Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 02, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through May 02, 2007 « Previous Next »

Milindaa
Tuesday, May 01, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, इथे कोणालाही इंग्लिश लिहीण्याची सूट दिलेली नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी देवनागरीतच लिहावे नाहीतर लिहू नये. देवनागरीत लिहावे असा आपण नक्की सांगू शकतो पण म्हणून सारखं 'मराठीत लिहा' असंच पोस्ट टाकण्यात मला तरी काही अर्थ दिसत नाही.

आणि माझ्या मते बापुचा यांना कॉमेंट हवी की नको हे लिहीण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला त्यावर कॉमेंट करायची असेल तर नक्कीच करु शकता, पण त्याने असेच का लिहीले वगैरे विचारणे (ते आक्षेपार्ह भाषेत नसेल तर) काही बरोबर नाही असे वाटते.

आणि सरते शेवटी, ते ४ शब्दांविषयी. मागे Admin यांनी उत्तर दिले होते की ती मर्यादा सदस्यांनी अर्थपूर्ण पोस्ट टाकावं यासाठी घातलेली आहे. अर्थात त्यावर पळवाटा पण निघालेल्या आहेतच. पण असं करण्याचा उद्देश चांगला आहे हे लक्षात घ्या.


Anjalisavio
Wednesday, May 02, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

५५ वर्षाची बाई OLD LADY??? आई ग, जर त्या बाईनी हे वाचल तर हाणेल तुला.
आणि कुणि सांगितले कि देवाला नवस वगैरे करुन सासुसुनेच पटु लागते? ऐ. ते न.
माणुस (आईचा), धन्य आहात आपण.


Meggi
Wednesday, May 02, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच दिवस झाले चर्चा वाचत आहे. चमत्कारी बाबांचे चमत्कार पण वाचले. पण असे चमत्कार काय उपयोगचे ज्याचा अजुन देशाला कही उपयोग नाही. चमत्कार फक्त ऐकिव असतात यांचे. दरीत पडणार्‍या बापू भक्ताला वाचवायचे, पन tumor पिडीत बापुभक्ता साठी कितीही आवाहन केले तरी response द्यायचा नाही. हे कसले चमत्कार??

अंजु, किती दिवसान्नी? :-)



Bhramar_vihar
Wednesday, May 02, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांस भी मधे... बापुंना scope आहे तर! पण गोची नक्की होती कुठे?? त्या बाई त्रास द्यायच्या की सून?? की बापुंच्या भक्तीमधे आल्यावर बाई घराबाहेर जास्त राहु लागल्या (अस घडताना मी पाहिलय बरं) म्हणुन घरात वाद कमी झाले?

दादा आठवल्यांनी संपूर्ण गाव व्यसन मुक्त केले. माझा एक बापु भक्त मित्र अजुन सिगारेट सोडु शकत नाहीये. बापुच स्वत: ५५५ ओढतात, भक्त काय कप्पाळ सोडणार?


Gurudasb
Wednesday, May 02, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कधी चमत्कार होऊन हे समाजबांधव खाईतून सुटतात हे पहायला पाहिजे . भक्ती आणि अवडम्बर यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे हे लक्षात यायला हवे . कमकुवत अविचारी मन , चार जणात मिरवण्याची हौस , प्रयत्नवादापासून दूर जाऊन स्वकर्तृत्व नाकारणे , अंधविश्वासाला बळी बडणे अशी मनोवृत्ती . सेवा वृत्ती अंशरुपात प्रत्येकाजवळ असते . पण त्याच्यावर कुणी अगोदर विचार करत नाही . दुसर्‍याने का ती जाणवून द्यायला हवी . नामस्मरण कुठेही , कधीही करता येते, त्यासाठी ठराविक वह्यांची गरज नाही . आणि मोठ्या देणग्यांच्या मोबदल्यात जर कर्तृत्वात , विचारात बदल होत असेल तर या अज्ञानाला काय म्हणायचे ?
आठवण होते मित्राने सांगितलेल्या एका गोष्टीची . प्रातिनिधीक .
एका गजबजलेल्या रस्त्यावर एक भामटा मध्येच उभा राहिला . त्याच्याबरोबर त्याचे ३ / ४ सवंगडी होते . आकाशाकडे बोट दाखवून त्याना काहितरी उगाच दाखवू लागला . लोकाना खरेच काहितरी आहे असा गैअसमज होऊन ही गर्दी जमायला लागली . कुणाला काही समजेना . पण उत्सुकतेने जो तो एक दुसर्‍याला दाखवत होता . प्रत्यक्षात काहीच नाही . एवढ्यात ते मुळचे चौघे काढता पाय घेऊन जमलेल्या बघ्यांच्या खिसे पाकिटांवर डल्ला मारून पसार झाले . समाजात या अशा गोष्टीचा फ़ायदा घेतला जातो .


Anamikaa
Wednesday, May 02, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमरा
valid point अगदी मनातले बोललास.माझ्या माहितितिल अजुन एक बापुभक्त स्त्री दुसर्‍या एका विवाहित स्त्रीचा संसार मोडण्यास कारणीभुत ठरतेय. बापुंची भक्त आणि असे आचरण? विसंगत आहे बुवा?
मी अजुनही उत्तराच्या प्रतिक्षेत आहे.बहुतेक "आपण रांगेत आहात कृपया प्रतिक्षा करा" अजुन माझ्या आवाहनाची वर्णी बापुंचरणी लागायची बाकि आहे" असच दिसतय....?
आज पर्यंत माझ्या एकाही प्रश्नाचे सुसंगत आणि पटेल असे उत्तर बापुभक्तांपैकी कुणीही दिलेले नाहि.(मुळात प्रश्न जाणिवपुर्वक वाचलाच नाहि) याला संवेदनाशुन्य माणसे नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?.(परिवारातील एका पिडीत व्यक्तीला मदत करण्यास आपण बांधिल आहोत हि भावनाच मुळात अस्तित्वात नाहि)
बापुंची मर्जी फ़क्त आपल्यावरच रहावी आणि इतर कुणावर त्यांची कृपादृष्टी होवु नये असा स्वार्थी विचार तर बापुभक्त करत नसतिल?याला अप्पलपोटेपणा म्हणतात नाहि का?
आणि सासुसुनेच्या भांडणे थांबण्यात बापुंचा चमत्कार कुठुन आला?काय वेडेपणा आहे. आणि तुळजापुरला जावुन देखिल त्या आजींना सकारात्मक परिणाम दिसुन आला नाही याचा अर्थ काय?आम्ही देवाकडे मागताना फ़क्त सर्वांना सुखी ठेव आणि सदबुद्धी दे लहानमुले असतिल तर त्यांना चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना करतो.तुम्ही काय प्रत्येक वेळेस चढावा देता तेंव्हाच बापु प्रसन्न होतात का?

बापुभक्त कृपया दिवे घ्या!
"अनामिका"


Meggi
Wednesday, May 02, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुदास पटलयं एकदम. मागे एकदा विरप्पन बद्दल वाचलं होतं. कोणाला तरी kidnap करुन काही मागण्या केल्या होत्या. १० मागण्यांपैकी ८ मागण्या आदिवासींसाठी होत्या. आपल्यासाठी गुंड असलेला हा माणुस आदिवासिंसाठी देव होता. त्यामुळे पोलीस पकडायला आले की वीरप्पनला स्थानिक आदिवासींचा पाठिंबा असे. केवळ याच कारणासाठी त्याला अनेक दिवस कोणी पकडु शकलं नाही. शंकराचार्य आणि तत्सम बाबा त्यांचं खरं रूप दडवण्यासाठी ही असली नाटकं करतात, तपासणी ची मागणी झाली की यांच्या भक्तांच्या भावना दुखवतात, problem तिथे आहे.

या भक्तांनी आपली बुद्धी, घर काय वाट्टेल ते गहाण टाकलं तरी मला फ़रक पडत नाही, फ़रक पडतो ते त्यांच्या MLM ने, आणि यांच्या बुवांच्या पडद्यामागच्या समाज विघातक करामतींनी.

Admin हा BB बंद करु नका. यांच्या भक्तांना नाही कळल तरी, त्यांच्या जाळ्यात येण्यापासुन कोणी वाचलं तरी पुरे.


Anamikaa
Wednesday, May 02, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरु
अतिशय समर्पक योग्य लिहिलेत आणि अत्यंत चपखल उदाहरण दिलेत गोष्ट सांगुन.
या वही वर रामनाम लिहुन जर पुण्य कमवायचे तर किमान त्याच प्रभु श्रीरामाचे अयोध्येत मंदिर तरी बांधुन दाखवावे की?त्या प्रभु श्रीरामाला आपल्याच जन्मभुमीमधे उपरी वागणुक मिळतेय.
"मुह मे राम और बगल मैं छुरी ".धर्माची चाड फ़क्त रामनाम वहीत लिहिण्यापुरतीच का?
"अनामिका"


Arch
Wednesday, May 02, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस ऐकल की सत्य साईबाबांनी गरीब बाईला अंगारा काढून दिला आणि श्रीमंत माणसाला सोन्याच घड्याळ. किती ते अंतर्ज्ञान. गरीब बाईला काय समजणार त्या घड्याळाची किंमत नाही का?

Deepad
Wednesday, May 02, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो गायकवाड, बापुंच्या आशिर्वादाने सासु-सुनेचे भांडण मिटले हे जरा अतीच होत आहे. हां, मात्रं बापुंच्या नादाला लागल्यामुळे घरातील त्यांचं राहणं कमी होउन सुनेला उगीचच डिवचणं नक्कीच कमी झालं असेल. तुळजपुरचा संबंध दाखवून आता हा बापू सगळ्या देवी-देवतांपेक्शा महान आहे असे सांगून बापूविरोधकांच्या संख्येत नक्कीच भर टकत आहात. धन्यवाद.

Ashwini_k
Wednesday, May 02, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari om Anamika and others,

Ram nam has been chanted even before Ram janma i.e. when Narada gave gurumantra to Valyakoli who then emerged to be Maharshi Valmiki who wrote Ramayan before Ram janma. Hence, a Paapi of any calibre (you may call all bapubhaktas as Mahapaapi) can chant Ram nam irrespective of time, period, caste, place.

I do not want to comment on political part of Ramjanmabhumi. But He (Ram) is the controllar of universe and He is present everywhere (in living / non-living things)including you and me. Do you think that Ram is present or He has only one place to stay i.e. Ramjanmabhumi ? He is the one who is feeding us and taking care of us, punishing us. So who are we to give Him, His right over Ramjanmabhumi ? Who are we to allot Him a place from His own empire ? We are very small, we are His children.

One thing is clear that Ram / Jesus / Allah (whatever you say) will not support those who lose control and shed blood in the name of God. God puts everybody under same test i.e. Karmacha Atal Siddhant. e.g. Aurangjeb razed the Hindu temples (he did not have any religious sentiments about temples). But still he had to pay for this. He spent his last few years of life alone and in bad shape. His own daughter also did not support him in his old age. Here long life proved to be a punishment for him. (Our Bapu says, if we abuse our mother, it is a sin of no match but if you abuse somebody else's mother still it is a sin and we have to pay for that. Ofcourse, we at the first place should not I repeat should not allow anybody to insult our mother but simultenously we should not insult somebody else's mother).

As far as this BB is concerned let us leave the Ramjanmabhumi issue to politicians and talk about Ram (the chaitanya, the ultimate power) who has covered this universe and Ram name (which helps everyboday). He gives same sunlight to grow us, same water to drink, same air to breath to all animals, plants and humans irrespective of caste, religion.

My brothers and sisters of other religions, I respect the name of ultimate power given by you. Only thing is, I am calling the untimate power as Ram, Dattaguru, Krishna, Shiv etc. as I am a human by birth as you are but professing Hinduism.

Please do not read this message with reference to any political context.

Hari om,




Bhramar_vihar
Wednesday, May 02, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, सत्यसाईबाबा एक नंबरचा भोंदु माणुस आहे. नरेंद्र दाभोळकरांनी "ऐसे झाले भोंदु" मधे बराच प्रकाश टाकलाय यावर. असो. बापु मात्र असले काही करत नाहीत हे मी नमुद करु इच्छितो!

Mandard
Wednesday, May 02, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सत्यसाईबाबा म्हणजे एकदम पाॅअवरफ़ुल बाबा आहेत नरसिंहराव, विलासराव देशमुख, सचिन तेंडुलकर सारखे हाय क्लास भक्त आहेत. मधे चेन्नई च्या एका मच अगोदर सचिन त्यांच्या पायावर डोके ठेउन आला होता. पण काही फ़ायदा झाला नाही. असो त्यांच्या साठी वेगळा बी बी पाहिजे. बाकी बापु भक्त विरोधक लगे रहो.

Meggi
Wednesday, May 02, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, LOL . "भाव तसा देव नसुन, देणगी तसा देव" :-)

बापूंचं नाही का, "जल्दी इच्छा पूर्ती"... जास्त पैसे लवकर काम :-) देवाल पण लाच देणारे लोक "रामराज्य" आणनार. ऐ. ते. न.


Bapucha
Wednesday, May 02, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HARI OM,
BAPU has told us that no where in vedas it is mentioned that,after the death of husband, woman should remove her MANGALSUTRA,BANGLES & OTHER SAUBHAGYA CHINHAS.she can continue using it.

I have seen a family,even after the death of her husband,the lady is using all her SAUBHAGYA CHINHAS,MANGALSUTRA,BINDI(kunku).She is leaving a confident, respectful (pavitra) life with her 20 year old son.SATYA ,PREM & ANAND are the principles of their life.
Both are BAPU bhaktas.

I just respects her confidence,which she says is due to BAPU only and BAPU is their family's SADGURU.

Even if time comes like that,my wife will follow the same.

Have anybody of u willing to follow the same as it is not mentioned in the vedas.

Or show us where it is mentioned in VEDAS.
OR tell us why u r following such tradition?

Everybody of u should give respectable answer.

(SORRY for english.my BAPU loves only MARATHI.pls wait for some more time for MARATHI.)

Gurudasb
Wednesday, May 02, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे भक्त मूळ उपस्थित मुद्द्याना बगल देण्यात तरबेज आहेत .

Bhramar_vihar
Wednesday, May 02, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो गायकवाड साहेब, अशा प्रथांचं कुणिही समर्थन करत नाही. माझी स्वत:ची काकी जी बापुभक्त नाही तिने देखिल माझ्या काकांच्या निधनानंतर सौभाग्यलेणी घालणे सोडले नाहि. आणि ही गोष्ट आहे १९८० सालची. आणि बापुभक्त कित्येक स्त्रिया आहेत ज्या हे धाडस करु शकत नाहीयेत, ते का? सावरकरांनी, प्रबोधनकारांनी अशा अनेक प्रथांना विरोध केला आहे. त्याला काही देवाचा अवतार असावे लागत नाही.

Anamikaa
Wednesday, May 02, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी,
तुम्ही जे लिहिले आहेत ते मी गोष्टीरुपात माझ्या आजोबांच्या मुखातुन ऐकले आहे आणि वाचले देखिल आहे.पण म्हणुन मुळ मुद्दा बाजुला सारु नका.शब्दच्छल करणे फ़ार सोपे आहे.
( Our Bapu says, if we abuse our mother, it is a sin of no match but if you abuse somebody else's mother still it is a sin and we have to pay for that. Ofcourse, we at the first place should not I repeat should not allow anybody to insult our mother but simultenously we should not insult somebody else's mother ). हे सांगायला बापुच कशाला हवेत हे संस्कार आणि शिकवण तर प्रत्येक सुसंस्कारीत घरातील मुलांना आपल्या मातापित्यांकडुन वडिलधार्‍यांकडुन मिळतच असतात. हे जाणुन अथवा समजुन घ्यायला साईनिवास ला भेट देण्याची मुळीच गरज नाही(निदान मला तरी)
माझ्या पोस्ट मधिल इतर ज्या बाबींचे उल्लेख आलेले आहेत त्यावर जरा प्रकाश टाकलात तर फ़ार बरे होईल.
माझ्या माहितीतले एक बापु भक्त वयाच्या ४५व्यावर्षी काहि उद्योग न करता मोठ्याभावाच्या जिवावर मजा मारत आहेत. मोठ्या भावाने वडिलांच्या मृत्यु पश्चात सगळ्या लहान भावंडांची जबाबदारि घेवुन त्या सगळ्यांना त्यांचे आयुष्य मार्गी लावण्यास मदत केली. पण आज मोठ्या भावाचे वय झाल्यावर त्याच सगळ्या(बापुभक्त) लहानभावंडांनी वडिलोपार्जित सगळ्या संपत्तिच्या आपापसात वाटण्यातर केल्याच शिवाय मोठ्या भावालाच सगळ्यातुन बेदखल केले.याला माझ्या मते नतद्रष्ट असणे असे म्हणतात.जर बापुंची शिकवण बापुभक्तांना वास्तविक जिवनात योग्य आचरण करायला मार्गदर्शक ठरत नसेल तर काय उपयोग?.
तुम्ही ज्या पोटतिडकिने लिहित आहात त्यावरुन तुम्ही फ़ार हळव्या मनाच्या असाव्यात असा माझा कयास आहे.त्या पिडित बापुभक्ताबद्दल तुमचे काय मत आहे?
"अनामिका"




Anjalisavio
Wednesday, May 02, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या पिडित बापुभक्ताबद्दल तुमचे काय मत आहे?

अनामिका, काहिहि होणार नाहि भक्ताकडुन. पण निदान त्या पिडिताचे आणि त्याच्या कुटुंबियाचे तरी डोळे ऊघडु दे ह्या प्रकारामुळे. गुरु काका म्हणाले त्याप्रमाणे हे लोक मुळ प्रश्नाला बगल छान पैकि देतात. ईतके दिवस तुम्हि सांगताय, त्या पिडिताबद्द्ल पण कुणि भक्त आला का मदतिला? मी तर म्हणते त्या पिडित भक्ताची हाक तरी बापुना कशी ऐकु येत नाहि?


Bapucha
Wednesday, May 02, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhramar,

Simple question is:

Have anybody of u willing to follow the same as it is not mentioned in the vedas.

Or show us where it is mentioned in VEDAS.
OR tell us why u r following such tradition?

This question is for everybody.


But personally will u allow ur family members to STOP THIS TRADITION if they accepts it?

pls answer yes OR no.and then put ur comment.


BAPU is putting it on paper bacause he knows VEDAS,PURANAS.HE IS OUR SADGURU,THE SUPREME POWER and he is challenging it.We r quiet sure,BAPU is beyond VEDAS,PURANAS.
thats why we people accept it.

And the base of any discussion must be to accept the changes.Every BAPU bhakta is changing his life qualitatively over the period of time.The only difference is u r looking only into negative aspects.If every reader of this BB is going to accept this minor change in their life,the change is in society will definately going to happen.

BAPU explains everything with SATYA, PREM & ANAND as his tools and we have 108% FAITH in him.

Do u know anybody else with such capacities?Or have u faith in anybody?
We are in lacs and number is growing.
HARI OM.









चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators