनेने पर्वा धिंगाणा घातला असला तरी हे स्फोट शिवसेनाच घडवून आणतेय अतिरेक्यांच्यावर आळ घेण्यासाठी???? मूर्खपणा... कोण शेंबडं पोर सुद्धा यावर विश्वास ठेवणार नाही. पण भारतातले पाकधार्जिणे मुस्लिम नक्की ठेवतील..
|
>>>> सगळे घोडे बारा टक्के !! आणखी काय ? This is what really irrates me. Is this necessary at this point ? http://ia.rediff.com/news/2006/jul/11train3.htm दुर्दैवाने, असामी मी तुझ्या मताशी सहमत नाही! मतान्च्या राजकारणातुन सत्तेवर येण्यासाठी कॉन्ग्रेसने जी घाण वीषवल्ली जोपासली हे त्याची ही विषारी कटु फळे आहेत! हे मात आजचे नाही गेली कित्येक दशकान्पासुनच हे! काल परवाची ती नारायण राणेची मुलाखत बघायला हवी होतीस, त्याच्या तोन्डाची वाफ पुर्णपणे उडुन जाइस्तोवरच हे स्फोट झालेत! लक्षात ठेव, अडवाणी जे म्हणले ते योग्यच हे! भिवन्डीत दोन पोलिस निर्घृणपणे मारले जाऊनही तिथे किन्वा आणि "मोहल्ल्यान्वर" कॉम्बिन्गची परवानगी पोलिसान्ना मिळत नसेल तर हे असेच होत रहाणार, अबु आझमी सारखा माणुस सरासर जाहीरपणे फुस लावत फिरतो आणि त्यावर मतान्कडे डोळा ठेवुन चौकशीची कारवाई देखिल होणार नसेल तर हे असेच होत रहाणार...कारण मुळात कॉन्ग्रेसची पॉलिसी एकच, कसही करा, कुणाचीही चाटा पण सत्तेवर असा! तो विलासराव अन राणे, त्यान्चे स्टेटमेन्ट परवा होते की "गृहखात्याकडे आलेली माहिती जर उघड केली तर शिवसेनेलाच ते जड जाईल", च्यामारी ही जाहीर धमकी नव्हे का? की एका राझ्याच्या मुख्यमन्त्री अन मन्त्रान्कडुन केलेले ब्लॅकमेलिन्ग? भोसडीच्यान्नो मिनाताई प्रकरणात चौकशा करणारे येवढे तुमचे खाते सुधारलेले असेल तर शहरात अतिरेकी कारवायान बद्दल तुमचे खाते काय उपटत बसले होते? का नाही मुबैतील गल्ली न गली अन मोहल्ले पिन्जुन काढले जात? तुम्हाला जमत नसेल तर मिलिटरीला बोलवा, पण तसे केले तर मते जातील ना! आम्हाला "सर्वधर्म समभाव वादी" सहिष्णुता दाखवायचा सोस ना!... अडवाणी म्हणतात ती यान्ची ही पॉलिसी! अज्जुका, सरकारकडे जाब नाही विचारायचा, त्यान्ना दोष नाही द्यायचा तर काय आभाळातल्या देवाकडे स्वतःच्या सुरक्षेची भीक मागायची का? तशी तर सिद्धिविनायक अन अशा हजारो देवळातुन लोक आयुष्याची, जगण्याची, किमान सुरक्षेची भीक भक्तिपुर्ण रित्या मागतच असतात अन त्यान्ची "अन्धश्रद्धा" म्हणुन कृर हेटाळणी करणारे निर्लज्ज्यही याच समाजात असतात! पण तो विषय वेगळा! अज्जुका, जे सरकार सत्तेवर येत तेव्हा किमान चाळिस टक्के लोकान्नी मतदानात भाग घेतलेला नसतो, (जवळपास पाच टक्के लोकान्ची नावेच मतदार याद्यात अपडेट झालेली नसतात, ती वेगळीच), उरलेल्या साठ टक्क्यातील विरोधी मतान्ची सन्ख्या विचारत घेता, हे सरकार शम्भर टक्के मताधिक्याने निवडुन आलेले नसते हे मान्य केल्यास लोकशाहीत, सत्तेवरील सरकारला शाब्दिक "जाब" विचारण्या वाचुन तरणोपाय नसतो आणि त्या साठ टक्क्यातील सरकार स्थापनेस कारणीभुत असलेल्या मतदारान्ना "त्यान्नी केलेली चूक" लक्षात आणुन देण्यावाचुन पर्याय नसतो! अन्यथा, तुम्ही काळवेळ आणि मुहुर्तच बघत बसा!
|
>>>>> मूर्खपणा... कोण शेंबडं पोर सुद्धा यावर विश्वास ठेवणार नाही. पण भारतातले पाकधार्जिणे मुस्लिम नक्की ठेवतील.. दुर्दैवाने अज्जुका, स्वतः नारायण राणे हेच म्हणतो हे! मुख्यमन्त्री विलासराव तर येवढ बोलतो हे की त्याच्या पाशी असलेली माहिती उघड केली तर शिवसेना अडचणीत येइल! याचा अर्थ ही लोकान्च्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी नी भावी मतान्ची पेरणी समजावी? कशावरुन पाकडे या दोखान्च्या मुर्ख वक्तव्याचा सन्दर्भ घेत नसतील? सत्तेवर अधिकारात असताना बोलताना बाळगण्याचा सन्यम देखिल हे दोघे विसरलेत, त्यान्ना कसली आलीये पॉलिसी! असलीच तर त्यान्ची एकच सुडाची पॉलिसी, ती म्हन्जे निरन्कुश सत्ता प्रप्तीसाथी विरोधकान्च्या नायनाट करण्यासाठी कोणत्याही थराला जायचे! हीच पॉलिसी अठ्ठेचाळिस नन्तर मोजक्या समाजाने अनुभवली, आणिबाणित सगळ्या देशानेच अनुभवली, आणि पुढे चालुच हे!
|
Maanus
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:51 am: |
| 
|
off the topic, but just read... Lalu's work will be added as case study in Harvard
|
Ajjuka
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:52 am: |
| 
|
>>अज्जुका, सरकारकडे जाब नाही विचारायचा, त्यान्ना दोष नाही द्यायचा तर काय आभाळातल्या देवाकडे स्वतःच्या सुरक्षेची भीक मागायची का?<< नाही मुळीच नाही. घटना घडल्यावर आपल्याकडे काहीच करण्यासारखे उरत नाही फारसे... लोकांची मदत करण्याशिवाय.. मि असेही म्हणत नाहीये रे की दोष देऊ नका. पण आपण नुसते दोष देऊन परिस्थिती किती बदलणार आहे? in a broader persopective मला आपण जबाबदारी उचलण्याबद्दल म्हणायचे होते / आहे. त्या पातळीवर जेव्हा आपण अगदी सिग्नला पकडल्यावर चिरिमिरी न देता पावतीचा आग्रह धरणे इतक्या छोट्या पातळीपासून जिथे जिथे संबंध येतो तिथे तिथे प्रत्येक प्रकारच्या भ्रष्ट्राचाराला विरोध करू आणि आपल संबंध नसल तरी समोर दिसणार्या अन्यायाला थांबवण्याचा प्रयत्न करू, न घाबरता... तेव्हा आपण काही म्हणण्याचे हक्कदार होऊ.. आणि आपण म्हणजे प्रत्येक नागरीक.. अश्या प्रकारचे मला काहीतरी म्हणायचे आहे.. संताप होतो आणि राजकारणी झाकाझाकी आणि वाचावावाचवी यापलिकडे काहीही करत नाहीत ह्यात अमान्य होण्यासारखे काय आहे.. ते कितीही पटत नसले तरी होतेच ही खरी गोष्ट आहे.. पण मार्ग काय? इथे मला विचर थांबल्यासारखा वाटतो.. म्हणून मी माझ्यापरीने थोडा विचार करायचा प्रयत्न केला तेव्हा मला हे मिळाले.. ते ठेवलेय इथे सगळ्यांच्यासमोर.. बस्स्...
|
Ajjuka
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:57 am: |
| 
|
>>अज्जुका, सरकारकडे जाब नाही विचारायचा, त्यान्ना दोष नाही द्यायचा तर काय आभाळातल्या देवाकडे स्वतःच्या सुरक्षेची भीक मागायची का?<< नाही मुळीच नाही. घटना घडल्यावर आपल्याकडे काहीच करण्यासारखे उरत नाही फारसे... लोकांची मदत करण्याशिवाय.. मि असेही म्हणत नाहीये रे की दोष देऊ नका. पण आपण नुसते दोष देऊन परिस्थिती किती बदलणार आहे? in a broader persopective मला आपण जबाबदारी उचलण्याबद्दल म्हणायचे होते / आहे. त्या पातळीवर जेव्हा आपण अगदी सिग्नला पकडल्यावर चिरिमिरी न देता पावतीचा आग्रह धरणे इतक्या छोट्या पातळीपासून जिथे जिथे संबंध येतो तिथे तिथे प्रत्येक प्रकारच्या भ्रष्ट्राचाराला विरोध करू आणि आपल संबंध नसल तरी समोर दिसणार्या अन्यायाला थांबवण्याचा प्रयत्न करू, न घाबरता... तेव्हा आपण काही म्हणण्याचे हक्कदार होऊ.. आणि आपण म्हणजे प्रत्येक नागरीक.. अश्या प्रकारचे मला काहीतरी म्हणायचे आहे.. संताप होतो आणि राजकारणी झाकाझाकी आणि वाचावावाचवी यापलिकडे काहीही करत नाहीत ह्यात अमान्य होण्यासारखे काय आहे.. ते कितीही पटत नसले तरी होतेच ही खरी गोष्ट आहे.. पण मार्ग काय? इथे मला विचर थांबल्यासारखा वाटतो.. म्हणून मी माझ्यापरीने थोडा विचार करायचा प्रयत्न केला तेव्हा मला हे मिळाले.. ते ठेवलेय इथे सगळ्यांच्यासमोर.. बस्स्...
|
Gs1
| |
| Wednesday, July 12, 2006 - 8:21 am: |
| 
|
निनावी आणि असामी मूर्ख आणि इरिटेटिंग ते नाहीत तुम्ही आहात. भारत सध्या ज्या जिहादचे टारगेट झाला आहे त्याविरुद्ध केवळ मुसलमानांच्या मतांसाठी काहीही कारवाई न करणारे सरकार, प्रभावी आणि वेळेत मुकाबला करण्यासाठी आवश्यक अशी पोटा सारखी कायदेशीर साधने मुसलमानांच्या दबावाखाली झुकुन रद्द करणारे राजकारणी या सर्व हत्याकांडाला जबाबदार आहेत. पक्ष, धर्म, प्रांत हे सर्व बाजूला ठेवून हा जिहादचा भस्मासूर रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची, सरकारवर दबाव आणण्याची आणि आम्ही आता हे आमच्या जीवावर बेतलेले लांगूलचालन खपवून घेणार नाही हे सांगण्याची गरज आहे नाहीतर रोज अशा हिंसेच्या तांडवाला तोंड द्यावे लागेल. हे समजत नसेल, समजून घेण्याची इच्छा वा वेळ नसेल तर गप्प बसा. मुर्खासारखे वा इरिटेटिंग बडबडून पुढच्या हत्याकांडाचे अप्रत्यक्ष समर्थक तरी बनू नका. मुर्ख, irritating हे माझ्या संवादाच्या भाषेतले शब्द नाहीत. पण तुमच्या पोस्टमधले असल्याने तेच वापरले आहेत.
|
Jaaaswand
| |
| Wednesday, July 12, 2006 - 8:33 am: |
| 
|
केदार.. तू म्हणतोस ते काही अंशी ठिक आहे.. कि हा घातपात दंगली घडवून आणण्यासाठी केला आहे.. पण मला सांग " त्यांच्यासाठी " ही win-win situation आहे.. दंगली केल्या तरी फ़ावणार आणि मूग गिळून गप्प बसलो तरी... मला एकच म्हणायचे आहे... कोणी कितीही आरडा-ओरड केली सुशिक्षीतपणाची..तरी ( निदान ) भारतात तरी भावना प्रधान लोक आहेत... त्यामुळे भडका उडायला वेळ लागत नाही... आणि त्यात " धर्म " वगैरे अति-जिव्हाळ्याचे प्रश्न आले तर ................. असामी.. निनावि..तुम्ही म्हणता तसे.. Political parties नी तर एकमेकांवर चिखलफ़ेक करणे थांबवायलाच हवे.. पण POTA सारखा कायदा रद्द करून... Vote Bank Politics पण थांबवायला हवे... अज्जुका.. तुझा मुद्दा मला पटला नाही.. कारण भ्रष्टाचार आणि अलगाववाद किंवा आतंकवाद एकमेकांशी किती निगडीत आहेत.. हा वादाचा विषय आहे... दुर्दैव एकच आहे.. कि भारतात स्फ़ोट घडवण्यासाठी.. बाहेरून लोक आणण्याची गरज नाही... मुद्दा आहे तो इतके देशद्रोही.. आपल्या देशात एवढ्या संख्येने कसे आहेत... कदाचीत.. आपणच कुठेतरी कमी पडतोय का.... मला नाही वाटत.. आपल्या देशात जितके देशद्रोही आहेत इतके इतर कुठल्या देशात असतील मी पुरता संघी आहे पण.... मधे एकदा बरखा दत्त चे edit वाचले होते ती म्हणाली It is our defeat, defeat of Majority community in India which has forced all Muslims in India to wear an I-Card of Patriotism everytime कुठेतरी वेग़ळे वाटले...
|
Moodi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 8:39 am: |
| 
|
नारायण राणे अन विलासी विलासराव हा सगळ्यात मोठा विनोद आहे आपल्या राज्यातला. मुंबईत पूर आला तेव्हाही हा माणुस अती वृष्टीला दोष देऊन मोकळा झाला. हो हे खरे आहे की बर्याच नको त्या घटनांना आपणही कळत नकळत जबाबदार असतोच. मग ती मुंबईतील पूर परीस्थिती का असेना. अर्थात तो विषय वेगळा आहे, पण अशा घटनांकडेही दुर्लक्ष करुन चालत नाही. लिंबु धारावी वगैरेसारख्या झोपडपट्ट्या अन भिवंडी, मुंब्रा सारखी संवेदनशील शहरे यात काम करायचे तर मूळात पोलीसांनाच संरक्षण नसते, आपल्याला वर वर दिसते तेवढे हे सोपे नाही. धारावीत पोलीस दिवसा सुद्धा जायला घाबरतात, भाईगिरी, अंमली पदार्थ, अंडरवर्ल्डशी लागेबांधे त्यातुन जरी चौकशी केलीच तर मतांसाठी राजकारण्यांचे दडपण यातुन पोलीसांना सुद्धा तपासणी करणे फार जड जाते. आपण पोलीसांना दोष देतो, पण तुच बघ की गुंडांकडे अत्याधुनीक शस्त्रसामग्री अन पोलीसांकडे काय? वरतुन मंत्री संत्री अन कोणी भाई यांच्या दडपणामुळे त्यांच्या हातात अधिकार रहात नाहीत. अर्थात यामुळे त्यांच्या बाकीच्या चुका नजरेआड करता येत नाहीत. कुठेतरी काहीतरी रहातेय, तेच दुरुस्त होत नाहिये. मग कशी गुंडगिरी अन दहशतवाद यांना हे लोक तोंड देतील? शिवसेनेने आत्ता जो मुर्खपणा करायचा तो केला, पण जर त्यांच्या मुसक्या आवळण्याची भाषा जर हे नाकामी सरकार करतेय मग अबु आझमी सारख्यांना का चाप लावला जात नाही. आमदार निवासात उतरलेल्या अतीरेक्यांचे लागेबांधे औरंगाबादच्या राष्ट्रवादीच्या आमदार बाईशी आहेत, तर ते का झाकतो हा राणे अन विलासराव? अन तर्रार आबा? मला वाटले होते की हा माणुस काहीतरी करु शकणार आहे, पण पेपरमध्ये वाचल्यावर कळते की हा पण त्यातलाच. आता वेळ आलीय लोकांनीच धडा शिकवण्याची, प्रत्येक वेळेस राजकारणाला कंटाळून मध्यमवर्गीय मते देत नाहीत, हीच घोडचुक नडतेय.
|
Ajjuka
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:17 am: |
| 
|
>>मुद्दा आहे तो इतके देशद्रोही.. आपल्या देशात एवढ्या संख्येने कसे आहेत... कदाचीत.. आपणच कुठेतरी कमी पडतोय का.... मला नाही वाटत.. आपल्या देशात जितके देशद्रोही आहेत इतके इतर कुठल्या देशात असतील<< बा जास्वंदा.. मी वेगळे काय म्हणत होते? एवढे देशद्रोही सुखेनैव राहू कसे शकतात इथे? भ्रष्टाचार आणि अलगाववाद (हा शब्द पहिल्यांदाच ऐकला) ही फक्त उदाहरणे दिली आहेत मी.. यादी अजून बरीच असू शकते.. >>भ्रष्टाचार आणि अलगाववाद किंवा आतंकवाद एकमेकांशी किती निगडीत आहेत.. हा वादाचा विषय आहे... << आणि भ्रष्टाचार व अलगाववादामुळेच आतंकवाद्यांचे फावते हे तर वरच्या almost प्रत्येक पोस्ट मधे दिसतेय.. वादाचा विषय कसला? आपण इथे एकमताने दोष कुणाचा हे मान्य करून काही फरक पडणार नाहीये. खरंच बदल घडवायचा असेल तर आधी स्वतःला थोडे प्रामाणिकपणच्या आरश्यात बघणे गरजेचे आहे.. इतकं कठीण का जातंय हे पचायला?
|
>>>> लिंबु धारावी वगैरेसारख्या झोपडपट्ट्या अन भिवंडी, मुंब्रा सारखी संवेदनशील शहरे यात काम करायचे तर मूळात पोलीसांनाच संरक्षण नसते मुडी, एकदम मान्य, मला पुर्ण कल्पना हे त्याची म्हणुन तर मिलिटरी का नाही बोलावली अस विचारल हे! पोलिस बिचारे दोन्हीकडुन थपडा खातात! सामान्य माणुस त्याच्या उण्यापुर्या धा पाच वर्षान्च्या आठवणीच्या इतिहासात रमत असतो! राष्ट्रविषयक घटनाक्रम त्याला शिकवला जात नाही, कुणी सान्गु पाहिले तर त्याचा बुद्धिभेद करायला अनेक बाबी सरसावुन असतातच शिवाय जगण्याच्या दैनन्दीन धडपडीत त्याला हे समजुन घ्यायला वेळही नसतो, पण एकविसाव्या शतकाच्या प्रारम्भी देशात जे होत हे त्याला मागल्या शे दिडशे वर्षान्ची कारणपरम्परा हे! ती कारणेच विसरली गेली की कसल्या तरी "स्वप्नाळु" कल्पनान्च्या मागे धावले जाते! मुळात बन्गालची फाळणी, ती होण्याकरता आधी झालेले दन्गे, नन्तर पाकिस्तानची निर्मिती, निर्मितीच्यावेळेसचा भारतावरील हल्ला आणि व्याप्त काश्मिर परत ताब्यात न घेण्याचा तेव्हा आणि पुढिल दोन युद्धावेळेस केलेला नादानपणा, मग खलिस्तान वीस वर्षे, काश्मिर तेवढीच वर्षे आणि आता थ्रुआऊत भारतभर नि खास करुन महाराष्ट्रात चाललेल्या अतिरेकी हालचाली! या सगळ्यान्मधे काही सुत्रे समान हेत पण ती समान सुत्रे बोलण्याची देखिल या "सर्वधर्मसमभावी" राज्यात बन्दी हे! (गाढवाला गाढव म्हणु नका, तो त्याचा अपमान हे, त्याला छोटा हत्ती म्हणा... त्याचा अपमान करु नका नाहीतर तो चिडेल अन तुमच्या वर धावुन येइल आणि मग उगाचच रक्तपात वगैरे... कशाला हव्यात या उठाठेवी, दोन वेळच चान्गल चुन्गल गिळायला मिळत हे ना? अन्थरुण पाहुन पाय पसरावेत माणसान्नी, उगा जगाच्या लष्कराच्या भाकर्या भाजू नयेत! "हे उपरोधाने लिहिले आहे")
|
>>>>> It is our defeat, defeat of Majority community in India which has forced all Muslims in India to wear an I-Card of Patriotism everytime अज्जुका, ही असली काव्यरसपुर्ण भावनेला हात घालणारी पण वीषाने बरबटलेली वाक्ये डोक्यात फिट्ट बसलेली असल्यावर समोरच्या देशद्रोह्याला तो देशद्रोही असे म्हणण्याची देखिल ज्यान्ना लाज वाटते किन्वा ज्यान्ची जीभही जड होते ते कसले आत्मपरिक्षण करणार? वरच्या पोस्ट मधे घटनाक्रम दिला हे, यात तपशीलात अक्षरशः शेकडो उदाहरणे ऍड होतील, मला तो डाटाबेस करुन हवाच हे! आणि तरीही, कोणता तरी कवि लेखकुचे "उदात्त" वगैरे वरच्या सारखे विचार वाचले की किमान माझ्या तरी मस्तकातली शीर तडतडते!
|
Saranga
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:34 am: |
| 
|
http://in.rediff.com/news/2006/jul/12mumblast7.htm Solve real issues to counter extremism: Kasuri hii tar saral dhamki aahe!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|