मनी राहिले मनाचे कधी बोललोच नाही आज वाटे संगतीने कधी चाललोच नाही
|
घनघोर पावसाची फक्त सुरुवात होती आसवांची आठवांशी झाली रुजवात होती
|
ज्याने त्याने येउनिया कर्ज फेडुनिया जाणे बाकी शून्य करायाला श्वास सोडुनिया जाणे
|
कशी धावता धावता स्तब्ध जाहली हरिणी बाण नाही उरी तरी विध्द जाहली हरिणी
|
आता जरा जरा जीव शांत शांत होत आहे गंगाजल झाली शाई शब्द श्रांत क्लांत आहे
|
Ninavi
| |
| Monday, April 24, 2006 - 2:35 pm: |
| 
|
सूर झाले बंदिवासी सक्त ओठांचे पहारे उरातल्या घावांवर आसवांचे दंश खारे
|
Ninavi
| |
| Monday, April 24, 2006 - 2:37 pm: |
| 
|
हे काय, मला एक नीट कळेस्तोवर तुझ्या चार लिहून होतात.
|
बंद ओठ तुझे तरी गीत ऐकायाला येई डोळ्यांतल्या पाण्यासवे सूर खळाळत येई
|
आईशप्पथ...वैभव, निनावी इथे एक वाचायचा आधीच पुढच्या ४ येतायत....वैभव आज full rajdhani express आहे मस्तच रे!
|
Moodi
| |
| Monday, April 24, 2006 - 4:36 pm: |
| 
|
या सगळ्या लोकांना निखळ अन निर्मळ शब्दाची दैवी देणगी इतकी जबरदस्त आहे, की प्रत्येक वेळेस आपण दाद द्यायला कोणते शब्द शोधावेत यावरच विचार करावा लागतो. 
|
काय एक एक प्रतिभावान लोक आहेत इथे!! मी पण आपल्या ४ ओळी जरा घाबरतच देतेय! विसावुनी कुशीत माझ्या आळवीसी तू विराणि आसवांना आसवांची ओढ का ही जीवघेणी
|
Meenu
| |
| Tuesday, April 25, 2006 - 12:05 am: |
| 
|
वैभव निनावी खूपच छान...
|
Santu
| |
| Tuesday, April 25, 2006 - 3:56 am: |
| 
|
अबबबबबबबब अरे हि काय तुफ़ान मेल कि काय वैभव, निनावि वाह व्वा
|
aaj angaat jhuluk sanchaarali ki kay?!!!!!!! chaan
|
Ruchita
| |
| Tuesday, April 25, 2006 - 5:04 am: |
| 
|
वैभव, निनावी..सकाळचा चहा आज एकदम फक्कड होत वाटत...गाडी अगदी सुसाट धावतेय.... ज़ीवघेणी ओढ तुझी माझ्या मनाला लागली कशी प्रिया ना कळली प्रीत माझी बावरी
|
Jayavi
| |
| Tuesday, April 25, 2006 - 5:56 am: |
| 
|
मूडी, अगदी सगळ्यांच्या मनातलं बोललीस बघ. वैभवा, निनावी अरे काय रे........ ! असं सतत तुमचं लिखाण वाचत रहावंसं वाटतं. अगदी तृप्त होतं रे मन ! रुचिता, मृण्मयी, सुरेखच !
|
धन्यवाद दोस्त्स ... सगळेच मस्त लिहीतायत ... रुचिता .. this one goes out for you जरी एकमेकांसाठी जीव नादावला होता कधी शब्द कोरडे नि कधी कंठ ओला होता
|
Shyamli
| |
| Tuesday, April 25, 2006 - 7:20 am: |
| 
|
मस्त चाललय लोक्स... माझीही मधेच लुडबुड कधि कधि प्रेम म्हणजे वाळुवरल पाणी नाती पटकन विरुन जातात आणि उरते शुष्क माती!! श्यामली!!!
|
क्षणभंगूर प्रेम मना एक रेशिमबंध देते वाळूवरचे पाणीही वाळूला मृदगंध देते
|
Shyamli
| |
| Tuesday, April 25, 2006 - 7:49 am: |
| 
|
मृदगंध झाला तरी क्षणभंगुरच ना तो? एकांतचा बरा........ तो तरी निरंतर असतो!!!! श्यामली!!!
|