Pinaz
| |
| Tuesday, July 11, 2006 - 3:41 pm: |
| 
|
sad naa mee yaa weekend laach mumbaeehoon aale. 
|
Avinashi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 3:47 pm: |
| 
|
लाल्भाइ दुसर्या बी बी वर लाल रंगानी लिहु नका ही विनन्ती आहे,आणि संटु तु घुटके घेत घेत देश सुधारायची स्वप्न बघ..! ह्या बोम्ब स्फ़ोट मुळे तरी आता जग पकिस्तानला दहशत वादी म्हणुन जाहिर करेल अशी आशा आहे. god bless them.
|
Pinaz
| |
| Tuesday, July 11, 2006 - 3:48 pm: |
| 
|
कशाला देता रे असल्या लिंका? मीडियाची चंगळ आहे नुसती.. breaking वर breaking news ..
|
पिनाझ. मला नाही समजले... म्हणजे काही चुकले का ???
|
very well said Saaranga. ईकडे मायबोलीवर संतु नेहेमी हाच विषय मांडत होते, अरे एक साधा मानुस ईतक्या बातम्या देऊ शकतो तर सरकार का नाही लक्ष ठेउ शकत अतीरेकी कारवांयावर? की हा एक मोठा डाव आहे परत एकदा दंगली घडवुन आनन्यासाठी. परत एकदा मला धर्माची गोळी घ्यावी लागेल असे दिसत आहे. Shame on Maha Govt. They are showing that on BBC.COM Live. NBC USA ver news daakhavat aahet. Per them its Dawood who had done this. Dawood has support from PAK.
|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 4:22 pm: |
| 
|
घडतय ते खूप वाईट घडतेय. लोकांच्या जीवाशी खेळतांना कुणाला काहीच कसे वाटत नाही? औरंगाबाद, मालेगाव येथे शस्त्रास्त्रे पकडली गेली अन भिवंडीत दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला. स्थानिक लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय का हे अतीरेकी पोसले जातात? ऐन गर्दीच्या वेळेस खचाखच भरलेल्या गाड्यांमध्ये कोण एवढे तपासत बसणार आहे? इंटरपोलने आता भारताकडे दाऊदचा पत्ता मागीतलाय. पाकडे नेहेमीप्रमाणे हात वर करुन मोकळे. एवढेसे इझ्रायल एका सैनिकाकरता जीवाचे रान करते अन आमचे सरकार? आबा नुसत्याच घोषणा देणार का?
|
Mbhure
| |
| Tuesday, July 11, 2006 - 4:35 pm: |
| 
|
check on CNN, not on Headlines. Showing direct telecat thru CNN-IDN
|
Asami
| |
| Tuesday, July 11, 2006 - 4:38 pm: |
| 
|
सगळे घोडे बारा टक्के !! आणखी काय ? This is what really irrates me. Is this necessary at this point ? http://ia.rediff.com/news/2006/jul/11train3.htm
|
Ninavi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 4:41 pm: |
| 
|
I hear you, असामी. मूर्ख लोक आहेत.
|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 4:41 pm: |
| 
|
हो CNN वर आत्ता दाखवतायत थेट. १५० च्या आसपास तर गेलेत अन २६० जखमी झालेत. दिसायलाच एवढे भीषण आहे की लोकांनी शांतता राखुन परस्परांना मदत केली हेच खूप आहे. पण प्रत्येक वेळेस तरी का मुंबईकरांची परिक्षा घेतली जाते? पाहुनच बधिर झाल्यासारखे झालेय.
|
Ajjuka
| |
| Tuesday, July 11, 2006 - 5:02 pm: |
| 
|
काहीही घडलं की आपण सरकार आणि यंत्रणेच्या नावाने खडे फोडून मोकळे होतो. सरकार सरकार म्हणता तेही आपल्यासारख्याच दुबळ्या माणसांचेच असते. पक्ष कुठलाही असो.. यंत्रणेतील माणसे ९०% corrupt आहेत ही खरी गोष्ट आहे. छोट्यातल्या छोट्या पातळीवर चाललेल्या अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराला आपण कधी थांबवत नाही कारण ते आपल्या तात्पुरत्या का होईना फायद्याचे असते. यातूनच आख्खि यंत्रणा किडत जाते. विवेक संपुष्टात येतो. स्वतःच्या भौतिक फायद्यासाठी आपण काय विकतो आहोत याचे भान रहात नाही. जे झालं ते भयंकर आहे. होणे टाळता आले असते की नाही माहित नाही. ९३ मधल्या स्फोटांचे आरोप सिद्ध व्हायला इतकी वर्षे लागली. एवढी मनुष्यहानी होऊनही आपले हितसंबंध वाचवायला प्रत्येक जण प्रयत्न करत होता. प्रश्न असा आहे की आपण सरकारला, राजकारण्यांना, पाकड्यांना, अमेरीकेला दोष देतो आहोत जे काही अंशी योग्यही आहे पण या लोकांचं बळ वाढवायला ०.००००००१ तरी का होईना आपणही जबाबदार असतोच. ती जबाबदारी आपण कधी ओळखणार? म्हणजे काय करायचं असा साहजिकच प्रश्न येईल. उत्तर मला सांगता येईलच असे नाही. ज्याने त्याने स्वतः हा विचार केला तरी कदचित काही बरे घडू शकेल..
|
In a telephonic statement to several media organisations, Lashkar spokesman Dr Abdullah Ghaznavi condemned in strongest terms, the serial blasts both in Mumbai and Srinagar. "These are inhuman and barbaric acts. Islam does not permit killing of an innocent person," he said. Dr Ghaznavi said those who have perpetrated such "dastardly acts" were 'enemies of humanity'. "Blaming the Lashkar-e-Toiba for such inhuman acts is an attempt by the Indian security agencies to defame the freedom struggle in Jammu and Kashmir," he added. ह्याला म्हनतात चोराच्या उलटया बोंबा.
|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 5:16 pm: |
| 
|
हसावे का रडावे या अब्दुल्लाच्या स्टेटमेंटवर? ही सकाळमधली ताजी बातमी. http://www.esakal.com/esakal/07112006/NT00AC75DA.htm
|
अज्जुका तु म्हनतेस ते खरे आहे पण सरकार जे चालवातात त्यांना आपनच निवडुन दिलेले असते, राज्य चालवन्यासाठी, मलाई खान्यासाठी व वेळप्रसंगी आपल रक्षण करन्यासाठी. एका माणसाकडे गुन्हेगाराला शोधुन काढन्यासाठी काहीही tools उपलब्ध नसतात पण तोच मानुस जेव्हा पोलीस होतो तेव्हा तो त्या यंत्रनेचा वापर करुन गुन्हेगाराला शोधुन काढु शकतो. हां आता वापर करुन त्याला पकडायचे की नाही ह्या परत त्या पोलीसातील व्यक्ती च्या प्रश्न होतो. मान्या आहे की राजकारनी,पोलीस भ्रष्ट आहेत पण त्यांना हे tools उपलब्ध आहेत तुला व मला नाहीत. BJP, Congress, blah blah हे सर्वच पक्ष आहेत लोकांनी चालविलेले मग त्यात हे येनारच. BJP ने लगेच सरकार ला दोष द्यायला नको. पण मग खरच कोण जबाबदार आहे आपल्या रक्षनाला? आपण स्वत:? ( BTW तुझ्या मुद्द्याला मी खोडुन काढत नाहीये. हा वाद पण नाहीये, फार तर माझ स्वगत समज व सोडुन दे)
|
Ajjuka
| |
| Tuesday, July 11, 2006 - 5:51 pm: |
| 
|
अरे मी कुठे म्हणतेय की ते भ्रष्ट नाहीत आणि त्यांचा दोष नाही म्हणून. पण तूच म्हणतोस ना आपणच त्यांना निवडून देतो म्हणून... आणि तू नी मी इथे बसून एकमताने त्यांना दोष देऊन काहीच होणार नाही ना? ते बदलणार नाहीतच.. मग आपल्या हातात काय आहे? मुंग्यांसारखं मारलं जाणं? नाही मग जी काही ०.००००१ आपलि जबाबदारी आहे ती आपण उचलूया आणि तिथूनच बदलाला सुरूवात करूया.. म्हणजे नक्की काय नी कसं करायचं हे माझ्याही मनात स्पष्ट नाही पण विचार करून बघायला काय हरकत आहे? at least रिकामा blame game खेळण्यापेक्षा तरी बरे..
|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 5:52 pm: |
| 
|
केदार पोलीसाकडुन आपण अपेक्षा ठेवतो अन त्या पुर्ण करण्याचे ते प्रयत्न पण करतात, पण वरुन राजकारणी, त्यांचे लागेबांधे यांचे आदेश आल्यावर सरकारी यंत्रणेचे हात बांधले जातात. आता आबा पाटलांमुळे आपण थोड्या तरी अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा ठेवतोय. आता परत लोकांची या समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलेल अन त्याचाच अतीरेकी अन पाकी सरकार फायदा घेतय. दुर्दैव!!
|
अज्जुका वेल सेड... lonDon च्या blast ननतर लगेच त्या लोकांची नवे जाहिर होणे पकडले जाणे.. इतक्या सफ़ाइने झाले आपली दुबळी व्यवस्था, दुबळे सरकार आणि अधुनिक समुग्री नसलेले पोलिस.. आणि नागरिक कोणी काय करायचे कशाला कशाचा पाय पोस नाही..!!! कधी गुन्हेगार पकडले जातील कोण जाणे.. देव त्या मृतात्म्याना शांती देवो..!!! आणि इकडे मुस्लिमाना वर कडक नजर ठेवली गेली तशी निदान sensitive area त तरी ठेवायला हवी..!!!
|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 6:42 pm: |
| 
|
यापुढे नक्की काय बोलायचे? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1733151.cms
|
Tulip
| |
| Tuesday, July 11, 2006 - 6:46 pm: |
| 
|
well said अज्जुका, मुडी. अतीरेक्यांवर वर्षानुवर्षे खटले चालवत बसून कसली ही क्रुर चेष्टा करतय सरकार अशा स्फ़ोटांमधे मारल्या जाणार्या निरपराध लोकांची! hang d terrorists!!!!
|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 6:49 pm: |
| 
|
इथेच द्यावे की कुठे कळत नाही पण देते. http://mumbai.mtnl.net.in/helpdesk/helplines.html
|