|
Moodi
| |
| Monday, January 09, 2006 - 1:54 pm: |
| 
|
श्री सूर्याष्टक. " जपाकुसुम संकाशम काश्यपेयं महद्युतीम तमोरीम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम. " श्री गणेशाय नम : सांब उवाच|| आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमो s स्तुते||१|| सप्ताश्वरथमारुढं प्रचंड कश्यपात्मजम्| श्वेतपद्मधर तं सूर्य प्रणमाम्यहम||२|| लोहितं रथमारुढं सर्वलोकपितामहम महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम||३|| त्रैगुण्यंच महाशूरं ब्रम्हाविष्णुमहेश्वरम्| महापापहरं देव तं सूर्य प्रणमाम्यहम||४|| बृहितं तेज : पुंजंच वायुआकाशमेवच्| प्रभुचंसर्वलोकांनां तं सूर्य प्रणमाम्यहम||५|| बंधुकपुष्पसंकाशं हारकुण्डलभूषितम्| एकचक्रधरं देवं तं सूर्य प्रणमामह्यम||६|| तं सूर्य जगद्कर्तारंमहातेजप्रदिपनं| महापापहरं देवं तं सूर्य प्रणमाम्यहम्||७|| तं सूर्य जगतानाथं ज्ञानविज्ञानमोक्षदम्| महापापहरं देव तं सूर्य प्रणमाम्यहम्||८|| सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपिडाप्रनाशनम्| अपुत्रो लभते पुत्रं दरिद्रो धनवान्भवेत्||९|| अमिषं मधुपानंच य : करोती रवेर्दिने| सप्तजन्म भवेद्रोगी प्रतिजन्मदरिद्रता||१०|| स्त्रीतैलमधुमांसानि य : त्यजेत रवेर्दिने| न व्याधिशोकदारिद्र्यं सूर्यलोकं स गच्छती||११||
|
Chinnu
| |
| Monday, January 09, 2006 - 6:01 pm: |
| 
|
मूडी, सहस्त्ररश्मीच्या सहस्त्रो किरणंएवढे धन्यवाद तुला! माझी गाडी पहिल्याच दोन ओळींवर अडकली होती इतके दिवस!!
|
Madhavm
| |
| Friday, January 20, 2006 - 5:22 am: |
| 
|
मूडी, अष्टकात ८ श्लोक असतात ना? ह्यात जास्त कसे?
|
Gurudasb
| |
| Friday, January 20, 2006 - 7:36 am: |
| 
|
माधव बरोबर आहे ना ते . आठ श्लोकानंतर फ़लश्रुती आहे . कुठल्याही स्तोत्रात असते ना तशी.
|
Madhavm
| |
| Friday, January 20, 2006 - 9:41 am: |
| 
|
मूडी, मी पण तसा विचार केला होता पण पहिला श्लोक पण मला अष्टकातला वाटला नाही, कारण बाकिच्या श्लोकांशी त्याचे यमक जुळत नाही. अष्टकातील सगळ्या श्लोकांचे यमक सहसा जुळणारे असते. किंवा प्रत्येक श्लोकातील शेवटचे काही शब्द सारखेच असतात. अकराव्या श्लोकात रविवारी स्त्रीतैलमधुमासानी' वर्ज्य सांगितले आहे. तैल म्हणजे तेलच का? आणि ते सूर्याला वर्ज्य का? just a question to improve my GK
|
Moodi
| |
| Friday, January 20, 2006 - 9:47 am: |
| 
|
माधव तसे मला पण समजलेले नाहीये की त्यात तेल का वर्ज्य आहे म्हणुन. कदाचीत कुणी संस्कृत जाणकार याचे निराकारण करू शकतील. अन वरचा एकदम पहिला श्लोक आहे ना " जपाकुसुम " हा सूर्याचा असल्याने सूर्याचे कुठलेही स्तोत्र किंवा नमस्कार घालायच्या आधी म्हणायचा असतो, म्हणजे त्याचे नामस्मरण आधी या श्लोकाने करायचे असते. म्हणजे प्रथम आपण जसे देवाला आवाहन करुन त्याच्या वर्णनाची स्तुती करतो तसे आहे ते. शेवटची फलश्रुती आहे. गुरुदासांचे बरोबर आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|