|
Yog
| |
| Tuesday, December 06, 2005 - 9:09 pm: |
| 
|
उपद्व्याप तसा इतर चार चौघांसारखा मिही गीत सन्गीताचा भोक्ता. म्हणजे घराण्यात सर्वच निदान कानसेन काही गानसेन. त्यामूळे विषय थोडा जिव्हाळ्याचा. पण अलिकडे एका नव्याच सन्गीत सेनेने मला सम्भ्रमात टाकल होत. आजकाल कुठल्याही सेनेला तसेही वाईटच दिवस आलेत म्हणा, कलियुगाचा महिमा झालं. त्याच अस की आमच्या " घराण्यातील " (घराणे या शब्दातील महान, उदात्त अन वैश्वीक सन्गीत सन्केत वाचकांच्या लक्षात आलाच असेल्) तशी गुणवंत मुलगी काय ते सारेगम का काय या तत्सम सन्गीताच्या बाजारात शिरली. अर्थात गेली अनेक वर्शे इकडे असल्याने तीच्या या नविन कलागुणांचा अन या नविन बाजाराबद्दल तशी काही माहिती नव्हती. पण एक दोन भाग बघितल्यावर मात्र मला अचानक outdated झाल्यागत वाटू लागलं, नशीब तरी जोवर कालनिर्णय वरच्या तारखा अन सण वार वाचता येतात तोवर तरि मि कालाशी निगडीत राहीन अस वाटतय. तुम्ही म्हणाल कोल्ह्याला द्राक्शे आम्बट किव्वा नाच न जाने आन्गन वगैरे... पहा अता याही ओळीतून नाच न जाने आन्गन टेढा च ते पडोसन मधल धमाल गाण आठवल... ते सन्गीत अन आता या बाजारात पाहिलेल(ऐकलेल अस लिहीणं प्रयत्नपूर्वक टाळले आहे) सन्गीत.. असो. तर मुद्दा असा की बर्याच समजूती, कल्पना, रिती रुढी एकन्दरीत बदलल्याच आहेत तर. आता असे बघा, अनेक copy paste सन्गीत दिग्दर्शक्(अरे अरे दिग्दर्शक हा शब्दही वापरावासा वाटत नाहीये, पण दुसरा कुठला वापरता येईल?) म्हणे मेन्टोर. अन काय गाता कस गाता यापेक्षा काय, किती, कस दाखवता(यालाच कसब म्हणतात का?) याला महत्व. म्हणजे शब्दांचे शुध्ध उच्चार, स्वर व्यंजनानुसार अर्थ समजवून घेवून केलेली शब्दफ़ेक, आवाजाचा बाज, इत्यादी इत्यादी वगैरे पेक्षा attitude महत्वाचा. शिर्डी वाले " साय " बाबा आया है तेरे " सरपे " सवारी म्हणत भिक मागणार्याकडे नेमके तेच असते, किव्वा त्याच्या शब्दोच्चारापेक्षा त्या भिक मागण्याच्या attitude वर आपण चार आणे फ़ेकतोही. पण आजकाल सर्वच अपग्रेड झालेय त्या नियमानुसार, कजरा रे करत ऐश्वर्या सारख नाचून भिक मागण हे Must आहे. आता भिक मागणे हाही धन्दा अन survival of fittest नियमानुसार कालानुसार बदलेल त्याचीच चलती हा नियम या सन्गीत धन्द्यालाही लागू होतोच. असेना का. सर्व instant चा जमाना आहे, मग रियाज, गुरू शिकवण, साथ संगत, साधना वगैरे करायला वेळ कुणाला आहे..? आधी दवाखाना काढायचा मग पदवी अन मग जडीबूटी यातलाच हा प्रकार. अन याच मानसिकतेचा किती सहज फ़ायदा हे धन्देवाले उठवतात पहा. म्हणजे तरूण पिढी म्हणजे यांच्यासाठी सोन्याचे अंडे देणारी कोम्बडी, अन त्यातून या कोम्बडीचे पालकही तीने आयुश्यभर सोनेच उबवावे, नाम कमवावे या एकाच हव्यासापायी काय वाट्टेल ते करायला तयार असतात. तरूण पिढी अन त्यान्चे पालक यान्च्या या सोन्याच्या आकांक्शांना खत पाणी घालायच की मग इतर सर्व माल मसाला कसा सहज जुळून येतो. मग चालू होतो एक जबरदस्त धन्दा, sms चा, नेटवर्क चा, जाहिरातींचा, होर्डींगचा. भाव भावनांशी खेळत, हसवे, रुसवे, फ़ुगवे, रडवे, सर्वाचे प्रदर्शन करत त्या मार्गाने हा बाजार कसा मच्छीच्या वासासारखा फ़ोफ़ावत जातो. अन मग मच्छी मार्केट मधे असते तशी सर्वत्र एकच बोंब असते, या मानवी कोम्बड्यांचे भाव लावायचे काय ते शिल्लक ठेवलय इतकच. reality show नावाखाली तेही लवकरच सुरू होईल म्हणा. अर्थात या सर्वात तितकी लायक कोम्बडी वा बळीचा बकरा असतोच, अन या बाजारातून त्याला योग्य भाव आज नाही मिळाला तरी गुणवत्तेच्या बळावर उद्या मिळेलच हे निश्चीतच असते म्हणजे हे मि नाही म्हणत इतीहास तसे सान्गतो. (आवाजावरून रेडिओ स्टेशन वर नोकरी नाकारलेला आजचा मै बन गया करोडपती big b , दादा मुनींच्या वलयापूढे आधी फ़िका पडलेला किशोर कुमार, किव्वा आपल्या गुरूच्या घरी पाणी भरणे, फ़रशी पुसणे अशी ढोर मेहेनत करून स्वर्गीय आवाज कमवलेले पन्डीत भिमसेनजी, कितीतरी उदाहरणे आहेत). पण म्हणून सन्गीताच्या नावाखाली कधी त्यांच्या आकांक्शांचा, भावनांचा अन गुणवत्तेचा असा बाजार, नंगा नाच मान्डलेला आजवर पाहिला नव्हता. " वो छलक जाता है जो पैमाना होता है " या सुरेल जातकुळीत आमचा जन्म अन शिकवण घडली. आपल्या आईच्या हातच्या आमटी भाताच्या चविला दुनियेने sms करून प्रमाणपत्र द्याव, किव्वा पडद्यावर माकड्चाळे करणार्या, सन्गिताशी सुतराम संबन्ध नसणार्या, उपट्सुम्भांनी मला तीच्या स्वयंपाकाची रेसिपी विचारून त्यावरून तिला cooking idol वगैरे घोषित कराव तशातला हा प्रकार, अन शेवटी यातून साध्य काय...? म्हणजे यातून सन्गीताच काय भल होत असाव..? आता उद्या ही नात्यातील मुलगी एक यशस्वी गायक बनली तर आम्हा सर्वाना आनन्दच होईल पण तीच्या वाट्याला, एक दोन तीन चार पाच छे सात आठ नौ अशीआकड्यांची, किव्वा a,b,c,d किव्वा इतर यमक जुळवणारी गीतेच जास्त येण्याची शक्यता अधिक. हा एक आहे, ताला सुरात ते " पाढे " म्हणून ती आयुष्याभराची कमाई मात्र निश्चीत करून जाईल. शेवटी मागणी ही आपलीच अन पुरवठाही आपलाच. गुणवत्ता वादातीतच असते. पण लता, आशा किशोर हे जन्मालाच यावे लागतात अन जन्म घेतल्यावरही टाकीचे घाव सोसल्याशिवाय त्यांनाही देवपण मिळाले नव्हते. तेही बिचारे म्हणत असतील हाय देवा आम्हाला या युगात का नाही जन्माला घातलस, आयुष्याच्या इतक्या रात्री काबाड कष्ट अन साधनेत घालवल्या त्यापेक्षा एका रात्रीत असे स्टार बनलो असतो. तसे घडले नाही हे माझ्या सारख्या outdated लोकांच्या दृष्टीने सुदैव. " दादा मला काही टिप्स दे ना.. " अस ती हक्काने म्हणली(नशीब तो हक्क तरी आयोजकांनी स्वताःकडे राखून ठेवला नाहीये, पण एकन्दरीत सुसंगत विचार करण्याचे अणि कान अन डोळे उघडे ठेवण्याचे आमचे किमान हक्क आम्ही कुठे विकून आलो आहोत देव जाणे!)तेव्हा म्हटल, अग मि पामर काय तुला टिप्स देणार मला तर ती स्पर्धाही पूर्णपणे माहिती नाही की त्याचे नियम वा requirements.. . जे आतून योग्य वाटते ते कर अस म्हणून मि मोकळा झालो पण तीच्या प्रश्णातील आशावाद मला व्यथीत करून गेला हे खर. गुणवत्तेच्या निकषापेक्षा, पैसा प्रसिध्धी याला मह्त्व देणार्या या अशा स्पर्धांमूळे एक वेगळ्याच जातकूळितले idols तर घडत नाहीत ना? आणि तीच्या सारख्याच इतर अनेक स्पर्धकातील त्रुटी स्पष्ट दिसत असल्या तरी पण म्हणून त्यवर पुढील अनेक वर्श मेहेनत घेवून एक साधक म्हणून राहण्याची एखाद्याची कितपत तयारी असेल किव्वा तशी अपेक्षा ठेवावी का या प्रश्णाच उत्तर माझ्याकडे नाही, असल तरी आजच्या supersonik धावत्या जगात ते न देण योग्य वाटत. अर्थात अशा स्पर्धा सोडून गेलेले गुणवंत स्पर्धकही आहेत हे नन्तर माझ्या निदर्शनास आले. मि तिला म्हणलो, अग त्या बाबतीत I am outdated ! you are the best judge of yourself! पण तरिही तीला मदत होवू शकेल म्हणून माझ बरच मोठ सन्गीताच घबाड काढून बसलो, म्हटल काहितरी तीला उपयोगी पडेल. त्या निम्मित्ताने त्या सर्वाच नीट सन्कलन करून काही गोष्टी पाठवून द्याव्यात म्हणून पसारा मांडला तेव्हाच बायकोने जरा नाक मुरडत प्रश्ण केला.. अरे मगाशी मि घर आवरल अन तू काय हा पसारा मांडून बसला आहेस, उगाच नसते उपद्व्याप तुझे.... अर्थात माझ्यापेक्षा कणभर अधिकच संगीतप्रेमी असलेल्या बायकोचे ते शब्द मात्र माझ्या मनातील बर्याच outdated प्रश्णांची उत्तरे देवून गेले. डोक बाजूला ठेवून सन्गीताच्या नावाखाली चाललेले उपद्व्याप पहायचे मि बन्द केले आहे मात्र खर्या idol (ज्याला शुद्ध मराठीत अन खर्या अर्थाने आदर्श म्हणतात्)चे चार बोलही मग ते गीत असो, शब्द असो, मुलाखत असो वा निव्वळ गुणगुणणे कानावर पडावे यासाठीचे उपद्व्याप मात्र चालूच आहेत. तुम्हालाही ते आवडत असतील तर sms जरूर करा, मैफ़ील जमवू (स्वगत्: खर्डेघाशी व घाम गाळण्यापेक्षा आपणही एक धन्दा काढू, अन मराठी मनुष्य अजूनही मागेच आहे या ओरडीला प्रत्त्युत्तर म्हणून खास " अ ब क ड ई " नावाचा धन्दा काढू. पैज घ्यायला तुम्ही तयार असालच. धन्द्याच कुलक्षणी(मला " क " लक्षणी म्हणायच होत) नावही ठेवता यईल, " कर्णबधिर अ ब क ड ई पैज " ! आणि हो, मेन्टोर म्हणून तुमच्यापैकी कुणीही येवू शकता, अट एकच " मला ऐकू आलेली चुकीची गाणी " लिहीण्या मधे तुम्ही पहिल्या पाचात हवे.) ps : कृपया या लेखावरून मि कुठल्या स्पर्धकाबद्दल बोलतोय किव्वा कुणाशी सम्बन्धीत आहे, किव्वा स्पर्धेत नक्की काय चालते इत्त्यादी गोश्टीचा पडताळा किव्वा तपासून बघण्याचा नसता उपद्व्याप करू नये ही नम्र विनंती
|
Chinnu
| |
| Tuesday, December 06, 2005 - 9:35 pm: |
| 
|
योग! चुकीची गाणी! सही.. बाकी हल्ली हर्-एक्-माल बाजारात मिळतो, त्यात आजकाल संगीतही..
|
योग, संगीताचं बाजारीकरण एकदम सही मांडलयस रे.. आजकाल सगळ काही ऐसा कुछ भी नही हे जो बिकता नही हे च्या धर्तीवरच चालु असतं...तेच आजच सत्य बनलय हे आपले दुर्दैव आहे
|
Savyasachi
| |
| Wednesday, December 07, 2005 - 4:41 am: |
| 
|
yogya, uttam lihila ahes.
|
Limbutimbu
| |
| Wednesday, December 07, 2005 - 5:21 am: |
| 
|
योग, माह्या ठुसठुसत्या कानावर कानफाटलस चेपलस की रे भो! बोम्बलायला आमच्या कॅन्टीनमधी कधी नव तो टेपरेकार्डर विथ रेडिओ लावला हे त तो शिन्चा कॅन्टिनवाला अन जो कोण उठल तो रेडिओ मिर्ची लावतो, अन आख्ख जेवाण गिळुन होईस्तोवर मिर्चीचा रिमेकचा रतिब कानात घुसत र्हातो! अन माह्या फुडच नौजवान त्या गाण्यान्वर डोलताना बघुन माझ्या नरड्यातला गिळु जाणारा घास नरड्यातच अडकतो, मग ढसा ढसा पाणी पिऊन त्याला सान्गाव लागत की बाबारे ह्ये रिमिक्स च गाण हे, ड्युप्लिकेट हे, पर तू वोरीजनल ऐकलच न्हाइस तर तुला काय ठाव असणार? होठोन्पे ऐसी बात वर नाचलेली वैजयन्ती कुठ अन कुठ ह्ये माह्याम्होरच डुगडुगत डोलणार नौजवान! अरारारारा! सम्द्या जेवणाचा नुस्ता सत्त्यानाश झाला बग! आऽऽर या रिमिक्स पेक्षा, शिमग्यात बेन्बीच्या देठापासुन आमी मारलेली बोम्ब जास्त नॅचरल अन सुरेल असती! तुही पोस्ट वेगळ्या इषयावरची हे, पर काॅन्ग्रेस गवतापरमाण फोफावलेल्या त्या त्या रिमिक्सच काय करायच, जरा ते बी बघा की राव!
|
Paragkan
| |
| Wednesday, December 07, 2005 - 11:00 am: |
| 
|
मला तरी तितकम्सं परिणामकारक नाही वाटलं. सुरुवातीच्या ' कोट्या ' अम्मळ जास्तच वाटल्या. तू यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं लिहू शकतोस.
|
Yog
| |
| Wednesday, December 07, 2005 - 12:09 pm: |
| 
|
मला वाटल मि जरा अम्मळ जास्तच सौम्य लिहीलय तू द्वारकानाथ सन्झगिरीचे क्रिडा column वाच, सामना मधे,कोट्या कराव्यात तर त्याने...
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 07, 2005 - 12:15 pm: |
| 
|
स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले हृदयनाथ मंगेशकर हल्लीच म्हणाले होते. मते देवुन नेता निवडता येतो. गायक नाही. आणखी काय बोलायचे ?
|
Milya
| |
| Thursday, December 08, 2005 - 4:35 am: |
| 
|
योग सही रे. विषय चांगला होता.. ल्हिलेस ही चांगले पण तुला अजुन चांगले लिहिता आले असते असे पीके प्रमाणे मला पण वाटले.. तरी सारेगमप हा जरा तरी बरा आहे... फ़ेम गुरुकुल, indian idol मधले idol म्हणजे.... मते देउन गायक निवडला की मग त्याची quality ही आजच्या नेत्यांप्रमाणेच असणार हे नक्की
|
Vinaydesai
| |
| Thursday, December 08, 2005 - 11:19 am: |
| 
|
योग, लेख आवडला.. 'मते देऊन गायक निवडता येत नाही' हेही पटण्यासारखं पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.. लता, किशोर नुसते जन्माला येऊन उपयोग नसतो. गेल्या पन्नास वर्षात 100 कोटींच्या देशात एक लता, एक किशोर, एक आशा जन्माला आले आणि बाकीच्या 9999.... मध्ये एकही नाही पटण्यासारखं नाही.. ते जसे जन्माला यावे लागतात, तसं त्याना पुढेपर्यंत पोहोचायला इतर खूप काही लागतं.. हिंदी फिल्मी दुनिया ही तर नरकपूरी आहे, तिथे संधीच्या बदल्यात काय काय मागणी केली जाते यावर ग्रंथ लिहिता येतील.. लाखोच्या संख्येने येणारे तरूण आणि त्यांच्या मागे धावणारे पालक हेच सांगतात की त्याना एक संधी हवी आहे, कुठेतरी वर येण्याची... त्याचा फायदा TV वाले उठवतात हे खरं असलं तर त्यातून पाच दहा जणाना संधी मिळाली तरी खूप नाही का? बाकी मतदान, SMS वगैरे कोलांट्या उड्या त्यासाठी खपवून घ्यायच्या..
|
Moodi
| |
| Thursday, December 08, 2005 - 11:56 am: |
| 
|
योग अगदी स्पष्ट अन छान लिहिलयस. अन लिंब्या म्हणतो ते पण खरे आहे. रीमिक्स्च्या नावाखाली धंगडधिंगाच सुरु आहे. जुनी सर्वोत्तम अनमोल गाणी भेसुर अन बेसुर बनलीत रीमिक्समुळे. बाकी विनय तुमचे म्हणणे बरोबर असले तरी आज म्हणतात की मंगेशकरांच्या मोनोपॉलीमुळे बाकीच मागे पडले. लता कितीही श्रेष्ठ असली तरी सुमन कल्याणपुरकर काही कमी नव्हती. अन आशा भोसलेला तर खुद्द जवळच्यांकडुनच त्रास झालाय. राहिता राहिला किशोर, त्याचा प्रश्न नव्हताच, रफी, मुकेश, मन्नाडे अन हेमंतकुमारनंतर तोच एकमेव होता की जो हृदयाने गायचा. त्याला तोड ही आताचे भ्रष्ट सानू,शान, अभिजीत काय देणार? किशोर विक्षीप्त होता अन तसेही R D बर्मनचे किशोर अन बंगाली प्रेम पुढे आल्याने रफी मागे पडला. बाकी मेहेनतीत मात्र तसे कमी पडत नाहीत आजचे तरुण अन तरूणी. वनिता समाज, दादर येथे मी भाग घेतला होता नाट्यगीतात. तेव्हा अद्वैत दिक्षीत नावाचा मुलगा काय गायला अहाहा. काय माहित आता कुठे आहे तो? सारेगामातील एक मुलगा नाव आठवत नाही तो स्पर्धेबाहेर गेला, आत्ताचे सारगामा नाही, पुर्वीचे TVS चे सारेगामा, त्यात तो या भवनातील गीत पुराणे गायला होता. आता आहे नुसती जीवघेणी स्पर्धा.
|
Rar
| |
| Thursday, December 08, 2005 - 2:50 pm: |
| 
|
मी last week मधे प्रथमच ह्या talent search प्रकारातला show पाहिला आणि my only reaction was things have changed a lot! मला विनयचं म्हणणं पटलं.... पण त्याच बरोबर हे सतत नवीन गायकांना नावं ठेवली जातात तेव्हा चक्क वाईट वाटतं... किशोर, रफ़ी, हेमंत कुमार, मन्नाडे, आशा लता पासून ते बेगम अख्तर, आबिदा परवीन आणि what not , ऐकत असतानासुद्धा मला स्वत्:ला सोनू निगम, उदीत नारायण, शान, के के, अभिजीत, कुणाल गांजावाला, नीरज श्रीधर, कैलाश खेर,किंवा अगदी latest उदाहरण म्हणजे ' मै मेरी पत्नी और वो ' मधे ' गुंचा कोई मेरे नाम कर दिया ' ही गज़ल गाणारा मोहीत चौहान हे कुठेही मेहनतीत किंवा आवाजात कमी पडतात असं वाटत नाही. ही industry अशी आहे जिथे एका रात्रीत लोकं star होउ शकतात तसंच एका रात्रीत ती रस्त्यावरही येउ शकतात. एकदा यश मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवणं खूप जास्त अवघड. ह्या नवीन लोकांकडे talent नसेल, त्यांनी मेहनत घेतली नाही तर लोकं त्यांचा आवाज ऐकूनच घेणार नाहीत. योगच्या लिखाणाला respect देउन सांगते की मला इथे V & C करायचा नाहीये. पण कोणाला हवीच असतील तर ह्या नवीन लोकांच्या ५० गाण्यांची list मी द्यायला तयार आहे की ज्यात IMHO हे लोक गाताना आवाजात, feelings express करण्यात किंवा गाण्याचा mood express करण्यात कुठेही कमी पडलेत असं मला वाटत नाही. आणि शेवटी गाणी किंवा एकूणच music हा असा प्रकार आहे की जो तुम्ही ' जगला पाहिजेत ' ... आणि प्रत्येकाच्या जगण्याच्या तर्हा आणि requirements ह्या वेगळ्या असणार हे मान्य करून, त्याला respect देउन, ज्याला जसं जगायचयं तसं जगू दिलं पाहिजे
|
Avdhut
| |
| Thursday, December 08, 2005 - 4:07 pm: |
| 
|
आजकालची गाणी दोन प्रकाराची असतात. ऐकायची गाणी व बघायची गाणी. Remix ही दुसर्या प्रकारात मोडतात. कोणत्याही जुन्या प्रसिध्द गाण्याचे बोल उचलायाचे व कोणालातरी रस्त्यावरुन उचलायचे. कोठल्यातरी English गाण्याचे dance mucsic आणी झाली Remix . गाण्याचे बोल मधेच थांबवुन काही लोक ते Rap की काय म्हणतात त्यांचे भुंकने सुध्दा टाकतात.
|
Sashal
| |
| Thursday, December 08, 2005 - 6:06 pm: |
| 
|
विनय आणि RAR ला अनुमोदन .. आजचं संगीत हे कदाचित आपल्या वाटतं त्या class मध्ये बसणारं नसलं तरी film industry मधले नियम वेगळे आहेत .. माझं ज्ञान खूप महान नाही पण लता जेव्हढी popular आहे तेव्हढी परवीन सुलताना किंवा तत्सम कोणी आहे का? मग जर ती popularity , ते glamor आणि तो पैसा हवा असेल तर ज्याची demand आहे त्याचा supply करायलाच हवा .. मग त्यासाठी एखाद्या TV Show ला किंवा त्यांच्या means of judgement ला critisize करणं मला योग्य वाटत नाही .. आणि आजकालचे संगीत दिग्दर्शक copy करतात etc. म्हणणंही मला अजिबात पटत नाही .. प्रत्येकानेच आशा, लता, किशोर, रफ़ी किंवा शंकर जयकिशन, सी रामचंद्र असायलाच हवं का?
|
Sashal
| |
| Thursday, December 08, 2005 - 6:10 pm: |
| 
|
योग, तुझं आतचं हे post आवडलं आणि सौम्यही वाटलं पण वरच्या ललित मधले शब्द बरेच तीव्र वाटले ..
|
Yog
| |
| Thursday, December 08, 2005 - 6:16 pm: |
| 
|
मंडळी विषय थोडा भलतीकडे जातोय म्हणून ही पोस्ट. रार, तुझ म्हणण बहुतांशी योग्य आहे. गुणवत्ता वादातीत आहे अस मिही म्हटलय, यश अपशय या थोड्या फ़ार नशीबाच्याही गोष्टि आहेत. आणि प्रत्त्येक व्यक्तिनुसार दर्जाची परिमाणं बदलणार हेही ठिकच. मला आजकाल एकन्दरीत सन्गीताच केलेलं वाह्यात अन अनाठायी बाजारीकरण, शिकवण, शिकवणूक अन प्रात्यक्षिक यातील तफ़ावत अन त्याला आपणच दिलेला पाठीम्बा हे माण्डायच होत. मि लेखातही म्हटल आहे की दुर्दैवाने " आपलीच मागणी अन आपलाच पुरवठा " (दोश कुणाला देणार?). या सन्गीताच्या धन्द्यात जितका पैसा निव्वळ चमक धमक अन उथळ प्रदर्शनावर खर्च होतोय त्याचा अर्धा पैसा अन प्रोत्साहन खेळात, लोक कलात, ऐतीहासीक जतन इत्त्यादी मधे गुन्तवला तरी बरच भल होईल... अर्थात प्रश्ण फ़ार व्यापक आहे आणि इतर bb वर तशा चर्चा झाल्याच आहेत. एखाद्या गायकानी वा गायिकेने 50 चान्गली गाणि म्हटली असतील हे त्यान्च यश आहे पण गाण किव्वा music जगायच असेल तर some idiotic sms based shows and marketing ची गरज नाही, त्यासाठी खर्या रसिकाचे कान अन खर्या गायकाचा गळा पुरेसा असतो! माझा मूळ प्रश्णच अनुत्तरीत आहे की, नविन so called idols निर्माण करण्याची काय गरज? आपल्याकडे सन्गीत दुनियेत आजच्या कालातही idols आहेत, that are truely idols.. अन जे फ़क्त गायकीच्याच बळावर आहेत, नाचण्याच्या, sms च्या, किव्वा कुठल्याही धन्द्याच्या बळावर नव्हेत. idols ही सन्कल्पनाच या धन्देवाल्यांनी इतकी उथळ अन स्वस्त करून टाकलीये की idol 1, idol 2,...... and so on अजून पैदा होतच आहेत.. एखाद्या न सम्पलेल्या कथे सारखे. तुम्हाल खरच सन्गीताचे आदर्श निर्माण कराय्चे आहेत ना, मग खरच तशा प्रकारच्या स्पर्धा प्रश्ण अन परिमाण ठेवा ना. भातखन्डे विद्यालयासारख्या किती उपक्रमांना यानी मदत केली आहे? किती deserving candidates च सन्गीत शिक्षण यांनी उपलब्ध करून दिलय? अप्रतीम गाणारे गायक गायीका खोर्याने गल्ली मुहल्ल्यात पडले आहेत, त्यान्च्या mentoring साठी किती धन्देवाले झटतात? किव्वा निदान तसा प्रयत्न तरी करतात? इथे कशाचाच कशाशीच ताळमेळ नाही. चकल्या पाडल्यागत sheet music copy paste करून चार गाणी आपल्या माथी मारायची अन त्याच त्याच गीतगिरणीतल दळन दळून वर idol गवसल्याची ढेकर द्यायची. (जीथे मूळ पायाच पोकळ वा नक्कल करण्याचा असतो तिथे दुसर काय होणार? मध्यन्तरी हरिहरनजी एका कार्यक्रमाच्या निमीत्तने भेटले तेव्हा म्हणले, सन्गीताच्या दुनियेत मी अजूनही विद्यार्थी आहे. माझ्या दृष्टीने यातच सर्व आलं) we all know that these shows were copied from US Based shows.. except original saregama विनय म्हणतो तसे सन्धी उपलब्ध करून देणे हे स्तुत्त्यच आहे पण त्यातून आम्ही फ़ार मोठा भगवान वगैरे घडवतोय किव्वा अखिल सन्गित विश्वासाठी एक महान कार्य हाती घेतलय हा पोकळ देखावा जो चालवलाय तो हास्यास्पद आहे. पिढीनुसार आवड बदलते यात दूमत नाही, किम्बहुना आपण नविन सन्गीत Accpet करण्यात बरीच flexibility दाखवली आहे, पण म्हणून " बदल अन नाविन्य " नावाखाली वाट्टेल ते प्रदर्शन का बर खपवून घ्यावे? मि माझ्याही लेखात म्हटले आहे की या स्पर्धातून यशस्वी गायक पुढे येतील पण एकन्दरीत सन्गीताची प्रगती त्यामूळे कुठे उर्ध्वगामी झाल्याच दिसत नाही. नाट्यसन्गीत, शास्त्रीय गायन यान्च्या आज एक गन्धर्व, वा इतर मोहत्सव अन मुम्बई पुणे शहरे सोडता किती मैफ़िली होतात? त्याला खरच किती श्रोता वर्ग आहे? एकेकाळी भावगीताच सुवर्णयुग उभ करणारी मराठी परम्परा कुठे गेली? त्याच त्याच जुन्या गितान्च्या स्मरणयात्रा अन नक्शत्रांची देणी आपण किती दिवस काढत बसणार आहोत? talent is there.. much more, much better and in many shapes and forms compared to even old times (हे मि नाही बर्याच दिग्गज्जांनी मान्य केलय्) प्रश्ण इतकाच आहे की सन्गितात आम्ही महान उदात्त कार्य करतो असे मिरवणार्या या so called idolistic सन्गीत सेनेने त्यान्चे पैसा, प्रयत्न श्रम खरच किती अर्थाने योग्य ठिकाणी आणि शुध्ध हेतूने वापरले आहेत? असो.. i guess we all can write a lot on this topic, cause music perhaps is very close to our hearts than anything else.. तूर्तास इथेच थाम्बतो. " नाम गूम जायेगा, चेहेरा ये बदल जायेगा, मेरी आवाजही पेहेचान है, गर याद रहे... " असा एक तरी आवाज या बाजारातून मिळाला तरी पुरे आहे. c.b.d.g. sashal, looks like while i was revising my post, u beat me with the timing..! anyways, copy करतात हे तुला पटत नाही हे म्हणण सोप आहे may be cause u donn have that background पण सर्वच copy असत अस कुणी म्हणत नाहीये आणि जे बहुतांशी असतच ते सहज ओळखता येत. प्रत्त्येकाने आशा, लता, रफ़ी वा तसे असायलाच हव अस कोण म्हणतोय, पण आम्ही ते घडवतोय या देखाव्याच प्रक्षेपण धन्देवाल्यांनी बन्द करावं, इतकच! असो. आधी लिहीलेल ललितही अगदी अगदी सौम्य आहे, घरच्या कढवलेल्या साजूक तुपा सारख, पण आता तीव्र ललित लिहीणं पुन्हा चालू करावं म्हणतोय! 
|
Sashal
| |
| Thursday, December 08, 2005 - 6:24 pm: |
| 
|
मी हे म्हणत नाहीये की ते copy करत नाहीत .. पण त्यांनी कशाही प्रकारे निर्माण केलेलं संगीत जर चालतंय, लोकांना आवडतंय तर त्यात त्यांचा काय दोष? असो .. तू म्हणतोस त्याप्रमाणे बरेच फ़ाटे फ़ोडता येतील या विषयाला .. पण सा रे ग म मी हल्ली regularly बघतेय, अगदी सगळंच्या सगळं मला आवडतं तसं नसलं तरी बराच चांगला वाटतो तो show म्हणून प्रतिक्रीया लिहाविशी वाटली .. 
|
Alhad
| |
| Friday, December 09, 2005 - 12:48 am: |
| 
|
सगळे कलाविष्कार हे तात्कालिक समाजाचे प्रतिबिम्ब असतात. समजातील बदलणार्या मूल्यांचा त्या कलेवरही तितकाच परिणाम होत असतो. पण शेवटी ज्या कलाविष्कारात सृजनशीलता दिसते, जे कलाविष्कार कला मूल्यांशी प्रमाणिक रहातात तेच कालातीत होतात. मला पूर्ण खात्री आहे कि लोक १५ वर्षांनी " ऐका दाजिबा " remix विसरतील पण " गारवा " मात्र निश्चितच लक्षात ठेवतिल. बरेच वेळा असेही घडते की एखाद्या कलाविष्काराला तात्कालिक समाज नाक मुरडतो पण तोच कलाविष्कार १५ वर्षांनी classics मध्ये गणला जातो. 'शाम ढले खिडकी तले' ला माझ्या आजी/आजोबांनी नाकं मुरडली. माझ्या आई / वडिलांनी ते डोक्यावर घेतले आणि आपल्या पिढीसाठी ती classics आहेत. शिवाय तुम्ही आजच्या गाण्यांची तुलना फ़क्त गेल्या ५० वर्षातील चांगल्या गाण्यांशीच करता त्यामुळे चित्र अधिकच दारूण दिसते. लता / आशाने गेल्या ५० वर्षांत २०००० + गाणी गायली असतील पण तुम्हाला जर त्यांच्या अतीव लोकप्रिय गाण्यांची यादी काढायला सांगितली तर ती ५०० च्या वर जाणार नाही. ह्याचा अर्थ असा होतो की उरलेली १९५०० गाणी कदाचित विसरण्याजोगीच आहेत. So moral of the story ... ज़े संगीत तुमच्या कानांना तृप्त करते त्याचा पूर्ण आनंद घ्या ... आणि दुसयांना त्यांच्या आवडणार्या संगीताचा आनंद घेऊ द्या ... सर्वे सुखिनः सन्तु .. -आल्हाद
|
Bhagya
| |
| Friday, December 09, 2005 - 12:54 am: |
| 
|
योग...बरेचसे पटले तुझ्या ललितमधले विचार.
|
इथे discuss करण्याचा मुद्दा नाही, तरीही लिहिल्या शिवय रहावत नाही. Regarding copy-paste stuff.. नावाजलेल्या जुन्या दिग्गज संगीतकारांनी, गायकांनी copy-paste , चोरी कधी केली नाही का फ़रक एवढाच की ' जमाना बदल गया और चोरीके तरीकी भी'! बाकी V&C वर हा topic असता तर लिहिले असते अजुन .... !
|
Asami
| |
| Friday, December 09, 2005 - 11:39 am: |
| 
|
अगदी ग DJ . पण yog चा मुद्दा तो नाहीये. त्याचा बाजारीकरणाला विरोध आहे. पण जिथे पूर्ण अयुष्य हे एक market झालय तिथे संगीत अपवाद कसे राहील रे भाउ बाकी rar ला अनुमोदन. तुझ्या list मधे मी अजून 50 add करून देइन ग हवे तर.
|
बाजारीकरण सुध्दा तेंव्हाही होतच, अत्ता ते मांडायला media जास्त आहे इतकेच ! काहींना ते बाजारीकरण वाटते तर काहींना 'Publicity ' .
|
Champak
| |
| Friday, December 09, 2005 - 1:24 pm: |
| 
|
गोलशुन्य बरोबरीत फ़ुटबाॅल सामना संपला म्हणुन त्या खेळाडुंनी केलेले प्रयत्न अन श्रम कसे विसरता येतील? यशाची फ़ुटपट्टी बदलली कि असे होते! काय चुक काय बरोबर कसे ठरवाल? Event management च्या जमान्यात अभिजात संगीत / कला दुर्मिळ च रे भो!
|
Bee
| |
| Friday, December 09, 2005 - 10:13 pm: |
| 
|
मी हा बीबी पूर्ण वाचला नाही. पण सा रे ग मा मधे मला पूर्वी सारखा रस राहिला नाही. ही लोक गायकांना का असे चित्रविचित्र मेक उप करून stage उभे करतात. तो भडकपणा पाहूणच Channel change करावेसे वाटते. मी जेन्व्हा गायकान्च्या अगदी सुरवातीच्या मुलाकती पाहिल्यात त्यात ती खूप निरागस साधीसुधी दिसत होती. पण TV presentation मुळे ह्या लोकांनी त्यांच्या इतका बेढब नखरा केला की श्या हे काय असे उद्गार तोंडातून निघतात. हल्ली एकाचवेळी नाचने आणि गाणे हे देखील TV वर दाखविले जाते त्यामुळे गायकाची दमछाक होत आहे हे चक्क नजरेस पडते पण तरीही तो ते करत असतो आणि परिक्षक नुसते हातावर हात ठेवून पहात असतात. हल्ली Energy चे market आहे. गाताना नाचताना, चित्रपटातले संवाद फ़ेकताना इतकी energy पाहून मीना कुमारी, वहिदा रहिमान हे संथ कलाकार कसे जन्माला आले ह्याचे नवल वाटते.. आणि त्यांच्यापासून आपण काहेच घेत नाही ह्याचे वाईट वाटते. जुने कलाकार, मग तो कुठल्याही क्षेत्रातील असो, आजच्याइतका बोगस कधीच नव्हता. इतके सगळे resources असूनदेखील आजची पिढी कलेच्या बाबतीत खूप कमी पडते आणि ह्याला कारण म्हणजे जीवघेणी स्पर्धा आणि immature रसिक. आजच्या काळातील नवीन गाण्याचे कितीही कौतूक केले तरी आजचा कलावंत हा पूर्वीच्या कलावंताची सर करू शकत नाही.
|
Bee
| |
| Friday, December 09, 2005 - 10:56 pm: |
| 
|
रार, नेहमीप्रमाणे तुझे पोष्ट प्रशंसणीय आहे. निवडक गाणी नक्कीच आहेत, गायकही आहेत पण चांगली गाणी भंपक गाण्यामुळे दबली जातात हेही एक कारण आहे. किंवा असे असेल की हल्लीच्या गाण्यांनी खर्या संगीतप्रेमींची इतकी निराशा केली की त्यांनी जुन्या गाण्यांनाच हृदयाशी लावून ठेवले आहे. पण तू मात्र एक सच्ची रसिक व्यक्ती आहेस हे मी मानतो. नवीन गायक, गाणी ह्यांच्याबाबतीतही तू खूप जागृक आहेस हे लक्षात आले.
|
Champak
| |
| Saturday, December 10, 2005 - 8:53 am: |
| 
|
Euro-junior या कार्यक्रमात युरोपातील २५ देशातील बाल कलाकारांना या सगळ्या देशातुन sms केले जातात अन त्यातुन विजेते निवडले जातात! operation triumpha मध्ये पुर्ण स्पेन मधुन sms मागवले जातात! mira quien bila... ह्या नाचा वर आधारित कार्यक्रमात ही पुर्ण स्पेन मधुन sms मागवतात! btw मला एक अडचण हे, मला sms लिहिती येत नाही! हॅन्ड्सेट चा प्राॅब्लेम हे कि माझा ते च समजेना झलय! पन योग, महफ़िल नक्की जमवु रे एकदा
|
योग, लेख खुप छान आहे, पण मला वाट्ते कि हे जे कहि शोज आहेत ते केवळ लोकान्च्या मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, त्यातुन तुम्ही अभिजात किंवा शास्त्रीय संगीताच्या भल्याची अपेक्शा करु नये. एकता कपुर च्या serials प्रमाणे ज्याना वेळ जात नाही त्यानी बघावे. बाजारीकरणा बाबत, एवढ्च म्हणता येइल की, Its Marketing .. Thats all
|
Manuswini
| |
| Tuesday, December 13, 2005 - 5:57 pm: |
| 
|
ह्या रेमिक्स गाण्या वरुन आठवले प्यार तो होना ही था मधिल एक छान गाण्याची एत्की वाट लागलेली एक ईमोशनल गाण जब किसिकी तरफ़ दिल झुकने लगे.. बात आके जुबा पर रुकने लगे छे!
|
Hi All R U interested in starting a 'Pune Chapter' of Maayboli? If yes, pls e-mail me your ideas & suggestions pkarandikar50@gmail.com Bapu.
|
Anilbhai
| |
| Monday, December 19, 2005 - 8:10 am: |
| 
|
बापु ही पुणे चाप्टर काय भानगड आहे. इथे पुण्याचे ( पुण्यातले आणि पुण्या बाहेरील ) कीतीतरी चाप्टर ( BB ??) आहेत. खालील ठिकाणी पहा. /hitguj/messages/32/51.html?1134991919
|
|
|