Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 21, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 21, 2006 « Previous Next »

Ninavi
Tuesday, June 20, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> त्या क्षणाचा मी, त्या क्षणाची ती...
>>>> हुलकावणार्‍या उत्तरांच्या मागे, कविने धावायचे.

क्या बात है!

Meenu
Tuesday, June 20, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपराध कधी, कोणता नव्हताच केला,
झाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला.
मीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा,
जीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा? >>> वा बापु सुंदर

Pkarandikar50
Tuesday, June 20, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aparna,
Simply Great.

Zaad,
अरुण कोलटकरांची आठवण करून देणारी कविता. ह्याहून मोठा compliment मी तरी देउ शकत नाहीये.
Ninavi, Meenu,
आभार!

बापू


Yog
Tuesday, June 20, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zaad,
मस्त लिहीली आहेस कविता, शेवट तर खासच!

Pkarandikar50
Tuesday, June 20, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एखादी कविता

आलो होतो मी कुठे,
सांगायला तुम्हाला की
मी लिहितो, तुमच्यासाठी?
पण भेटलोच आहोत तर,
थांबा की जराशी, वाचून पहा,
माझी एखादी कविता?
नका बसू लावत अर्थ तिचे
अशानेच होतात अनर्थ अर्थांचे.
निरर्थक प्रवासाची जुजबी टिपणे,
तेव्हढ्याच निरर्थक अव्याहताची.
करून तिरपी सुरई चांगली,
घ्याल भरून प्याला काठोकाठी,
हाता-तोंडाशी लावण्या खारे चणे,
जोडीला तशाच माझ्या रुबाया-गज़ला.
जाईल चढत घेऊन ती वरवर,
जशी विस्मृतीच्या हल्लक ढगांवर
तरंगाल, तुम्ही जेंव्हा, किंवा
इरसाल ती बया उतरेल,बघता बघता,
वास्तवाच्या पोकळीचा मस्त सपका
बसून फुटेल थोबाड, रक्त येइल,
तेंव्हाही असू द्या सोबतीला,
माझी एखादी कविता.
तेवढंच बरं वाटेल, जीवाला.

-बापू





Pkarandikar50
Tuesday, June 20, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी दोस्तहो, 'माझी एखादी कविता' मधल्या दोन ओळी टाईप करायच्या राहून गेल्या. "तेव्हढ्याच निरर्थक अब्याहताची" नंतरच्या दोन ओळी अशा आहेत:-

"अथांग, अनंत पसरट रेतीवरची,
बडेजावी पाऊले, एका हव्यासाची"

तसं पाहू गेलं तर ह्या दोन ओळींनी (किंवा संपूर्ण कवितेनेही) फारसा फरक पडत नाही, तरीही.

-बापू,


Kmayuresh2002
Tuesday, June 20, 2006 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू,अगदी अगदी... कविता मस्त:-)
अपर्णा,झाड सहीच:-)


Aparnas
Wednesday, June 21, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसी, मुक्तछंद, बापू, मयूर सगळ्यांना मनापसून धन्यवाद...
बापू मी पण करंदीकर च आहे माहेरची :-)


Lopamudraa
Wednesday, June 21, 2006 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडेजावी पाऊले, एका हव्यासाची"
vaa kaay chaan lihiley.. baapu
aajun baakichaa maahaapur vaachalaa naahii,
vaachate ni pmag prateekriyaa dete.


Naadamay
Wednesday, June 21, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगले लिहिलेय बापू, `वास्तवाच्या पोकळीचा सपका बसून.."


Archanamandar
Wednesday, June 21, 2006 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुसटतं आयुष्य म्हणजे कुणी आपलं वाटत नाही
थांबलेलं वाटलं तरी संपलं वाटत नाही
दुखत असलं खूप तरी दुखलं वाटत नाही
वर्षाव झाला अगदी तरी शिंपलं वाटत नाही
खोल खोल गेलं तरी रूजलं वाटत नाही
आपलं आपलं म्हणतानाच परकं वाटत रहातं
कितीही सांभाळलं तरी पोरकं वाटत रहातं
गडद गडद केलं तरी भुरकं वाटत रहातं
कुठेतरी चुकतंय असं सारखं वाटत रहातं

शोधावं म्हटलं तर मिळत नाही
जुळवावं म्हटलं तर जुळत नाही
पुसटतं आयुष्य...
म्हणजे काय ते कळत नाही.

Lopamudraa
Wednesday, June 21, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

antyaachii saamaajik kavitaa khup aavadalii,
jhaad,meenu,naadamay,archanaa,aprnaa,mansii,
ekaahun ek varachadh kavitaa aahet.!!!

Manasi
Wednesday, June 21, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा अर्चना छान.
गडद गडद केलं तरी भुरकं वाटत रहातं ... :-)

बापू तुमचि कविता पण आवडली
बडेजावी पाऊले, एका हव्यासाची...
खरेच छान आहे


Zaad
Wednesday, June 21, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, योग, मयुरेश, लोपा प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
निनावी, खरंय. चित्रकवितेतही चालली असती ही कविता. मी आधी पाहिलं नव्हतं ते चित्र.
प्रभाकर, प्रतिक्रिया खूपच मोठी आहे रे तुझी... पण खरं सांगायचं तर मलासुद्धा ही कविता लिहून झाल्यावर कोलटकरांचीच आठवण झाली! :-)

आता ह्या कवितेबद्दल थोडंसं....

एका अज्ञात निराकार शक्तीला माणूस मानत आलेला आहे. त्या शक्तीला माणसाने 'आपापला देव' ह्या संकल्पनेत गुंफून धर्माची एक 'तीक्ष्ण' परंपरा निर्माण केली. ही परंपरा तीक्ष्ण एवढ्यासाठी की माणसाच्या या (धार्मिक) भावनांना एक प्रखर धार आहे. तिच्या वाटेला कुणी गेलं तर प्रसंगी रक्तपातही होऊ शकतो हे सिद्ध झालं आहे. ही परंपरा कधीतरी कोलमडून पडेल असं मला वाटलं, कारण ह्या परंपरेत ईश्वरच दिसेना झाला... पण धर्माच्या या भिंती इतक्या कट्टर की, उंच दरीतून खाली सोडलेले फोलपट जसे खाली न जाता वर वरच येत राहते तशी माणसाने आपापली 'देव' ही संकल्पना उचलून धरली. परंतु जेव्हा मी या शक्तीला सर्व परंपरेतून मुक्त करून पाहिलं, ही शक्ती चराचरात पसरली असल्याची जाणीव मला झाली. फक्त चिमटीतून निसटलेल्या उन्हाप्रमाणे, मी ती धरून ठेऊ शकत नाही. ईश्वराच्या अमूर्त, निराकार रुपाची कितीही जाणीव असली तरी त्याला मूर्त रुप देण्याची माझी सनातन भूक मला टाळता येत नाही. कुणावर तरी भक्ती असावी, श्रद्धा असावी अशी प्रत्येकच माणसाची मुलभूत प्रेरणा असते. या प्रेरणेतूनच आपण त्या शक्तीला निरनिराळ्या रुपात पाहत असतो. आणि 'भगवंत'ही आपल्या याच भक्तीसाठी भुकेला असतो!!! फक्त होतं असं की, या प्रत्येक गोष्टीची एकेक परंपरा निर्माण होते आणि माणूस मूळ हेतू विसरून परंपरेवरच प्रेम करायला लागतो. परंपरेचा अनाठायी दुराग्रह विसरून खर्‍या भक्तीभावाने येणार्‍या भक्तासाठी पांडुरंग विटेवर उभा राहून वाट पाहत आहे...


Zaad
Wednesday, June 21, 2006 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, दोन्ही कविता आवडल्या.
अर्चना छानच!
अमेय, "श्री तशी सौ" मधली ती कविता मला कुठे मिळेल?


Manasi
Wednesday, June 21, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकाकी

अर्ध्या वळणावरि सोबती
जुळवित जाती नातीगोती
परि पाहता मागे वळुनि
सावलीच ती पडते दृष्टी

कधी भावे संगती कुणाची
मनी कामना सहवासाची
कधी नित्य सहवास असोनि
साथ तयाची जाई विरुनि

असो साथ वा असो संगती
अंती तर कायाही परकी
अज्ञाताचे प्रवासी आपण
आधारास हे एकाकीपण


Zaad
Wednesday, June 21, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसी अप्रतिम आहे कविता!!

Vaibhu
Wednesday, June 21, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्चनामन्दार छान कविता आहे

Pkarandikar50
Wednesday, June 21, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Archana, Manasi,
छान अर्थघन कविता आहेत.
Zaad, Lopa, Manasi,
आभार.
बापू


Pkarandikar50
Wednesday, June 21, 2006 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Archana, Manasi,
छान अर्थघन कविता आहेत.
Zaad, Lopa, Manasi,
आभार.
बापू





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators